Tag: अनुकंपा नोकरी

  • Implement the old pension scheme |अनुकंपा कर्मचाऱ्यांवर अन्याय! जुनी पेन्शन योजना लागू होणार का?

    Implement the old pension scheme

    खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र 

    Implement the old pension scheme : चंद्रपूर: अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या (OPS) प्रलंबित मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज (शुक्रवार, १४ जून २०२५)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका महत्त्वाच्या पत्राद्वारे (पत्र क्र. ५४३/२०२५)  केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

    या पत्रात खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या, परंतु १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी आज वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन अनुकंपा पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी गुरुदास गुरनुले, नितीन साखरे, वीरेंद्र पिल्लेवान, हरीश मांढरे, नितीन उमरे, गजानन बोरकुटे यांची उपस्थिती होती. (Old Pension Scheme for Compassionate Appointment Cases)

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, ०२ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयात १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेसाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना देण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही. हे सर्व कर्मचारी केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने अनुकंपा धारकांसाठीच्या धोरणाचा शासन निर्णय काढताना या महत्त्वाच्या बाबीचा विचार केलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. government decision on OPS for compassionate employees 2025

    चंद्रपूर जिल्ह्यात वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण, शेतकऱ्याचा मृत्यू

    अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करा

    त्यामुळे, केंद्र शासनाने त्यांच्या अनुकंपा धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सक्षम अधिकारी मार्फत सरळ सेवा प्रवेशाने रिक्त जागेवर निवड झालेल्या अनुकंपा कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, अशी शिफारस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    खासदार  प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अनुकंपा कर्मचाऱ्यांनी केलेली मागणी रास्त असून, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

  • Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

    Anukampa Niyukti : चंद्रपुरात 14 ऑगस्ट पासून अनुकंपा धारकांचे आमरण उपोषण

    Anukampa niyukti चंद्रपूर : आज चंद्रपूर मनपा कृती समितीने शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड.निमेश मानकर यांचे नेतृत्वात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय बाबत निवेदन दिले. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर येथील सर्व अनुकंप धारकांनी वेळोवेळी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देवून त्यांची वेळोवेळी भेट घेतली परंतु मा. आयुक्त साहेबांनी सर्व अनुकंपाधारकांना मराठा आरक्षणा बिंदुनामावली आरक्षीत झाली नसल्यामुळे अनुकंप भरतीला स्थगिती दिली आहे असे सांगितले. तसेच महानगरपालिकेच्या आस्थपना येथील संबंधित बाबुला विचारणा केली असता त्यांनी सुध्दा ३ ते ४ जागा शासनाच्या धोरणाप्रमाणे भरण्याचे सांगितले.

    अवश्य वाचा : त्या मुलीचा आत्मविश्वास बघून आमदार म्हणाले तू पुन्हा धावशील

    Anukampa niyukti ही सर्व आश्वासने अनुकंपधारकांना २०२२- ते -२०२४ या दरम्यान देण्यात आली, मात्र त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले .त्यामुळे प्रतिक्षा यादीत असणाऱ्या अनुकंपाधारकांवर व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
    शासन निर्णयानुसार सरळ सेवा कोठ्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के प्रमाणे पद भरती होत आहे. मात्र सदरील शासन निर्णयाप्रमाणे सामायिक प्रतिक्षासुची मधील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील मोजकेच अनुकंप धारकांना नियुक्ती मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्षा सुचीमध्ये सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यास १० ते १२ वर्षाचा कालावधी लागत असल्याने अनुकंपाधारक वयाच्या अटीमध्ये बाद होत आहोत.

    महत्त्वाचे : त्या दलालांविरोधात अनुसूचित जनजाती आयोगाला तक्रार

    शासन निर्णयामध्ये बदल करुन त्यामध्ये सरळसेवेने रिक्त होणाऱ्या पदाऐवजी सद्यस्थितीत सरळ सेवेचे रिक्त असलेल्या एकुण पदाच्या २० टक्के पदावर असा बदल केल्यास अनुकंपा प्रतिक्षा यादी कमी होईल. जर प्रशासन/ शासनाने अनुकंपा धारकांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर अनुकंपाधारकांकडे उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने आम्ही सर्व अनुकंपाधारक दि. १४/०८/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून मनपा समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. त्यामुळे या निवदेनावर प्रशासन व शासनाने गांभिर्याने लक्ष देवून मागण्या मान्य कराव्या. अशी सर्व अनुकंप धारकांची नम्र विनंती.


