Tag: सिनेट सदस्य निलेश बेलखेडे

  • Gondwana University carry on policy update । 📢 “गोंडवाना विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ धोरणावर चर्चा, सिनेट सदस्यांचा आग्रह

    Gondwana University carry on policy update

    Gondwana University carry on policy update : चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. ,बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिलॅबस व अभ्यास साहित्य उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. academic year loss due to new education policy

    चंद्रपुरात अमृता फडणवीस यांच्या हस्ते भव्य रुद्राभिषेक

    मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेताना बसत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहे. काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे व प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली.

    विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दोन्ही सिनेट सदस्यांनी तत्काळ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरी ऑन लागू करावे अशा पद्धतीची विनंती केली.

    तोडगा निघणार

    कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेऊ, सदरचा निर्णय हा अकॅडमिक कौन्सिलच्या अंतर्गत येत असल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर निश्चितपणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केलेले आहे.

    Somayya institute of technology

    त्यामुळे येणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची विद्यापीठाने काळजी घ्यावी. अशा स्वरूपाची मागणी दोन्ही सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.

  • University PhD viva process | गोंडवाना विद्यापीठात Ph. D. अधिसूचना आता Viva-Voce च्या दिवशीच

    University PhD viva process

    सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नांना यश

    University PhD viva process : गोंडवाना विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता Ph. D. पदवी प्रदान करण्याची अधिसूचना (Notification) थेट Viva-Voce च्या दिवशीच प्रकाशित केली जाणार आहे. यामुळे संशोधन विद्यार्थ्यांना त्वरित प्रमाणपत्र मिळेल आणि ते सरकारी व खाजगी नोकरी भरती प्रक्रियेत त्वरित पात्र ठरू शकतील. PhD certificate verification

    घुग्गुस शहरात शालेय विद्यार्थिनीसमोर विकृती

    पूर्वी, गोंडवाना विद्यापीठात Ph. D. Viva-Voce झाल्यानंतर साधारणतः 15 दिवस ते एक महिना अधिसूचना जाहीर करण्यात विलंब होत असे. त्यामुळे या कालावधीत जर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती निघाली, तर संबंधित विद्यार्थी पात्र ठरत नव्हता आणि त्याला संधी गमवावी लागत होती.

    या समस्येची दखल घेत, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना विभागीय सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांनी ही प्रक्रिया गतिमान करण्याचा ठराव मागील अधिसभेत मांडला. सिनेट सदस्य डॉ. प्रवीण जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठराव मांडण्यात आला आणि तो सभागृहाने मंजूर केला. यामुळे आता Viva-Voce पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि विद्यार्थ्यांना लगेच त्याचा लाभ मिळेल.

    Ph. D. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी प्रा. निलेश बेलखेडे आणि डॉ. प्रवीण जोगी यांचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले जात आहेत.

  • University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

    University of Gondwana : नाट्यशास्त्र विभागाशी संबंधित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करा – निलेश बेलखेडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन्ही जिल्हे सांस्कृतिक दृष्टीने सम्पन्न जिल्हे आहेत. झाडीपट्टी रंगभूमी या दोन्ही जिल्ह्यात विखुरलेली आहे शिवाय शेजारच्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात देखील झाडीपट्टी रंगभूमीची नाटके सातत्याने होतात. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक नाटकांची चळवळ सक्रिय आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया द्वारे आयोजित राज्य नाटय स्पर्धा असो वा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार राज्य नाटय स्पर्धा असो या जिल्ह्यातील नाटय कलावंत राज्य पातळीवर अग्रणी आहेत. University of Gondwana

     

     

    ही चळवळ पुढे नेण्यासाठी नव्या पिढीतील तरुण विद्यार्थी नाटय विषयक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व उत्सुक आहेत. मात्र आपल्या विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांना नागपूर किंवा राज्यातील अन्य ठिकाणी जावे लागत आहे पर्यायाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी या पासून वंचीत देखील राहत आहेत. Department of Drama

     

    नाट्यविषयक शिक्षण घेऊन या जिल्ह्यातील विद्यार्थी नाटय चळवळ अधिक समृद्ध करतील या दृष्टीने गोंडवाना विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयाचे पदविका , पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावे याकरीता शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित युवासेनाच्या वतीने युवासेना चे पुर्व विदर्भाचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे यांनी कुलगुरू डॉ. बोकारे यांना सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली आहे.

     

    सदर विषय अत्यंत जिव्हाळ्याचा चंद्रपूर च्या मातीशी जुळलेला व महत्वपुर्ण असून यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर गोंडवाना विद्यापीठात सदर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल या साठी सकारात्मक भुमिका घेणार असे त्यांनी आश्वासित केले. यावेळी यासंदर्भात प्र कुलगुरू डॉ. कावळे यांच्याशी हि सदर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गोंडवाना सिनेट सदस्य प्रा डॉ प्रविण जोगी यांची सुद्धा उपस्थिती होती.

  • गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी जेवनाविना

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी गेले तीन-चार दिवसापासून जेवण न मिळाल्यामुळे उपाशी आहेत. जेवणासाठी आंदोलन करीत आहेत, कुलगुरू स्वतः त्यांना जाऊन विद्यार्थ्यांना भेटल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की आपणापैकी कोण उपाशी आहेत त्यावेळी विद्यार्थ्यांनी जेवण न केल्याचे सांगितल्यावर देखील कुलगुरू डॉ प्रशांत बोकरे विचारणा करून उपाययोजना न करता निघून गेले यावरून कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या प्रती किती गंभीर आहे हे दिसून येते. आज परत विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं.

     

    त्यानंतर कुलगुरूंनी त्यांच्या जेवणाची तात्पुरती व्यवस्था करण्याबद्दल त्यांना आश्वासित केले आहेत. कुलगुरूंनी दिलेले आश्वासन ते पाळतील ही अपेक्षा आहे. परंतु हा प्रश्न तात्पुरत्या सोयीने सुटणार नाही. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना जेवण, प्रवेश व हॉस्टेल तिन्ही मोफत राहील अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आली आणि आता मात्र त्यांच्याकडून पैसे मागत असल्याबाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे. माननीय राष्ट्रपती महोदया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आलेल्या असताना कुलगुरू यांनी राष्ट्रपतींच्या समक्ष जाहीरपणे बोलताना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला एकही रुपया लागणार नाही असे उदगार काढलेले आहे. परंतु कुलगुरू बोललेले शब्द पाळत नाहीत असा वारंवार अनुभव येत आहे.

     

    अनेक विद्यार्थी कुलगुरूंच्या उदासीन धोरणामुळे शिक्षण सोडून जेवण मिळणार नाही म्हणून गावाला परत जात आहे. ही बाब विद्यापीठाच्या प्रतिष्ठेसाठी चांगली नाही.
    गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की कशासाठी हेच कळत नाही?. एकीकडे “विद्यापीठ आपल्या गावी” योजना सुरू केल्याची शाबासकी मिळविली जाते मात्र दुसरीकडे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न चार दिवसापासून सुटू शकत नाही.

     

    त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अन्यथा आम्हाला विद्यापीठात येऊन विद्यापीठाला विद्यार्थ्यांसह घेराव घालावा लागेल असा इशारा सिनेट सदस्य , प्रा. निलेश बेलखेडे,प्रा डॉ दिलीप चौधरी, डॉ. प्रवीण जोगी, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत, अजय लोंढे, दीपक धोपटे, यांनी दिला आहे.

  • विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील काही वर्षांपासून कधी प्राध्यापकांच्या प्रलंबित पगाराला घेऊन चर्चेमध्ये राहणारे राजीव गांधीं अभियांत्रिकी महाविद्यालय हे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)लोनारे रायगड यांच्या वतीने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भोंगळ कारभारामुळे चर्चेत आले आहे.

     

    या विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून नाहक त्रासाला समोर जावं लागतं आहे त्यामुळे विविध प्रश्नांना घेऊन राजीव गांधीं महाविद्यालयाचे विद्यार्थी युवासेना कडे धाव घेत त्यांना होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानापासून न्याय मिळवून द्यावे या मागणीला घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ यामध्ये महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष तेजस अल्लावार, वतन मादर, अक्षय उपगनलावार, रोहन आंबटकर, हेमंत गोरे, अनिकेत मानकर ,अथर्व कर्चे, विशाल कुलसंगे, वैभव किनाके व इतर विद्यार्थी मित्र इत्यादी हे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना सचिव पुर्व विदर्भ इंजि निलेश बेलखेडे यांना भेटले व सदर विषयावर एक निवेदन त्यांनी दिले. यापुर्वी सुद्धा निलेश बेलखेडे यांनी या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवुन दिलेले असल्याने विद्यार्थ्यांनी बेलखेडे यांच्या कडे या प्रश्नांना सोडविण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली.

