Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • Convocation ceremony :  डॉ.अपर्णा ढेले (कासराळे) आचार्य पदवीने सन्मानित

    Convocation ceremony : डॉ.अपर्णा ढेले (कासराळे) आचार्य पदवीने सन्मानित

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झालेल्या ३७ व्या दीक्षांत समारंभात डॉ. अपर्णा मन्मथ ढेले (कासराळे) यांना कृषी विस्तार शिक्षण विभागातील संगमनेरी शेळी वरील “Adoptation Of Management Practices and Utility Perception Of Sangamneri Goat Rearers and Non Discriptive Goat Rearers- A comparitive Study” या प्रबंधासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू श्री.प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते पदवीदान समारंभात आचार्य पदवी (PhD) बहाल करुन सन्मानित करण्यात आले.

     

     

    आचार्य पदवी प्राप्त करनाऱ्या डॉ.अपर्णा ढेले ( कासराळे) ह्या सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील बँक ऑफ इंडिया बेंबाळ शाखेत कृषी अधिकारी या पदावर असून मुल तालुका कृषी अधिकारी मूल श्री. प्रशांत कासराळे यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत. त्यांना लहान पणापासून अभ्यासाचं व्यासंग असून त्यांच्यात जिद्द,चिकाटी, परिश्रम घेण्याची त्यांच्या अंगी गुण असल्याने एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सेवा करीत असतानाही त्यांनी अभ्यासासाठी आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून अभ्यास केला आणि आपला प्रबंध विद्यापीठाकडे सादर करुन हे यश प्राप्त केले आहे.

     

    डॉ.अपर्णा ढेले ह्या मुल तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्या सुविज्ञ पत्नी असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या प्राध्यापक वृंदामधे, कुटुंबीयासमवेत इतर शुभचिंतक, मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

  • OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

    OBC Community : सकल ओबीसी बांधवानी निदर्शने करुन मराठा आरक्षण अध्यादेशाची केली होळी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्रात सर्वाधिक सकल ओबीसी समाजाची संख्या असताना मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिल्या गेले आहेत. त्यावेळी मराठ्यांनी कुठेही स्वतःच्या आरक्षणाबाबत मागणी केलेली नाही. याचे कारणही सबळ आहे.

     

    मराठ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे.उन्नत आहे. म्हणून आरक्षणाचा मुद्दा केंद्र व राज्य शासनासमोर पुढे केलेला नाही. आता मात्र ओबीसींना मिळणाऱ्या सवलती घेण्याच्या दृष्टीने ओबिसीमधे आपला समावेश करावा म्हणून जरांगे पाटलांना पुढे करुन आरक्षणासाठी रस्त्यावर उपोषण व आंदोलन सुरु केले. आणि मराठ्यांच्या आंदोलनाला राज्य शासन घाबरून म्हणा किंवा शासन करतेच मराठे असल्याने ओबीसी संवर्गातील समावेश असलेल्या असंख्य जातीचा विचार न करता ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचे अध्यादेश काढला.

     

     

    हे न्यायाला धरुन नसून केवळ ओबीसींवर अन्याय करणारे आहे. करीता ओबीसीचे राष्ट्रीय नेते राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात शासनाने नुकताच मराठ्यांच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला मसूद्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात हरकती नोंद व मसुद्याची होळी करण्यासाठी मुल येथे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांचे नेतृत्वात सकल ओबीसी समाज बांधवांचा मोर्चा काढून काढलेला अध्यादेश त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी असंख्य ओबीसी समाज बांधव व महिलांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

     

    निवेदन देताना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी जी.प. सदस्य प्रा.रामभाऊ महादोरे, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, राकाचे तालुका अध्यक्ष प्रा. किसान वासाडे, डॉ.पद्माकर लेनगुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, प्रा.सुधीर नगोषे, ईश्वर लोनबले, राकेश मोहूर्ले, कैलाश चलाख, सीमा लोनबले,अमित राऊत,शमलता बेलसरे,समता बनसोड, यांचेसह समता परिषदेचे समस्त पदाधिकारी, शेकडो महिला युवक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • Live Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संमिश्र प्रतिक्रिया

