चंद्रपूर नागपूर मार्गावर वाढतंय अतिक्रमनाचे जाळं

News34 chandrapur

चंद्रपूर – दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा विस्तार वाढत असून नागरिकांच्या मूलभूत सोयी काही प्रमाणात अपुऱ्या पडत आहे. सोबतच शहरात अतिक्रमण सुद्धा झपाट्याने वाढत आहे.

 

चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जटपुरा गेट परिसर असो की वरोरा नाका चौक ते बापट नगर याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

 

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर शिक्षिकेचा रस्ते अपघातात बळी गेला होता, कारण रस्त्यावर चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ व काही दुकान चालकांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण त्या अपघाताला कारणीभूत होते.

 

त्या अपघातानंतर सुद्धा चंद्रपूर मनपा प्रशासनाने रस्त्यावर असलेल्या अतिक्रमनावर काही ठोस कारवाई केली नाही, विशेषतः चंद्रपूर नागपूर मार्ग हा अनेक दुकान चालकांनी आपल्या दुकानाच्या हद्दीत घेतला आहे.

या मार्गावरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने तात्काळ हटवून चंद्रपूर नागपूर महामार्ग मोकळा करून भविष्यात होणाऱ्या अपघाताला टाळण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *