Tag: ओबीसी आंदोलन

  • ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    टोंगे यांच्या समर्थनार्थ ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी “भीक द्या भीक द्या… सरकार ला भीक द्या…” मागणी करत भीक मांगो सत्याग्रह गांधी चौकते गोल बाजार येथे ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृह,आधार योजना, विदेश शिष्यवृत्ती या मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबर, ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर तर्फे मुसळधार पावसात भीक मांगो सत्याग्रह करण्यात आले.मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.

     

    राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग गंभीर नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित आहेत. अनेक विदयार्थ्यांनी वसतिगृह सुरु होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे.मात्र अजूनही वसतिगृह सुरु झाले नाही.

     

    चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.52% च्या वर असलेल्या कष्टकरी ,अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही.त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह च्या माध्यमातून सरकार साठी भीक मागितली व मिळालेली भीक सरकारला पाठविण्यात आली.

     

    याची दखल घेऊन सरकारने न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांनी दिला. यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके,जिल्हामहासचिव ऍड.विलास माथनकर,भाविक येरगुडे,,मनीषा बोबडे ,प्रलय म्हशाखेत्री,अक्षय येरगुडे,गीतेश शेंडे उपस्थित होते.

     

    सरकार जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही.ओबीसी विदयार्थ्यांच्या योजनेसाठी सरकारकडे निधी नाही.आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे तीव्र आंदोलन करत आज टोंगे यांच्या उपोषण स्थळी ओबीसी युवकांनी समर्थ संकल्पनेतून मुंडण आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांचा निषेध व्यक्त करत महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडण करत निषेध व्यक्त केला.स्थळी विनायक बांगडे, नंदू नागरकर, सुभाष गौर,राजेश बेले, देवा पाचभाई, सुनीता लोढिया,ऍड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.

     

    अन्नत्याग उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने ओबीसी युवकाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम उमटतील -सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

     

    ओबीसी संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक

    राज्य सरकारला देणार अखेरचा इशारा

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे ओबीसींच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन याबाबत दिनांक 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ , सर्व ओबीसी संघटना , सर्व जातीय संघटनाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

     

    चंद्रपूरच्या ताडोबा मार्गावरील तुकुम येथील मातोश्री सभागृहामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी, ओबीसीतील विविध जातींच्या संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले.

    महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी अखेरचा इशारा देण्याचे हेतुने या बैठकीच्या आयोजन करण्यात आलेआहे , तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला गणेश मंडळाने दिले समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. Obc vs Maratha

     

    19 सप्टेंबर पासून गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून वेंडली येथील न्यु यंग बाल गणेश मंडळाने सरकारला सदबुद्धि देण्याची मागणी करीत टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न द्यावे, स्वाधार योजना व प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करावे अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे 11 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्यभरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे, मात्र अजूनही ओबीसी आंदोलनाची गंभीर दखल शासनाने न घेतल्याने आंदोलन आजही सुरूच आहे.

     

    चंद्रपुर तालुक्यातील वेंडली येथील गणेश मंडळाने अनोख्या पद्धतीने समर्थन दिल्याने सध्या या गणेश मंडळाची जिल्हाभरात चर्चा आहे.

    यावेळी गणेश मंडळाचे नंदू टोंगे, रणजित पिंपलशेंडे, राजू टोंगे, अमित टोंगे, प्रकाश चालूलकर, गजानन देवाळकर, अनुज नैताम, पंचफुला झाडे, रेखा गोरे, गिरीजा देवाळकर, मनाबाई देवाळकर आदींची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे.

    ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे, आज आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

     

    मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करीत बैठक लावू असे आश्वासन आंदोलकांना दिले.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, वस्तीगृहाबाबत चंद्रपुरात वसतिगृह सूरु करू व स्वाधार योजनेचा लाभ इतर ओबीसी विद्यार्थ्यांना देणार असे आश्वस्त केले मात्र आंदोलकांनी मुनगंटीवार यांना हा प्रश्न जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे, वस्तीगृह चंद्रपूर सहित राज्यात सुरू करावे असे आंदोलकांनी म्हटले.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आंदोलकांसोबत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून दिला.

    चंद्रपुरात वस्तीगृह सुरू करावे याबाबत तात्काळ काम सुरू करण्यात येतील असे सावे यांनी आश्वाशीत केले.

    मात्र आंदोलकांनी सरळ सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी ओबीसी नेत्यांसोबत बैठक लावून आमच्या मागणीवर चर्चा करावी, चर्चेतून काही निष्पन्न झाले तर ठीक अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

     

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अर्धे मंत्रिमंडळ गेले, उपोषण सोडविण्याआधी त्यांना सरकारने काय आश्वासन दिले हे अजूनही बाहेर आले नाही, मात्र आमच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली असे चित्र सध्या दिसत आहे, आमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा करीत ओबीसी शिष्टमंडळाला शासनाने आश्वाशीत करावे अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहणार असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले.

  • मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी मधून नाही – आमदार धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसींची जनगणना करणे, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण न देणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या उपोषण मंडपाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

     

    तसेच “कोणत्याही प्रकारची घाई न करता ओबीसी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि संविधानिक ओबीसी प्रवर्गाची बिहार राज्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. विद्यार्थी वसतीगृह तत्काळ सुरू करावे. मागासवर्गीय आयोगाला निधी व इतर बाबी उपलब्ध करून द्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

     

    याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, शहर काँग्रेस जिल्हाध्य्क्ष रामू तिवारी, ओबीसी अध्यक्ष राहुल चौधरी, डॉ. शरयू बबन तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ अध्यक्ष इंजि. सुषमा भंड, साधना बोरकर, वृंदा विकास ठाकरे, नंदा उदयराव देशमुख, मनीषा बोबडे, श्रीधरराव मालेकर, प्रभाकर दिवसे, अरविंद मुसळे यांची उपस्थिती होती.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन टोंगे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, ओबीसींच्या अनेक वर्षांपासून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. ओबीसींची जनगणना करणे ही सर्वात महत्वाची मागणी आहे. मात्र, अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. यामुळे ओबीसींना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.

