Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • शिक्षक सेनेची मध्यस्ती आणि डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबाबत शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो मृत्यू आणि महाराष्ट्रभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यामुळे सरकार तोंडघशी पडली आहे, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे शंभर प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. चंद्रपुरात गेल्या ४ महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे ते संपावर गेले आहेत.

     

    चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व इतर अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना केवळ आश्वासने देत होते आणि त्यांच्या देयकाचा निधी इतरत्र वापरत होते. त्यामुळे या डॉक्टरांना संपावर जावे लागले मात्र गेल्या 10 दिवसांपासून तेच आश्वासन दिले जात होते. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य पाहून शिक्षक सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप करत अवघ्या एका दिवसात प्रकरण पूर्णपणे मिटवले.

     

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित शिक्षक सेनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व गडचिरोली संपर्क प्रमुख राजेश नायडू हे 6 ऑक्टोम्बर ला सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी या डॉक्टरांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टर व आरोग्य विभाग यांच्यात मध्यस्थी करून ही समस्या तात्काळ जागेवरच सोडवण्यात आली.

     

    राजेश नायडू यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांच्या गटाशी तात्काळ चर्चा करून कोषागाराशी बोलून उद्यापर्यंत पगार देण्यास सांगितले आणि डॉक्टरांना तातडीने कामाला येण्याचा सल्ला दिला.

    संपावर असलेल्या डॉक्टरांनी आपसात चर्चा करून व राजेश नायडू यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देत संप तातडीने संपवून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्यापर्यंत आमची देणी न दिल्यास किंवा संपाबाबत आमच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्हाला आमच्या हक्कासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल, असेही ते म्हणाले.

    यानंतर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनीही जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आभार मानले मात्र दिलेले आश्वासन पाळले नाही तर आता या डॉक्टरांसह शिक्षक सेनेच्या वतीने पूर्ण ताकदीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. हा प्रश्न सोडवल्याबद्दल डॉक्टरांनी शिक्षक सेनेचेही आभार व्यक्त केले.

  • चंद्रपूर महानगरपालिकेने या मशीनवर घातली बंदी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

     

    शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर मशीनचाही वापर केला जातो ज्याला सीओटू पेपर ब्लोवर मशीन म्हणतात. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात कागदांचे अथवा प्लास्टीक कागदांचे तुकडे एका वेळेस हवेत उधळल्या जातात. हे दृश्य पाहण्यास मोहक वाटत असले तरी त्या एका ब्लास्टने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर जमा होतो, मग रॅली अथवा कार्यक्रमात उपस्थीत लोकांच्या चालण्याने ते कागद रस्त्यावर असे घट्ट चिपकतात कि, ते काढतांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना फार त्रास होतो.

     

    आज आपल्या शहरात कुठलीही रॅली निघाली तरी ती रॅली संपताच रस्ते स्वच्छ आढळुन येतात कारण मनपा स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेप्रती जागरूक असतात. नागरीक म्हणुन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आपलेही कर्तव्य आहे तेव्हा मनपातर्फे आवाहन करण्यात येत आहे कि,सार्वजनिक कार्यक्रम अथवा रॅलीमध्ये पेपर ब्लोवर मशीनचा वापर करून कागद अथवा प्लास्टीक तुकडे हवेत उडवु नये अन्यथा सदर मशीन,सदर वाहन जप्त करण्यात येऊन संबंधितांवर घनकचरा अधिनियमानुसार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

  • खासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट स्वच्छ करायला लावल्याने राज्यात पाटील यांचा डॉक्टरांनी काळी फित लावत निषेध नोंदवीला.

    नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस.आर. वाकोडे यांना टॉयलेट्स ची स्वच्छता करायला लावली, यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा केला.

     

    या घटनेमुळे डॉक्टर संघटनांनी खासदार पाटील विरोधात एल्गार पुकारत त्यांचा निषेध केला.
    चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काळी फित लावत पाटील यांचा निषेध नोंदवला.

     

    निवासी, शिकाऊ डॉक्टर्स व विविध संघटनेच्या डॉक्टरांनी खासदार पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी केली आहे, खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींचे हे कृत्य संघटना खपवून घेणार नाही अशी माहिती डॉक्टर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
    यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. तेजस्विनी चौधरी, रोहित होरे, प्रशांत मगदूम, ऋतुजा गांगुर्डे आदींची उपस्थिती होती.

  • डॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – शासनाचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असून रुग्णांचे बेहाल होत आहेत. आजच्या स्थितीत एका दिवशी हिवताप व विषमज्वर असे 890 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार अपुरी असल्याचे दिसून येत आहे.

