Tag: Indian forest department relocation project

  • boma enclosures for deer relocation । ताडोबातून 10 चितळांचे यशस्वी स्थानांतर! नवेगाव–नागझिरा प्रकल्पात सुरक्षित पोहोच

    boma enclosures for deer relocation

    boma enclosures for deer relocation : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून चितळांचे स्थानांतर करण्याच्या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 10 चितळांचे नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे स्थानांतर करण्यात आले.

    ताडोबामध्ये चितळांना पकडून आफ्रिकन पद्धतीच्या ‘बोमा’ संरचनेत ठेवण्यात आले. ही बोमा संरचना कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणीच्या विस्तीर्ण माळरानात उभारण्यात आली आहे. जामणी परिसरातील समृद्ध चितळसंख्या आणि अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे तो बोमा उभारण्यासाठी सर्वात योग्य परिसर ठरला. या उपक्रमाची तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू होती. boma enclosures for deer relocation

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर वसतिगृह आत्महत्या प्रकरणात एकाला अटक

    बोमातून चितळांना विशेष तयार केलेल्या स्थानांतर वाहनांद्वारे हलविण्यात आले. या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फॉगर, तसेच जखम टाळण्यासाठी आवश्यक कुशनिंगची सोय आहे. तसेच नर–मादी चितळांना वेगळे ठेवता येईल, अशी यात रचना करण्यात आहे. या उपक्रमासाठी अशी दोन वाहने विशेष खरेदी करून सुधारित करण्यात आली. चितळांना नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजर्समध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आले.

    श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोर), यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या काटेकोर नियोजनामुळे हे काम शक्य झाले. त्यांना श्री विवेक नातू, एसीएफ यांचे मोलाचे सहकार्य लाभलं. श्री अनिरुद्ध धागे, एसीएफ, श्री भाविक चिवंडे, आरएफओ आणि श्री विशाल वैद्य, आरएफओ यांनीही यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या स्थानांतर प्रक्रियेसाठी मध्य प्रदेशातील तज्ज्ञ पथकातील आरएफओ डॉ. बलवंत केशवाल, डेप्युटी आरओ श्री चौधरी, डेप्युटी आरओ श्री उईके आणि डेप्युटी आरओ श्री भायस यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. तसेच नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आरएफओ श्री तेजस सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाहतूक आणि पायलटिंगदरम्यान आवश्यक सहकार्य केले. boma enclosures for deer relocation

    boma enclosures

    “या संपूर्ण प्रक्रियेत एकाही चितळाचा मृत्यू न होणे हे सर्वात मोठे यश आहे”, असे श्री आनंद रेड्डी यांनी सांगितले. हा उपक्रम ताडोबा-अंधारी आणि नवेगाव–नागझिरा या दोन्हा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रभावी समन्वयातून यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

    “या स्थानांतर उपक्रमामुळे ताडोबाचा शाकाहारी प्राण्यांच्या स्थानांतराचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. यापूर्वी वाघांचे नवेगाव–नागझिरा, सिमलीपाल आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थानांतर करण्यात आले आहे. आता चितळांचे यशस्वी स्थानांतर हा ताडोबाच्या संवर्धन कार्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.” – श्री प्रभू नाथ शुक्ला, भावसे, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

    “संवर्धनातील विद्मान आव्हाने आणि मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा सक्रिय व्यवस्थापन उपाययोजना अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्र वन विभाग भविष्यातही अशा प्रगतिशील उपक्रमांची अंमलबजावणी करत राहील.” – श्री एम. एस. रेड्डी, भावसे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र