    Live Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संमिश्र प्रतिक्रिया

    News34 chandrapur

    २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प – ना. सुधीर मुनगंटीवार

    आज देशाच्‍या अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे. मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी अनेक योजना चालविल्‍या, ज्‍यामुळे गरीब, तरूण, महिला, शेतकरी, दिव्‍यांग यांच्‍या जिवनात आमुलाग्र बदल झाला आहे. या अर्थसंकल्‍पात पुढील ५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी घरे बांधल्‍या जातील तसेच मध्‍यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे. रूफटॉप सोलर प्‍लॅन अंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट दर महिन्‍याला मोफत मिळणार आहे. याशिवाय कृषी, रेल्‍वे, स्‍कील इंडिया, महिला, युवा या सगळयांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्‍यात आली. मी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांचे या उत्‍तम अर्थसंकल्‍पाबद्दल अभिनंदन करतो.

     

    देशाचा शास्वत व सर्वसमावेशक विकास साधणारा अर्थसंकल्प – हंसराज अहीर

     

    चंद्रपूर/यवतमाळ :- देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी सितारमन यांनी सन 2024-25 करीता संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला विकसीत राष्ट्रांच्या रांगेत आणण्याचे ध्येय अंतर्भूत असून हे अर्थसंकल्प गरीब, महिला, युवक व बळीराजाला समर्पित असून या अर्थसंकल्पाद्वारे माननिय मोदी सरकारच्या ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास व सर्वांचा विश्वास’ या धोरणाशी सुसंगत असल्याची प्रतिकीया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

    देशातील पायाभूत सुविधांसाठी 11.11 लक्ष कोटींची तरतूद विकासाला नवी दिशा देणारी ठरेल 7 लक्ष रूपये वार्षिक उत्पन्नावर करदात्यांना करसुट देण्यात आली असल्याने मोठ्या संख्येतील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. गेल्या 10 वर्षात सरकारने 390 कृषी विद्यापीठ, 7 आयआयटी, 7 आयआयएम व 3 हजारहून अधिक आयटीआय संस्थांची उभारणी केली. जीएसटीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना यशस्वीपणे साकार करण्यात सरकार यशस्वी ठरले. महिला सशक्तीकरण, ग्रामिण महिलांना 70 टक्के घरे, शेती क्षेत्रातून 3 लक्ष कोटीचा व्यापार, 80 कोटी लोकांना मोफत शिधा देण्यात सरकार सफल झाले आहे.

    युवकांना सुवर्णकाळ लाभण्यासाठी 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी 1 लक्ष कोटीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यास 517 नवीन विमानमार्ग प्रस्तावित केले आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना 9 ते 14 वर्षीय मुलींसाठी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधासाठी लस, सोलर पॅनलद्वारे 1 कोटी घरांना महिनाभरात 300 युनिट मोफत विज पुरविण्याचे धोरण, आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ, उच्च शिक्षणात महिलांचा टक्का वाढविण्याचे धोरण, मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना 30 कोटी कर्ज वितरण, देशात गोदामांची उभारणी, किसान संपदा योजनेतून 38 लक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण, 5 वर्षात ग्रामिण क्षेत्रात 2 कोटी घरांची उभारणी करण्याचा मनोदय सरकारने या अर्थसंकल्पातून व्यक्त केला असून अमृत कालात शास्वत व सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत वृध्दी संसाधनात गुंतवणूक हे सरकारचे धोरण शक्तीशाली अर्थव्यवस्थेला चालना देणारे असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

     

    विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थहीन अर्थसंकल्प; अंतरिम नसून अंतिम अर्थसंकल्प

    विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र

    मुंबई :- देशातील शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा, नोकरदार, मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा, करदात्यांचे पाकीट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज केंद्र सरकारने सादर केला आहे. विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम असल्याचे टीकास्त्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डागले आहे.

    केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर श्री. वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली आहे.

    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, भांडवलदारांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार असून फक्त भाजपचे उद्योजक स्नेही मित्र फायद्यात आहेत. कॉर्पोरेट टॅक्स कमी केला पण सर्वसामान्यांना करात कोणतीही सूट देण्यात आली नाही.यावरून सरकार कोणाचे भल करते हे स्पष्ट होते. राज्यातील नेत्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मी पुन्हा येईन, अशी भाषा वापरली परंतु हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम आहे. गेल्या 9 वर्षात मोदी सरकारच्या योजना अपयशी ठरल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे अजून पूर्ण नाहीत. सामाजिक न्याय देणारे सरकार, असा डांगोरा केंद्र सरकार पिटत असले तरी ओबीसी, एसी, एसटी विद्यार्थ्यांना इथे शिष्यवृत्ती मिळत नाही. एकीकडे सरकार दावा करते की २५ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेबाहेर काढले. दुसरीकडे आम्ही ८० कोटी जनतेला मोफत धान्य देतो, हे सरकारकडून सांगितले जाते. यातील विरोधाभास स्पष्ट आहे. म्हणजे देशात गरिबीची संख्या वाढली आहे. आजच्या अर्थसंकल्पात युवकांसाठी, बेरोजगार बाबत काही ठोस मांडलेले नाही. देशात धार्मिक उन्माद करून या सरकारने युवकांना देशोधडीला लावले आहे. त्यामुळे
    बेरोजगार युवक म्हणजे सक्षम युवक का? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.

     

    सरकार महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा करते पण दुसरीकडे महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ रोखण्यात, मणिपूरमधला हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशी आहे. देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला. अजूनही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. पीक विम्याचा देशातील केवळ ४ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतोय. पीक विम्याने शेतकऱ्यांचे भले होते की, पीक विमा कंपन्यांचे? राज्यात पीक विमा कंपन्यांचे भले करण्याऱ्या मंत्र्यांनी स्वतःची तिजोरी भरण्याचे काम केले आहे. हे महाराष्ट्रातील चित्र असेल तर देशात काय चित्र असेल? असे सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.

    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, गरीब, वंचित, उपेक्षित घटक देशोधडीला लागणार आहे. कृषी, उद्योग, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार, बांधकाम व्यवसाय या सर्व क्षेत्राचे भविष्य अंधःकारमय आहे. गरीब-श्रीमंतीची दरी वाढवणार हा अर्थसंकल्प आहे. परकीय गुंतवणुकीचा सरकारचा दावा खोटा असून रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या आशा आकांशा धुळीस मिळाल्या आहेत. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. प्राप्तीकर उत्पन्नमर्यादेत वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु ही आशा देखील मावळली आहे. कष्टकरी मजूरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारने मदत केली नाही. केंद्रीय अर्थमंत्री दिवा स्वप्ने दाखवत आहेत. आत्मस्तुतीने भारावलेले केंद्रीय अर्थमंत्र्याचे भाषण अच्छे दिन प्रमाणे आभासी होते. पंतप्रधानांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. हे स्वप्न जसे भंगले तसेच हा अर्थसंकल्प सर्वसामान्याचे स्वप्न धुळीस मिळविणारा, जुन्या कढीला नव्याने ऊत आणणारा आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारचे वाभाडे काढले.