     

    यामधे मंजूर पदे ४८ भरलेली पदे ३२ कंत्राटी ५ असून १३ पदे रिक्त असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. मुल तालुक्यात सर्वाधिक गावांची संख्या लक्षात घेता उपजिल्हा मंजूर केले. परंतु उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने रुग्णांवर विविध आजारांवर उपचार करणारे डॉक्टर पुरेसे नाहीत. तालुक्यात मोठे उपजिल्हा रुग्णालय असून देखील आय.सी. यु.ची सोय नाही. त्यामुळे भरती केल्यानंतर लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना रेफर केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

     

    औषधांचा साठा पुरेसा नाही तसेच रुग्णालयात बेसिक मेडीसिन नाही. जे इंजेक्शन उपलब्ध आहेत ते पुअर कंडीशनचे असल्याने रुग्णांना तात्काळ फायदा होत नाही. आक्सिजन सुविधा बरोबर नाही. ती गरजेनुसार वेळेवर उपलब्ध केल्या जाते. एटीबायटिक नाही. सोनोग्राफी सेवा असून हप्त्यात फक्त दोनच दिवस तपासणी होत आहे.

     

    कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची वेतन अडले

    पहिलेच कंत्राटी डाक्टर कर्मचारी यांची संख्या कमी असून मागील चार महिन्यापासून वेतन दिल्या जात नसल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दमशक झाली आहे. याबाबत मुल तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक काँग्रेस,शहर कांग्रेस वतीने आरोग्य सेवेबाबत लेखी पत्र देऊन अपुरे कर्मचारी त्वरित भरण्यात यावे. औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करावे. आय सी.यु. युनिट नियमित ठेवण्यात यावे. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सोई तात्काळ करावे.

     

    शक्यतोवर चंद्रपूरला रेफर करणे टाळावे. रुग्णांवर इथेच उपचार करुन त्यांचे समाधान करावे. नियमित एक्सरे टेक्निशियन ठेवावे. इत्यादी मागण्या बाबत चंद्रपूर येथील शल्य सिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांना तात्काळ बोलावून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.रामटेके, डॉ कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे.उपअधीक्षक डॉ.प्रफुल लांडेकर , बालरोग तज्ञ डॉ.मेंढे उपस्थित होते.

     

    समस्यांचे व मागण्यांचे निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,माजी नगर सेविका लीना फुलझेले, युवक अध्यक्ष पवन निलमवार,शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, बंडू गुरनुले, सुरेश फुलझेले, सरचिटणीस संदीप मोहबे, आशिष रामटेके यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

     

    ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली

    ग्रामीण विभागातील जिल्हा परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र अपुरे कर्मचारी असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या असून तालुक्यातील आरोग्यसेवा निकामी झाल्याने चित्र दिसून येत आहे.

     

    ग्रामीण भागातही बाहेरून औषधी आणायला सांगतात. मौजा बेंबाल प्राथमिक आरोग्य केंद्राची काही दिवसापूर्वी गावाच्या दृष्टीने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी नवीन वास्तू उभारण्यात आली.गेल्या सहा दिवसापूर्वी सायंकाळी ६ वाजता बेंबाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डीलव्हरीची केस नेली असता तिथे एकही डाक्टर, नर्स ,कर्मचारी उपलब्ध नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तेथील सरपंच चांगदेव केमेकर यांनी संपर्क साधून माहिती दिली असताना सुद्धा त्या महिलेवर उपचार होऊ शकला नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवाही आक्सिजनवर राबविली जात आहे.

  • चंद्रपुर मनपात अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र, मनपाने केली पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  मनपा आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीदरम्यान अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल व फसवणुक केल्याबद्दल दोन उमेदवारांविरुद्ध महानगरपालिकेद्वारे सिटी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    जुन महिन्यात मनपा आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शितल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल,बजाज नगर नागपुर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले.

     

    मात्र मनपाद्वारे सदर कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता सदर नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. नौकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणुक केल्याने आरोग्य विभागामार्फत सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    रिक्त पदांची अथवा कंत्राटी पदांची भरती दरम्यान कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्रे सादर करून उमेदवारांनी आपल्या भविष्याचे नुकसान न करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला शासकीय रुग्णालयाचा आढावा

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या मृत्यूचे तांडव सुरू आहे, अनेकानी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विविध रुग्णालयात होत असणाऱ्या मृत्यूबाबत वृत्ताबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे.

     

    सौनिक यांनी घेतलेल्या आढाव्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपुरातील शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूबाबत आकडेवारी घेतली आहे.

    3 जिल्ह्यात दररोज व महिन्याकाठी किती मृत्यू होतात व का याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे.

     

    नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालय मिळून
    मासिक मृत्यू: 532
    प्रतिदिन सरासरी: 17

    नांदेड रुग्णालय
    मासिक मृत्यू: 401
    प्रतिदिन सरासरी: 13

    छत्रपती संभाजीनगर रुग्णालय
    मासिक मृत्यू: 426
    प्रतिदिन सरासरी: 14

    ही प्रतिदिन सरासरी आहे. नागपूरचे उदाहरण घ्यायचे तर कधी 17 पेक्षा कमी असतात, तर 17 पेक्षा अधिक सुद्धा असतात.

    खाजगी रुग्णालयात येणारे रुग्ण हे क्रिटिकल अवस्थेत येतात.
    सुट्ट्यांच्या काळात (जशा नुकत्याच 5 दिवस सुट्ट्या आल्या) त्यात प्रामुख्याने सरकारी रुग्णालयाकडे ओढा अधिक असतो.

  • राज्याची आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये – डॉ. अभिलाषा गावतुरे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील डिन ला टॉयलेट स्वच्छ करायला लावले, त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातुन खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला, खासदारावर गुन्हे दाखल झाले असले तरी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूच्या तांडवाला डिन जबाबदार कसे? या संपूर्ण घटनेला देश व राज्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे, राज्यातील आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये एडमीट झाली आहे, राज्यातील घटनेची जबाबदारी घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

    ठाणे नंतर नांदेड मधील घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मात्र याला जबाबदार केंद्र व राज्याची आरोग्यव्यवस्था आहे, आजही राज्यातील शासकीय रुग्णालयात अनेक पदे भरल्या गेली नाही, देश व राज्याच्या अर्थ संकल्पात आरोग्य व्यवस्थेवर निधीची तरतुद दिवसेंदिवस कमी होत आहे, आरोग्य यंत्रणेत असणारे प्रशासकीय अधिकारी हे आयएएस असतात मात्र त्यांना आरोग्य व्यवस्थेचे पुरेसे ज्ञान नसते त्यामुळे अश्या घटना राज्यात घडत आहे अशी प्रतिक्रिया बहुजन मेडिकल असोसिएशच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजही अनेक पदे रिक्त आहे, 190 सफाई कर्मचाऱ्यांपैकी एकही पद भरल्या गेले नाही, 350 परिचारिका पैकी फक्त 97 परिचारिका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहे, प्राध्यापकांचे अनेक पदेही आज रिक्त आहे, चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शिकाऊ डॉक्टरच्या भरवश्यावर आहे, चंद्रपुरातील आरोग्य व्यवस्थेला लोक प्रतिनिधी पूर्णतः जबाबदार आहे, एकही लोकप्रतिनिधी पालकमंत्री असो की आमदार यांनी मुळीच लक्ष दिलेले नाही, नांदेड, ठाणे जिल्ह्यासारखं मृत्यूचे तांडव चंद्रपुरात घडायची वाट तर हे लोकप्रतिनिधी बघत असावे अशी शक्यता आम्हाला वाटते.
    स्थानिक आमदार हे सत्तेसाठी सुरत ते गुवाहाटी चा प्रवास करतात मात्र रुग्णालयात रुग्णांची काय परिस्थिती आहे हे कधी जाणून घेत नाही.

     

    या सर्व परिस्थिती बाबत बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे व डॉ. राजू ताटेवार यांनी अधिष्ठाता फुलपाटील यांची भेट घेतली व आरोग्य व्यवस्थेची तात्काळ सुधारणा करावी असे निवेदन त्यांना देण्यात आले.

     

    अभिलाषा गावतुरे यांनी पुढे माहिती दिली की शिंदे गटाच्या खासदार हेमंत पाटील यांनी केलेले हे कृत्य क्षमयोग्य नाही, आपली कमतरता लपविण्यासाठी अधिष्ठाता यांना जबाबदार धरणे हे चुकीचे आहे, या घटनेचा बहुजन मेडिकल असोसिएशनने निषेध करीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

     

    पत्रकार परिषदेला बहुजन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर राजू ताटेवर, डॉक्टर राकेश गावतुरे, डॉक्टर राकेश वनकर, डॉक्टर नम्रता बेंडले, डॉक्टर समृद्धी वासनिक, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर स्नेहल खोब्रागडे, डॉक्टर प्रीती उराडे व डॉक्टर समीर कदम उपस्थित होते.

  • हत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर /सिंदेवाही –  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला.  या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची नावे आहेत.

