mama talav : मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर, पाळीला पडले मोठे भगदाड

Mama talav

Mama talav मुल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून त्याठिकाणी भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने आज भेट दिली आणि प्रशासनाला इशारा देत मोठा अनर्थ टाळायचा असेल तर त्वरित कारवाई करावी.

मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव जसे चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान झालेले असतानाच आठवण येथील तलावाच्या पाळीला सुद्धा मोठे भगदाड पडलेले आहे आणि तो तलाव जर फुटला तर शेतीच्या आणि वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने प्रशासनाला दिलेला आहे.

अफवा : जिल्ह्यात उडाली अफवा, लाडकी बहीण योजना 31 ऑगस्ट नंतर बंद होणार, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिलं स्पष्टीकरण


Mama talav या घटनेमुळे मामा तलावांच्या देखरेखितेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे, मुसळधार पाऊस आला, पूर आला की मामा तलावांतील पाणी फुटतात आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना भोगावा लागतो हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ही भूमिपुत्र टीम ने यावेळी केली आहे.

आधीच पिंपळगाव व चीचपल्ली येथील मामा तलाव फुटल्याने स्थानिक नागरिकांची भर पावसात वाताहत झाली होती, नागरिकांचे अन्न धान्य सुद्धा वाहून गेले होते, प्रशासनाने त्या घटनेनंतर याबाबत जिल्ह्यातील मामा तलावाची दुरुस्ती होत आहे का? याकडे लक्ष देणे गरजेचे होते मात्र काटवन येथील मामा तलाव बघितल्यावर प्रशासन सध्या मुकदर्शक झाला की काय असे चित्र पुढे आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *