Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • आयटीआय निदेशकांच्या समस्यांबाबत सकारात्मक बैठक

    ITI Directors Association : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री. सुधाकरजी अडबाले यांच्या विशेष प्रयत्नांनी व प्रमुख उपस्थितीत खात्याच्या अप्पर मुख्य सचिव सन्माननीय श्रीमती मनिषा वर्मा मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेसोबत विविध मुद्द्यांवर बैठक आयोजित केलेली होती. (हे हि वाचा – प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश, उमेदवारांना मिळाला दिलासा)

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक

    सदर बैठक प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी नागपूर विभागाचे पदवीधर आमदार सन्माननीय श्री अभिजितजी वंजारी सुद्धा पूर्णवेळ उपस्थित होते.

    बैठकीला संचालक श्रीमती माधवी सरदेशमुख तसेच उपसचिव श्री मठपती, सहसंचालक श्री. सूर्यवंशी, श्री गावित साहेब (ऑनलाइन) हे चर्चेत उपस्थित होते. ITI Directors Association

    कालमर्यादेत प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत

    हिवाळी अधिवेशनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने शासनास दिलेल्या पत्रात असलेल्या सर्वच तेराही मुद्द्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. मा. अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा मॅडम यांनी सर्व मुद्दे एक – एक करून संघटना, संचालनालय आणि मंत्रालय स्तर यामध्ये नेमके कुठे समस्या निवारणार्थ उपाययोजना आवश्यक आहे आणि किती कालावधीत उपाययोजना व्हावी, याबाबत कालमर्यादेत प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांनी सुद्धा संघटनेची न्यायिक बाजू मांडली.

    यावेळी सन्माननीय अप्पर सचिव मॅडम यांची प्रशिक्षण योजनेमधील सुधारणा आणि प्रशिक्षणार्थी कल्याण याविषयीची कळकळ वेळोवेळी जाणवून आली. त्यांनी यावर आवाहन करताच संघटना केवळ प्रशिक्षण याविषयावरच समर्पित एक बैठक आपणासोबत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगताच त्यांनी लवकरच ही बैठक आपण आयोजित करू असे आश्वस्त केले. एकंदरीतच दीड तास चाललेल्या या बैठकीत अनेक समस्या निवारणार्थ निर्णय घेण्यात आलेले असून त्यादृष्टीने गतीने पावले उचलण्यात येतील याबद्दल अपर मुख्य सचिव यांनी आश्वस्त केले. Skill Development Maharashtra

    बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी मागील वर्षभरातील सभागृहातील कार्याची आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्तक अपर मुख्य सचिव वर्मा मॅडम यांना भेट दिले.

    महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संघटनेचे मार्गदर्शक, माजी सरचिटणीस तसेच नॅशनल फेडरेशनच्या Advisory Board चे अध्यक्ष श्री भोजराजजी काळे, माजी सरचिटणीस श्री दुर्गपुरोहित, अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीपजी कडू, राज्य अध्यक्ष श्री विनोदजी पाटील, राज्य सरचिटणीस श्री राजेशजी खडबडे, राज्य उपाध्यक्ष श्री संजयकुमार खर्चे, राज्य सहचिटणीस श्री शिवाजी ढुमने, राज्य सहचिटणीस श्री मंगेश पुंडकर, राज्य खजिनदार श्री प्रवीणजी वाइनदेशकर, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव गुडधे, राज्याच्या महिला सदस्य श्रीमती शर्मिला कळमकर, नागपूर विभागाचे श्री प्रेमकुमारजी भैसारे, पुणे विभागाचे अध्यक्ष श्री नेताजी दिसले, अमरावती विभागाचे श्री राहुल चौधरी, नागपूर विभागाचे सचिव श्री सचिन मालिचकर, सचिव श्री सिद्धार्थ मेहरे, श्री धीरज सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.