     

    आजचा अर्थसंकल्प विकसित राष्ट्राचा पाया, राज्याच्या विकासाला मिळणार गती – आ. किशोर जोरगेवार

    आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, युवक, महिला, गरिब आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला आला असून यात जिडीपी वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचा नक्कीच महाराष्टाला फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा एकंदरीत विचार केला असता आजचा अर्थसंकल्प हा विकसित राष्ट्राचा पाया असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

     

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. यात आज सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. या सरकाच्या कार्यकाळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्र सरकारचा भर राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी लोकांच्या घरात सौर रूफटॉप यंत्रणा बसवली जाणार आहे.त्यामुळे ३०० युनिट पर्यंतची वीज सदर कुटुंबियांना मोफत मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आणखी 2 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले जाईल त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 10 वर्षात महिलांना 30 कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. विविध क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. आज सादर केलेल्या अर्थसकंल्पात आर्थिक क्षेत्र मजबूत होणार असून लोकांसाठी नवीन संधी वाढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

     

    शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष! – आमदार सुधाकर अडबाले यांची टीका

    केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्राला भरीव तरतूद नसल्याबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, “हा अर्थसंकल्प केवळ देखावा आहे आणि सर्वसामान्य मुलांना मूलभूत शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.”

    अडबाले यांनी पुढे म्हटले, “शिक्षण हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु, केंद्र सरकार शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहे. शिक्षणासाठी निधी कमी करणं हे निश्चितच चिंताजनक आहे.”

    “या अर्थसंकल्पामुळे शिक्षण क्षेत्रावर अनेक नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिक्षण घेणे अधिक कठीण होईल,” असंही ते म्हणाले.

    अडबाले यांनी केंद्र सरकारला शिक्षण क्षेत्रासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

     

    अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा – दिनेश चोखारे 

    या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही. तसेच लघुउद्योगांसाठी कुठल्याही प्रकारची ठोस धोरणे नसल्याने अर्थ व्यवस्थेला हवा तेवढा उपयोग होऊ शकलेला नाही. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे.

    दिनेश दादापाटील चोखारे
    प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ
    उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर
    माजी सभापती तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर

     

    सर्वसामान्य जनतेला दिशाभूल करणारा अंतरिम अर्थसंकल्प – प्रवीण खोब्रागडे,राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष

    निवडणुकीच वर्ष असल्या कारणाने या अंतरिम अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस झाला असे वाटते,
    सर्वसामान्य जनतेच्या विशेष हाती काही लागलेला नाही म्हणून त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.शेती,क्षिक्षण आणि आरोग्य यावर अधिक तरतूद करणे अपेक्षित होते,बेरोजगार तरुणांसाठी विशेष निधीची तरतूद करून बिन व्याजी किंवा कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे ती प्रत्यक्षात उतरते का हे येणार वेळ सांगणार आहे असे मत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

     

     

    शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राकडे दुर्लक्ष, प्रदूषणावरही उपाययोजना नाही – राजेश वारलुजी बेले

    चंद्रपूर: आज सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर ओबीसी नेते राजेश बेले यांनी टीका केली आहे. बेले यांनी म्हटले आहे की, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात अपेक्षित तरतूद करण्यात आलेली नाही. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस तरतूद नसल्याची टीकाही त्यांनी केली.

    बेले यांनी म्हटले की, “शिक्षण आणि आरोग्य हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहेत. मात्र, या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आलेली नाही. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा न झाल्यास देशाची प्रगती खुंटण्याची शक्यता आहे.”

    त्यांनी पुढे म्हटले की, “प्रदूषण ही आज देशासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मात्र, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही ठोस योजना आखण्यात आलेली नाही.”

    बेले यांनी सरकारला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्याची आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  • Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    Union Interim Budget 2024 : विकासाचा नव्हे तर आगामी निवडणुकीचा हा अर्थसंकल्प – डॉ. अभिलाषा गावतुरे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला, आजचे अर्थसंकल्प निव्वळ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केले अशी प्रतिक्रिया डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

     

    अतिश्रीमंत उद्योगपतींच्या गरीब देशात प्रस्तुत केलेलं २०२४ चे बजट व १० वर्षाच्या आर्थिक वाटचालीचे रिपोर्ट कार्ड म्हणजे समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन सामाजिक न्याय, आर्थिक सहिष्णुता, महिला सन्मान, विकसित भारत सारख्या शब्दांची नुसती लखोरी अर्थमंत्री निर्मला सितारमन कडून वाहिली गेली.

