Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • चंद्रपुरात भाजप युवा मोर्चाचे शिवम सिंग यांनी बांधले शिवबंधन

    News34

    चंद्रपूर – राज्य व जिल्हा स्तरावर सुरू असलेल्या राजकारणाचे बदलते स्वरूप सध्या नागरिक बघत आहे, मात्र शिवसेना ठाकरे गट या बदलत्या व सूडाच्या राजकारणाला बगल देत आपली चांगली प्रतिमा नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी ठरत असून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकजण शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहे.

    चंद्रपूर भारतीय जनता पक्षाचे पूर्व मंडळ महामंत्री, जिल्हा सचिव उत्तर भारतीय मोर्चा तसेच युवा वॉरियर्स चे अध्यक्ष शिवम रामप्रवेश सिंग यांनी आज शिवसेना कार्यालय, चंद्रपूर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गीऱ्हे यांच्या मार्गर्शनात युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला.

    यावेळी वसीम भाई शेख,सिकंदर खान,सोनू ठाकूर, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रिजवान पठाण, शहरप्रमुख शाहबाज शेख, मनीष दास, बादल डे उपस्थित होते.

  • चंद्रपूर महावितरणची तत्पर सेवा अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी

    News34

    चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बाबूपेठ शाखा कार्यालय भागातील रहिवासी कनकतारा मलय्या सौदारी यांनी महावितरण कडे नविन वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी देण्यात आली.

    राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुक सेवा देण्याची सुचना केली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी व अभियंता यांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तत्परतेने देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर परिमंडल अंतर्गत ग्राहकांना वीज जोडण्या तसेच ग्राहकांच्या विविध तक्रारींचे वेळेत निरासन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

    महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुनिल देशपांडे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु करुन श्री. कनकतारा सोदारी यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून चंद्रपूर उपविभाग क्र. 1 येथे सद्दस्थितीत पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या संपुर्ण ग्राहकांच्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत व ही मोहीम चंद्रपूर परिमंडलांतर्गत सर्वत्र राबविण्यात येत आहे.

     

    त्या अनुषंगाने मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडल यांनी चंद्रपूर उपविभाग क्र. 1 चे उपकार्यकारी अभियंता श्री वसंत हेडाऊ व संपूर्ण चमुचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी श्री सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, श्रीमती संध्या चिवडे, अधिक्षक अभियंता, चंद्रपूर प्रविभाग, चंद्रशेखर दारव्हेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग, किर्ती चांभारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, वसंत हेडाऊ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चंद्रपूर उपविभाग क्र. 1 साहील टाके, सहाय्यक अभियंता बाबूपेठ शाखा कार्यालय व सर्व जनमित्र उपस्थित होते.

  • त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सुनीता पाटील

    News34

    चंद्रपूर – वरोरा शहरात पोलिसांनी अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहविक्री चा व्यापाराचे मोठे नेटवर्क उघडकीस आणत त्या प्रकरणात अनेकांना अटक केली. Viral videos

    मात्र वरोरा तालुक्यातील काही तथाकथित नेत्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलींची भेट घेत तिच्यासोबत आक्षेपार्ह विचारणा करीत व्हिडीओ बनविला ते तितक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, त्यामुळे पीडित मुलीची ओळख त्यांनीं पटवून दिली. Sex racket

    अत्याचार पीडित कोणत्याही प्रकरणात पीडितेची ओळख बाहेर आणणे हा मोठा गुन्हा आहे असे असताना सुद्धा मेश्राम व जीवतोडे यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना केली आहे.

    त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये मेश्राम हे तिला आक्षेपार्ह विचारणा करीत जणू त्या अल्पवयीन मुलीची खिल्ली उडवीत आहे असे दिसत होते, अश्या विकृत मानसिकतेच्या तथाकथित नेत्यांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कुणी असे कृत्य करणार नाही अशी मागणी चंद्रपूर महिला अध्यक्ष सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, महिला पदाधिकारी राणी जैन, लक्ष्मण पाटील व अजय आंबेकर यांनी केली आहे.

    वरोरा प्रमाणे चंद्रपूर शहरात सुद्धा असे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना दिली आहे.

     

  • चंद्रपूर शहरातील या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार यांचं नाव

    News34

     

    चंद्रपूर : शहरातून बल्लारपुरकडे जाणारा रस्ता बागला चौक ते अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले या रस्त्याची नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.

     

    मोठा गाजावाजा केला गेला तसेच रस्त्याचे फलक शहरात लावण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम अर्धवट सोडून कंत्राटदाराने तेथून पळ काढल्याने जनतेमध्ये प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आम आदमी पार्टी च्या टीमने अधिक माहिती घेतली असता अधिकच्या कमिशन खोरी मुळे कंत्राटदाराचा वाद झाला असे कळले.कमिशनखोरीमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप आप ने केला आहे.

    या रोड वरती जिल्ह्यातील विद्युत विभागाचे मुख्य कार्यालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने तथा बल्लारपूर कडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज रहदारी असते. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात.

