forest department captures man-eating tiger
forest department captures man-eating tiger : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चिमूर तालुक्यात धुमाकूळ माजवीत तिघांची शिकार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला १० नोव्हेम्बर रोजी यश प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून यामध्ये आतापर्यंत तब्बल ३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Also Read : ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला
चिमूर तालुक्यात या हल्लेखोर वाघाने तिघांची शिकार केली होती ज्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी भिसी उपवनक्षेत्रात गडपिपरी क्षेत्रात घडली, शेतात निंदनाचे काम करीत असलेल्या ४२ वर्षीय विद्या कैलास मेश्राम वर हल्ला चढवीत वाघाने ठार केले होते. तर दुसऱ्या घटनेत चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा बीटातील शिवरा मध्ये २६ ऑक्टोबरला ६० वर्षीय शेतकरी नीलकंठ भुरे हे शेतातील पिकाची पाहणी करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवीत ठार केले होते.
ग्रामस्थांनी केले होते रस्ता रोको आंदोलन
६ नोव्हेम्बर रोजी शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या ४५ वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे यांच्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले होते. चिमूर तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील ८ गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. वाघाचे हल्ले होत राहिल्यास आम्ही शेतावर जायचे कसे असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिला होता.
वाघाचा बंदोबस्त व त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या वतीने एक लाईव्ह कॅमेरा, १६ ट्रॅप कॅमेरे व ३५ वनकर्मचारी तैनात केले होते. अखेर १० नोव्हेम्बर रोजी शंकरपूर वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाला डार्ट मारत जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.
सदरची यशस्वी कारवाई पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस कर्मचारी व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे शुटर अजय मराठे, दीपेश टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, कोरपे व दांडेकर यांनी केली.