     

    दरवर्षी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, विद्यार्थी यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा बजट मुळातच कुठले ठोस योजना व त्यांची अंमलबजावणी करताना दिसत नाही. अर्थमंत्री आरोग्याच्या बाबतीत उपलब्ध मानवी संसाधन व पायाभूत सेवांना बळकट करण्यापेक्षा नवे फसवे स्वप्न दाखवीत आहेत. शेतकऱ्याला हमी भाव नाकारून सन्मान योजनेच्या नावाखाली भीक देणे म्हणजे बळीराजाचा अपमान आहे. Union finance minister nirmala sitaraman

     

    शिक्षणाला बजेट नाकारुन,चांगल्या दर्जाचे प्राथमिक व उच्च शिक्षण नाकारून युवकाना स्किलइंडिया सारखे फसवे कार्यक्रम म्हणजे वेठबिगारी ला लावण्याचा प्रकार आहे. जर २५ टक्के लोक गरिबी रेषेच्या वर आले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले तर ८० कोटी लोकांना मोफत राशन ची देण्याची गरज का पडत आहे? या देशातील बहुसंख्य असलेला ओबीसी, एससी,एसटी यांचा देशातील उद्योग व देशातील साधन संपत्तीवर किती हिस्सा? महाज्योती, सारथी योजनेसाठी पुरेसा बजट नाही. Budget 2024

     

    उच्चशिक्षणामध्ये महिलांचे प्रमाण वाढले पण व्यावसायिक शिक्षण घेऊन किती महिला सक्षम झाल्या याचे आकडे नाहीत! गेल्या ५ वर्षात प्रवेश मिळविलेले १३००० बहुजन विद्यार्थी IIT सारख्या संस्थांमधून बाहेर का फेकल्या गेले त्याचे उत्तर नाही! एकीकडे शाळा चालविणे व युवकाना पगार देणे परवडत नाही म्हणून शाळा बंद व नोकऱ्या कंत्राटी करणे , महांगाई वर न बोलणे , विकासाच्या नावावर फक्त भंपक बाजी करणे या सगळ्यागोष्टीला जनता कंटाळली आहे व हे बजट विकासाचे बजेट नसून फक्त इलेक्शन बजेट आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिली आहे.

  • Budget 2024 : आकड्यांचा खेळ मांडून भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    Budget 2024 : आकड्यांचा खेळ मांडून भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केल3 मात्र हा अर्थसंकल्प भ्रमनिरास करणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे.

     

     

    आज मांडण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जन सामान्यांची फसवणूक करणारा आहे. आकड्यांचा खेळ मांडून अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी स्वतःची व सरकारची पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. समोरील निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प असल्याचे दिसून येत आहे.

     

     

    या अर्थसंकल्पात युवक, शेतकरी यांच्या करीता कुठलेही स्थान नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अर्थमंत्री ग्रामीण भागातील नागरीकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे स्वतः च 80 करोड नागरीकांना अन्नधान्य पुरवत असल्याचे सांगत आहे. यावरुन केंद्र सरकारचा खोटारडेपणा जनतेसमोर येत आहे. भविष्यात आवास योजना अस्तित्वात आणू हे सांगून गरीब नागरिकांना गाजर दाखवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

  • Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

    Bear In Chandrapur City : चंद्रपुरात अस्वलीने ठोठावले चिकन सेंटरचे शटर

    News34 chandrapur

    चंद्रपूर- शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट जवळ अस्वलाच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भिवापूर वार्डातील एका दुकानात नागरीक बचावासाठी गेले असता अस्वलीने त्या दुकानात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरे व्दारे दिसून येत आहे. Bear in city

     

    31 जानेवारीला मध्यरात्री 12.30 वाजता अचानक एक अस्वल नागरिकांच्या मागे लागली, त्यावेळी नागरिकांनी जवळील इंडियन चिकन सेंटरमध्ये धाव घेतली, वेळेवर नागरिक आत शिरल्याने तात्काळ शटर बंद केल्याने काही अनुचित घटना यावेळी घडली नाही. Wild animal सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

     

     

    मागील महिन्यात अंचलेश्वर मंदिर व लालपेठ भागात अस्वलांचा मुक्तपणे संचार सुरू आहे, नागरिकांनी अनेकदा सदर बाब वनविभागाला सांगितली मात्र त्यांचा काही प्रतिसाद मिळत नाही आहे, त्यामुळे एकदिवस अनुचित घटना घडल्यावर वनविभाग जागा होणार जे निश्चित.