  • प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा

    Municipal Election Expense Relief : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली निवडणूक खर्चाबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्हे वाटप झाल्यानंतरच (दिनांक ११ डिसेंबर रोजी) केलेला खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यापूर्वी केलेला सर्व खर्च ग्राह्य धरू नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे उमेदवारांवरील अतिरिक्त खर्चाचा ताण कमी झाला असून, निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे. Municipal Elections (हे हि वाचा – लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा प्रश्न आणि धक्कादायक वास्तव समोर)

    या मागणीनुसार निवडणूक आयोगाने सकारात्मक कार्यवाही केली असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आणि आयोगाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उमेदवारांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडू नये, या उद्देशाने ही मागणी केली होती. Municipal Election Expense Relief

    उमेदवारांना मोठा दिलासा

    मा. उच्च न्यायालयाने देखील निवडणुकीच्या विलंबामुळे उमेदवारांच्या खर्चात झालेली वाढ मान्य करून, खर्चाची मर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती, ज्यामुळे उमेदवारांच्या खर्चीक वाढीव मागणीला बळ मिळाले होते. या परिस्थितीत, चिन्हे वाटप झाल्यानंतरच झालेला खर्च ग्राह्य धरण्याचा निर्णय झाल्यामुळे, उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. Election Expenses

    या निर्णयामुळे अनेक नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती की, या महत्त्वाच्या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. त्यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे, निवडणुकीतील खर्चाबाबत उमेदवारांमध्ये असलेल्या अनिश्चिततेवर पडदा पडला आहे,व निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भात मर्यादा वाढविण्यात येणार असल्याने आधी केलेल्या खर्चाच्या देखील समावेश होऊन निवडणूक लढविणे उमेदवारांना सोईचे होणार आहे. या निर्णयामुळे खासदार प्रतिभा धानोरकरांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहेत

  • चंद्रपूर जिल्ह्यात ‘Plug and Play’ Industrial Model राबविणार; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    tribal industrial area : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि गोंडपिपरी तालुक्‍यातील करंजी येथील एमआयडीसी  मध्‍ये प्‍लग अॅन्‍ड प्‍ले या धर्तीवर आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकसित करण्‍यासाठी शासन निश्‍चीतपणे सकारात्‍मक विचार करेल. यापूर्वी नाशिक येथे अशा यशस्‍वी प्रयोग करण्‍यात आला आहे. तोच प्रयोग चंद्रपूर जिल्‍हयातील या दोन एमआयडीसी मध्‍ये करण्‍यात येईल असे आश्‍वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभे दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्‍या अर्धा तास चर्चेदरम्‍यान उद्योग मंत्र्यांनी वरील आश्‍वासन दिले. (हे हि वाचा – मुनगंटीवार यांच्या मागणीवर घरकुल साठी ८८ कोटींचा निधी मंजूर)

    या अर्धा तास चर्चेदरम्‍यान बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, आपण स्‍वातंत्र्यांचा अमृत महोत्‍सव साजरा केला. मात्र आदिवासी युवकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी जलदगतीने प्रयत्‍न होताना दिसत नाहीत. चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी तरूण तरूणींना उद्योजक बनविण्‍यासाठी आदिवासी औद्योगिक क्षेत्र निर्माण करणे आवश्‍यक आहे. आदिवासींचे उत्‍थान करण्‍यासाठी आपण विविध योजना राबवितो. मात्र आदिवासी तरूणांमधून उद्योजक तयार होताना दिसत नाहीत.

    आदिवासी तरुणांना संधीची गरज

    चंद्रपूर जिल्‍हयाचे आदिवासी सुपुत्र क्रांतीवीर बाबुराव पुलेश्‍वर शेडमाके हे ब्रिटीशांविरूध्‍द संघर्ष करताना शहीद झाल्‍याचा जाज्‍वल्‍य इतिहास आहे. मी अर्थमंत्री असताना चंद्रपूर जिल्‍हयातील आदिवासी तरूण-तरूणी आठ महिन्‍यांच्‍या प्रशिक्षणात मिशन शौर्य या अभियानाअंतर्गत माऊंट एव्‍हरेस्‍ट सारख्‍या शिखरावर चढले. देशाच्‍या पंतप्रधानांनी या युवकांचे आपल्‍या भाषणात कौतुक केले. आदिवासी तरूण प्रामाणिक आहेत, शूर आहेत मग त्‍यांना संधी का दिली जात नाहीत, असा सवाल करत आदिवासी वसतीगृहांमध्‍ये लागणारे गणवेश व इतर वस्‍तु पुरविण्‍यासाठी आदिवासी संस्‍था, आदिवासी व्‍यक्‍ती यांना संधी देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. tribal industrial area

