Tag: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

  • Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

    वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच जात आहेत दिवसाआड मनुष्यबळी

    Chandrapur Forest Department 19 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली.

    मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


    Chandrapur Forest Department गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व बिबट च्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरचा कमवता व्यक्ती गमवल्या मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.


    काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ता करिता अनेक वेळा निवेदन देऊन व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबी कडे वेधले आहे परंतू मानवी जिवा पेक्षा डुक्कर, बिबट, वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Chandrapur Forest Department)


    विशेष करून गाय, बकरी, म्हैस यांच्या चराई करिता चरण कुरणे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे परंतु सद्यास्थीती पर्यंत वनविभागाने चराई कूरणा करिता ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात सामान्य नागरिकाचे जीव जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वन्यप्राण्याच्या बंदोबस्ता मध्ये वनविभाग व प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे.


    जिल्ह्यामध्ये वनविभागाचे प्रमुख पद असलेले मुख्य वनसंरक्षण चंद्रपुर हे पद गेल्या कितेक महिन्या पासून रिक्त असून ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या कडे वनप्रशासनाने या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यात ताडोबा महोत्सव, वनमहोत्सव, कास्ट रवानगी महोत्सव आदी कार्यक्रमा मध्ये ते व्यस्त झाले आहे. तर हे सर्व कार्यक्रम करून घेण्यात वनविभागाचे प्रधान सचिव पासून ते वनविभागाचे सर्व छोटे मोठे अधिकारी कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी व गुराखी यांच्या मुख्य प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. (Chandrapur Forest Department)

    अवश्य वाचा : महिलांनी केला निर्धार, संदीप गिर्हे आमचा निर्धार

    त्यामुळे सामान्य माणूस वाघाचा बळी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात वनविभाग शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत सौर झटका मशीन वाटप सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जाहिरात व प्रसिद्धी करून राजकीय पक्षाच्या प्रचार सारखे करून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या इसमाच्या परिवाराच्या दुखाःवर मिठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वनमंत्री असून देखील याविषयी ब्र काढायला तयार नाही.
    सामान्य शेतकरी व गुराखी यांच्या जीविताची किंमत काही हजार आणि लाख ठरवली आहे आणि वनविभाग एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मूळ जबाबदारी पार पाडण्यात अपयशी झाले आहेत.


    सरकार आणि वनविभागाच्या या असंवेदनशील वागणुकीचा भूमिपुत्र ब्रिगेडने जाहीर निषेध केला असून वन महोत्सव यांच्या प्रचार, प्रसिध्दी व जाहिरातीमध्ये अखंड बुडालेल्या वनविभाग व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाळीव जनावराच्या चराईच्या प्रश्नावर निष्काळजी करणाऱ्या या घटलेला जबाबदार असलेल्या वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर हे पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे. (Chandrapur Forest Department)


    चराई क्षेत्र निर्माण करणे, दोषी वनाधीकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहीती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिग्रेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले
    आणि म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतल्या नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मुल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.


    यावेळी मुल तालुक्याचे काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष
    अध्यक्ष जेष्ठ नागरिक नामदेवरावजी गावतुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे, छायाताई सोनुले, सीमाताई लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले, संतोष चिताळे, कालिदास गायकवाड, दिवाकर चौधरी, दामोदर किनाके, सुखदेव मगरे, वामन सोनवणे, संतोष गायकवाड, समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे, कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम, संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत, सचिन मुंडवार, जोगेश्वर ठाकरे, मारुती मगरे, करण ठाकरे यांच्यासह शेकडो चिंचोलीवासी उपस्थित होते.

  • Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    Road Stop Movement : ओव्हरब्रिज नाही मात्र टोलवसुली सुरू चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आम आदमी पार्टी (आप) 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरातील अष्टभुजा जवळील बायपास रोड पुलावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या भीषण अपघाताच्या प्रत्युत्तरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, आता आप पीडितांना न्याय देण्याची मागणी करत आहे. Aam Aadmi Party

     

     

    वर्षभरापूर्वी बायपास रोडवर दुसरा पूल बांधण्यासाठी रेल्वे विभागाने टोल कंपनीला परवानगी दिली होती. मात्र, वेळ उलटूनही पुलाचे काम अपूर्णच आहे. प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी, अस्तित्वात नसलेल्या पुलासाठी टोलवसुली आधीच सुरू झाली आहे. Road stop movement

     

     

    या रस्त्यावर घडलेला अपघात हा टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेल्या निष्काळजीपणाचा स्पष्ट परिणाम आहे. चार निष्पाप जीव गमावले, आणि जबाबदार असलेल्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले जाणे अत्यावश्यक आहे. युवक जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने टोल कंपनी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. Demand justice

     

     

    आप ने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा उद्देश या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी आहे. संबंधित नागरिकांना एकत्र आणून आणि टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल जागरुकता वाढवून, AAP अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यासाठी दबाव आणेल अशी आशा करते. Negligence

     

     

    अपूर्ण पूल बांधकाम आणि अस्तित्वात नसलेल्या पुलासाठी टोलवसुली सुरू करणे ही गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराची स्पष्ट उदाहरणे आहेत. न दिलेल्या सेवेसाठी नागरिकांना पैसे देण्यास भाग पाडले जात आहे, हे अस्वीकार्य आहे. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आम आदमी पार्टीची मागणी हे न्याय मिळवण्याच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे. Tragic accident

     

     

    अष्टभुजाजवळील बायपास रोडवर घडलेल्या अपघातासारखा दु:खद अपघात हा जनतेच्या सुरक्षेला आणि हिताला प्राधान्य देण्यासाठी अधिकाऱ्यांना जागृत करणारा आहे. निष्पाप जीव गमावणे हे हलके घेतले जाऊ नये आणि अशा अपघातांना जबाबदार असलेल्यांना त्यांच्या निष्काळजीपणाचे परिणाम भोगावे लागतील.

     

     

    AAP ने आयोजित केलेले रस्ता रोको आंदोलन हे नागरिकांसाठी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि न्यायाची मागणी करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते. समोरच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करतात याची खात्री करण्याचा हा एक शांत पण शक्तिशाली मार्ग आहे.
    आंदोलनात सामील होऊन एकजुटीने उभे राहून चंद्रपूरचे नागरिक टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कडक संदेश देऊ शकतात. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडून पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याची वेळ आली आहे. शिवाय, अस्तित्वात नसलेल्या पुलाची टोलवसुली त्वरित थांबवली पाहिजे.

     

     

    अष्टभुजाजवळ झालेल्या या भीषण अपघाताचा समाजावर कायमचा परिणाम झाला आहे. दोषी सदोष हत्या प्रकरणाची AAP ची मागणी गांभीर्याने आणि सखोल चौकशी करणे महत्वाचे आहे. न्याय मिळालाच पाहिजे आणि अपघाताला जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे.

     

     

    ‘आप’ने 20 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन हे नागरिकांसाठी एकत्र येण्याची आणि पीडितांना न्याय मागण्याची संधी आहे. हे कृतीचे आवाहन आहे आणि स्मरणपत्र आहे की जनतेच्या सुरक्षिततेशी आणि कल्याणाशी कधीही तडजोड केली जाऊ नये. टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदार धरले पाहिजे आणि भविष्यात असे दुर्दैवी अपघात होऊ नयेत यासाठी पावले उचलली पाहिजेत.

     

    अपघातग्रस्त या बायपास मार्गावर सर्व्हिस रोड नाही, जवळच स्मशान भूमी आहे, त्याठिकाणी प्रेत नेताना होणारी गर्दी भविष्यात मोठा अपघात त्या मार्गावर टाळता येणार नाही, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग व WCBTRL टोल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे – राजू कुडे युवा जिल्हाध्यक्ष, आप

  • चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्या वन निसर्गाने वेढलेला जिल्हा आहे, अनेक वन्यप्राणी या निसर्गात वास्तव्यास आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी हे प्राणी शेतात जात पिकांची नासाडी करतात.

    या वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे वर्ष 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 13 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, सदर 12 प्रकरणात शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, विशेष म्हणजे काही प्रकरणात स्वतः शेतमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    याकरिता शेत मालकांनी शेतात जिवंत विजेचा प्रवाह सोडु नये जर असे केल्यास या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मालकांनी असा प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.