Tag: forest department response tiger attack

  • Chimur forest human conflict latest | जंगलराज; वाघाच्या दहशतीने चंद्रपूरचा शेतकरी वर्ग हादरला, पुन्हा शेतकरी ठार

    Chimur forest human conflict latest

    Chimur forest human conflict latest : चिमूर 6 नोव्हेंबर (NEWS34) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात सतत वाढ होत आहे, वर्ष 2025 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 38 नागरिकांचा बळी गेला आहे. 5 ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

    Also Read : चंद्रपुरातील अल्पवयीन गुन्हेगारी


    चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील आंबोली रोडवर असलेल्या शेतात ईश्वर भरडे कापूस वेचायला गेले होते. सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्या परिसरात दबा धरून बसलेल्या शेतकरी भरडे यांच्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले.

    45 वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे हे शिवरा गावात राहत होते, या घटनेमुळे परिसरात जनतेचा रोष बघायला मिळाला, वाघाचे हल्ले सतत होत राहिल्यास शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

    आतापर्यंत 38 मृत्यू

    या घटनेनंतर नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी करीत काही काळ चक्काजाम आंदोलन सुद्धा केले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 34 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, 1 अस्वल व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. एकूण 38 मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहे.

  • tiger attack Chandrapur 2025 । शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू, अब तक ३१ मृत्यू

    tiger attack Chandrapur 2025

    tiger attack Chandrapur 2025 : चिमूर:- शंकरपूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली, विद्या कैलास मसराम वय 42 असं मृतक महिलेचे नाव आहे ही घटना चिमूर वनपरिक्षेत्र भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतपर्यंत तब्बल ३१ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे, ज्यामध्ये २९ वाघाच्या हल्ल्यात, १ अस्वल व १ हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. tiger attack Chandrapu

    ब्रह्मपुरीमध्ये वाघाचा हल्ला, गुराखी ठार

    लावारी मध्ये मसराम यांनी धानाची शेती ठेक्याने घेतली आहे, मागील २ दिवसापासून शेतात निंदनाचे काम सुरु होते, आज सकाळी सहा महिला शेतात निंदनासाठी गेल्या होत्या, ५ महिला वेगळ्या दिशेने तर विद्या मसराम हि दुसऱ्या बाजूस निंदण करीत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विद्या वर हल्ला करीत तिला फरफटत नेत ठार केले.

    महिलेचा पती विद्या ला बघण्यासाठी शेतात आला तेव्हा ती कुठे आढळून आली नाही, त्यावेळी मागील बांधीत विद्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, काही अंतरावर गावकर्यांना वाघ दिसला मात्र त्यांच्या आरडाओरडाने वाघ पळून गेला. जोपर्यंत महिलेच्या पतीला नोकरी, दहा लाख रुपये व वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कुणाचेही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकर्यांनी घेतली.

    दुचाकी वाहन फोडले

    वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र गावकऱ्यांचा रोष वाढल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झळा होता, यावेळी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वनरक्षकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी गावकरी करीत होते. यावेळी पोलीस व ववनविभागाने गावकर्यांना लेखी आश्वासन दिल्यावर तणाव शांत झाला. वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते तर पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, थूटे चिमूर व भिसी येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.