Tag: Chandrapur tiger attack

  • वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बळी’चा आकडा ४२ वर

    tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    🔍 शोधानंतर लागला मृतदेह

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

    शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities

    📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका

    शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे.

    आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • Chandrapur breaking news today tiger attack । चंद्रपूर हादरले! गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार

    Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    प्रशासनाचा आदेश : जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी

    सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack

    विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.

  • Chandrapur farmer killed tiger attack । 🌳 चंद्रपूरात पुन्हा वाघाचा हल्ला! सिंदी तोडण्यासाठी गेलेला शेतकरी ठार

    Chandrapur farmer killed tiger attack

    Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

    Also Read : वाघाच्या दहशतीने शेतकरी वर्ग हादरला

    ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack


    आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

    आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack

    गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka

    नागरिकांचा संताप

    या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


  • Chandrapur wildlife conflict । ब्रम्हपुरीत वाघाचा हल्ला : गुराख्याचा जागीच मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

    Chandrapur wildlife conflict

    Chandrapur wildlife conflict : ब्रम्हपुरी १७ सप्टेंबर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला.

    पोलीस निरीक्षकापायी कर्मचारी त्रस्त

    अब तक ३०

    मृत व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारून परत येत असताना, झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सुनील राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये २८ वाघाच्या, १ हत्ती तर १ अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

    घटनेनंतर लाखापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.