Tag: Farmer killed tiger attack Chandrapur

  • Chandrapur farmer killed tiger attack । 🌳 चंद्रपूरात पुन्हा वाघाचा हल्ला! सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी ठार

    Chandrapur farmer killed tiger attack

    Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

    Also Read : वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग हादरला

    ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack


    आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

    आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack

    गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka

    नागरिकांचा संताप

    या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


  • Tiger terror in chandrapur district | गोंडपिपरीत वाघाचे थैमान! ८ दिवसांत दुसरा बळी; ४५ वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

    Tiger terror in chandrapur district

    Tiger terror in chandrapur district : गोंडपिपरी (चंद्रपूर 26 ऑक्टोबर News34): गोंडपिपरी (Gondpipri Taluka) तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी (Ganeshpipri) गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज, सोमवार (दि. २७ ऑक्टोबर), सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत (Terror) आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. Woman killed by tiger Gondpipri cotton field

    Also Read : नागभीड मधील त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू

    अल्का महादेव पेंदोर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मजूर मिळत नसल्याने त्या एकट्याच आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी (Cotton Picking) गेल्या होत्या. त्यांचे पती बैल घेऊन घरी परतले, मात्र उशिरापर्यंत अल्का घरी न परतल्याने कुटुंबियांना भीती वाटली. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतशिवारात अल्का यांचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

    वनविभागाच्या उपाययोजनांना अपयश

    गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी आणि चेकपिपरी या भागात वाघाची दहशत वाढली होती. या वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती.

    दुसरा बळी: आठ दिवसांपूर्वी याच वाघाने चेकपिपरी येथील ७० वर्षीय शेतकरी भाउजी पाल यांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वाघाला जेरबंद (Cage/Capture) करण्याचे आदेश मिळवले होते, मात्र वनविभागाला या आदेशांचे पालन करण्यात अपयश आले.

    लोकक्षोभ: ८ दिवसांत दोन शेतकऱ्यांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट (Anger Wave) पसरली आहे.

    सन्मानजनक मदतीसाठी ग्रामस्थांचा पवित्रा

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू तात्काळ गणेशपिपरी (Gondpipri News) येथे दाखल झाली. मात्र, संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत या नरभक्षक वाघाला जेरबंद केले जात नाही आणि मृत कुटुंबाला सन्मानजनक आर्थिक मदत (Financial Aid) दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. उशिरापर्यंत गावकऱ्यांचा हा विरोध सुरू होता.

    सध्या कापूस वेचणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना, वाघाच्या भीतीमुळे शेतीत काम करणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

    आतापर्यंत 36 बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे, यावर्षी 36 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये 32 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, एक हत्ती व एकाचा अस्वलीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.