Tag: मोदी सरकार

  • middle class suffering due to inflation । 😡 महागाईने नाकीनऊ आले! मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले, दरवाढ मागे घ्या – खासदार धानोरकर

    middle class suffering due to inflation

    middle class suffering due to inflation : चंद्रपूर : १ जुलै २०२५ पासून रेल्वे तिकीट, एटीएम व्यवहार शुल्क, पॅन कार्ड नियम आणि गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या या अन्यायकारक निर्णयांचा खासदार प्रतिभा धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. railway ticket price hike July 2025

    चंद्रपुरात मोठा आर्थिक घोटाळा

    खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “देशातील जनता महागाईने (inflation) त्रस्त असताना, मोदी सरकारने १ जुलैपासून विविध सेवांवर लादलेली ही दरवाढ म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. रेल्वे हे सामान्य माणसाच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. त्यात वाढ करून सरकारने गरिबांचा प्रवास आणखी महाग केला आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये केलेले बदल आणि ओटीपीची सक्ती यामुळे सामान्य प्रवाशांना, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल.”

    डिजिटल इंडियाच्या नावाखाली आर्थिक लूट

    त्या पुढे म्हणाल्या, “एटीएममधून पैसे काढण्यावरील वाढीव शुल्क हा डिजिटल इंडियाच्या (digital india) नावाखाली सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रकार आहे. बँका आणि वित्तीय संस्थांना याचा फायदा होईल, पण सर्वसामान्यांसाठी रोख व्यवहार करणे अधिक खर्चिक होईल. पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य करणे आणि नवीन नियम लागू करणे हे लोकांना अधिक त्रासात टाकणारे आहे. तर, गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करणे म्हणजे गृहिणींच्या बजेटवर दर महिन्याला महागाईची टांगती तलवार ठेवण्यासारखे आहे.”

    खासदार धानोरकर यांनी ठामपणे सांगितले की, “मोदी सरकार (modi government) केवळ धनदांडग्या उद्योजकांचे सरकार बनले आहे. त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही. निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाची स्वप्ने दाखवून आता जनतेला महागाईच्या खाईत लोटले जात आहे. मी मोदी सरकारला विनंती करते की, त्यांनी तातडीने या सर्व दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा, काँग्रेस पक्ष आणि इतर समविचारी पक्ष जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.”

  • Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    Threat To Constitution : लोकशाही धोक्यात असल्याने नागरिकांनी सजग रहावे – प्रा. श्याम मानव धोक्यात

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : मनुस्मृतीला गाडून निर्माण करण्यांत आलेली राज्यघटना अलीकडील काळात धोक्यात आली असून मोदी सरकार लोकशाही संपुष्टात आणून पुन्हा मनुस्मृतीचे राज्य उदयास आणण्याचे कारस्थान रचत आहे. असे झाल्यास स्वतंत्र भारताच्या नागरीकांना पुन्हा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल. हे लक्षात घेवून प्रत्येक नागरीकांनी सजग राहणे काळाची गरज झाली आहे. असे मत अखील भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
    आम्ही भारताचे लोक तालुका मूल या संस्थेच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजीत अमृतकाळात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर आयोजीत व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. Indian democracy

     

    स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाचा अभ्यास आणि विचार करून अथक प्रयत्नाने लिहीण्यांत आलेल्या सर्वसमावेश अश्या राज्यघटनेतील कलम आणि अधिनियमांद्वारे देशाचा कारभार सुरळीत सुरू असतांना मागील काही वर्षापासून काही मंडळी राज्यघटनेला डावलुन देशात सांप्रदायीक वातावरण निर्माण करून नागरीकांनामध्यें द्वेष, असुरक्षीतता, भावना चेतवुन दंगली घडविण्याचे काम करीत असल्याचा आरोप प्रा. श्याम मानव यांनी केला. Threat to Constitution

     

    डार्वीनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत शालेय अभ्यासक्रमामधून वगळण्याचे कारस्थान करणारे विद्यमान शासनकर्ते अंधश्रध्दा पसरविण्याचे काम करीत असलेल्या धिरेंद्र महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणारा गोडसेचे गोडवे गाणा-या कालीचरण महाराज, गांधीना मुस्लीमांची औलाद म्हणणा-या संभाजी भिडे या दुस-यांच्या जीवनात चिवडा चिवड करणा-या मंडळीना प्रौत्साहन देण्याचे काम करीत असल्याचे सांगतांना प्रा.श्याम मानव यांनी न्याय हक्काकरीता आंदोलन करीत असलेल्या शेतक-यांवर वेगवेगळया आयुधांचा वापर करून शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करणारे मोदी असंवेदनशील असल्याचा आरोप केला. Modi government

     

    राज्य आणि देशात कंत्राटी नोकर भरतीची पध्दत अंमलात आणून सुशिक्षीत बेरोजगारांची मस्करी केल्या जात आहे. महागाईनेही डोके वर काढले आहे, जाती धर्माचे राजकारण करून लोकशाहीला धोक्यात आणण्याचे कारस्थान रचल्या जात असल्याचे सांगतांना प्रा. श्याम मानव यांनी कारवाईच्या भितीपोटी देशातील न्याय व्यवस्था प्रचंड दबावात असून निवडणुक आयोग, गृहविभाग व इतरही प्रशासकिय यंञणा शासनकर्त्यानी पट्टे बांधुन ठेवल्याचे सांगीतले. Manusmriti

     

    नोटबंदी आणि कोविड काळात मोदींनी घेतलेले निर्णय अत्यंत चुकीचे असून ईडी आणि सीआयडी च्या नांवाने दबाव तंत्राचा वापर करून करण्यांत येत असलेले पक्ष फोडीचे राजकारण लोकशाहीला घातक ठरणारे आहे. त्यामूळे स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरीकाला लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर मोदी हटाव-देश बचाव हा नारा जोपासला पाहिजे. असे आवाहन केले. सामाजीक कार्यकर्त्या तथा बालरोग तज्ञ डाॅ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मवीर महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.अनिता वाळके यांचे हस्ते झाले. Equally and justice

     

    यावेळी अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, धनगर समाज संघर्ष समितीचे विदर्भ अध्यक्ष डाॅ. तुषार मर्लावार, साहित्यीक प्रब्रम्हानंद मडावी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु गेडाम, प्राचार्य अशोक झाडे, गंगाधर कुनघाडकर, सामाजिक कार्यकर्ते डाॅ. वासीम राजा, संपत कन्नाके, डेव्हीड खोब्रागडे, संजीवनी वाघरे, जयश्री चन्नुरवार, गुरू गुरनूले आदि मंचावर उपस्थित होते. यावेळी डाॅ. अनिता वाळके, डाॅ. अभिलाषा गावतुरे आणि सुरेश झुरमूरे यांनी मनोगत व्यक्त केले. हिरालाल भडके यांनी प्रास्ताविक, नंदकिशोर शेरकी यांनी संचलन तर साक्षी गुरनूले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येनी उपस्थित होती.