Tag: राजू कुडे

  • paver block theft FIR Chandrapur । कोहिनूर तलावात पेव्हर्स चोरी प्रकरणी दंडात्मक कारवाई सह गुन्हा दाखल होणार

    paver block theft FIR Chandrapur

    paver block theft FIR Chandrapur : चंद्रपूर : कोहिनूर ग्राउंडवर नागरिकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या ट्रेकिंग व वॉकिंग ट्रॅकवरील पेव्हर्स अर्बन एनवायरो कंपनीने चोरून स्वतःच्या कामात वापरले, तसेच माता महाकाली महोत्सवासाठी वापरण्यात आलेली गिट्टी सुद्धा बेकायदेशीररीत्या तिथून चोरून नेली, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. kohinoor lake pavers theft case Chandrapur

    चंद्रपूर शासकीय आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवार रोजगार मेळावा

    या संदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सर्व पुराव्यासकट तक्रार चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल केली होती. तक्रारीनंतर महानगरपालिकेने विशेष चौकशी समिती नेमून तपास केला असता कंपनी दोषी आढळली.

    जवळपास ९ लाखांचा दंड

    त्यानुसार, अर्बन एनवायरो कंपनीवर रु. ८,८९,०००/- पेक्षा अधिक दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून तिच्यावर तात्काळ एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली आहे.

    राजू कुडे यांनी स्पष्ट केले की, “जनतेच्या पैशांचा अपव्यय व सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या कंपन्यांना केवळ दंड नव्हे तर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत लढणार आहे.”

    आम आदमी पार्टीने शहरातील अशा प्रकारच्या भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • sewer line construction hazards in rainy season । भर पावसात रस्त्याचं खोदकाम, नागरिकांच्या जिवाशी खेळ!, AAPचा इशारा

    sewer line construction hazards in rainy season

    sewer line construction hazards in rainy season : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे खोदकाम नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, यामुळे अनेक रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. या खोदकामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी महानगरपालिकेला निवेदन देऊन काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

    मूल पोलिसांच्या कौतुकास्पद कार्याची सर्वत्र चर्चा

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रस्त्यावर झालेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत असून, यामध्ये शाळकरी विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिक यांना इजा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच, पावसामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंबरांना भेगा पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.

    आम आदमी पार्टीने पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

    1. भर पावसाळ्यात सुरू असलेले सिव्हरेजचे काम तात्काळ थांबवावे.
    2. खोदकामामुळे निर्माण झालेले खड्डे त्वरित बुजवून वाहतूक सुरळीत करावी.
    3. काम पूर्ण झालेल्या भागात दर्जेदार काँक्रीटीकरण करावे.

    या मागण्या दोन दिवसांत मान्य न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.

  • Illegal school in Chandrapur । चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात? शाळेवर कारवाईचा अल्टीमेटम!

    Illegal school in Chandrapur

    Illegal school in Chandrapur : चंद्रपूर – शासकीय सैनिक शाळेच्या जवळच “SSCN सैनिक स्कूल चंद्रपूर” नावाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी शाळेविरोधात आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्यावतीने शिक्षण विभागाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सदर शाळेस कोणतीही शासकीय मान्यता, परवाना अथवा UDISE क्रमांक नसतानाही ती निर्बंध न पाळता खुलेआम प्रवेश प्रक्रिया राबवते आहे. unauthorised school in Chandrapur SSCN

    या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच राजू कुडे – युवा जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन सादर केले. त्यानंतर शिक्षण अधिकारी (प्राथमिक), शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आणि SSCN शाळेचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक पार पडली.

    माझी आई बेपत्ता, चंद्रपूर पोलिसांवर गंभीर आरोप

    या बैठकीत, सदर शाळेला नव्या प्रवेशांना मनाई करण्यात आली असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांनी दिले.

    तर शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन

    पालकांची फसवणूक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बेकायदेशीर शाळांविरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. नियमबाह्य शिक्षण संस्था चालवणे हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा असून अशा प्रकारांवर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. जर ८ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.


