Tag: वैनगंगा नदी

  • village connectivity lost due to flood । ब्रह्मपुरी तालुक्यात पुराने ८ गावांना वेढले, जिल्ह्यातील ४६ मार्ग बंद

    village connectivity lost due to flood

    village connectivity lost due to flood : ब्रह्मपुरी – मागील ३ ते ४ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे, यासह गोसीखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीत सुमारे १५,१२७ क्यूमेक्स पाणी सोडल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पूरानं नदीकाठच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे. आरहेर-नवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, धानाचे पीक (रोपे) खराब झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवलगाव, रणमचान येथील घरांचेही नुकसान झाले आहे.

    कोल वॉशरी बंद करा – आमदार जोरगेवार

    बचाव पथकाला सतर्क ठेवण्यात आले असून, मदतीची गरज असलेल्यांसाठी पिंपळगाव येथे दोन बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.

    ब्रह्मपुरी-वडसा, वालगाव-गंगाळवाडी, ब्रह्मपुरी-कान्हळगाव, ब्रह्मपुरी-चांदगाव, ब्रह्मपुरी-दुधवाही, ब्रह्मपुरी-परदगाव आणि ब्रह्मपुरी-गडचिरोली हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. flood affected roads in chandrapur district

    नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केल्या जाऊ शकतात. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. emergency rescue during floods

    तालुका नियंत्रण कक्ष (control cell) स्थापन करण्यात आला आहे. कोणतीही व्यक्ती ०७१७७- २७२०७३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकते, असेही तहसीलदार सतीश मसाळ यांनी कळवले आहे.

    जिल्हयात याठिकाणी मार्ग बंद

    मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ४६ मार्ग बंद झाले आहे. यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील ४ मार्ग, वरोरा तालुका १, ब्रह्मपुरी तालुका २६ मार्ग, नागभीड २ मार्ग, सावली तालुका १३ मार्ग, सदर मार्ग बंद झाल्यामुळे विविध गावातील संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पुराचा धोका बघता प्रशासनाने त्याठिकाणी CDRF चे पथक तैनात केले आहे.

    सुट्टी जाहीर

    अतिवृष्टीमुळे अनुचित घटना घडू नये यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना १० जुलै रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सुट्टीचा आदेश ब्रह्मपुरी तालुका पर्यंत मर्यादित आहे. school holiday due to heavy rain today

  • Wainganga river drowning accident । शिक्षणाच्या प्रवासात काळाने घेतली परीक्षा; तीन MBBS विद्यार्थी कायमचे हरपले

    Wainganga river drowning accident

    Wainganga river drowning accident : सावली : व्याहाड बुज जवळील वैनगंगा नदीत गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीनही एमबीबीएस विद्यार्थ्यांचे मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आले. गोपाल गणेश साखरे, रा. चिखली, स्वप्निल उद्धवसिंग शिरे (२०), छत्रपती संभाजीनगर, पार्थ बाळासाहेब जाधव (२०) रा. शिर्डी अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. tragic news about medical college students

    व्हॉलीबॉल काढायला गेले आणि….


    गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्गमित्र वैनगंगा नदीजवळ शनिवारी व्हॉलिबॉल खेळायला गेले होते. बॉल नदीत गेल्याने काढण्यासाठी गेले असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघेजण बुडाले. रविवारी शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंंतर गोपाल साखरे, स्वप्निल शिरे व पार्थ जाधव यांचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणी करून तिघांचेही मृतदेह कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आले.

    चंद्रपूर जिल्ह्यात २ दिवसात ४ महिलांची वाघाने केली शिकार

    वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. राकेश वाघमारे, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी रंजीत यादव आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

    विशेष बाब म्हणजे या वर्षातील २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीला चंद्रपुरातील ३ सख्ख्या बहिणींचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता, २ महिन्यांनंतर पुन्हा ३ भावी डॉक्टर तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

     

    या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

     

    वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.

     

    त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.