Tag: Irai dam water release Chandrapur

  • Chandrapur Weather Update । मुसळधार पावसाचा तडाखा: चंद्रपूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    Chandrapur Weather Update

    Chandrapur Weather Update :चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात भूकंप? नेमकं काय घडलं?

    इरई धरणाची स्थिती आणि नदीकाठच्या गावांना सूचना

    सध्या इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी आधी तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. आता, आणखी दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Irai Dam Water Release Chandrapur

    प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही माहिती त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुसळधार पाऊस: शाळा-महाविद्यालये बंद

    जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज (२५ सप्टेंबर २०२५) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळा सकाळी सुरू झाल्या आहेत, त्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. Chandrapur Schools Holiday Rain

    नागभीड तालुक्यात दुर्देवी घटना: एकाचा मृत्यू

    नागभीड तालुक्यातून एका दुर्देवी घटनेची माहिती समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेले धर्मा देवाजी शेंडे (वय अंदाजे ६५) यांचा त्यांच्या घराशेजारील विहिरीवर असलेल्या मोटरपंपाला विजेचा धक्का (करंट) लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. धर्मा शेंडे यांच्या नावे गोविंदपूर येथे शेती आहे. तहसीलदार नागभीड यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

  • Irai dam gates opening alert villages । मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना इशारा

    Irai dam gates opening alert villages

    Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels

    ३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

    नागरिकांनो सतर्क रहा

    इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.