     बल्‍लारपूर येथे रू.१२.५० कोटी निधी खर्चुन सुषमा स्‍वराज महिला सक्षमीकरण केंद्र तयार करण्‍यात आले आहे. अशाच पध्‍दतीने आदिवासींना कौशल्‍य विकासाची संधी उपलब्‍ध करण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या योजनांशी इंटीग्रेट करण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी प्रतिपादीत केली. ट्रायबल को-ऑपरेटीव्‍ह मार्केटींग फेडरेशन च्‍या माध्‍यमातुन कृषी आधारित, वनआधारित उद्योग चंद्रपूर जिल्‍हयातील एमआयडीसी मध्‍ये स्‍थापन करण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचेही ते म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हा हा आदिवासी बहुल जिल्‍हा असल्‍यामुळे हा प्रयोग चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा आणि करंजी या एमआयडीसीमध्‍ये राबवावा व त्‍यासाठी आवश्‍यक निधी उपलब्‍ध करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात लवकरच दोन्‍ही विभागांच्‍या सचिवांसह उच्‍चस्‍तरीय बैठक घेवून पुढील कार्यवाही करण्‍यात येईल, असे आश्‍वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

  • तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये ही लिंक आली तर नाही ना?

    WhatsApp scam link : चंद्रपूर दि. १३ डिसेंबर २०२५ (News३४) : अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवा संदर्भात बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APK) तसेच SMS/WhatsApp द्वारे खोट्या लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे वाहनचालक व वाहनमालक यांची व्यक्तिगत माहिती चोरी, बँकिंग तपशीलांची गळती आणि ओळखीचा गैरवापर होत आहे. (हे वाचा – चंद्रपुरातील बसपाचे माजी नगरसेवक भाजपात दाखल)

     फक्त खालील अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करा :

    * वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in

    * ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in

    * परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in

    * ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in

    वरील सर्व संकेतस्थळे नेहमी “.gov.in” नेच समाप्त होतात.“.com”, “.online”, “.site”, “.in” अशा इतर डोमेनवरील कोणतीही वेबसाइट उघडू नये. WhatsApp scam link

    असे असतात फसवणूक करणाऱ्यांचे संदेश  :

    * “आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित पैसे भरा” असे धमकीवजा संदेश

    * बनावट पेमेंट लिंक पाठवून त्वरित दंड भरण्याची जबरदस्ती

    * “तुमचा DL सस्पेंड होणार आहे, लिंकवर क्लिक करून तपासा” असे संदेश. परिवहन विभाग किंवा प्रादेशिक परिवहन  कार्यालय कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही.

    खालीलप्रमाणे अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत :

    * RTO Services.apk

    * mParivahan Update.apk

    * eChallan Pay.apk

    तसे केल्यास तुमचा OTP, बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.

    संशयास्पद लिंक/संदेश आल्यास त्वरित तक्रार करा :

    * National Cyber Crime Portal – https://www.cybercrime.gov.in

    * सायबर फसवणूक हेल्पलाइन – १९३०

    * जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन. असे सह परिवहन आयुक्त शैलेश कामत मुंबई यांनी कळविले आहे.

  • सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर 15,058 घरांसाठी ८८ कोटींचा निधी मंजूर

    Yashwantrao Chavan Mukt Vasahat : नागपूर 12 डिसेंबर २०२५ (News३४) – हिवाळी अधिवेशनात आज चंद्रपूरसह राज्यातील भटक्या-विमुक्त, गरीब आणि ग्रामीण कुटुंबांच्या घरकुल समस्येवर सविस्तर व गांभीर्यपूर्ण चर्चा झाली. मंजूर घरांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने ही घरे रखडत असल्याचे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधून, चंद्रपूर जिल्ह्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत निधीची तातडीची गरज व्यक्त केली. यावर सकारात्मक उत्तर देत मंत्री अतुल सावे यांनी तात्काळ 88 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी आश्वस्त केले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हे वाचा – हि व्हाट्सअप लिंक तुमच्या ग्रुपवर आल्यास होणार मोठी फसवणूक)

    मुनगंटीवार यांनी अधिवेशनात मागणी रेटून धरली

    हिवाळी अधिवेशनात आज चंद्रपूर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील भटक्या-विमुक्त, गरीब आणि ग्रामीण रहिवाशांच्या घरकुल समस्येला विशेष महत्त्व देत अर्धा तास चर्चा घेण्यात आली. यावेळी माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी सभागृहापुढे ठामपणे मांडल्या.