     

    रात्रीच्या सुमारास जंगलातून अस्वल रस्ता भटकली असावी त्यामूळे ती वारंवार शहराकडे धाव घेत आहे.

  • Chandrapur Municipal Corporation : मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा, सर्व्हेक्षण प्रगणक निलंबित

    Chandrapur Municipal Corporation : मराठा सर्वेक्षण कार्यात निष्काळजीपणा, सर्व्हेक्षण प्रगणक निलंबित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले असुन सदर सर्वेक्षण हे महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. Maharashtra State Commission for Backward Classes

     

    महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासुन केले जात आहे. या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४९ पर्यवेक्षक व ७३९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.Maratha survey work

     

    सदर कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.मात्र प्रगणक म्हणुन जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण पुर्ण करून सुद्धा काम स्वीकारले नाही.अनेकवेळा सुचना देऊन देखील काम सुरु न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली.

     

    सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असुन आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनी यंत्रणा,वृत्तपत्रे,समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. आता सर्वेक्षणास २ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवुन घेतली जाणार नसल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

  • Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

    Rahuri Advocate Murder News : अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करा – चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि. २५/०१/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील अधिवक्ता राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती, या घटनेमुळे राज्य हादरले, अधिवक्ता दाम्पत्यावर असा हल्ला होणे हे एक कृरकृत्य होते या घटनेचा निषेध करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने निषेध दर्शवित जिल्हाधिकारी गौडा यांना अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ अधिवक्ता संरक्षण कायदा लागू करण्याबाबत निवेदन दिले. Advocate couple murder case

     

    आरोपींनी आधी आढाव दाम्पत्याचे अपहरण करीत 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती, पैसे न मिळाल्याने आढाव दाम्पत्याची हत्या करीत त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असता सर्व आरोपीना अटक करण्यात आली. Chandrapur district bar association

    चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन 30 जानेवारीला अधिवक्ता संघाने निषेध करीत अश्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी अधिवक्ता यांच्या संरक्षणार्थ कठोर कायदे करण्याची गरज आहे अशी माहिती बार असोसिएशनचे सचिव खडतकर यांनी दिली आहे.

  • Maratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

    Maratha Reservation : ओबीसी समाजावरील अन्याय सहन करणार नाही, तो अध्यादेश परत घ्या – आमदार धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र शासनाने मराठा आंदोलनाचा धस्का घेऊन कुठलाही विचार न करता अध्यादेश काढून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला असल्याने हा ओबीसीं वरचा अन्याय आहे, अशी भावना आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली. Maratha reservation

     

     

    अलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार  उपसले होते त्यांची आरक्षणाची मागणी योग्य असली तरी त्यांना ओबीसी समाजातून आरक्षण देण्यात येऊ नये असे आमचे मत होते. परंतू मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मुंबईत येताच  शासनाने ओबीसी समाजातील बांधवांचा कुठलाही विचार न करता मराठा समाजातील नागरीकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय अध्यादेश काढून घेण्यात आला. Mla pratibha dhanorkar
    अप्रत्यक्षरीत्या ओबीसी समाजाची दिषाभूल करुन ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. हा अन्याय ओबीसी बांधव सहन करणार नसून ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.
    मराठा आरक्षणासाठी शासनाने सर्वेक्षण सुरु केले असून त्यातून जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे. 2011 पासून जनगणना झाली नसून या सर्वेक्षणाचा आधार घेऊन शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवावी असे देखील मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले. शिंदे सरकार ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करीत असून कुठल्याही ओबीसींच्या मागण्या पुर्ण होत नसल्याची खंत आमदार महोदयांनी व्यक्त केली आहे. ओबीसींची वस्तीगृह अद्यापही सुरु झाली नाही. शासकीय पदभरती अद्यापही अपुर्ण आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. यावर उपाय करायचा सोडून सरकार मराठा समाजासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे, हे चूकीचे असून या विरोधात मोठे आंदोलन उभारुन ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.
    यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे सांगून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयाच्या अुनषंगाने ओबीसी समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.
  • Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    Residential Ashram School : भाजप नेत्याच्या निवासी आश्रम शाळेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक निवासी आश्रम शाळेतील वर्ग 7 वि मध्ये शिकणारी 12 वर्षीय मिताली केशव कोंडागुर्ले चा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

    मृतक विद्यार्थिनी ही गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली गावातील निवासी आहे, विशेष बाब म्हणजे शाळेतील प्रबंधकाने मिताली चा मृत्यू झाल्यावर सदर बाब तिच्या कुटुंबाला सांगितली. Residential Ashram School

     

    मागील 6 दिवसापासून मिताली ची प्रकृती बरी नव्हती, मात्र शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले, 31 जानेवारीला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात मिताली ने सहभाग घेतला होता, सोमवारी कार्यक्रमाची तयारी करीत असताना मिताली अचानक कोसळली, त्यानंतर तिला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, त्यानंतर मूल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला चंद्रपूर रेफर केले, मात्र चंद्रपुरात पोहचण्याआधी वाटेत मिताली चा मृत्यू झाला.

     

    याबाबत शाळेतील मुख्याध्यापक यांनी कुटुंबाला कसलीही माहिती दिली नाही, मिताली चा मृत्यू झाल्यावर तिच्या कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली, ही बाब संदेह उपस्थित करणारी आहे.

     

    याप्रकरणात शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शाळेतील शिक्षकावर कारवाई करीत शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
    शाळा व्यवस्थापनाने मिताली च्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले, याबाबत आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती गिर्हे यांनी दिली.

     

    विशेष म्हणजे ही आश्रमशाळा चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भाजप नेत्या संध्या गुरनुले यांची आहे, त्यामुळे सदर प्रकरणात कमालीची गुप्तता पाळली गेली.

     

    मिताली चे शवविच्छेदन झाल्यावर आई-वडील गावी मृतदेह नेत असताना त्याठिकाणी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत दाखल झाले, आधीच मुलगी गेल्याचा कोंडागुर्ले दाम्पत्याला धक्का पोहचला होता आणि त्यामध्ये पोलीस निरीक्षकांनी गडचिरोली जिल्ह्यातील छोट्याशा गावातून मुलीचा मृतदेह नेण्यासाठी दाखल झालेल्या नातेवाईकांना निघा इथून म्हणून त्यांना दम दिला, मुलीचा मृत्यू कसा झाला? त्याबाबत कुटुंबाला माहिती नाही आणि पोलीस निरीक्षकाच्या अश्या वागण्याने खाकी ची माणुसकी संपली की काय? असा प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित होतो.

    याबाबत संस्था अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शाळेची चूक नसल्याचे सांगितले.

    हलगर्जीपणा केला नाही : संध्या गुरनुले
    याबाबत आश्रमशाळेच्या संस्थेच्या अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असून यात हलगर्जीपणा बाळगला नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलीची तब्येत बरी नव्हती तेव्हा तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. औषध दिल्यावर तिच्यात सुधारणा झाली होती. यानंतर सोमवारी नृत्याचा सराव करताना तिला चक्कर आली. तिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले मात्र वाटेत तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली होती. मात्र मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदन अहवालातुनच समोर येणार आहे, असे त्या म्हणाल्या.

     

    या प्रकरणी मूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.