Tag: वाघाचा हल्ला

  • tiger attack in Brahmpuri taluka । धक्कादायक! वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, मुंडकचं धडावेगळं केलं

    tiger attack in Brahmpuri taluka

    tiger attack in Brahmpuri taluka : ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदिरवाडे (वय 52) असे असून, सोमवारी (दि. 11) सकाळी शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. आज सदर शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे.

    २५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

    प्राप्त माहितीनुसार, काल सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घनश्याम उंदिरवाडे शेतावर गेले होते. शेतातील काम पूर्ण करून परत येत असताना शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्ला एवढा भीषण होता की मृताचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते.


    सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांच्या शोधासाठी शेत व जंगल परिसरात पाहणी केली. परंतु ते आढळून आले नाही. अखेर आज मंगळवारी (दि. 12) सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलातील झुडपात आढळून आला. tiger attack farmer दक्षिण वनपरिक्षेत्रातील पद्मपूर बीटमधील गट क्रमांक ७२ मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने मृतदेह सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

    २५ हजारांची तातडीची मदत

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रह्मपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
    मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने तातडीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी आर. एफ. ओ. आकाश सोंडवले यांच्यासह इतर अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    या घटनेमुळे कुडेसावली व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यजीवांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  • tiger attack in forest areas । आंब्याचा मोह जीवावर बेतला, मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    tiger attack in forest areas

    tiger attack in forest areas : मूल (चंद्रपूर) : समाजसेवक बाबा आमटे यांच्या सोमनाथ प्रकल्पात गेल्या ४० वर्षांपासून वास्तव्यात असलेले जयदेव पोतलू करनेकर (६०) रा. विसोरा ता. वडसा जिल्हा गडचिरोली यांना वाघाने ठार केले. ते सोमनाथ प्रकल्पात नेहमीप्रमाणे आंबे तोडण्यासाठी गेले होते. अशातच वाघाने हल्ला चढविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सततच्या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    ashok jiwtode

    दुचाकीवर कोसळल झाड, एकाचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना

    जयदेव हे आंबे तोडण्यासाठी सोमनाथ प्रकल्पात रविवारी दुपारी ३ वाजता गेले होते. दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. घरच्या मंडळींनी जयदेव परत आला नसल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने शोध घेतला मात्र उपयोग झाला नाही. human wildlife conflict in Maharashtra

    जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळले

    सोमवारी सकाळी वाघाने जयदेवला ओढत वन विभाग कक्ष क्रमांक ७९२ येथे नेले होते. सोमवारी सकाळी ८:३० वाजता मूल वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र सहाय्यक आर.सी. पेदापल्लीवार यांनी कर्मचाऱ्यांना घेवून जंगलात शोध मोहीम सुरू राबविली असता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक ७९२ जयदेवच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले.

    रात्रभरात वाघाने मृतदेहाचा बराच भाग खाल्ल्याचे दिसून आले. जयदेव हा आपल्या पत्नीसह सोमनाथ प्रकल्पात राहत होता. वनविभागाने मृतकाच्या नातेवाईकाला २० हजार रुपये सानुग्रह म्हणून मदत दिली आहे. वनविभागाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. चालू वर्षात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यन्त एकूण २४ नागरिकांच्या बळी गेला आहे.

  • Frequency of tiger attacks in Chandrapur region । चंद्रपूर जिल्ह्यात माणूस आणि वन्यजीव संघर्ष शिगेला, एकाच दिवशी दोघांची शिकार

    Frequency of tiger attacks in Chandrapur region

    Frequency of tiger attacks in Chandrapur region : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून २७ मे रोजी वाघाने मूल तालुक्यात दोघांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील १७ दिवसात वाघाने ११ नागरिकांची शिकार केली असून ५ महिन्यात २३ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

    पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत

    पहिल्या घटनेत मूल तालुक्यातील कांतापेठ गावातील ५२ वर्षीय सुरेश मुंगरु सोपानकार हा मंगळवारी चिरोली मार्गावरील जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, दुपारच्या सुमारास बकऱ्याचा कळप गावात परतला मात्र सुरेश हा न परतल्याने गावातील नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिरोली मार्गावरील जंगलात शोधमोहीम राबवली असता सुरेश चा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला, सुरेशचा पूर्ण पाय वाघाने खाऊन टाकला होता. Wildlife conservation and human conflict in Chandrapur

    पतीसमोर पत्नीला नेले फरफटत

    दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भगवानपूर मधील जंगल परिसरात बांबूच्या बारीक काड्या, सरपण आणि कुड्याची फुले आणण्याकरिता चिरोली गावातील ४५ वर्षीय संजीवनी मैकलवार हि महिला पती संजय मैकलवार, नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चौघे वनविकास महामंडळाच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये सकाळी ९ वाजताच्या सुमारास गेले होते. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनी वर हल्ला केला, संजीवनी ला पती व नातेवाइकांसमोर वाघाने फरफटत नेले, पती व त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करीत वाघाला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत संजीवनीचा मृत्यू झाला होता. Tiger attacks in villages near Chandrapur forests

    या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.

