chandrapur police news
chandrapur police news : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर गुन्हेगारीने अक्षरशः कहर केला आहे. ड्रग्स, क्रिकेट सट्टा आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 7 मार्च रोजी चंद्रपूर शहरात एका बारमध्ये झालेल्या भांडणात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण यांची हत्या झाली, तर समीर चाफले गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. त्यानंतर घुग्गुसमध्येही अशीच घटना घडली.
कांग्रेस नेते राजू रेड्डी यांच्या घरावर गोळीबार, पोलिसांनी केला खुलासा
या पार्श्वभूमीवर, आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलात तातडीने फेरबदल करण्याची मागणी त्यांनी केली.
- गुन्हेगारीत वाढ
- दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढली आहे.
- ड्रग्स आणि क्रिकेट सट्ट्याचे प्रमाण वाढले आहे.
- 2024 मध्ये हत्या आणि गोळीबाराच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.
- पोलीस दलात प्रामाणिक आणि तडफदार अधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे.
- पोलीस अधिकारी चांगल्या पोलीस ठाण्यांसाठी लॉबिंग करतात, पण गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न करत नाहीत.
- काही पोलीस कर्मचाऱ्यांची मुलेही गुन्हेगारीत गुंतलेली आहेत.
- आमदार जोरगेवार यांच्या मागण्या
- चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात तातडीने फेरबदल करावा.
- गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
- स्थानिक गुन्हे शाखेत नुकताच बदल झाला, पण जिल्हा स्तरावरही बदल आवश्यक आहे.
- जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.