    आ.मुनगंटीवार म्हणाले की, 2011 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत घरकुल मंजुरी दिली जाते. योजना रक्कम वाढवून 1 लाख 20 हजार रुपये करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष निधी वेळेवर न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण राहिली आहेत. “एक हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यासाठी लाभार्थी दीर्घ प्रतीक्षा करत आहेत. मंजुरी असूनही निधी लांबणीवर पडल्याने अडचणी वाढत आहेत,” असे त्यांनी सांगितले. Yashwantrao Chavan Mukt Vasahat

    चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर 15,058 घरांसाठी निधी तातडीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यवतमाळ, बीड, जालना आदी जिल्ह्यांतील घरकुल स्थितीचा उल्लेखही त्यांनी सभागृहात केला. मंजुरी दिल्यानंतरही निधी वेळेवर न मिळाल्याने घरे पूर्णत्वास येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    चर्चेला उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “आवश्यक 88 कोटी निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. शंभर टक्के निधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे त्यांनी सांगितले. पुढील घरकुल वाटप पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत ग्रामविकास विभागामार्फत केल्याने प्रक्रिया आणखी गतिमान होईल, असेही त्यांनी नमूद केले.

    या चर्चेत घरकुल प्रश्नाच्या संवेदनशीलतेवर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले. एकीकडे नागरिकांच्या अडचणी मांडल्या गेल्या, तर दुसरीकडे सरकारकडून निधी वितरणाबाबत तातडीच्या निर्णयाचे आश्वासन देण्यात आल्याने समाधानाची भावना व्यक्त झाली.

  • लोकसभेत खासदार धानोरकरांच्या प्रश्नावर धक्कादायक वास्तव समोर

    lung cancer in women : चंद्रपूर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग पंजीकरण कार्यक्रमाच्या अभ्यासामध्ये देशातील महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाशी संबंधित महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. या अभ्यासानुसार, महिलांमधील फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी जवळपास ५३% प्रकरणे ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराची आहेत, जो “गैर-धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा सर्वात सामान्य हिस्टोपॅथोलॉजिक प्रकार” आहे. (हे हि वाचा – खासदार धानोरकरांचा पाठपुरावा यशस्वी, चंद्रपूर मनपात आता IAS दर्जाचा अधिकारी आयुक्त)

    १९८२ ते २०१६ या दीर्घ कालावधीत महानगरांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये लक्षणीय वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी लोकसभेत अतारांकित प्रश्न संख्या २२८२ अंतर्गत केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला होता. त्यात हि गंभीर आकडेवारी समोर आली आहे. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे क्षयरोगाशी (टीबी) मिळतीजुळती असल्याने निदानात होणाऱ्या विलंबाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर शासनाने स्पष्ट केले की, ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत, क्षय रोगाच्या तपासणीदरम्यान कर्करोगाची शंका आल्यास, रुग्णांना त्वरित पुढील निदान व उपचारांसाठी विशिष्ट केंद्रांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कर्करोगाच्या रुग्णांना टीबीसाठी संवेदनशील मानले जाऊन त्यांच्या नियमित तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी देशभरात ३९ संस्थांना मंजुरी देण्यात आली असल्याची आकडेवारीही सभागृहात सादर करण्यात आली. lung cancer in women

    फुफ्फुसांच्या कर्करोगाचे एक अप्रत्यक्ष कारण म्हणून वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जानेवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम लागू केला आहे. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सध्या २४ राज्ये/संघ राज्य क्षेत्रांमधील १३० शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यरत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केलेला हा गंभीर सार्वजनिक आरोग्य विषय आणि त्यावरील शासनाच्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. संबंधित समस्या सोडविण्यासाठी शहर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ वायू कृती योजनांच्या माध्यमातून अंमलात आनंत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. 