    हल्ल्याचे सत्र

    मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यापासून वाघाने आपला आतंक सुरु केला आहे, १० मे पासून वाघाने सतत हल्ले करीत आतापर्यंत ११ नागरिकांची शिकार केली आहे, वाघाचे हल्ले नियंत्रणात यावे यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलली नसल्याने नागरिकांचे बळी जात आहे. मागील ५ महिन्यात २३ नागरिक वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहे.

  • woman killed by tiger in Maharashtra । 😨 चंद्रपूर हादरलं! 🛑 वाघाच्या हल्ल्याचा थरार LIVE – जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडली महिला

    woman killed by tiger in Maharashtra

    woman killed by tiger in Maharashtra : चंद्रपूर : 14 मे 2025 – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले दरदिवशी वाढत असून आज बुधवारी (१४ मे) सलग चवथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र ८६२ मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची थरारक घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. कचराबाई अरुण भरडे (५४) रा . करबडा असे मृतक महिलेचे नाव आहे. चार दिवसातील आजचा सहावा बळी आहे. tiger attack during tendu leaf collection

    वाघाचे हल्ले रोखण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी घेतली तातडीची बैठक

    महिलेला फरफटत नेत होता वाघ


    चिमूर तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील कुटुंबीय आपला संसार चालविण्यासाठी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. आज बुधवारी कचराबाई अरुण भरडे ही महिला आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला. तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याचा आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता. tiger kills woman in forest area

    नागरिकांचा आक्रमक पवित्रा


    या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा,गावाभोवताल तारचे कुंपण करा,मुलाला नौकरी द्या,असा मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचला, असा आक्रमक पवित्रा मृतक महिलेचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. वनविभाग व पोलीस विभागाने आक्रमक झालेल्या नागरिकांची समजूत काढली. त्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.या वेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम,वनपाल विनोद किलनाके,अमोल कवासे,जरारे वनरक्षक, मेश्राम, नागलोत, जिवतोडे, गेडाम, खारडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे,सहकायक पोलीस निरीक्षक, दीप्ती मडकाम,पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने मयत भरडे कुटुंबास पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली. villagers protest after tiger attack

    तेंदूपत्ता गोळा करण्याची स्पर्धा

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही तब्बल 300 च्या जवळपास आहे, सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता चा हंगाम सुरू झाला असून ग्रामीण भागातील नागरिक भल्या पहाटे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात. चांगला तेंदूपत्ताच्या मोहापायी नागरिक वाघाच्या क्षेत्रात जातात त्यामुळे हे हल्ले सध्या वाढत आहे.


    वनविभागाच्या प्रत्येक विभागात हजारोंच्या संख्येत पहाटे नागरिक तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जात असल्याने वनविभाग त्यांना थांबवू शकत नाही आहे. मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी द्वारे एक बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. मात्र त्या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत काही माहिती पुढे आलेली नाही.

  • tiger attack in Brahmapuri forest । मोहफुलात मृत्यूची छाया! वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    tiger attack in Brahmapuri forest

    What started as a peaceful morning in the forest turned into a deadly encounter. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा गावातील ६० वर्षीय विनायक जांभुळे यांच्यावर आज रविवारी मोहफुले वेचत असताना वाघाने sudden and fatal attack केला. कालच नांदगाव-जानी भागात बिबट्याने तीन शेतकऱ्यांवर हल्ला केला होता.

    tiger attack in Brahmapuri forest : मोहफूले वेचायला गेलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (13 एप्रिल) ला ब्रह्मपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे उघडली झाली आहे. विनायक विठोबा जांभुळे मृतकाचे नाव आहे. काल शनिवारी याच तालुक्यातील नांदगाव जानी शेतशिवारात एका बिबट्याने तीन शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ताजी असताना आज साठ वर्षीय व्यक्ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा ११ वा बळी आहे. man killed by tiger

    चंद्रपुरात बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण


    दरवर्षी मोहा फुले वेचणीचा हंगामी सीजन येतो या योजनांमध्ये गोर गरीब व्यक्ती गावालगत च्या जंगलामध्ये जाऊन मोहबोल मोह फुले गोळा करतात त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नावर संसाराचा उदरनिर्वाह करतात. याच उद्देशाने आज रविवारी चिचखेडा येथील 60 वर्षीय विनायक जांभळे हा व्यक्ती परिसरातील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेला होता. मोहफुले वेचत असताना जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला.

