Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • जनसंवाद पदयात्रेचा इफेक्ट

    News34 गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेने काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मुल तालुक्यातील कोसंबी, मारोडा, आदर्षखेडा, उषराळा, भादूर्णी, मरेगाव, चीतेगाव, बेलगाटा, चिखली, गांगलवाडी, डोंगरगाव, राजोली, ताडाळा, चीचाळा, हळदी, भेजगावं, येरगाव, चांदापुर, जूनासुरला, गडीसुरला, नवेगाव (भू), बाबराळा, बेबाळ, बोंडाळा, नांदगाव, जानाळा, फूलझरी ,कांतापेठ, टोलेवाही, चिरोली, हेटी, खालवसपेठ, उठलपेठ, नलेश्र्वर, सुशी, केळझर इत्यादी गावात पदयात्रा काढून काँग्रेसचे पदाधिकारी, महिला,पुरुष व युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवादल काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी होऊन केंद्र व राज्य सरकारने चालवलेली हुकूमशाही, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार ,विजेचे वाढते दर, शेतकरी दुष्काळ, मानवावर वन्य प्राण्यांचे हल्ले, लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, विजेचे वाढीव दर, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, खोटे खटले दाखल करुन लोकशाहीची हत्या करणे अशा महत्वाच्या समस्याची जाणीव चर्चेतून सर्व सामान्य जनतेशी संवाद साधून समजाऊन सांगण्यात आली. Congress party news

     

    पदयात्रेत काँग्रेसने सी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक, ३४ ग्राम पंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्य, माजी नगरसेवक, सहकारी सोसायट्यानचे अध्यक्ष व सदस्य, तालुकाचे अध्यक्ष व पदाधिकारी युवक कांग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी, महिला काँग्रेसचे अध्यक्षा व पदाधिकारी, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा व पदाधिकारी, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष पदाधिकारी, ओबीसी सेल, किसान सेल पदाधिकारी, औद्योगिक सेलचे पदाधिकारी, व तालुक्यातील कांग्रेस प्रेमी पदयात्रेत सहभागी झाले. यात्रेत असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

     

    बेंबाळ येथे भाजप व वंचीत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    बेंबाळ यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे गंगाधर आनंदराव बोरकर व वंचीत आघाडीचे प्रमोद वाळके, साजिद उराडे यांनी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यात्रेचे नेतृत्व सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोष सिंहरावत यांनी प्रवेश करणाऱ्यांचे पुष्प गुच्छ व गळ्यात काँग्रेस दुपट्टा घालून स्वागत केले अभिनंदन केले.

     

    याप्रसंगी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी तालुकाध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पाटील वाढई, राजू पा. मारकवार, सरपंच चांगदेव केमेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, प्रशांत उराडे, उपसरपंच देवाजी ध्यांनबोइंनवार, माजी सरपंच विजय बॉम्मावार,किशोर नंदीग्रामवार, विनोद वाढई, गणेश नीलमवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी दीपक कोटगले, ज्येष्ठ कांग्रेस नेते नत्थु पा.आरेकर, बंडूभाऊ गुरनुले,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी, सेवादलाचे नामदेवराव गावतुरे, संचालक सुमित आरेकर, युवा नेते मनी बुग्गावार, पं.स.माजी उपसभापती. दशरथ वाकुडकर, सरपंच हिमानी वाकुडकर, बाजार समिती संचालक योगेश शेरकी, जालिंदर बांगरे, सरपंच धीरज गोहने, संतोष चावरे, संदीप मोहबे, तालुका महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, शशिकला गावतूरे ,शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, सचिव शामला बेलसरे,सीमा भसारकर, समता बनसोड, लता निंदेकर यांचेसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • अखेर त्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात 7 सप्टेंबर ला वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले होते मात्र 9 सप्टेंबरला रेस्क्यू केलेल्या बछड्याचा मृत्यू झाला. Tadoba tiger cube

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले होते.

     

    अशक्त वाघाच्या बछड्याला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले होते, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे. मात्र उपचारा दरम्यान आज बछड्याचा मृत्यू झाला.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिव्य मराठीला माहिती दिली की सदर बछडा हा भुकेने व्याकुळ झाला होता, वाघीण शिकारीला निघून गेल्याने बछड्याना दूध मिळालं नाही, त्यामुळे 2 बछड्याचा मृत्यू झाला, मात्र आम्ही एका बछड्याला रेस्क्यू करीत वन्यजीव उपचार केंद्रात आणले, त्या बछड्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो उपचाराला सहकार्य करीत नव्हता, 3 ते 4 दिवस तो बछडा उपाशी असल्याने त्यांच्या शरीरातील अवयव उपचाराला साथ देत नव्हते, आज उपचारा अंती त्याचा मृत्यू झाला.

    वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसर व इतरत्र कॅमेरे लावले आहे, मात्र जंगलाची व्याप्ती मोठी असल्याने वाघीण नेमकी कुठं गेली याबाबत सांगता येत नाही, तरीसुद्धा वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

  • सहायक कामगार आयुक्त पोहचले आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात

    News34

    चंद्रपूर – सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या अनेक रास्त मागण्या प्रलंबित आहे. त्यांना निष्कृष्ट दर्जाचे सुरक्षा साधने दिल्या जात आहे. हा अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्या प्राथमिकतेने सोडवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना दिले आहे.

     

    सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले आहे. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी, माथाडी बोर्ड क्लर्क चे संतोष नवाते, लेखापाल रवींद्र चाहारे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आनंद रणशूर, नितेश गवळी सुरक्षा महामंडळातील कामगार संतोष कटरे, संजय क्षिरसागर, मारोती रतनकर, सचिन करमरकर, समीर काजी यांच्यासह इतर कामगारांची उपस्थिती होती.

     

    सुरक्षा रक्षक महामंडळातील नोंदणीकृत कामगारांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे या कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गार्ड बोर्ड नियमानूसार उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने त्यांना दिल्या जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला.

     

    सुरक्षा रक्षक हे जबाबदारी चे काम आहे. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे ही महामंडळची जबाबदारी आहे. त्यांना नियमानुसार मिळणार असलेले सर्व सुरक्षा व गरजेची साधने आपण तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत, सदर साहित्यांचा दर्जा गार्ड बोर्डाने निर्धारित केलेल्या निकषानुसार असला पाहिजे अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना केल्या आहे.

     

    सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा महामंडळात नोंदणी झालेल्या कामगारांना नोंदनीची पावती देण्यात आलेली नाही. सदर पावती त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उपचारा करिता रुग्णालये निर्धारीत करुन देण्यात यावी, प्रत्येक कामगाराला स्वतंत्र वेतन पावती देण्यात यावी, गार्ड बोर्डाच्या नियमानूसार प्रत्येक वर्षी त्यांना गणवेश व इतर सुरक्षा साधने देण्यात यावी आदी सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे. कामगार हा प्रमूख घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका त्यांच्या मागण्यांकडे विषेश लक्ष देत त्या सोडविल्या जाव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांना केल्या आहे.

  • माढेळी ते नागरी ते जिल्हा सीमा रस्त्याची स्थगिती उठवा

    News34

    चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वरोरा – भद्रावती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. त्यावेळीच अर्थसंकल्प २०२२ मध्ये वरोरा तालुक्यातील माढेळी ते नागरी ते जिल्हा सीमा अ) रस्ता किमी ०/०० ते ५/ ०० ता. वरोरा अं. कि. ३९९ लक्ष तसेच ब) रस्ता किमी ५/ ०० ते १० / ०० ता वरोरा अं. कि. ३९९ लक्ष मजुरी प्रदान करण्यात आली होती.

     

    परंतु शिंदे सरकारमध्ये यावर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांची गैरसोय होत असून तात्काळ स्थगिती उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

     

    वरोरा – भद्रावती मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. येथील शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल पोहचविण्याकरिता पक्के रस्ते निर्माण करण्याच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मतदार संघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात रस्त्याना निधी मंजूर करण्यात आला होता.

     

    परंतु नवीन सरकारच्या काळात मतदार संघातील शेकडो कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ही सर्व कामे रखडली आहेत. येथील नागरिकांवर हा अन्याय असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे. त्यांची हि मागणी रास्त असून तात्काळ स्थगीती उठविण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. या कामांवरची स्थगिती उठल्यास हजारो नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

  • Devastating Earthquake Hits Morocco: 632 Dead and 329 Injured

    An early morning earthquake has caused massive devastation in the African country Morocco. The earthquake, with a magnitude of 6.8, resulted in the collapse of numerous buildings, leading to a tragic loss of life. As of now, 632 people have been reported dead, and 329 individuals have been injured. Rescue operations are underway, but there are concerns that the death toll may increase further.

     

    The epicenter of the earthquake was located approximately 70 km from the city of Marrakesh, Morocco. However, its impact was felt far beyond, with the capital Rabat, located about 350 km from Marrakesh, also experiencing the tremors. Moroccan Interior Ministry spokesman, Rashid Al Khalfi, revealed that in some areas, the intensity of the earthquake reached a level 7.

     

    The earthquake originated in Ighil, situated in the Al-Hawz province of Morocco. According to the United States Geological Survey (USGS), this is the most powerful earthquake to occur in North Africa in the last 120 years. Remarkably, no earthquakes of magnitude 6 or higher have been recorded within a 500 km radius of this region since 1900, except for 9 earthquakes measuring magnitude 5.