     

    आमदार धानोरकर यांनी सांगितले की, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देणे हे योग्य नाही. यामुळे ओबीसींचे आरक्षण कमी होईल. त्यामुळे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

     

    आमदार धानोरकर यांनी सांगितले की, टोंगे यांचे आंदोलन हे ओबीसींच्या हक्कांसाठी लढण्याचे एक महत्त्वाचे आंदोलन आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत.

  • OBC आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोबत चर्चा करणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

     

    दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण पेंडालाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी टांगे यांच्या प्रकृतीची विचारणा करत त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आहे. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आंदोलकांच्या भावना आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासनाने रीतसर कानडोळा करत आहे. Maratha vs obc

     

    राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध करत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे असे म्हटले आहे.

     

    शिवाय वास्तविक, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे उपोषणाला बसले तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा तापला.परंतु जरांगे यांची मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी नसून आम्ही संविधानिक मागणी करीत आहोत असे ओबीसी महासंघाने स्पष्ट केले.

     

    दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पाहता चंद्रपूरातील ओबीसी समाजातील लोकही मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.येत्या 17 सप्टेंबर ला ओबीसी समाज बांधव मोठया प्रमाणात महामोर्चा काढणार आहे.

     

    या आंदोलनात मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये ही मुख्य मागणी असून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या उपोषण मंडपास भेट दिली व खुद्द ओबीसींचे मंत्री असताना ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसीच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्री शिंदे घेतील काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जालन्यात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं आमरण उपोषण मागे घेतले, मात्र उपोषण मागे घेतले आंदोलन नाही असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

     

    राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं अशी मागणी झाली, त्यावर ओबीसी संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    चंद्रपुरात 11 सप्टेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे आमरण उपोषणाला बसले आहे, मात्र 4 दिवस लोटल्यावर सुद्धा त्यांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्यात आली नाही.

     

    मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी प्रवर्गातून नको अशी ठाम भूमिका घेत टोंगे यांनी आंदोलन सुरू केले आहे.

     

    जरांगे यांच्या उपोषणाला अर्ध्या मंत्रिमंडळाने भेट दिली, त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या मग ओबीसी समाज बांधवांचे काय? त्यांच्या आंदोलनाची दखल कोण घेणार?

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समनव्यक डॉ. अशोक जीवतोडे यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश घेतला, त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले होते.

     

    त्या कार्यक्रमात भाजपचा DNA हा ओबीसी आहे, ओबीसी समाजाला फक्त भाजप न्याय देऊ शकते अशी ग्वाही त्यांनी दिली होती, 15 ऑगस्ट पासून राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्यात येणार अशी घोषणा खुद्द फडणवीस यांनी केली होती, मात्र आजपर्यंत एक वसतिगृह सुद्धा सुरू झाले नाही.

     

    जातनिहाय जनगणना, स्वाधार योजना, वस्तीगृह व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका अशी मागणी रवींद्र टोंगे यांनी केली आहे.

     

    टोंगे यांच्या मागण्यांना भाजप न्याय देणार काय? की न्यायाची भाषा ही भाषणापुरती मर्यादित होती? भाजपवासी झालेले अशोक जीवतोडे यांनी तरी ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपली कठोर भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडायला हवी.

     

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 96 कुळी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली.

     

    तर दुसरीकडे राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील बांधवांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भेट द्यावी अशी मागणी केली, मराठ्यांना एक न्याय तर ओबीसी समाजावर अन्याय करू नका अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

     

    आरक्षणाच्या ठिणगीने राज्यात 2 समाजात भांडण लावण्याची कामे केली जात आहे, मात्र आरक्षणावर ठोस निर्णय सरकारच्या अंगावर येतो की काय अशी वेळ सध्या आली आहे, कमीतकमी भाजपच्या OBC DNA ने तरी ओबीसींच्या रास्त मागण्याची दखल घ्यावी अन्यथा आरक्षणाचा तिढा काही सुटणार नाही.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनात 6 महिन्याचं बाळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करणे या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी, तिसऱ्या दिवशी रविंद्र टोंगे यांची पत्नी व सहा महिन्यांचा अनिस यांनी सुद्धा दिवसभर अन्न त्याग आंदोलनात साथ दिली.

     

    मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह सुरू करावे, जातनिहाय जनगणना व्हावी अश्या ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषण आंदोलनाचे बंड पुकारले आहे.

     

    11 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या अन्नत्याग आंदोलनाला जिल्ह्यातील मंत्री व जनप्रतिनिधी यांनी पाठ दाखवली आहे.

    दिवसभरात ओबीसी समाजबांधवांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. भाजपचे देवराव भोंगडे, राहुल पावडे, आशिष ताजने कोरपना, मनोज पोतराज, ओबीसी जनगणना परिषद चे बळीराज धोटे, भावसार समाजाचे डॉ नंदकिशोर मैदळकर व त्यांचे सहकारी, तैलीक समाजाचे, ऍड विजय मोगरे, रघुनाथ शेंडे, बबनराव फंड, प्रकाश देवतळे, डॉ विश्वास झाडे, काँग्रेस ओबीसी सेल चे प्रशांत दानव, उमकांत धांडे, प्रा संजय बेले, जनविकास सेनेचे अध्यक्ष पपू देशमुख, घनश्याम येरगुडे, विमल पिदूररकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन समर्थन जाहीर केले.