toll naka : टोल नाक्यावर धडकली मनसे

Toll naka chandrapur

toll naka सावली:- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाहि तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Toll naka टोलनाका व्यवस्थापकाच्या हलगर्जी पनामुळे पंधरा दिवसाआधी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला होता, अशा विपरीत घटणा वारंवार घडु नयेत यासाठी टोलनाक्याजवळ पडलेले खड्डे तास्काळ दुरस्त करूण दुचाकी वाहनाकरीता बाजूने रस्ता उपलब्ध करून द्यावे आठ दिवसात सदर मागणी पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येणार असून याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात टोलनाका व्यवस्थापकाला देण्यात आले आहे.

मानव वन्यजीव संघर्ष – मूल तालुक्यात वाघाने केली गुराख्याची शिकार

यावेळी निवेदन देण्यार्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे मनसेचे मूल तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे, शुभम वांढरे, मंगेश धोटे, निक्की यादव, प्रशांत रामटेके, शंकर भडके आणि मनसे तथा मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते.

टोलनाक्याचे नियम काय?

राष्ट्रीय महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी टोलनाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच जर त्या टोल नाक्यावर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागू नये, असं नियम सांगतो. जर तुम्हाला 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबायला लागलं तर तुम्ही टोल ने देता तिथून जाऊ शकता. टोल नाक्यावर 100 मीटरहून अधिकची रांग असता कामा नये, असा नियम आहे.

गोळीबार : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांड प्रकरणात राजकीय कनेक्शन?

टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी लेन केलेल्या असतात. या प्रत्येक लेनमध्ये सहापेक्षा अधिक वाहनं नसावीत. प्रत्येक टोल नाक्यापासून 100 मीटर अंतरावर पिवळ्या रंगाची पट्टी असावी. या शिवाय दोन टोलनाक्यांमध्ये 60 किलोमीटर अंतर असावं, असा नियम आहे. आता यात थोडा बदल करण्यात आला आहे. 60 किलोमीटर अंतराच्या परिघात एकच टोलनाका असावा.

टोल टॅक्स ही देशात कुठेही एक्सप्रेसवे किंवा हायवे वापरण्यासाठी तुम्ही भरलेली रक्कम आहे. सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात गुंतले आहे, ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो. हा खर्च महामार्गांवरून टोल टॅक्स आकारून वसूल केला जातो. विविध शहरे किंवा राज्यांमध्ये प्रवास करताना महामार्ग किंवा एक्सप्रेसवे हा वापरण्यासाठी सोयीस्कर पर्याय आहे. टोलकर दर संपूर्ण भारतातील विविध महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर बदलते. रक्कम रस्त्याच्या अंतरावर आधारित आहे आणि प्रवासी म्हणून, तुम्हाला त्यासाठी जबाबदार राहावे लागेल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *