Tag: Chandrapur tiger human conflict

  • Chandrapur farmer killed tiger attack । 🌳 चंद्रपूरात पुन्हा वाघाचा हल्ला! सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी ठार

    Chandrapur farmer killed tiger attack

    Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

    Also Read : वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग हादरला

    ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack


    आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

    आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack

    गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka

    नागरिकांचा संताप

    या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


  • Latest tiger attack news from Chandrapur । सोमनाथ पर्यटनस्थळाजवळ वाघाचा हल्ला, धाडसी पतीचा प्रयत्न व्यर्थ, पत्नीचा मृत्यू

    Latest tiger attack news from Chandrapur

    Latest tiger attack news from Chandrapur चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.

    नेमकं काय घडलं?

    अन्नपूर्णा बिलोणे (५२) आणि त्यांचे पती तुलसीराम बिलोणे हे बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आज पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा त्यांच्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्याचवेळी एका वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. Villager woman killed by tiger attack

    सावली तालुक्यात धुमाकूळ घालणारी नरभक्षी वाघीण जेरबंद

    पतीचा धाडसी प्रयत्न

    अन्नपूर्णा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती तुलसीराम तातडीने बाहेर आले. त्यांनी पाहिले की वाघाने अन्नपूर्णा यांच्या गळ्याला पकडले आहे. घाबरून न जाता, तुलसीराम यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी वाघाशी दोन हात केले. त्यांनी अन्नपूर्णा यांचे पाय धरून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा जोर कमी पडला. शेवटी, त्यांनी जवळच पडलेली एक काठी घेऊन वाघावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वाघ तिथून पळून गेला, पण दुर्दैवाने अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९ नागरिकांनी वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये २७ वाघाच्या हल्ल्यात तर एक-एक हत्ती व अस्वलच्या हल्ल्यात बळी गेला.

    प्रशासकीय कार्यवाही

    घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तात्काळ, मेजर राष्ट्रपाल कातकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उप-जिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेच्या पतीला तात्काळ २०,००० रुपयांची मदत दिली.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.