Tag: ब्रह्मपुरी तालुका

  • tiger attack in Brahmpuri taluka । धक्कादायक! वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, मुंडकचं धडावेगळं केलं

    tiger attack in Brahmpuri taluka

    tiger attack in Brahmpuri taluka : ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदिरवाडे (वय 52) असे असून, सोमवारी (दि. 11) सकाळी शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. आज सदर शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे.

    २५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

    प्राप्त माहितीनुसार, काल सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घनश्याम उंदिरवाडे शेतावर गेले होते. शेतातील काम पूर्ण करून परत येत असताना शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्ला एवढा भीषण होता की मृताचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते.


    सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांच्या शोधासाठी शेत व जंगल परिसरात पाहणी केली. परंतु ते आढळून आले नाही. अखेर आज मंगळवारी (दि. 12) सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलातील झुडपात आढळून आला. tiger attack farmer दक्षिण वनपरिक्षेत्रातील पद्मपूर बीटमधील गट क्रमांक ७२ मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने मृतदेह सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

    २५ हजारांची तातडीची मदत

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रह्मपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
    मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने तातडीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी आर. एफ. ओ. आकाश सोंडवले यांच्यासह इतर अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    या घटनेमुळे कुडेसावली व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यजीवांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  • village connectivity lost due to flood । ब्रह्मपुरी तालुक्यात पुराने ८ गावांना वेढले, जिल्ह्यातील ४६ मार्ग बंद

    village connectivity lost due to flood

    village connectivity lost due to flood : ब्रह्मपुरी – मागील ३ ते ४ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे, यासह गोसीखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीत सुमारे १५,१२७ क्यूमेक्स पाणी सोडल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पूरानं नदीकाठच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे. आरहेर-नवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, धानाचे पीक (रोपे) खराब झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवलगाव, रणमचान येथील घरांचेही नुकसान झाले आहे.

    कोल वॉशरी बंद करा – आमदार जोरगेवार

    बचाव पथकाला सतर्क ठेवण्यात आले असून, मदतीची गरज असलेल्यांसाठी पिंपळगाव येथे दोन बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.

    ब्रह्मपुरी-वडसा, वालगाव-गंगाळवाडी, ब्रह्मपुरी-कान्हळगाव, ब्रह्मपुरी-चांदगाव, ब्रह्मपुरी-दुधवाही, ब्रह्मपुरी-परदगाव आणि ब्रह्मपुरी-गडचिरोली हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. flood affected roads in chandrapur district

    नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केल्या जाऊ शकतात. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. emergency rescue during floods

    तालुका नियंत्रण कक्ष (control cell) स्थापन करण्यात आला आहे. कोणतीही व्यक्ती ०७१७७- २७२०७३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकते, असेही तहसीलदार सतीश मसाळ यांनी कळवले आहे.

    जिल्हयात याठिकाणी मार्ग बंद

    मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ४६ मार्ग बंद झाले आहे. यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील ४ मार्ग, वरोरा तालुका १, ब्रह्मपुरी तालुका २६ मार्ग, नागभीड २ मार्ग, सावली तालुका १३ मार्ग, सदर मार्ग बंद झाल्यामुळे विविध गावातील संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पुराचा धोका बघता प्रशासनाने त्याठिकाणी CDRF चे पथक तैनात केले आहे.

    सुट्टी जाहीर

    अतिवृष्टीमुळे अनुचित घटना घडू नये यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना १० जुलै रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सुट्टीचा आदेश ब्रह्मपुरी तालुका पर्यंत मर्यादित आहे. school holiday due to heavy rain today