     

    Authorities are working tirelessly to provide aid and support to the affected areas. The international community has also offered assistance to help the country recover from this natural disaster. Our thoughts and prayers go out to the victims and their families during this difficult time.

  • निधनानंतर संपूर्ण कर्ज माफ करणारी चंद्रपुरातील एकमेव शिक्षक पतसंस्था

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर ही पतसंस्था मोठी करण्यात सर्व सभासदांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पतसंस्थेतील कर्जदार सभासदांचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास पूर्ण कर्ज माफ केले जाते, असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.

    नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूरच्‍या वतीने शिक्षक दिनी जिजाऊ लॉन येथे सेवानिवृत्त सभासद, सभासदांचे १० वी, १२ वी व पदवीतील गुणवंत पाल्य, विशेष प्राविण्य एमपीएससी सिलेक्ट, आचार्य पदवी प्राप्त सभासद यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्‍हणून पतसंस्‍थेचे संस्‍थापक अध्यक्ष तथा आमदार  सुधाकर अडबाले तर अध्यक्षस्थानी उपाध्यक्षा संध्याताई चंद्रकांत गोहोकार, प्रमुख अतिथि प्रकाश कुंभारे, जगदीश जुनघरी, सीमा अडबाले, मानद सचिव सुरेंद्र अडबाले, दिलीप मोरे, अशोक बोढे, प्राचार्य संजय ठावरी, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सुनील शेरकी, शरद डांगे, डॉ. विजय हेलवटे यांची मंचावर उपस्थिती होती.

    पतसंस्थेत आजमितीस ६६६७ सभासद असून नागपूर विभागात मुख्य शाखेसह १५ शाखा आहे. कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा मानस असून लवकरच संपूर्ण विदर्भ कार्यक्षेत्र असणार आहे. आपल्या विश्वासास तडा जाऊ न देता प्रामाणिक कार्य करणार आहे. सभासद, सेवानिवृत्त सभासद ठेवीदार आहेत. हा संपूर्ण संचालक मंडळावर विश्वास आहे. कर्मचारी चांगली सेवा देत असल्याने ते शक्य होत आहे. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय निर्णयानुसार पगार व भत्ते दिल्‍या जात असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

    पतसंस्थेचा विकास व कार्यावर प्रकाश कुंभारे, सीमा अडबाले, संजय ठावरी, सुनील शेरकी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त व सेवानिवृत शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य शिक्षकेत्तर कर्मचारी, गुणवंत पाल्य यांचा आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार सुधाकर अडबाले यांचा पतसंस्‍थेच्या वतीने संचालकांच्या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेंद्र अडबाले यांनी केले. संचालन विखार सर, तर आभार व्यवस्थापक प्रदीप वासेकर यांनी मानले.

    दुसऱ्या सत्रात सहकार प्रशिक्षण केंद्राचे मोरे साहेब व ॲड. खासरे यांनी पतसंस्‍थेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

  • पद्मश्री परशुराम खुणे यांनी घेतली अम्माची भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवास स्थानी अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमातून शेकडो गरजूंना मायेचा घास भरविल्या जात असल्याचे म्हणत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती.

     

    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीला दररोज घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. सदर उपक्रमाला राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली असून उपक्रमाचे कौतूक केले आहे.

     

    कुटुंब निरोगी तर समाज निरोगी आणि समाज निरोगी तर आपला देश निरोगी या सशक्त, सुदृढ समाज सूत्राचे पालन करत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या स्वगृही अम्मा का टिफिन या उपक्रमाची गेल्या तीन वर्षापूर्वी सुरवात केली. याच माध्यमातून गरजूंची दर महिन्यात आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य त्याप्रमाणात मोफत औषध औपचार दिल्या जातो. समाजाचे आपण काही देणे लागतो या सामजिक भावनेतून समाजातील गरजू व्यक्तींना अम्मा का टिफिन घरपोच दिल्या जातो.

    दरम्यान आज शुक्रवारी झाडीपट्टी नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने डंका वाजविणारे पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी येत अम्माची भेट घेतली. यावेळी अम्मा चा टिफिन परिवाराशी त्यांनी चर्चा केली. अम्माने कष्ट करुन जोरगेवार कुटुंबाला उभे केले आहे. आजच्या पिढीसाठी अम्माचा प्रवास प्रेरणादाई आहे.

     

    मुलगा आमदार असतांनाही अम्माने कष्ट करण्याचा मार्ग सोडलेला नाही. कधीकाळी गरिबीचे चटके सोसलेल्या अम्माने आता गरीब गरजूंसाठी सेवा कार्य सुरु केले आहे. त्यांनी सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम अनेक गरजुंसाठी उपयुक्त असल्याचे ते यावेळी म्हणाले.