    आज आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात तथा राजु कुडे यांच्या नेतृत्वात या रस्त्याला आमदार किशोर जोरगेवार खड्डा रस्ता असे नावं देण्यात आले. सोबतच हा रस्ता चोरीला गेला असल्याने आमदार यांनी हा रस्ता तात्काळ शोधून आणून जनतेच्या सेवेत तत्पर करून द्यावा. अशी विनंती सुध्दा करण्यात आलेली आहे.
    तात्काळ काम झाले नाही तर जनतेला सोबत घेऊन चक्का जाम आंदोलन करू असा इशारा राजु कुडे यांनी दिला.

    यावेळी आप चे शहर सचिव राजू कुडे, झोन सह संयोजक जयदेव देवगडे, प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, प्रशांत रामटेके, सागर बोबडे, भिमराज बागेसर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

     

  • झपाट्याने वाढत असलेल्या डोळ्यांच्या साथीवर उपाययोजना करा

    News34

     

    चंद्रपूर:- जिल्ह्यांमध्ये डोळ्यांचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असून डोळे येवून डोळे सूजने या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यासंदर्भात शिवसेनेचे वैद्यकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान व शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सोनारकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

    महाराष्ट्रासह विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये डोळ्याचा संसर्गजन्य रोग म्हणजेच डोळे येणे याचा खूप प्रादुर्भाव झालेला दिसत असून आपल्या जिल्ह्यात सुद्धा अनेक व्यक्तींना हा रोग झालेला मोठ्या प्रमाणात आढळत आहे. यावर आळा बसवण्यासाठी व त्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व प्रशासनमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गांवस्तरावर युद्ध पातळीवर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करुन जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या आजारापासून दूर ठेवण्यास प्रयत्न करावे.

    आजच्या स्थितीत खेडोपाडी या आजारावर इलाज होत नसून शासनामार्फत गोरगरिबांना याचा लाभ मिळावा या हेतूने आपण प्रयत्नशील आहात तसेच आपण संबंधितांना यासंदर्भात तात्काळ आदेश देवून ह्या आजारापासून नागरिकांना बाहेर काढण्यास मदत करावी.

    यावेळी शिवसेनेचे वैदकीय जिल्हा प्रमुख, अरविंद धिमान, शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख, संतोष पारखी, कोरपना तालुका प्रमुख, राकेश राठोड, उपतालुका प्रमुख, अविनाश उके, राजू रायपुरे, आशिष खरोले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

  • चंद्रपूर मनसे पक्षात फेरबदल

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये फेरबदल करण्यात आले असून वाहतूक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सध्या चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये सर्व काही आलबेल सुरू असून संघटन वाढीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी भरीव प्रयत्न केले व करीत आहे.

    ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न न केल्याने त्यांना जबाबदारी मधून मुक्त करण्यात आले आहे, चंद्रपूर जिल्हा मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पदावर मनसैनिक महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    वाहतूक सेना संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या आदेशाने सरचिटणीस आरिफ शेख यांच्यासह मनसे वाहतुक राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने व मनसे जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या हस्ते वासलवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

    नियुक्ती झाल्यावर वासलवार यांनी वाहतूक सेना संघटन वाढीचे जिल्ह्यात प्रयत्न करू व वाहतुकदारांना सध्या नेतृत्वाची गरज आहे, त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते, आम्ही मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वासलवार यांनी दिली.

     

  • गोंदिया ते चांदा फोर्ट रेल्वे रुळावर चालणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द

    News34

    चंद्रपूर – गोंदिया रेल्वे स्थानकावर सुरक्षेसंबंधी कार्य सुरू असल्याने गोंदिया ते चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे.

    अमृत महोत्सव अंतर्गत राज्यातील अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण होत आहे, मात्र त्यामध्ये गोंदिया रेल्वे रुळावर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे काम सुरू असल्याने पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. Chanda fort

    ज्यामध्ये गाडी संख्या नंबर ०८८०६ गोंदिया – वडसा मेमु पैसेजर दिनांक ९/८/२०२३ ते दिनांक २२/८/२०२३ पर्यंत बंद राहील.
    गाडी संख्या नंबर ०८८०८ वडसा – नागभीड- चांदाफोर्ट मेमु पैसेजर दिनांक १०/८/२०२३ ते दिनांक २३/८/२०२३ पर्यंत बंद राहील.
    गाडी संख्या नंबर ०८८०५ चांदाफोर्ट – नागभीड – गोंदिया मेमु पैसेजर दिनांक १०/८/२०२३ ते २३/८/२०२३ पर्यंत बंद राहील.

    अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

  • चंद्रपूर युवासेनेच्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

    News34

    चंद्रपूर – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समाज हित धोरण स्विकारून शिवसैनिक अमनभाऊ अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगष्ट २०२३ रोज मंगळवारला
    इंदिरा नगर येथे युवासेना शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या द्वारा आयोजित करण्यात आले होते.

    आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले, तब्बल 68 युवकांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदान शिबिरांनातर इंदिरा नगर येथे युवासेना शाखेचे उदघाटन करण्यात आले.

