Tag: ओबीसी आरक्षण

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची शिष्टाई यशस्वी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मुंबई येथे शुक्रवारी (दि.२९) राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची अतिशय सकारात्मक बैठक घेण्यात आली. यात संघटनांच्यावतीने मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असून राज्य सरकार ओबीसी समाजाच्या उत्थानाला प्राधान्य देईलअशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेष म्हणजे राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ही बैठक घडून आली.

     

    चंद्रपूर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट दिली. उपोषणकर्ते श्री. टोंगेविजय बलकीप्रेमानंद जोगी यांना लिंबू पाणी देऊन २० दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांच्या उपोषण मंडपाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबरला भेट दिली होती. त्यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. ओबीसी समाजाच्या मागण्या चर्चेतून आणि संवादातून सोडविण्यात येतील, असा विश्वास देऊन श्री. टोंगे यांनी अन्नत्याग उपोषण सोडावे, असे आवाहन त्यांनी केले होते.  श्री. मुनगंटीवार यांच्या शिष्टाईमुळेच उपोषणाची सांगता होऊ शकली, अशी प्रतिक्रिया जनमानसांतून व्यक्त होत आहे.

    ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत श्री. मुनगंटीवार सुरुवातीपासून अतिशय आग्रही आहेत. त्यांनी याबाबत सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला. त्यांच्याच पुढाकारातून शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०२३ ला मुंबई येथे ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली. राज्य शासनाने सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री. टोंगे यांचे उपोषण सोडण्यासाठी चंद्रपुरात आणण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यशस्वी देखील ठरले.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

    News34 chandrapur

    चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.

     

    या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.

     

    शनिवार दिनांक सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात शासनाने दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी.

  • चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना अटक केली. Fight for obc reservation

     

    मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

     

    मात्र काल बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची हृदयगती, रक्तदाब आणि शुगर पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आज ओबीसी समाजाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

     

    आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड होते. बैठकीला दिनेश चोखारे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. काही वेळ वाहतूक
    खोळंबली होती. मात्र यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेणे सुरू केले.

    24 सप्टेंबरला शासन, लोकप्रतिनिधींची प्रेतयात्रा

    २४ सप्टेंबरला आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून प्रेतयात्रा काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाईल. त्यानंतर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर ओबीसी कार्यकर्ते ठिय्या देतील. २५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातीस सर्व तालुकास्तरावर लाक्षणिक आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली

    News34 obc vs maratha

    चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

     

    जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

     

    त्यानंतर 17 सप्टेंबर ला ओबीसी संघटनांचा महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र टोंगे यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधी दखलही घेतली नसल्याने आता आंदोलनाचे काय होणार? हा मोठा प्रश्न ओबीसी संघटनांना पडला आहे.

     

    टोंगे यांच्या आंदोलनाला विविध संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे,  21 सप्टेंबरला भारत राष्ट्र समितीने टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले.

     

    भारत राष्ट्र समितीने दिला टोंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    मागील 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    Bharat rashtra samiti chandrapur
    टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समितीने दिला पाठिंबा

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या सर्व रास्त व प्रमुख मागण्यासाठी मागील 11 दिवसापासून रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.

     

    भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत चर्चा केली याप्रसंगी सचिन भाऊ राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपस्थित होते. ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे.

     

    भूषण फुसे असेही म्हणाले की शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.

     

    याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    टोंगे यांच्या समर्थनार्थ ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी “भीक द्या भीक द्या… सरकार ला भीक द्या…” मागणी करत भीक मांगो सत्याग्रह गांधी चौकते गोल बाजार येथे ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृह,आधार योजना, विदेश शिष्यवृत्ती या मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबर, ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर तर्फे मुसळधार पावसात भीक मांगो सत्याग्रह करण्यात आले.मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.

     

    राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग गंभीर नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित आहेत. अनेक विदयार्थ्यांनी वसतिगृह सुरु होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे.मात्र अजूनही वसतिगृह सुरु झाले नाही.

     

    चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.52% च्या वर असलेल्या कष्टकरी ,अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही.त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह च्या माध्यमातून सरकार साठी भीक मागितली व मिळालेली भीक सरकारला पाठविण्यात आली.

     

    याची दखल घेऊन सरकारने न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांनी दिला. यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके,जिल्हामहासचिव ऍड.विलास माथनकर,भाविक येरगुडे,,मनीषा बोबडे ,प्रलय म्हशाखेत्री,अक्षय येरगुडे,गीतेश शेंडे उपस्थित होते.

     

    सरकार जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही.ओबीसी विदयार्थ्यांच्या योजनेसाठी सरकारकडे निधी नाही.आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे तीव्र आंदोलन करत आज टोंगे यांच्या उपोषण स्थळी ओबीसी युवकांनी समर्थ संकल्पनेतून मुंडण आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांचा निषेध व्यक्त करत महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडण करत निषेध व्यक्त केला.स्थळी विनायक बांगडे, नंदू नागरकर, सुभाष गौर,राजेश बेले, देवा पाचभाई, सुनीता लोढिया,ऍड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.

     

    अन्नत्याग उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने ओबीसी युवकाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम उमटतील -सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

     

    ओबीसी संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक

    राज्य सरकारला देणार अखेरचा इशारा

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे ओबीसींच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन याबाबत दिनांक 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ , सर्व ओबीसी संघटना , सर्व जातीय संघटनाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

     

    चंद्रपूरच्या ताडोबा मार्गावरील तुकुम येथील मातोश्री सभागृहामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी, ओबीसीतील विविध जातींच्या संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले.

    महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी अखेरचा इशारा देण्याचे हेतुने या बैठकीच्या आयोजन करण्यात आलेआहे , तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला गणेश मंडळाने दिले समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. Obc vs Maratha

     

    19 सप्टेंबर पासून गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून वेंडली येथील न्यु यंग बाल गणेश मंडळाने सरकारला सदबुद्धि देण्याची मागणी करीत टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न द्यावे, स्वाधार योजना व प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करावे अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे 11 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्यभरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे, मात्र अजूनही ओबीसी आंदोलनाची गंभीर दखल शासनाने न घेतल्याने आंदोलन आजही सुरूच आहे.

     

    चंद्रपुर तालुक्यातील वेंडली येथील गणेश मंडळाने अनोख्या पद्धतीने समर्थन दिल्याने सध्या या गणेश मंडळाची जिल्हाभरात चर्चा आहे.

    यावेळी गणेश मंडळाचे नंदू टोंगे, रणजित पिंपलशेंडे, राजू टोंगे, अमित टोंगे, प्रकाश चालूलकर, गजानन देवाळकर, अनुज नैताम, पंचफुला झाडे, रेखा गोरे, गिरीजा देवाळकर, मनाबाई देवाळकर आदींची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे.

    ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे, आज आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

     

    मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करीत बैठक लावू असे आश्वासन आंदोलकांना दिले.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, वस्तीगृहाबाबत चंद्रपुरात वसतिगृह सूरु करू व स्वाधार योजनेचा लाभ इतर ओबीसी विद्यार्थ्यांना देणार असे आश्वस्त केले मात्र आंदोलकांनी मुनगंटीवार यांना हा प्रश्न जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे, वस्तीगृह चंद्रपूर सहित राज्यात सुरू करावे असे आंदोलकांनी म्हटले.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आंदोलकांसोबत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून दिला.

    चंद्रपुरात वस्तीगृह सुरू करावे याबाबत तात्काळ काम सुरू करण्यात येतील असे सावे यांनी आश्वाशीत केले.

    मात्र आंदोलकांनी सरळ सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी ओबीसी नेत्यांसोबत बैठक लावून आमच्या मागणीवर चर्चा करावी, चर्चेतून काही निष्पन्न झाले तर ठीक अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

     

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अर्धे मंत्रिमंडळ गेले, उपोषण सोडविण्याआधी त्यांना सरकारने काय आश्वासन दिले हे अजूनही बाहेर आले नाही, मात्र आमच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली असे चित्र सध्या दिसत आहे, आमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा करीत ओबीसी शिष्टमंडळाला शासनाने आश्वाशीत करावे अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहणार असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले.

  • ओबीसी समाजाच्या या मागण्या पूर्ण होणार काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात शामिल करावे अशी मागणी केलेली आहे. जरांगे पाटलांनी केलेल्या सरसकट मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे.

     

    या संबंधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संपन्न झालेल्या सभेत सदर मागणीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटनाच्या कडून चंद्रपूर येथे गांधी चौकातून महामोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यात आले, यात चंद्रपूर सहीत लगतच्या यवतमाळ, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातून मोठया प्रमाणात ओबीसी बांधवानी आपला आक्रोश व्यक्त केला.

     

    ओबीसी च्या मागण्या राज्य सरकारनी त्वरित पूर्ण कराव्यात. यात प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबीजातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येवू नये. बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसींची जातनिहाय सर्वे करण्यात यावी. संपूर्ण देशात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकार कडे करावी.

     

    कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये. ५२% ओबीसी समाजाला ५२% आरक्षण देण्यात यावे. मा. सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारकडे करावी. महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यासाठी मंजूर केलेली ७२ वसतिगृहे त्वरित भाड्याच्या इमारतीत सुरु करावी.ओबीसी समाजातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांच्याकरीता स्वाधार योजना त्वरित लागू करावी.ओबीसी विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमात त्वरित शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजना त्वरित लागू कराव्या. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ( CMEGP) योजनेत इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा (OBC) समावेश करण्याबाबत. नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र व (२) 8 लाख रू. उत्पन्नाची अट अशा दोन अटीपैकी 8 लाख रू. उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा.

