Tag: Chandrapur Wildlife News

  • Chandrapur farmer killed tiger attack । 🌳 चंद्रपूरात पुन्हा वाघाचा हल्ला! सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी ठार

    Chandrapur farmer killed tiger attack

    Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

    Also Read : वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग हादरला

    ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack


    आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

    आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack

    गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka

    नागरिकांचा संताप

    या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


  • Man-animal conflict Chandrapur news | चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा कहर! शेतकऱ्याला केले ठार

    Man-animal conflict Chandrapur news

    Man-animal conflict Chandrapur news : चंद्रपूर/नागभीड – 25 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : तालुक्यातील तळोधी (बाळापूर) जवळील आकापूर (Akapur) शेतशिवारात आज, शनिवार (२५ ऑक्टोबर), सकाळी एका धक्कादायक घटनेत वाघाने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतला. वाघाच्या हल्ल्यातील ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. Tiger attack Chandrapur

    Also Read : झोपडपट्टी मधील मुलांसोबत आमदार मुनगंटीवार यांनी साजरी केली दिवाळी


    वासुदेव लक्ष्मण वेठे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शुक्रवार (दि. २४) सायंकाळी आपल्या धान पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी रात्रभर शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. अखेर, आज शनिवारी सकाळी शेताच्या एका बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळावरील वाघाच्या स्पष्ट खुणांवरून हा हल्ला वाघानेच केल्याचे वनविभागाने प्राथमिकदृष्ट्या निश्चित केले आहे.

    वनविभागाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप

    या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्याभरापासून या आकापूर शेतशिवारात वाघाचे प्रस्थ होते. नागरिकांनी वारंवार तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला लेखी निवेदन देऊन या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
    मात्र, वन विभागाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. फक्त पाहणी करण्याशिवाय कॅमेरे बसविणे किंवा पिंजरे लावणे यासारख्या प्रभावी उपाययोजना वन विभागाने केल्या नाहीत, असा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.

    वनअधिकाऱ्यांना घेराव, मृतदेह उचलण्यास नकार

    घटनेची माहिती मिळताच तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी शहा मॅडम आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा सुरू असतानाच संतप्त गावकऱ्यांनी वनअधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत शहा मॅडम यांना घेराव घातला.


    जोपर्यंत नागरिकांना सुरक्षिततेची ठोस हमी दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यास नागरिकांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे वृत्त लिहीपर्यंत (सकाळी/दुपारी) मृतदेह घटनास्थळीच पडून होता, अशी माहिती आहे. वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागभीड आणि चंद्रपूर (Chandrapur) परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    यावर्षीचा 35 वा मृत्यू

    चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 35 नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 31 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट तर अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एका नागरिकांचा मृत्यू झाला.

  • Male Leopard found dead । चंद्रपूरात नर बिबट्याचा रहस्यमय मृत्यू

    Male Leopard found dead

    Male Leopard found dead : चंद्रपूर : 9 सप्टेंबर 2025 – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतात एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक वनरक्षकाच्या माहितीवरून त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली असताना शोध मोहिमेदरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला.

    घराबाहेर भांडे घासत असताना महिलेवर वाघाचा हल्ला

    सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतातील झुडपात एक बिबट दडून असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकाला मिळाली त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यावरून विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे आणि सावली वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांचे नेतृत्वात बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले. Mul taluka leopard death

    बिबट्याची शोधाशोध आणि…

    याकरीता चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर, अतिशीघ्र कृती दलाचे कर्मचारी, वनकर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याचे नियोजन पूर्ण झाले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याची शोधाशोध सुरू असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याला ताब्यात घेऊन सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष बिबट्याचे शवविच्छेदन केले आणि त्या ठिकाणीच दहन करण्यात आले.

    शवविच्छेदन वेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, लंकेश आखाडे, अतिशीघ्र कृती दलाचे शूटर अविनाश फुलझेले, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरुण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर, अक्षय दुम्मावार, टेकाडी पी.आर.टी. टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. Chandrapur wildlife incident

    याच परिसरात चार दिवसांपूर्वी ३०० कोंबड्यांना ठार करणारी मादी बिबट जेरबंद करण्यात आली होती. सध्या मृत अवस्थेत सापडलेला बिबट नर जातीचा आहे. नर आणि मादी बिबट दोघेही या परिसरात एकत्र वावरत असावेत असा वनविभागाचा कयास आहे. टेकाडी परिसर सादागडच्या घनदाट जंगलाच्या जवळ असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे याच परिसरात नर मादी बिबट राहत असावेत असे अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि वन्यप्राण्यांची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.