    प्रमुख मागण्या :-
    १) ‘ड’ वर्गातील सर्व अनुकंप धरकांना एक विशेष बाब म्हणून शासन सेवेत तात्काळ सामावून घेण्यात यावे.
    २) सद्या स्थितीत रिक्त असलेल्या एकुण पदाच्या २० टक्के वर्ग क व वर्ग ‘ड’ च्या अनुकंप धारकाची पद भरती करण्यात यावी.
    ३) २३/०८/२००८ चा शासन निर्णय ५० टक्के, २५ टक्के, २५ टक्के प्रमाणे १०० टक्के अनुकंप पदभरती करावी. मा.आमदार महोदय यांनी या विषयावर लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट घेवून तोडगा काढू असे आश्र्वासन दिले. निवेदन देताना शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर तसेच अनुकंपाधारक सुजय घडसे, संतोष सुभाष बोरकर, आकाश मधुकर करपे, ओमदेव दिनकर निखाते, शुभम मोरेश्वर गहुकर, अजय अनिल रामटेके, संगीता खेमराज दुर्गे उपस्थित होते.

  • Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj ahir चंद्रपूरः- वेकोलिच्या विविध क्षेत्राशी निगडीत प्रकल्पग्रस्त शेतकन्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी, बैठक व बृहत पत्रव्यवहार व सतत पाठपुराव्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर याना यश मिळाले असून दि. 17 जून 2024 रोजी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोलि विश्रामगृहात वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (सीएमडी) व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपुर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे.

    अवश्य वाचा : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा मोर्चा

    सदर बैठकीस वेकोलि मुख्यमहाप्रबंधक (भूमि) व (औ.स.) मांजी आमदार सुदर्शन निमकर, विनोद शेरकी, अॅड. इंजी. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, पवन एकरे, माजी सरपंच बंडु रायपुरे, कोलगांवचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडसकर, लक्ष्मण बोढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    वेकोलि प्रबंधनाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली.

    महत्त्वाचे : 19 जूनपासून चंद्रपुरात पोलीस भरतीचा प्रारंभ, 137 जागेसाठी 22 हजार अर्ज

    Hansraj ahir गोवरी पोवनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजूरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले. गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन 4 करीता लवकरच प्रस्तावित करण्याचे तसेच भूमि अधिग्रहण प्रकल्पातील ग्रैंड डॉटर (नात) मुलीचा मुलगा/मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होवून अनुकंपा नोकरीत विवाहीत मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशीताचा भाऊ, बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयीन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सीएमडी यांनी हंसराज अहीर यांना या बैठकीत दिली.

     

    न्यायालयीन प्रकरणातील प्रलंबित नोकऱ्या मार्गी लावण्यास गुणवत्ता प्राधान्य प्रकरणामध्ये निर्णय घेण्याबाबत ठोस धोरण स्वीकारले जाईल, भूमिगत खाणीतून सुरक्षा प्रहरीकरीता आवेदन केलेल्या कामगारांची कॅडर बदल विषयक सुची प्रकीयाधीन असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बैठकीत आश्वस्त करण्यात आले.

    Hansraj ahir या व्यतिरिक्त पोवनी, सास्ती, सोनुर्ली गावातील उर्वरीत जमिनीचे अधिग्रहण, सीएमपीडीआयएल द्वारा सव्र्व्हेक्षण करुन तातडीने अंमल करण्याच्या सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी केल्या. यावेळी भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा व 2 एकर पेक्षा अधिक तसेच दोन आराजी असल्यास फेरफार प्रक्रियेनंतर 2 नोकऱ्या देण्यास अडचण नसल्याचे ही प्रबंधनाने या बैठकीत स्पष्ट केले. तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात प्रलंबित नोकरी प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्वपुर्ण विषयांवर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.