     

  • येत्या निवडणुकीत सरकारला जागा दाखवू – ओबीसी महापंचायत

    News34

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    जालन्यातील झालेला लाठीचार्ज याचा ओबीसी समाजाने निषेध केला आहे, सरकारने निजामशाही मधील कुणबी समाजाचे दाखले द्या व कुणबी प्रमानपत्र देणार मात्र मराठा समाजाकडे निजामशाही चा पुरावा नसल्याने त्यांनी ओबीसी समाजात सामील करावे अशी मागणी केली.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन केले, या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करा व मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये असे ठराव मांडण्यात आले.

     

    मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या, आधीच ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, जर त्यांच्याकडे निजामशाही चे दाखले पुरावे असतील तर त्यांना आरक्षण द्या पण सरसकट नको, मराठा समाजाने आजपर्यंत मोठे मोर्चे काढले आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली आहे.

     

    ओबीसी समाजाला मोठा मोर्चा काढायचा आहे यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसी समाजाच्या बैठका लावा, मोर्च्यांचे नेतृत्व आपल्याला करायचं आहे.

     

    ओबीसी महापंचायतीमध्ये सोमवार 11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करणार आहे. 17 सप्टेंबर ला ओबीसी समाजाचा महामोर्चा विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार आहे.

    ओबीसी महापंचायती मध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ, तेली महासंघ, माळी महासंघ व विविध राजकीय पदाधिकारी सहित एकूण 20 संघटना सामील झाल्या होत्या.पंचायत मध्ये बबनराव फंड, अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर ,माजी देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, संदीप गिरे, सतीश भिवगडे, पुरुषोत्तम सातपुते, अरुण तीखे,शाम लेडे, रजनी लेडे, डॉ संजय घाटे, अनिल धानोरकर, सूर्यकांत, खनके मनीषा बोबडे, गणेश आवारी, अविनाश पाल ,निलेश बेलखेडे, रवींद्र टोंगे, राजेंद्र खांडेकर, अजय बलकी, हितेश लोडे, अनिल डहाके आदींची उपस्थिती होती.

  • मराठा आरक्षणावरून विदर्भ तेली महासंघाने सरकारला दिला इशारा

    News34

    चंद्रपूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला दिला आहे.

     

    यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके, माजी महापौर संगीता अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे यांची उपस्थिती होती.

     

    जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे (ता. अंबड) या गावी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे. त्या ठिकाणी उपस्थित जमावावर दि. २ सप्टेंबर, २०२३ रोजी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. त्याचा विदर्भ तेली समाज महासंघाने यावेळी निषेध केला.

     

    सन १९९३ पासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, मागासलेपणाच्या निकषात ते बसत नसल्याने न्या. खत्री व न्या, बापट कमिशनने त्यांना आरक्षण नाकारले होते. श्री. नारायण राणे कमिटीचा (२०१२) अहवाल असंविधानिक असल्याने उच्च न्यायालयात त्याला स्थगिती दिली गली. न्या. गायकवाड आयोगाने मराठा समाजासाठी शिफारस केलेले १२ % (शिक्षण) व १३% (नोकरी) आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.

     

    संविधानाच्या कलम १५(४) व कलम १६(४) नुसार या समाजाला अपवादात्मक परिस्थितीच्या कारणास्तवसुद्धा ५०% च्यावरील आरक्षण देता येणार नाही. असे मान. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या दि. ५ मे, २०२१च्या निकालात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसींमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसींवर अन्याय होईल.

     

    त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीत मराठा जातीचे ओबीसीकरण करू नये. त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये. हे दिल्यास फक्त कुणबी समाजावरचा अन्याय होणार नसून संपूर्ण ओबीसी समाजावर हा अन्याय आहे. त्यामुळे हा अन्याय तेली समाज कदापि सहन करणार नाही. या विरोधात तेली समाज रस्त्यावर उतरेल, तसेच राज्यपातळीवर बिहार राज्याच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा. आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा.

     

    राज्य सरकारने ओबीसींविरोधी अन्यायकारक निर्णय घेतल्यास संपूर्ण राज्यात ओबीसी रस्त्यावर उतरतील. आणि ओबीसीविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्वच पक्षांच्या विरोधात आगामी निवडणूकांत मतदान करील, असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाचे यांनी दिला आहे.

  • चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागासवर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    मंत्रालयात ना.  मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे,  जिल्हाधिकारी विनय गौडा,  हरीश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, दूरदृष्य प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, एमएआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक  स्वाती पांडे उपस्थित होत्या.

     

    मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात फ्लाईंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे  या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपती कडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

     

    चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते, ते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेल, असेही श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.