  • मोरवा–विमानतळ मार्ग उन्नतीला ६ कोटींची मंजुरी; मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    Morwa Airport Road Upgrade : चंद्रपूर, दि.१२ डिसेंबर २०२५ (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणून मोरवा ते मोरवा विमानतळ मार्गाच्या सुधारणा व उन्नतीसाठी तब्बल ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतूक सुलभता लक्षात घेता अत्यावश्यक असलेल्या या कामासाठी शासनाने अधिकृत मान्यता दिली आहे.

    मोरवा विमानतळ परिसरात नागपूर उडान क्लबच्या DGCA-अनुमोदित प्रशिक्षण सुविधा कार्यरत आहेत. सुरक्षित आणि आधुनिक विमान संचालनासाठी दर्जेदार रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, विमानतळाच्या आधुनिकीकरणासोबत जोडणाऱ्या मार्गाचे उन्नतीकरण अत्यावश्यक झाले होते. यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे मागणी करत सविस्तर पाठपुरावा केला होता. (हे हि वाचा – १४ वर्षीय मुलीवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार)

    रस्ता सुधारणा झाल्यानंतर वैमानिक प्रशिक्षण, विमानतळ सेवा, तसेच स्थानिक रहदारी या सर्वांना मोठा दिलासा मिळणार असून चंद्रपूर जिल्ह्याच्या विमानतळ विकासाला नवी गती मिळणार आहे. Morwa Airport Road Upgrade

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, मोरवा विमानतळाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून चंद्रपूरच्या भविष्यातील प्रगतीचा कणा आहे. विमानतळाशी जोडणारा मार्ग सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार झाल्यावर प्रशिक्षण संस्था, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीच्या संधींना व्यापक चालना मिळेल. चंद्रपूरला आधुनिक पायाभूत सुविधा मिळाव्यात, विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत व्हावे आणि येथील तरुणांना हवाई सेवा क्षेत्रात नवी दारे खुली व्हावीत, हे माझे सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

  • मुंबई–पुण्यासाठी Daily Train द्या; MP प्रतिभा धानोरकरांची लोकसभेत मागणी

    Mumbai Pune direct train : चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपूर येथून राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या शहरांसाठी थेट दैनिक रेल्वे कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याचा गंभीर मुद्दा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज लोकसभेच्या शून्य प्रहरात प्रभावीपणे मांडला. त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची आग्रही मागणी केली आहे. (हे हि वाचा – दारू दुकानांच्या परवान्यासाठी लोकसंमती आवश्यक – आमदार जोरगेवार)

    ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणी, मोठे वीज प्रकल्प आणि पेपर मिल्समुळे राज्याच्या महसुलात मोठे योगदान देतो. मात्र, औद्योगिकदृष्ट्या इतके महत्त्वाचे असूनही, आजही या भागातून पुणे आणि मुंबई येथे जाण्यासाठी पुरेशा आणि दैनंदिन थेट रेल्वे गाड्या उपलब्ध नाहीत. Mumbai Pune direct train

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले की, सध्या चंद्रपूरवरून मुंबई आणि पुण्यासाठी एकही ‘दैनिक’ थेट गाडी नाही. यामुळे हजारो विद्यार्थी, व्यापारी आणि उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अपुऱ्या रेल्वे व्यवस्थेमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.या समस्येवर तोडगा काढताना, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर येथे मंजूर झालेले ‘कोचिंग टर्मिनल’ पूर्ण होईपर्यंत नागरिकांना ताटकळत ठेवणे योग्य नाही.

    त्यामुळे, तात्काळ व्यवस्था म्हणून चंद्रपूर-पुणे आणि चंद्रपूर-मुंबई या दोन्ही मार्गांवर नवीन दैनंदिन ट्रेन्स सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी सांगितले की, या तात्पुरत्या उपायांमुळे चंद्रपूर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. त्यांनी रेल्वे मंत्रालयाने या जनहिताच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी आणि तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे, जेणेकरून लाखो नागरिकांची गैरसोय दूर होईल.

