Tag: राजेश बेले

  • private companies misusing government property । खासगी कंपनीकडून सरकारी मालमत्तेचा वापर; बेले यांनी केले धक्कादायक खुलासे

    private companies misusing government property

    private companies misusing government property : चंद्रपूर, [२७ जून]: चंद्रपूर शहरातील पठाणपुरा येथील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या शासकीय जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे सोलर पॅनल लावून अतिक्रमण केल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात बायपास मार्गाची नितांत गरज – खासदार धानोरकर

    मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने अवैधरित्या आपली खासगी मालमत्ता, म्हणजेच सोलर पॅनल, स्थापित केले आहेत. या गंभीर आरोपांसोबतच, चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालीवाल यांनी संबंधित कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. solar panel installation on government land

    चौकशीची मागणी

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, शासकीय जागेवरील अवैध सोलर पॅनल त्वरित हटवून ती जागा पुन्हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी राजेश वारलुजी बेले यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ही तक्रार सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

    या प्रकरणी शासनाकडून त्वरित लक्ष घालून कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त विपिन पालीवाल यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

  • Pollution Crisis : चंद्रपुरात सनफ्लॅग कोळसा खाणी विरुद्ध आंदोलन

    Pollution Crisis : चंद्रपुरात सनफ्लॅग कोळसा खाणी विरुद्ध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सॅन फ्लॅग कोळसा खाणीमुळे जिल्ह्यातील बेळगाव येथील रहिवाशांना प्रदूषणाच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा केवळ पर्यावरणावरच परिणाम होत नाही तर गावकऱ्यांच्या जीवनावरही त्याचा परिणाम झाला आहे. Sunflag coal mine

    गावातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई हा त्यांना भेडसावणारा एक प्रमुख प्रश्न आहे. त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा यावेळी प्रयत्न करीत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. Pollution crisis

     

    सन फ्लॅग कोळसा खाणीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रदूषण विभागाचे अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप समाजातील प्रमुख सदस्य राजेश बेले यांनी केला. प्रदूषणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करीत त्यांना निलंबित करावे अशी मागणी बेले यांनी केली असून कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व पंतप्रधानांचे पुतळे जाळून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Environmental preservation

     

    गावकरी त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आणि स्वतःसाठी आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्याचा निर्धार करतात. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या चिंतेकडे लक्ष देणे आणि सॅन फ्लॅग कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे महत्त्वाचे आहे. ग्रामस्थांचे कल्याण आणि पर्यावरणाचे रक्षण याला सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे आणि पुढील हानी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या पाहिजेत. Water scarcity

  • चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय रामभरोसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्यालय वाऱ्यावर आहे. प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव वारंवार कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर जातात. यामुळे कार्यालयाचे काम बेभरवसे सुरू आहे. याबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

     

    प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा सुट्टी घेतली आहे. या सुट्ट्यांचे नियोजनही त्यांनी केलेले नसते. त्यामुळे कार्यालयात कामकाजाची अडचण निर्माण होते.
    याशिवाय, कार्यालयातील फील्ड अधिकारी देखील कामात दिरंगाई करीत आहेत. यामुळे कारखाने आणि औद्योगिक प्रकल्पांवर नियमांचे पालन केले जात नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती आहे.

     

    बेले यांनी प्रादेशिक अधिकारी आणि फील्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

  • सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सनफ्लेग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून, कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मानवी, जलीय, वन्य आणि पाळीव प्राण्यांवर धोका निर्माण झाला आहे.

     

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वा. बेले यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

     

    निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे खाणीतील घातक रासायनिक द्रव्य नदी, नाले आणि शेतजमिनीत सोडले जात आहे. यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, या प्रकल्पामुळे होणाऱ्या ब्लास्टींगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.

     

    या खाणीतून निघणारा कोळसा देखील वायु प्रदूषण करत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, हृदयविकार, स्कीन विकार, डोळयांचे आजार, टी.बी., मेंदुचे आजार, नवजात शिशु व गर्भवती महिला यांना प्रदुषणाचा आजार होत आहे.

     

    कोळसा खाणीतुन निघणा-या रासायनिक द्रव्यामुळे संपूर्ण नदी नाले प्रदुषीत झाले आहे. कोळसा खाणीतुन निघणारा रासायनिक द्रव्यामुळे कोळसा खाणीला लागून असलेल्या संपूर्ण शेत जमीन प्रदुषीत झाली आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसामुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसा रेल्वे साईडींगमुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन होणा-या कोळसा वाहतुकीमुळे घातक वायु प्रदुषण व रस्त्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

     

    बेले यांनी या निवेदनात मागणी केली आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच, या प्रकल्पाला तात्काळ बंद करण्यात यावे.

     

    या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महान – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.

     

    यानिमित्त चंद्रपूर शहरातून जटपुरा गेट ते गांधी चौक, गांधी चौक ते नगीना बाग इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, पुरुष, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघाली.

     

    शोभायात्रेनंतर सवारी बंगला येथे प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, ओबीसी नेते, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा २०२४ निवडणुकीतील बहुजनांचे प्रतिनिधी राजेश बेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगीनाबाग सवारी बंगला येथे असलेल्या फुले दांपत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     

    यावेळी राजेश बेले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले या एक महान क्रांतिकारी आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांचे स्थान उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले.

     

    बेले म्हणाले की, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा. आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असेही ते म्हणाले.

     

    या मेळाव्यात बोलतांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
    यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  • आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    आणि त्या मृत युवकाच्या कुटुंबाला राजेश बेले यांनी दिला आधार

    News34 chandrapur

    पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.

     

    कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

     

    यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.