     

    मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत  उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील सिंदेवाही तालुक्यांत चिटकी गावालगत शेतात काही नागरीकांना जंगली हत्ती मृत्तावस्थेत आढळून आल. सदर घटनेची माहिती बीट वनरक्षक राठोड यांना देण्यात आली. सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक हे आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह चमु दाखल झाले.

     

    सदर घटनेची खात्री केल्यानंतर घटना स्थळावर मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी सुरपाम, डॉ. शालीनी लोंढे दाखल झाले. वरिष्ठांच्या उपस्थितीत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हत्तीच्या मृत्तदेहाचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या आघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला.

     

    शेतमालक अशोक पांडुरंग बोरकर व सभोवतालच्या परिसराची झडती घेण्यात आली. यामध्ये प्रकरणात वडिल अशोक पांडुरंग बोरकर व अजय अशोक बोरकर यांचे विरूध्द पी.ओ. आर. क्र. 09130/228231 अन्वये वनगुन्हा नोंदवून दोघे संशयीत बापलेकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण तपास ब्रम्हपुरीचे सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे करीत आहेत.

    विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शेत मालकांना आपल्या शेतात विद्युत प्रवाह न सोडण्याचे आवाहन केले होते, अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ड

  • गांधी जयंती निमित्त इरई बचाव आंदोलनाचा सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त इरई नदीचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा जल सत्याग्रह केला. भजन दिंडी काढून तसेच गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून व इरईच्या पात्रात घोषणा देऊन हा जल सत्याग्रह करण्यात आला.

     

    दुपारी 12 वाजता इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुशाबराव कायरकर तसेच जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत दाताळा रोडवरील अग्रसेन भवन समोरून भजन दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी भूमी कायरकर यांनी दिंडीचे नेतृत्व केले तर जय देशमुख या लहान मुलाने गांधींची वेशभूषा केली.

     

    इरई नदीच्या पात्रात दिंडी पोहोचल्यानंतर दिंडीत सहभागी सर्वांनी नदीपात्राच्या एका भागात स्वच्छता अभियान राबवले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून नदीमध्ये जल सत्याग्रह करण्यात आला. नंतर आंदोलनात सहभागी नागरिकांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी घोषणा दिल्या.

     

    जनविकास सेनेचे मनीषा बोबडे व अक्षय येरगुडे निखाडे,प्रतिभा कायरकर,संगिता विधाते,विद्या ठोंबरे, वंदना मोरे,नलिनी कडुकर,वर्षा काळभुत, शिवसेना (उबाठा)च्या कुसुम उध्दार,निलीमा शिरे,अर्चना चामटकर, दिक्षा सातपुते,सुनंदा जोगी,मेघा दखने,सचिन निंबाळकर, महेश काहीलकर,अमूल रामटेके, विठ्ठल भगत,तुकाराम झाडें,सुरेश विधाते,पांडुरंग गावतुरे, अविनाश देव,देवराव बोढे, सुधाकर मत्ते,नगमा पठाण, सुरेश खाडे आप च्या तबसूम,योगेश कुरेकर इत्यादी नागरिक या जन आंदोलनामध्ये सहभागी झाले.

     

    सविस्तर असे की 22 मार्च 2006 रोजी जलदिनानिमित्त इरई नदीच्या पात्रात सत्याग्रह करून इरई बचाव जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनाला 17 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.या 17 वर्षात अनेक वेळा स्थानिक नेत्यांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेची आश्वासने दिली. कधी कधी तर खोलीकरणाला थातूर मधून सुरुवात सुद्धा करण्यात आली. परंतु संपूर्ण इरई पात्राचे खोलीकरण करण्याचे आश्वासनाची पूर्तता करण्यास चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. दुसरीकडे इरई बचाव जन आंदोलनाने आपल्या संघर्षाचे 17 वर्षे पूर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण केले.

     

    महाऔष्णिक विज निर्मिती केंद्राच्या राखेमुळे इरईचे पात्र उथळ झाले. त्यामुळे पुराचि धोका वाढला.अनेक घरे निळ्या पुर रेषेच्या आतमध्ये आली.एकीकडे नागरिकांना दरवर्षी पुराचा फटका बसतो, परावर्तित भूखंड असुनही बांधकामाची परवानगी नाकारण्यात येत आहे.तर दुसरीकडे स्थानिक नेते केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. लवकरच शहरातील अशा सर्व मुद्द्यांवर जनतेमध्ये जाऊन जनविकास सेनेतर्फे जनजागृती करण्यात येईल.

  • माझ्या मुलाला शोधून द्या, चंद्रपूर शहर पोलिसांना आईची आर्त हाक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.

     प्रकरण काय?