     

    यामध्ये १) काही विद्यार्थ्यांचा मागील वर्षीच्या पास म्हणून आलेला निकाल विद्यापिठाच्या सिस्टम अपडेटमुळे चक्क सहा महिने तर काहिंचा एक वर्षानंतर नापास म्हणून आलेला आहे व त्यांना आता त्या विषयांची परिक्षा द्यावी लागणार आहे म्हणजे अश्या विद्यार्थ्यांना remedial परिक्षेची संधी पासून सुद्धा विद्यापिठाच्या चुकीमुळे वंचित राहावे लागले आहे . २)काहि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका ७-८महिने कालावधी झाल्या नंतरहि अजून आलेल्या नाही. ३)अंतिम वर्षातील विद्यार्थी पास होऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हि त्यांच्या गुणपत्रिका, डिग्री वेळेवर न मिळाल्याने त्यांना समोरच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी वंचित राहावे लागत आहे. ४) नियमीत सत्राची परिक्षेचा निकाल लागून अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या फेरतपासनीचा निकाल न लागता त्यांना remidial चा फाॅर्म भरून परिक्षा द्यावी लागत आहे यामध्ये शैक्षणिक नुकसान सोबतचं आर्थिक भृंदड सुद्धा त्यांच्यावर पडआहे. ५) विद्यार्थ्यांचा मागील सेमिस्टर चा सप्लिमेंट चा निकाल आतापर्यंत लागलेला नाही त्यामुळे समोर च्या शैक्षणिक सत्रामध्ये ते पोहोचले कि नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर असून अभ्यास कसा करायचा या संभ्रमात विद्यार्थी पडले आहे. ६) विद्यापिठाच्या पोर्टलच्या चुकांमुळे काही विद्यार्थी विद्यापिठाच्या criterion नुसार विद्यार्थी हा समोरच्या सत्रासाठी pramote असून सुद्धा तो पोर्टल वर Not Pramoted दर्शवितो आहे. ७) आॅनलाईन पद्धतीने पेपर्स मुल्यांकन होत असून चुकिचे पेपर चेक होणे इत्यादी.

     

    अश्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना समोरे जावे लागत असून यासंदर्भात काही दिवसांपूर्वी निलेश बेलखेडे यांच्या वतीने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य प्रशांत पोटदुखे, रजिस्ट्रार व महाविद्यालयीन डिन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता महाविद्यालय आपल्या वतीने या समस्येवर प्रयत्न करीत असून विद्यापिठ महाविद्यालयाच्या कुठल्याही मेल ला योग्य उत्तरे देत नसून याबाबत विद्यापीठ फारसं गंभीर नाही असे एकंदरित दिसून आले. त्यावेळी निलेश बेलखेडे यांनी या सर्वाच निराकरणाची जबाबदारी हि महाविद्यालयाची असून फक्त मोबाईल वर, मेल द्वारे हे प्रश्न सुटणार नसून महाविद्यालयाच्या वतीने विद्यापिठात रायगड येथे एक शिष्टमंडळ पाठवून तिथे विद्यापीठ कुलगुरू यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढून विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक शोषण थांबवावे असे सांगितले त्यावेळी महाविद्यालयाच्या वतीने हे मान्य करण्यात आले परंतु अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नाही.

     

    हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बनलेलं आहे कि विद्यार्थी पालकांची आर्थिक लुट करण्यासाठी बनलेलं आहे यावरून रोष व्यक्त करित युवासेना सचिव निलेश बेलखेडे यांनी येत्या काही दिवसांत याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभीर्य समजून शिष्टमंडळ पाठवून त्यांना या चुका निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर युवासेना च्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन तिव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना सचिव इंजि.निलेश बेलखेडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • एका कॉल वर विद्यार्थ्यांची समस्या सुटली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिवर्सिटी (BATU) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील तृतीय वर्षाचे संगणक तसेच मायनिंग च्या ८०च्या वर विद्यार्थ्यांचे २०२२ मध्ये झालेल्या रिमेडियल परिक्षेचा निकाल एक वर्ष लोटूनहि न लागल्यामुळे या युनिवर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे या वर्षीचे म्हणजेच २०२३ चे शेक्षणिक नुकसान होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती.

     

    यावेळी महाविद्यालयानी सुद्धा आपल्या परिने वारंवार ईमेलद्वारे व काॅल करून यासंदर्भात या युनिवर्सिटी च्या परिक्षा विभागाला विचारना करून सुद्धा उडवा उडविची उत्तरे त्यांच्या मार्फत दिली जात होती यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वार्षिक नुकसानाच्या भितीचे वातावरण तयार झाल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना विभागीय सचिव तसेच सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या कडे धाव घेऊन या संदर्भात निवेदन देऊन मदत मागितली.

     

    प्रा निलेश बेलखेडे यांनी लगेच विभागीय कार्यालयात संपर्क करून या संदर्भात ४-५दिवसात निर्णय होऊन निकाल जाहिर करावे हि विनंती वजा ठनकाऊन सांगितले अन्यथा नागपुर विभागीय कार्यालयात येऊन विषय मार्गी लावल्या जाईल असे सांगताच विभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्फत लवकरच निकाल लावून विद्यार्थ्यांचे समाधान करणार असे आश्वासीत केले व निलेश बेलखेडे यांनी दिलेल्या विद्यापिठाला कालावधीतचं ५दिवसातचं या संबंधी चे निकाल जाहीर झाले व सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. प्रा निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचले यावर विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त करून निलेश बेलखेडे यांचे आभार मानले.