    या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांना शंका आली. त्यांनी शोधाशोध केली असता सदर वृद्धाचा मृतदेह कक्ष क्रमांक 1006 मधील जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती वन व पोलीस विभागाला देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणी करिता ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. चिचखेडा गाव मेंडकी पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे मृतक हा चिचखेडा येथील होता. chandrapur tiger attack

    या घटनेने चिचखेडा परिसरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. काल शनिवारी याच तालुक्यात नांदगाव जानी शेत शिवारात तीन शेतकऱ्यांना बिबट्याने जखमी केले आहे. या परिसरात कर यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धानपिकाला पाणी देण्यासाठी तीन शेतकरी शिवारात गेले होते. तरस वन्य प्राण्यापासून स्वतःचा जीव वाचवीत पळतसुटलेल्या बिबट्याने या तीन शेतकऱ्यांना शेत शिवारात जखमी केले. ही घटना ताजी असताना आज पुन्हा 60 वर्षीय वृद्धाला वाघाने ठार केले. दिवसागणिक वाघ बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी जोरात सुरू असतानाही वनविभाग बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे.

  • Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack : मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच

    Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे.


    Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय (६०) वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.


    मूल तालुक्यातील मौजा मरेगांव एम.आय.डी.सी. येथील वासुदेव झिवरु पेंदोर वय ६० वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या शेतकरी गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. चराई करीत असताना दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली.

    अवश्य वाचा : तान्हा पोळ्याला महागाईचे ग्रहण


    सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. (Tiger attack) व मृतदेह शवविच्येदन करण्यासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

    महावितरणची अभय योजना


    सावली वनविभागाच्या वतीने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. मुल तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी,गुराखी व गावकरी भयभीत झाले असून अजूनही वनविभाग व शासन यावर काहीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही.अशी ओरड शेतकरी बांधवांनी केली आहे. अशीच अवस्था शासनाची राहिली तर मात्र मुल व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेती करणे सोडावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

    वनविभागाच्या वतीने तातडीची मदत

    वासुदेव झींगरु पेंदोर वय ६० वर्षं राहनार मरेगाव , तालुका मूल याला गुरे चारत असतांना गुरुदास वाकडे यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केले.माहीती मिळताच घटणास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वाकडोत, वनरक्षक धनविजय, वनरक्षक गुरनुले, वनरक्षक आखाडे, वनरक्षक बोनलवार, वनरक्षक नागोसे हे त्वरित हजर होऊन घटणास्थळाचा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री विनोद धुर्वे यांचे हस्ते मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये रोख देण्यात आले यावेळी संदिप भाऊ कारमवार, उमेशसिंह झिरे, मरेगाव चे पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.

  • बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एक ठार

    News34 chandrapur

    रमेश निषाद

    बल्लारपूर :- येथून जवळच असलेल्या कारवा जंगलात वाघाने हल्ला करून इसमास ठार केल्याची घटना घडली.
    आज ७ जानेवारी ला मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कारवा १ मधील राखीव वनखंड क्रमांक ४९२ मध्ये बल्हारपुर येथील राजेंद्र प्रसाद वार्ड मधील शामराव रामचंद्र तिडसुरवार वय ६३ वर्ष सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन जागीच ठार मारल्याबाबत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    या बाबत माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त वनकर्मचारी समवेत तात्काळ घटना स्थळी पोहचले.
    घटनास्थळी पाहणी केली असता वाघाचे हल्यात शामराव रामचंद्र तिडसुरबार यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्यावेळी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरता आर्थिक मदत पंचवीस हजार रुपये देण्यात आले.

