Tag: GMC chandrapur

  • Gmc chandrapur | मेडिकल कॉलेजसाठी 100 कोटीचा निधी द्या – आमदार जोरगेवार

    Gmc chandrapur

    Gmc chandrapur : चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, सदर मेडिकल कॉलेज रुग्णसेवेसाठी तात्काळ सुरू करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशी मागणी अधिवेशनात (winter session nagpur 2024) औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

    youtube च्या नव्या नियमाने अनेक चॅनेल होणार बंद

    शनिवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजचा विषय उचलत साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

      बहुप्रतिक्षित चंद्रपूर मेडिकल कॉलेजची सुमारे ५० एकरातील नवीन वास्तूचे बांधकाम (new campus) पूर्णत्वास आले असले तरी वैद्यकीय साहित्य आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध झाला नाही. साहित्य खरेदीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची आवश्यकता असून, तातडीने हा निधी मिळावा म्हणून कॉलेज प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन इमारतीत लाकडी फर्निचरसाठी ५७ कोटी रुपये तर वैद्यकीय साहित्यासाठी ४१ कोटी ७६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.  मात्र सदर  प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

       लगतच्या गडचिरोली, यवतमाळ, तेलंगणातील आसिफाबाद, करीमनगर या भागातील रुग्णसुद्धा चंद्रपुरात उपचारासाठी येत असतात. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. निवासी डॉक्टरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने नव्या जागेतील इमारतीत कॉलेज हलविण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. परंतु, आवश्यक साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व काम रखडले आहे.

      हाच विषय आता आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उचलून धरला. यावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण झाले आहे. परंतु साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारे 100 कोटी रुपये न मिळाल्याने रुग्णालय बंद आहे. अतिशय सुंदर परिसरात सुंदर वास्तू तयार झाली असली तरी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्य नसल्याने रुग्णालय सुरू होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तात्काळ साहित्य खरेदीसाठी 100 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नसून पदाचे राजीनामे देण्याची मागणी यावेळी केली. व बाहेरील स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    या घटनेमुळे सामान्य नागरिकांनि या सरकारवर व व्यवस्थेवर विश्वास ठेवावा तरी कसा, असा प्रश्न आता सामान्याना पडला आहे. या मृत्यूस सर्वस्वी जवाबदार डॉक्टर आहेत असा आरोप तेथील सर्व परिचरिकेंनी करत काम बंद आंदोलन केले. यावरून तेथे काम करणाऱ्यांकडे डॉक्टर दुर्लक्ष करत आहेत तर सामान्य नागरिकांचा उपचार वाऱ्यावर असल्याचे सिद्ध होते.

    यावेळी मनसे तर्फे वर्षभरा आधी दिलेल्या निवेदनात औषध बाहेरून विकत घ्यावे लागते, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयात सोनोग्राफी सारख्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही त्यामुळे रुग्णांना एक दोन महिन्याची सोनोग्राफीची तारीख देण्यात येते यावर तक्रार केली होती परंतु तेही परिस्थिती जैसे थे असल्याचे यावेळी चौकशी समितीच्या निदर्शनात आणून देण्यात आले. तसेच सीआर्म ऑर्थो मशीन बंद आहे, येथील कार्यरत डॉक्टर्स स्वतः रुग्णालयात उपस्थित न राहता मेडिकल इंटर्न कडून रुग्णांची तपासणी करत असल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते ह्या सर्व विषयांना घेऊन मनसे तर्फे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उईके यांना घेराव करीत वरील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

    सदर बैठकीत यंत्रणा पुरविण्यात सरकारचा हलगर्जी पणा, डॉक्टर, परिचारिकाचा अभाव व त्यांची रखडलेली भरती यामुळे हे सर्व प्रकार घडत असल्याचा समितीचा एकंदरीत सुर असल्याने शासनाची आरोग्य विभागा बद्दलची उदासीनता या साठी कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट होते, औषधांचा पुरवठा शासनाकडून होत नाही ही शरमेची बाब आहे असा आरोप यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केला.

    यावेळी विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासालवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जिल्हासचिव किशोर मडगुलवार तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शहरसंघटक मनोज तांबेकर, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धणवलकर, राकेश पराडकर, मयूर मदणकर, तुषार येरमे, कार्तिक खंगार, बाळु शेवते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.