    यावेळेस आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे, प्रशांत सिदूरकर, स्नेहल नगराळे, इत्यादी उपस्थित होते.

  • amrut scheme water supply problems । अमृत योजनेचा फटका; पाणी नाही, जनता आहे त्रस्त!, आपने दिला आंदोलनांचा इशारा

    amrut scheme water supply problems

    amrut scheme water supply problems : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर प्रभागात पाण्याच्या तीव्र टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, अमृत योजनेअंतर्गत पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला जोरदार हाक दिली आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने जनतेचे हाल सुरू असून, मूलभूत सुविधेसाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

    पडोली मध्ये १ कोटी रुपयांची आधुनिक अभ्यासिका

    या गंभीर परिस्थितीबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. “स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्याकडून बाबुपेठ वर वीज पाण्याची सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे, प्रशासकीय अधिकारीही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप राजू कुडे यांनी केला आहे. aam aadmi party water protest

    तर तीव्र आंदोलन करणार

    राजू कुडे पुढे म्हणाले, “अमृत योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना एक थेंब पाणी मिळत नाही. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे.” त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र विधानसभेत चंद्रपूर महानगरपालिकेतील ९० टक्के अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु या वक्तव्यानंतरही प्रत्यक्षात आंबेडकर नगरसारख्या भागात नागरिकांना एका थेंब पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही बाब खेदजनक आणि खोट्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे.

    Powered by myUpchar

    स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाण्याविना रोजचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या टंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.

    आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, याकडे आता जनतेचे लक्ष्य लागले आहे.

  • important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    Important demand बायपास जवळील नागरिकांना नाल्या-अभावी होत असलेल्या त्रासाला लागणार पूर्णविराम, आम आदमी पक्ष युवा आघाडीच्या मागणीला यश

    Important demand चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते तसेच शिरना-या पाण्यामुळे अनेक त्रासांना समोर जावे लागत होते. याबाबत नागरिकांची आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे
    यांच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करन्यात आल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी तर्फे बांधकाम विभागाला अनेक निवेदन देण्यात आले, त्यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.

    7 वर्षांच्या मुलाची बिबट्याने केली शिकार

    आंदोलनामुळे नाली च्या कामाला मंजुरी मिळाली असून आज नालीच्या कामाकरिता बांधकाम विभाग यांच्या टीमने मोजणी करूण जागेची पाहणी केली ४ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सुद्धा संबंधित अधिकारी यांनी म्हटले आहे. याकरिता येथील पीडीत नागरिकांनी आम आदमी पार्टीचे राजु कुडे यांचे आभार मानले. Important demand

    भाजपची निवडणूक प्रचाराला सुरुवात


    यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद शेख, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, आदित्य नंदनवार, अक्षय गोवर्धन, सागर बोबडे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    चंद्रपुरात आम आदमी पार्टीत युवकांचा पक्ष प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.

     

    दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.

     

    यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.

  • बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

    शहरातील बाबूपेठ मधील डॉ. आंबेडकर नगर, माता चौक येथे राहणारा 24 वर्षीय आकाश पाल असे त्या मृत युवकाचे नाव आहे. आकाश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिली होती.

     

    बाबूपेठ भागातील सोनामाता मंदिर जवळ पुरातन काळातील विहीर आहे, मात्र त्या विहीरिला सुरक्षा जाळी नसल्याने हा प्रकार घडला, ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

     

    आकाश याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पोलीस व मनपा प्रशासनाने आकाश चा मृतदेह बाहेर काढला.

     

    यापूर्वी सुद्धा या पुरातन विहिरीत असे प्रकार घडलेले आहे, प्रशासनाने या विहिरीवर तात्काळ सुरक्षा जाळी लावण्याचे काम करावे अन्यथा भविष्यात अश्या घटना निश्चित वाढणार, पाल कुटुंबाने कमविता मुलगा गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    प्रशासनाने आकाश च्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजू कुडे यांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.