     

    म्हाडा व सिडको योजने अंतर्गत ओबीसी समाजास आरक्षण लागू करण्यात यावे याचे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, पालकमंत्री ,चंद्रपूर,मुख्य सचिव, प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अध्यक्ष मागासवर्गीय आयोग, पुणे यांना या महामोर्च्याच्या ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर, ऍड. पुरुषोत्तम सातपुते, ऍड. विजय मोगरे, राजेश बेले दिनेश चोखारे, सूर्यकांत खनके, डॉ. संजय घाटे, डॉ. दिलीप कामडे, विलास माथाणकर श्याम लेडे, कुसुम उदार, अनिल डहाके,कुणाल चहारे,गणेश आवारी, मनीषा बोबडे, गोमती पाचभाई,अनिल शिंदे, देवा पाचभाई,प्रेमा जोगी अक्षय येरगुडे हितेश लोडे यांच्या मार्फत चंद्रपूर उपविभागीय अधिकारी मृगूनाथन यांनी स्वीकारले.

     

    उपरोक्त मागण्या पूर्ण करण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी विद्यर्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 11सप्टेंबर पासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत.या आंदोलनास ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तयावाडे यांनी समारोपिय भाषणात निवेदनात दिलेल्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर या पेक्षा मोठे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येईल असा इशारा दिला.

     

    विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार माजी, माजी मंत्री परिणय फुके आमदार अभिजित वंजारी, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर,अशोकभाऊ जिवतोडे, माजी आमदार देवराव भांडेकर,माजी आमदार आशिष देशमुख,माजी आ. सुदर्शन निमकर,नंदू नागरकर, पप्पू देशमुख, महेंद्र ब्राम्हणवाडे, देवराव भोंगडे,सतीश वारजूरकर, संध्याताई गुरनुले,रवींद्र शिंदे,राजेंद्र वैद्य, सलील देशमुख,रमेश राजूरकर,अनिल धानोरकर, किशोर टोंगे, संदीप गिऱ्हे, नितीन भटारकर, प्रशांत वाघरे, अविनाश पाल, गंगाधर वैद्य, गोविंदा पोडे,संदीप आवारी, बळीराज धोटे, विश्वास झाडे, राजू झोडे,अभिलाष गावतुरे, डॉ गावतुरे, प्रवीण खोब्रागडे, सुनील मुसळे राजेंद्र खोब्रागडे,प्रतीक डोर्लिकर,निलेश बेलखेडे, नंदू पढाल, दत्ता हजारें, वासुदेव खेळकर,डॉ. महाकुळकर, गोवील मेहेरकुरे,विजय नळे विजय पिदूरकर, रंजित डवरे डॉ. पियुष मेश्राम, ऋषभ राऊत, निलेश खोडे, आदिवासी समाजाचे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम ,पराग वानखेडे आदी विविध पक्षाचे तथा विविध जातनिहाय संघटना कुणबी, तेली, माळी, सुतार, नाभिक, बारई, सोनार, कलार,धनगर, बेलदार, भावसार, शिंपी, परीट, लोहार, वाढई समाज संघटना सोबतच आरपिआय संघटनेचे समर्थक उपस्थित होते.

  • चंद्रपुरात निघाला ओबीसींचा महामोर्चा

    News 34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे, त्या मागणीचा राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये,बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे, ओबीसी (विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही. सोमवार पासून 11 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.

     

    अन्नत्याग आंदोलनाला शासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही, मात्र मराठ्यांच्या आंदोलनात राज्याच्या अर्ध्या मंत्री मंडळाने भेट दिली, पण ओबीसी आंदोलनाला अजूनही एकाही मंत्र्याने भेट दिली नाही.

     

    सोमवारी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महामोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यात हजारो ओबीसी बांधवांनी सहभाग दर्शविला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपला सहभाग दर्शविला.

     

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलन मंडपात मोर्चा समाप्त करण्यात आला, जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नाही, सरकारने ओबीसी वस्तीगृहाबाबत घोषणा केली मात्र त्याची पूर्तता केली नाही, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

    आयोजित महामोर्चा मध्ये जिल्ह्यातील हजारो ओबीसी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली.

  • चंद्रपुरात रविवारी ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.

     

    याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन नये व कुणबी प्रमाणात देवू नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे कऱण्यात यावा, ओबीसी समाजाचे वसतीगृह तात्काळ सुरू करन्यात यावे , ओबीसी(विजे, विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे त्यामध्ये आता मराठा आले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही.

     

    सोमवार पासून11 सप्टेंबर ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे व 17 सप्टेंबर ला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी मोडणाऱ्या सर्व जात संघटनेच्या वतीने चंद्रपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे.

     

    या दरम्यान दिनांक 16 सप्टेंबर ला शहरात बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते, मोर्चात सहभागी व्हावें असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासघाचे महासचिव सचिन राजूरकर, समनवयक डॉ अशोक जीवतोडे, धानोजे कुणबी समाजाचे ऍड पुरुषोत्तम सातपुते, बबनराव फंड, कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, प्रा अनिल शिंदे, विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खनके, माळी महासंघाचे डॉ संजय घाटे ,चंद्रपूर माळी समाजाचे अध्यक्ष राजू बनकर , ओबीसी सेवा संघाचे अनिल डाहाके, राजेश बेले,सतीश मालेकर, शाम राजुरकर, शैलेश जुमडे, शाम लेडे, अक्षय येरगुडे , ऍड देवा ,पाचभाई, मनीषा बोबडे, यांनी केले आहे.