    भाविका खंडाळे या 22 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास कामावर निघून गेल्या होत्या, रात्री घरी परतल्यावर त्यांचा मोठा मुलगा प्रजेश त्यांना दिसला नाही, भाविका यांनी 23 वर्षीय लहान मुलगा राजदीप याला विचारले असता दादा घरी आला नाही असे त्याने सांगितले.
    आईने शेजारी व आजूबाजूला प्रजेश चा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, आई ती आईचं मुलगा येण्याची ती वाट बघू लागली.
    24 सप्टेंबरला प्रजेश ने आईच्या मोबाईल वर कॉल केला आई मी मुंबई ला आलो आहे, माझ्यासोबत घराजवळील योगेश व इतर 6 मुले आहे, यावर आईने म्हटले की बाळा काळजी घे? तू कशाला तिथे गेला कसलं काम आहे? यावर तो काही बोलला नाही, मला रोज फोन कर असे म्हटल्यावर प्रजेश ने हो म्हणत कॉल कट केला, मात्र त्या दिवसानंतर प्रजेश ने आई सोबत सम्पर्क साधला नाही, विशेष म्हणजे प्रजेश कडे मोबाईल नसल्याने त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाईल वरून आईला सम्पर्क केला होता.
    आई भाविका यांना मुलाची काळजी वाटू लागली, प्रजेश ने मी योगेश गेडाम सोबत बाहेरगावी असल्याची बाब आईला सांगितली असल्याने ती 27 सप्टेंबरला शेजारी असलेल्या योगेश गेडाम यांच्या घरी गेली, योगेश हा चंद्रपुरात आला होता, मात्र त्याने याबाबत प्रजेश च्या कुटुंबियांना माहिती दिली नाही.
    भाविका यांनी योगेश ला विचारणा केली की प्रजेश आला नाही काय? प्रजेश तर 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला तो आपल्या नातेवाईकांकडे जातो असे म्हणाला.
    त्यानंतर भाविका यांनी नागपुरातील नातेवाईकांना सम्पर्क केला असता प्रजेश कुणाकडेच गेला नसल्याची माहिती मिळाली.

    तपासात काय निष्पन्न?

    भाविका खंडाळे यांनी मुलगा घरी आला नाही म्हणून शहर पोलिसात तक्रार देत 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
    चंद्रपूर शहर पोलिसांनी योगेश गेडाम यांना चौकशीसाठी बोलाविले, त्याने प्रजेश हा नागपूरला उतरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. ज्या मोबाईल वरून प्रजेश ने आईला सम्पर्क केला त्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मुंबई होते, 25 सप्टेंबरला प्रजेश नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
    योगेश ने प्रजेश च्या घरी न सांगता त्याला बाहेरगावी कशासाठी नेले होते? योगेश घरी परतला तेव्हा त्याने प्रजेश च्या आईला याबाबत माहिती का दिली नाही? योगेश ने जे बयान पोलिसांना दिले तीच खरी माहिती आहे काय? त्याच्या माहितीवर पोलिसांनी क्रॉसचेक केलंय का? प्रजेश सोबत गेलेले इतर मूल कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत पोलिसांशी सम्पर्क केला असता ते म्हणतात तपास सुरुच आहे.
    मागील आठवडाभरापासून प्रजेश ची आई योगेश ला मुलांबाबत विचारत आहे, मात्र तिला समाधानकारक उत्तर योगेश कडून मिळत नसल्याने ती न्यायासाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत आहे, भाविका खंडाळे यांना पोलिसांकडून न्याय हवा? पोलीस न्याय देतील काय? प्रजेश चे काही बरे वाईट तर झाले नाही? अशी शंका आई भाविका यांच्या मनात निर्माण होत आहे.
    प्रजेश जवळ खर्च करायला पैसे नाही, त्याच्या अंगावर जे कपडे आहे तेच त्याच्याजवळ आहे, तो काय करीत असेल? काय जेवण करीत असेल असे शब्द प्रजेश ची आई पुटपुटत असते.
    वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना मोठं केलं व आज अशी परिस्थिती भाविका खंडाळे यांच्यापुढे उभी झाली, मुलगा आज येणार उद्या येणार अशी आस आईच्या नजरेसमोर आहे.
    दरवर्षी हजारो लाखो महिला व पुरुष बेपत्ता होतात मात्र काही जणांचा शोध लागतो, आजही लाखो नागरिक पोलिसांच्या रेकॉर्डवर हरविल्याची नोंद आहे, मात्र त्यांना कुणी शोधणारा नाही, माझ्या मुलाला शोधून द्या अशी आर्त हाक एक आई पोलिसांना करीत आहे.