Blog

  • चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनला मिळाला 80 कोटी रुपयांचा निधी

    News34

    चंद्रपूर- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे ऐतिहासिक कार्य होत असून पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सोयीसुविधांसह विकास होत असून गोंडकालीन वैभव प्राप्त चंद्रपूरातील चंद्रपूर रेल्वे स्टेशन, चांदा फोर्ट व बल्हारशाह या स्थानकांचा विकास 80 कोटी निधीतून होत आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे मनःपूर्वक आभार मानतोे.

    हे कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरीता अनमोल भेट असून केंद्र शासनाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम एकप्रकारे महोत्सव असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या शुभहस्ते होऊ घातलेल्या व्हीडीओ काॅन्फ्रेन्सिंग द्वारे भूमीपूजन सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना केले.

    अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर रेल्वेस्थानकाचा पूनर्विकास या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या वतीने दि 06 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थित नागरीकांना हंसराज अहीर संबोधित होते. याप्रसंगी चंद्रपूर चे आ. किशोर जोरगेवार, एमईएल कार्यकारी संचालक के. रामकृष्ण, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल,चंद्रपूर महाऔष्णीक केंद्राचे मुख्य अभियंता गिरीष कुमारवार, रेल्वेचे सिपीएम विनोद बंगाले, स्टेशन मास्टर एस.आर.देवगडे, विजय राऊत, रमणिकभाई चव्हाण, राखीताई कंचर्लावार, डाॅ मंगेश गुलवाडे, रघुवीर अहीर, पूनम तिवारी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात असलेल्या मागणीची या योजनेच्या माध्यमातून परिपूर्ती होणार आहे. या पूनर्विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर स्टेशनकरीता 27.66 कोटी, चांदा फोर्ट करीता 16.00 कोटी व बल्हारशाह करीता 34 कोटी निधी मंजूर झाला असून या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या सोयीकरीता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारच्या गतिमान धोरणांस अभिप्रेत असलेले हे काम गुणवत्तापूर्ण व निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांकरीता रेल्वेच्या अनेक सोयी-सुविधा देता आल्या मात्र कोरोना काळात दुर्भाग्याने अनेक महत्वाच्या गाड्या बंद पडल्या त्या पूर्ववत करण्याचा कसोशिने प्रयत्न करु,. तिसऱ्या लाईनचे काम पूर्ण होत आहे, पिटलाईन पूर्णत्वास आली असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या अनेक गाड्या बल्हारशाह येथून सुटणार आहेत. आपल्या ऋणांची परतफेड करणे हे कर्तव्य असून त्याकरीता सदैव कटिबध्द राहील. चंद्रपूर, बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा पूनर्विकास पहिल्या टप्प्यात होत आहे हा सौभाग्याचा क्षण आहे.

    यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या व मान्यवर अतिथिंच्या शुभहस्ते विद्याथ्र्यांना भेटवस्तू देण्यात आली.
    या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचे स्वागत करुन हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून अमृत भारत योजनेत तेही पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, चंादा फोर्ट व बल्लारपूर रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयींनी स्वयंपूर्ण होणार असल्याचे सांगीतले.

    या कार्यक्रमास राजू घरोटे, राजेंद्र अडपेवार, संजय कंचर्लावार, विनोद शेरकी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, रवि आसवानी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवि लोणकर, वंदना संतोषवार, गौतम यादव, सुदामा यादव यांचेसह रेल सुविधा संघर्ष समितीचे रमेश बोथरा, नरेंद्र सोनी, डाॅ गोपाल मुंधडा, डाॅ भूपेश भलमें व शहरातील विविध क्षेत्रातील गनमान्य नागरीक उपस्थित होते.

  • अमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान ठरेल – आमदार किशोर जोरगेवार

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर हा ऐतिहासीक जिल्हा आहे. सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. राज्य भरातून येथे कामगार वर्ग स्थायी झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. औद्योगिक करणालाही गतीशील करण्यात रेल्वेचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास चंद्रपूर जिल्ह्यासह सर्व औद्योगीक जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर मुख्य रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. आर देवगडे, रेल्वे अधिकारी सुभाष यादव, जिल्ह सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता कुमरवार, रमनिक चैव्हाण, रेल्वे विभागाचे चिफ कमर्शिअर इन्स्पेक्टर क्रिष्णा कुमार सेन, माजी महापौर राखी कंचर्लावार, विजय राऊत, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटीका वंदना हातगावकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याचे ऐतिहासिक धार्मिक, सामाजिक, औद्योगीक असे महत्व आहे. देशात असलेल्या दोन दिक्षाभुमी पैकी एक दिक्षाभूमी चंद्रपूरात आहे. येथे सिमेंट, कोळसा, लोहखनीज असे मोठे उद्योग आहे. येथे 500 हजार मेगावॅट विद्युत निर्मीतीचे केंद्र आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य येथे आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक चंद्रपूरात येत असतात रेल्वे हेच त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे या स्थानकांवर उतरताच त्यांना चंद्रपूरच्या संस्कृतीचे सुंदर चित्र दिसायला हवे असे ते यावेळी म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा विकास होत आहे. या विकासामुळे चंद्रपूरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. प्रवाशांना आता येथे अधिक सुविधा मिळतील. येणा-या पर्यटकाला पून्हा चंद्रपूरात याव अस वारंवार वाटेल असे संदर रेल्वे स्थानक येथे उभे राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. येथील रेल्वे स्थानकांवर विविध रेल्वे गड्यांचा थांबा असला पाहिजे असे ही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात जळाला अवैध सुगंधित तंबाखू

    News34

    चंद्रपूर – शहरातील प्रशासकीय भवनात असलेले अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला सकाळी आग लागली, या आगीत कागदपत्रे व जप्त केलेले अवैध सुगंधित तंबाखू जळाले असल्याची माहिती आहे.

    सकाळी प्रशासकीय भवन परिसरातून फेरफटका मारताना काही नागरिकांना वरच्या मजल्यावरून धूर निघताना दिसला याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

    तात्काळ अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व लवकर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

    सदर आग कशामुळे लागली याबाबत कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जप्त असलेला सुगंधित तंबाखूचा काही साठा जळाला अशी माहिती पुढे आली आहे.

    शहरातील हवेत काही वेळ तंबाखू मिश्रित धूर मिसळण्याचे काम काही वेळ सुरू होते.

  • चंद्रपूर शहर बनले समस्यांचे माहेरघर

    News 34

    चंद्रपूर शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे,शहरात ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून नागरिकांना पायदळ किंवा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.

    रस्त्यावरील खड्ड्या मुळे दररोज अपघात सुद्धा होत आहेत, त्याचप्रमाणे आता पावसाळा सुरू आहे आणि थोडा जरी पाऊस आला तर शहरात नदीचे रूप बघायला मिळते त्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरते.

    Pub-G च्या नादात मुलाने केली आई-वडिलांची हत्या

    नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, बाबूपेठ प्रभाग तर समस्यांचे माहेरघर आहेत,बाबूपेठ गेट ते फुले चौकापर्यंत खडेच खड्डे आहेत, नालीवर झाकण नसल्यामुळे सर्वत्र घाण रस्त्यावर येतात,अमृत योजनेतून रस्ता फोडल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

    या सर्व समस्याला वाचा फोडण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे नेतृत्वात तसेच उपस्थितीत उपायुक्त महानगर पालिका चंद्रपूर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

    यावेळी उपायुक्त यांनी आयुक्त साहेब नसल्यामुळे मी आपण निवेदनात दिलेल्या सर्व समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो आणि नक्कीच मार्गी लावतो असे शिस्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्ट मंडळाणी उपायुक्त याना जर या समस्या वेळेत सुटल्या नाही तर काँग्रेस पक्षातर्फे महानगर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा दिला.

    यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश पदाधिकारी अश्विनीताई खोब्रागडे,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी माजी नगरसेविका विनाताई खनके,सकिनाताई अन्सारी,वंदनाताई भागवत ,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष निशाताई ढोंगळे अल्पसंख्याक विभागाच्या महिला पदाधिकारी मुन्नीताई शेख ,महिला काँग्रेस च्या जयश्री जाधव ,सुवर्णा भारस्कर,अंजु वैरागडे ,लीला बुटले,तेजस्विनी पोडे, शीतल लेडांगे,यांचे सह महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आनंदोत्सव मनाते कई लीटर दूध सड़क पर बहाया

    News34

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉तेलंगाना के मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ने राज्य के किसानों का 19 हजार करोड़ का कर्ज माफ कर दिया, साथ ही परिवहन विभाग के 42 हजार कर्मचारियों को सरकार में विलीन किया. उनके इस निर्णय का हर स्तर पर स्वागत हो रहा है.

     

    महाराष्ट्र में उनकी पार्टी के कार्यकर्ता आनंदोत्सव मना रहे हैं. जगह – जगह आतिशबाजी की जा रही है एवं मिठाई का वितरण किया जा रहा है. चंद्रपुर, बल्लारपुर, राजूरा, घुग्घुस आदि स्थानों पर यह जश्न मना. सभी जगह नारेबाजी की गई और लोगों में मिठाई बाटकर पार्टी की महिमा मंडीत करने का प्रयास किया गया. परंतु बल्लारपुर में अलग ही नजारा दिखा. यहां के कार्यकर्ताओं ने आतिशबाजी करने के साथ ही चंद्रशेखर राव की फोटो को दूध से नहलाते हुए कई लीटर दूध सड़क पर बहा दिया. जो सबके पैरों के नीचे आता रहा.

    👉भारत राष्ट्र समिति राजुरा विधानसभा महिला समन्वयक रेशमा चव्हाण, सह-समन्वयक संतोष कुलमेथे, बाबाराव मस्की, भूषण फुसे, मीनाक्षी मून, तालुका समन्वयक अजय साकीनाला, महिला तालुका समन्वयक ज्योति नले, शहर समन्वयक रवि पवार, सहसंयोजक प्रदीप पोपटे, सास्ती शहर समन्वयक शंकर कोटले के नेतृत्व में राजुरा में यह उत्सव मनाया गया.

    एका महिलेने अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहव्यापार करण्याचे काम केले मात्र पोलिसांनी या घटनेचा भांडाफोड केला आहे..सविस्तर बातमी वाचा

    वहीं बल्लारपुर के गणपति वार्ड स्थित पार्टी कार्यालय के सामने जश्न मना. सभी कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री की फोटो पर दुध डालकर नहलाया. जमकर नारेबाजी की. सारा दुध उनके पैरों के नीचे से होते हुए सड़क पर बहता रहा. किन्तु किसी के भी ध्यान में यह बात नही आई कि सड़क पर बहते हुए दूध को एकत्रित कर उसका सदुपयोग किया जाए.

  • या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

    News34 crime

    चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 11 आरोपीना अटक केली यामधील 1 आरोपी आधीच बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    शुक्रवारी सायंकाळी वरोरा पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद वर्तन करताना आढळली, पोलिसांनी तिची विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता मी कस्टमर कडे जात आहे अशी माहिती त्या मुलीने पोलिसांना दिली.
    वरोरा शहरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती पटल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 2 एजंट ला ताब्यात घेतले यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

    पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तिच्यासोबत देहव्यापार करणाऱ्या २२ वर्षीय महिलेला तसेच एका पुरुष एजंटला ताब्यात घेतले. या दोघांनी काही ग्राहकांची नावे दिली. पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून त्यापैकी एक बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    याबाबत अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी सांगितले की, सर्व आरोपी आणि ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर बलात्कार, बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि Pita या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे, असेही नोपानी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले असून आरोपी महिला, एजंट आणि ग्राहकांची चौकशी करण्यासाठी आठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनी ज्या आरोपीना ताब्यात घेतले आहे हे सर्व त्या एजंट च्या ओळखीचे ग्राहक होते, मुलगी अल्पवयीन असल्याने 9 आरोपीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी हे वरोरा तालुक्यातील असल्याची माहिती आहे.

    सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे, विशेष म्हणजे यामध्ये पुन्हा 5 ते 10 आरोपींची संख्या वाढणार अशी माहिती नोपाणी यांनी दिली आहे.

  • 6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात

    News34

     

    वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती

    कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद आपले मास्तर प्रा.नितेश कराळे सर वर्धा यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सह इयत्ता १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ctv वरोरा लोकल चॅनेलचे भव्य उदघाटन आणि उन्माद विषमतेचा या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

    सदर कार्यक्रमाचे उदघाटन आयुष नोपानी (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेशजी सोलापण जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर हे राहणार आहेत.

    कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे, परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर, ॲड पुरुषोत्तम सातपुते ज्येष्ठ अधिवक्ता चंद्रपूर, प्रकाश बाबू मुथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माढेळी, धनराज पाटील आस्वले कार्यकारी अध्यक्ष, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, सुषमाताई श्री शिंदे, विश्वस्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल टेबल ट्रस्ट चंद्रपूर, शोभाताई वेले ज्येष्ठ कवयित्री नागपूर, सुधाकर कडू गुरुजी विश्वस्त ,महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा यांची उपस्थिती राहणार आहे.

    आयोजित कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशफाक शेख अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा सुनिल शिरसाट सचिव, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा संजय तोगट्टीवार सचिव स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, हितेश राजनहिरे ,संघटक , महाराष्ट्र राज्य ग्रामीण मतदार संघ वरोरा अमर गोंडाने, सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा मुजाहिद कुरेशी ,फैज पटेल, विश्वदीप गोंडाने ,अजीम शेख, अहेफाज शेख यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती

    News 34 jobs

     

    चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

     

    सदर रिक्त पदांकरीता इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर 4 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 च्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करता येणार आहे. तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जि.प. चंद्रपूरच्या www.zpchandrapur.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     

    तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर ठराविक दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांक 07172-255592 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड मंडळ निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.

  • वनमंत्री मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा

    News34

    चंद्रपूर – वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत  पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

    यासंदर्भात शुक्रवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले की, राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्य जीव संघर्षामध्येही वाढ होत आहे . हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

    मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे.

    यांसंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे.  03 ऑगस्ट, 2023 रोजी हा निर्णय निर्गमित केला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली.

    ना. मुनगंटीवार आपल्या निवेदनात म्हणाले की, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणीही  होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे  व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे. मात्र, खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे नमूद शासन निर्णयात करण्यात आले आहे.

    वाघ,  बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

    असे मिळेल अर्थसहाय्य

    वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणा-या रक्कमेपैकी रुपये 10 लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लाख पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये 10 वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

  • Why every American has a stake in Biden’s..

    Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua. Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua.

    Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua.

     Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s

    Lorem Ipsum?

    Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries,

    It has survived not only five centuries.

    Officia pariatur? Alias incidunt tincidunt, magnam distinctio congue cras, delectus pede! Tincidunt beatae habitant ullam. Aute reiciendis nemo aut alias unde laboriosam placerat sequi! Atque habitasse fringilla similique. Dis odit voluptate dis rutrum dui praesentium? Justo?

    Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer.

    Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua. Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua.

    Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore et dolore magna aliquyam erat, At vero eos et accusam et justo duo dolores et ea rebum. Lorem ipsum dolor sit amet, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. Stet clita kasd gubergren, no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. no sea takimata sanctus est Lorem ipsum dolor sit amet. sed diam voluptua. Lorem ipsum dolor sit amet,sed diam nonumy eirmod tempor invidunt ut labore.