Tag: Chandrapur road repair update

  • Chandrapur road widening project । २० कोटींच्या निधीतून चंद्रपूरच्या मुख्य मार्गांचा कायापालट! रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

    Chandrapur road widening project

    Chandrapur road widening project : चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली.

    Also Read : ग्रामीण भागात पत्रकाराने केली महिलांची फसवणूक

    या बैठकीस महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग , वेकोली आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या विभागांचा समावेश होता. यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता चिवंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, तसेच भाजप महानगर अध्यक्ष  सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष  छबू वैरागडे, संघटन महामंत्री नामदेव डाहुले,  माजी महापौर राखी कंचार्लावार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगर सेवक संजय कंचार्लावार, करणसिंह बैस आदी उपस्थित होते.

    road expansion

    बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील कस्तुरबा आणि महात्मा गांधी या दोन मुख्य मार्गांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांतून या दोन्ही मार्गांचे काम सुरू असून आता अंतिम टप्प्यात शेवटच्या आवरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र, हे काम होत असताना रस्त्यावर असलेले अतिरिक्त विद्युत खांब काढून रस्ते रुंद करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. road widening project in Chandrapur city challenges

    रस्ते प्रशस्त करा

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, रस्त्याकडेला उभे असलेले वीज खांब व गटारे यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना सतत धोका निर्माण होतो. म्हणूनच हे खांब तातडीने हलवून रस्ते प्रशस्त करावेत. अनेक ठिकाणी पाणी गळतीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या घरासमोर चिखल व घाण साचते. संबंधित विभागांनी त्वरित तपासणी करून यांची दुरुस्ती करावी. municipal authority road expansion plans

    केवळ रस्ते बनवणे हे आपले उद्दिष्ट नाही, तर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखदायी प्रवासाचा अनुभव देणे हे आपले ध्येय आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करावे, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.वेकोली अंतर्गत येणाऱ्या मार्गांचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आणि महावितरणने रस्त्यावर केलेले खोदकाम दुरुस्त करून उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

  • Chandrapur road repair update । 🚧 खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या इशाऱ्याने मनपाला आली जाग! ‘जीवघेण्या’ रस्त्यांवर दुरुस्तीला वेग

    Chandrapur road repair update

    Chandrapur road repair update : चंद्रपूर ९ ऑक्टोबर २०२५ (News ३४ वृत्तसेवा):  शहरातील ‘जीवघेण्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दिलेल्या ५ दिवसांच्या अल्टिमेटम’मुळे चंद्रपूर शहर महानगर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या तीव्र इशाऱ्यानंतर काही तासांतच मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहराच्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या तसेच दुरुस्तीच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

    Also Read : मनपा आयुक्त पालीवाल यांची मुंबई मध्ये बदली

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पत्र पाठवून रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले होते आणि ५ दिवसांत काम सुरू न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियतेविरोधात प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला होता. नागरिकांची सुरक्षितता आणि वाढते अपघात लक्षात घेता रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली होती. Chandrapur MP Pratibha Dhanorkar road action

    या इशाऱ्याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवर आणि सर्वाधिक खड्डे असलेल्या भागांमध्ये काम सुरू केले आहे.

    शहरवासीयांना दिलासा

    “जीवघेण्या” रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना सुरू झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि जनआंदोलनाच्या इशाऱ्यामुळेच प्रशासन त्वरित कामाला लागले, अशी चर्चा आता चंद्रपूर शहरात रंगली आहे.

    मनपाने काही भागांत काम सुरू केले असले तरी, शहरातील अन्य भागात अद्याप खड्डे कायम आहेत. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपला इशारा कायम ठेवला आहे. उर्वरित खड्डे ५ दिवसांच्या आत बुजवले नाहीत, तर “गिट्टी फेक” आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. नागरिकांना पूर्ण दिलासा मिळेपर्यंत प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.