  • दारू दुकानांना नागरिकांचा विरोध वाढतोय; परवान्यांसाठी ‘लोकसंमती’ बंधनकारक करा – जोरगेवार

    Chandrapur liquor shop licenses : चंद्रपूर/नागपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) –  चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात मध्य परवाणे दिल्या जात आहे. मात्र नागरिवस्तीत दारु दुकाने सुरु करण्यासाठी दिल्या जात असलेल्या परवण्याला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे लोकसमंतीशिवाय दारुचे दुकाने मंजुर करु नका अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रश्नोउत्तराच्या तासात बोलतांना सभागृहात केली आहे.

    नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आज मध्य परवाना विषयावर चर्चा दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या दारूच्या दुकानांबाबत ठाम मत मांडले. दारूबंदी उठवल्यानंतर चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बीअर शॉपी, वाईन शॉप, आणि बीअर बार सुरू होत असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (हे वाचा – चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील १२ कर्मचारी निलंबित)

                आमदार जोरगेवार म्हणाले की, ज्या भागात अशी दुकाने सुरू केली जात आहेत, त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोधाची लाट दिसून येत आहे. समाजजीवन, विद्यार्थी, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि सामाजिक वातावरण या सर्वांचा विचार करून दारू दुकान मंजुरीला लोक संमती आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. Chandrapur liquor shop licenses

                जनतेच्या भावना न विचारता परवाना दिला जाऊ नये. परवाना देतांना संबंधित वॉर्डातील नागरिकांची संमती घेणे अनिवार्य केले पाहिजे. लोकशाहीत लोकांची मते सर्वात महत्त्वाची आहेत, असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारने या विषयावर तातडीने ठोस धोरण आणण्याची मागणी केली आहे.

  • मुल तालुक्यातील सोमनाथ मंदिरास ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जा – आमदार मुनगंटीवारांचा पाठपुरावा

    Somnath Temple Mul taluka : चंद्रपूर ९ डिसेंबर २०२५ (News३४) – मुल तालुक्यातील ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेल्या सोमनाथ मंदिराला अखेर ‘तीर्थक्षेत्र ब दर्जा’ मिळाला असून हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ठोस पाठपुरावा आणि त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    मंदिर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि परिसराची ओळख राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक नकाशावर अधिक भक्कम व्हावी, या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मंजुरीमुळे सोमनाथ मंदिर परिसराच्या विकासाला आता नवी दिशा आणि गती मिळणार आहे.

    रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी

    तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाल्यानंतर सोमनाथ मंदिर परिसरात मूलभूत सुविधा उभारणी, परिसराचे नियोजित सौंदर्यीकरण, आधुनिक सुविधा विकास, पर्यटक केंद्र उभारणी तसेच स्थानिकांसाठी रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. Somnath Temple Mul taluka

    सोमनाथ मंदिराला मिळालेल्या ‘तीर्थक्षेत्र-ब’ दर्जामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होईल. ब दर्जानंतर नंतर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर विशेष निधी मंजुरी, नवीन सुविधा उभारणी आणि मोठ्या विकास आराखड्याची अंमलबजावणी वेगाने होणार आहे. त्यामुळे मुल तालुक्याचा एकूण विकास प्रवास आणखी गतिमान होणार असल्याने मुल तालुक्यातील नागरिकांनी ब दर्जा मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे.

    मुल तालुक्याचा सर्वसमावेशक विकास

    मुलच्या तालुक्यातील विकासाचा हा प्रवास केवळ शब्दांवर नाही तर ठोस कामांवर उभा आहे. मुख्य रस्त्यांचे उन्नतीकरण, आकर्षक इको पार्क, अत्याधुनिक स्टेडियम, जलतरण तलाव, आदिवासी वसतिगृह, व्यायाम शाळा, पत्रकार भवन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तहसील कार्यालय इमारत, पंचायत समिती इमारत, कृषी महाविद्यालय, बसस्टँड, आठवडी बाजार, सुसज्ज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी, मुल पॉलिटेक्निक कॉलेजला नुकतीच मंजुरी, नवीन पोलिस स्टेशन, ओव्हरब्रिज, पट्टे वितरण उपक्रम, रेस्ट हाऊस आणि योगाभवन या सर्व प्रकल्पांमुळे मुल तालुक्यातील प्रगतीचा पाया आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे अधिक भक्कम झाला आहे.