    यावेळी युवतीसेना महाराष्ट्र राज्य सहसचिव रोहिणीताई पाटील, महाराष्ट्र राज्य विभागीय सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य निलेशभाऊ बेलखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शालिकभाऊ फाले, शिवसेना माजी महानगरप्रमुख प्रमोदभाऊ पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख रिझवान पठाण,सुमित अग्रवाल, सुजित पेंदोर, महिला आघाडी जिल्हासंघटीका उज्वलाताई नलगे, माजी जिल्हासंघटीका कुसुमताई उदार, इंदिरा नगर शाखाप्रमुख पराग कुत्तरमारे,उपशाखाप्रमुख श्रीकांत दडमल, शाखा सचिव अमित वाघमारे, शाखा उपसचिव तुषार वारफडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

  • त्या 33 कोटीचे काय? – आमदार धानोरकर

    News34

    चंद्रपूर : राज्यातील जि.प. अंतर्गत 2019 व 2021 मध्ये पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली. सदर पद भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू, वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधींची उधारी झाली. या अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत करावेत, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.

    ३३ कोटी ३९ लाख ४५ हजार २५० रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडे थकलेली आहे. जिल्हा परिषदांच्या भरतीमुळे बेरोजगारांची सरकारकडे कोट्यवधी रुपयांची उधारी थकली आहे. भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. परंतू अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत केले नाही. सन 2023 रोजी सर्व जि.प. अतंर्गत पद भरतीचे जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून, सन 2019 व 2021 मध्ये ज्या बेरोजगार तरुणांनी विविध पदासाठी परीक्षा शुल्क भरलेले आहते. तेच परीक्षा शुल्क ग्राह्य धरुन सन 2023 च्या पदभरतीत सदर तरुणांना समाविष्ठ करुन घ्यावे. सोबतच वयोमर्यादा ओलांडलेल्या किंवा परीक्षा न देऊ इच्छीनाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क तात्काळ परत करण्यात यावे,अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

    जिल्हा परिषदमार्फत 2019 आणि 2021 भरती जाहिरातीनुसार विविध पदांसाठी अर्ज केले होते. या पदांसाठीच्या परीक्षा अचानक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवार आर्थिक संकटात सापडले आहेत. हजारो बेरोजगार तरुणांनी या भरतीच्या जाहिरातींवर आशा ठेवल्या होत्या. भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उमेदवारांनी परिश्रमपूर्वक अर्ज केला आणि आवश्यक परीक्षा शुल्क देखील भरले, ज्याची रक्कम एकत्रितपणे बऱ्यापैकी होती. मात्र, सरकारने अनपेक्षितपणे दोन्ही परीक्षा प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा केल्याने त्यांच्या आशा-आकांक्षांना तडा गेला. भरती रद्द केल्याने गंभीर परिणाम झाले आहेत, अनेक उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरण्यासाठी विविध स्त्रोतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले असल्याचे उघड झाले आहे. या अनपेक्षित आर्थिक भारामुळे त्यांना कर्जाच्या खाईत लोटले आहेत.

    आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्रस्त उमेदवारांच्या हक्कासाठी कठोर भूमिका घेतली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून बेरोजगार उमेदवारांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी केली आहे. धानोरकर यांनी बेरोजगारांच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला असून, रद्द झालेल्या परीक्षांमुळे आर्थिक चणचणच असलेल्या तरुणांना परतावा देण्याची मागणी केली आहे.

  • पुरग्रस्तांसोबत संवाद साधण्यासाठी पालकमंत्री उशीरा पोहचले

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील वर्षीपासून पावसाळ्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण व्हायला लागली आहे, मात्र या पूर परिस्थिती वर अद्याप तोडगा निघाला नाही, आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन भवनात पूरग्रस्तांसोबत संवाद व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलाविले होते मात्र पालकमंत्री मुनगंटीवार हे स्वतः त्या बैठकीला उशिरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

    शहरात येणाऱ्या पुरावर जनप्रतिनिधी व प्रशासन कायमचा तोडगा काढण्यास अपयशी ठरले आहे, दरवर्षी पाऊस पडला की शहरातील अनेक भागातील घरे पाण्याखाली जातात.

    आजही काही पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळत नसल्याची माहिती आहे, पुरग्रस्तांच्या समस्या काय आहे? हे जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्तांची बैठक आयोजित केली होती.

    सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत ही बैठक होणार होती, मात्र पालकमंत्री स्वतः 7 वाजताच्या दरम्यान पोहचले, नागरिक कामावर न जाता पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या समक्ष आपल्या समस्या विस्तृत मांडणार होते मात्र मंत्री महोदय उशिरा आले.

    त्यानंतर पालकमंत्री यांनी सर्वांच्या समस्या ऐकुन घेतल्या मात्र बैठकीला उशीर झाल्याने नागरिक संतापले, कारण पुरग्रस्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे सविस्तर समस्या कुणी सांगू शकले नाही.

    दरवर्षी पुर येतं आहे, त्यावर प्रशासन व जनप्रतिनिधीं यांनी कायमचा तोडगा काढावा, अन्यथा दरवर्षी फक्त प्रशासन पंचनामे करणार आणि मदत देणार असे किती दिवस चालणार असा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांनी उपस्थित केला.