     

    सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. स्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल- खरीप हंगाम धान कापणी व चुरणा करण्याची वेळ आली की, नेहमी वाघाच्या घटना घडतच असतात. याच्यावर मात्र शासनाच्या वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शेतकरी म्हटला तर त्याच्या जनावरांना चारा लागणारच यासाठी शेतातून गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३३ मध्ये गुरुवारी सकाळी ८.३० वाजता दरम्यान घडली. रात्रो होऊनही शेतातून घरी परत न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला असता शुक्रवार सकाळी ७ वाजता दरम्यान शेतातलगत असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

     

    सुभाष लिंगाजी कडते वय अंदाजे (४२) वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे.नेहमीप्रमाणे घरच्या गुरांना शेतातून चारा आणायला सुभाष शेतात गेला होता.दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने सुभाषवर हल्ला करून जागीच ठार केले.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र सुभाष दिसला नाही.शुक्रवारी सकाळी ७ वाजता शेतातून फरफटत नेल्याचे दिसून आले.त्याच्या ५०० किमी अंतरावर जंगलात सुभाषचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर आणि कर्मचारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

     

    शासनाच्या वनविभागाकडून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ ३० हजार रुपयाची मदत वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडून देण्यात आली. याच वन परिक्षेत्रात यापूर्वीही अनेक वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाला पुन्हा किती घटनेची अपेक्षा आहे असा सूर मात्र जानाळा ग्रामस्थांमध्ये दिसून आला. वाघाच्या सारख्या दहशतीमुळे शेतकरी आपली शेती कसने सोडून देणार असल्याचे बोलून दाखविले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याची शेती करावी व शेतकऱ्याला शेतीचा मोबदला द्यावा. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वणाला तारेचे कुंपण करुन आपल्या वन्य प्राण्यांचे रक्षण स्वतः करावे. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

  • वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार जोरगेवार यांनी घेतली भेट

    वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार जोरगेवार यांनी घेतली भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनोनाच्या जंगला लगत असलेल्या शनी मंदिरात गेलेल्या 53 वर्षीय मनोरह वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर वाणी यांच्या बाबूपेठ येथील राहत्या घरी सांत्वनपर भेट देत परिवाराला आर्थिक मदत केली.

     

    यावेळी मृतकाची पत्नी उज्वला वाणी, वडील विक्रम वाणी व इतर कुटुंबातील सदस्यांसह वन परिक्षेत्र अधिकारी जि. आर. नागमकर, यंग चांदा ब्रिगेडचे अमोल शेंडे, राशिद हुसेन, अब्बास शेख, अशोक अक्केवार, महेश वासलवार यांची उपस्थिती होती.

     

    रविवारी सकाळच्या सुमारास जुनोना रोडच्या कडेला असलेल्या शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बाबुपेठ येथील रहिवासी मनोहर वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी दाखल होत. मृतदेह शवविच्छेदना करिता जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल केला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर यांच्या घरी सांत्वतपर भेट दिली. यावेळी त्यांनी मृतकच्या पत्नी उज्वला वाणी यांना आर्थिक मदत केली. सोबतच शासनातर्फे मिळणार असलेली मदत लवकर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

     

    यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मृतक मनोहर यांचा शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे वनविभागाला लकवर उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या आहे. सदर कागदपत्रे प्राप्त होताच शासनाची उर्वरित आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नागमकर यांना केल्या आहे. मृतकाच्या पत्नीला वन विभागाने कंत्राटी पद्धतीवर काम देण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

  • चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    चंद्रपुरात वाघाचा हल्ला, 1 ठार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आता मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असून सोमवार 20 नोव्हेम्बरला बाबूपेठ भागात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून यावर्षी आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला.

     

    बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात 53 वर्षीय मनोहर वाणी हे सकाळी पूजा करण्यासाठी गेले होते, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने मनोहर यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    शनी मंदिर परिसरात तब्बल 300 ते 400 मीटर अंतरावर मनोहर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

     

    कुडे यांनी वनविभागाला सदर घटनेची माहिती देत मृतकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली, मनोहर हे घरचे कर्ते पुरुष होते, घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना 2 मुली आहे.

     

    वनविभागाशी चर्चा केल्यावर तपास पूर्ण झाल्यावर वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याचे आश्वासन कुडे यांना मिळाले.

     

    बाबूपेठ भागातील जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून 2 वन्यप्राणी नियमित फिरत आहे, ज्यामध्ये बिबट व वाघाचा समावेश आहे, सदर दोन्ही वाघाचा तात्काळ बंदोबस्त करीत या परिसरात 2 पिंजरे वनविभागाने लावावे अशी मागणी करण्यात आली, वाघाचा बंदोबस्त न केल्यास राजू कुडे यांनी वनविभाग विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

     

    20 नोव्हेम्बरला घडलेल्या घटनेमुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे, याठिकाणी दररोज नागरिक मॉर्निंग वॉक करायला जातात.