Tag: मूल तालुका

  • Sarpanch sanghatna : सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड

    Sarpanch sanghatna : सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल मुरकुटे, उपाध्यक्ष रणजित समर्थ व सचिव पदी मुरलीधर चुधरी यांची निवड

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच संघटना अतिशय पावरफुल असून तालुक्यातील सरपंच यांच्या मागण्या व ग्राम पांच्यायातीचा व गावाचा विकास यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करीत असते. त्याच मुल तालुका ग्राम पंचायत संघटनेची दिनांक 1-2-2024 रोज गुरवारला पं. स.मुल येथील सभागृहात सरपंच संघटना मुल तालुका स्तरीय नवीन कार्यकारणी गठित करण्यासाठी सभा आयोजित केलेली होती.

     

    सदर सभेला मुल तालुक्यातील समस्त सन्माननीय सरपंच महोदय यांनी भाग घेतला.यात सरपंच संघटना मुल तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल गजानन मुरकुटे सरपंच ग्रामपंचायत ताडाळा तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांची निवड करण्यात आली.

     

     

    तसेच उपाध्यक्ष जुना सुरला येथील सरपंच रंजित समर्थ, सचिव म्हणून मुरलीधर चुधरी, तर सहसचिव म्हणून उसराला महिला सरपंच प्रियांकाताई नर्मलवार, कोषाध्यक्ष्य कोमलताई रणदये, संघटक पदी सुशी येथील सरपंच अनिलभाऊ सोनुले ,कायदेशीर सल्लागार म्हणून नांदगाव सरपंच एड. हिमानिताई वाकुडकर ,तसेच सदस्य म्हणून वासुदेव वाघ,चांगदेव केमेकर,शिल्पाताई भोयर, वैशालीताई निकोडे,जस्मिताताई लेनगुरे,यशवंत खोब्रागडे अशा प्रकारे कार्यकारणीची निवड करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली.

     

    सरपंच संघटना निवड करण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामविस्तार अधिकारी श्री. विजय यारेवार साहेब, श्री.येरमे साहेब ग्रामविस्तार अधिकारी आकुलवार साहेब, साहरे साहेब, गजभे साहेब वरील सर्व अधिकारी उपस्थितीत राहून सहकार्य केले.

     

    नव निर्वाचित सरपंच संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सहसचिव, व कार्यकारिणीच्या समस्त सदस्यांचे तालुक्यातील सर्व सरपंच,उपसरपंच सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

  • Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

    Sudhir Mungantiwar News : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल येथे 100 खाटांचे 107 कोटीचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तमोत्तम सुविधा असाव्यात, येथील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, मुंबईच्या चकरा माराव्या लागू नये तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अत्यल्प दरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मुल येथीाल 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मुल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी केला आहे. Guardian minister sudhir mungatiwar

     

    सद्यस्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आता मुल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर तीन माळे असे एकूण 15 हजार चौ. मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 4 मजली निवासस्थान राहणार आहे. तसेच 100 खाटा करिता लागणारी नवीन पदनिर्मिती या रुग्णालयासाठी करण्यात येईल. यामध्ये नेत्रतज्‍ज्ञ, बालरोगतज्‍ज्ञ, स्त्रीरोगतज्‍ज्ञ, अस्थिरोगतज्‍ज्ञ, सर्जन, भूलतज्‍ज्ञ आणि इतर वैद्यकीय अधिकारी अशी एकूण 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे निर्माण होतील. सोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका, तांत्रीक पदेसुद्धा पदे निर्माण होतील. Hospital chandrapur

     

     

    रुग्णालयामध्ये राहणार अत्याधुनिक सोयीसुविधा : रुग्णालयामध्ये नवीन विशेषउपचार कक्ष, सर्व प्रकारच्या विशेषज्‍ज्ञ सेवा पुरविता येणे शक्य होईल. या ठिकाणी डोळ्यांच्या व अस्थिरोग शस्त्रक्रियासाठी नवीन शस्त्रक्रियागृह निर्माण करण्यात येणार आहे. नव्याने कार्यान्वित होणाऱ्या विशेष उपचार कक्षाकरिता आधुनिक वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री उपलब्ध होतील. या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी तसेच एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज माता-बाळ उपचार यंत्रणा, अपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधनसामुग्री, बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे. गंभीर शस्त्रक्रियेसाठी आय.सी.यू, मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, महिला, पुरुष व बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, मॉड्यूलर औषधी वितरण कक्ष, ब्लड बँक, आयुर्वेद, युनानी व होमीओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतररुग्ण सेवा, पिण्याचे शुध्द पाणी व स्वच्छतेच्या उपाययोजना राहणार आहे.

     

     

    रुग्णांच्या नातेवाईकांसाठीसुध्दा सुविधा : रुग्णालयात रुग्णांसोबत येणा-या नातेवाईकांसाठी जेवणाची, बसण्याची व आराम करण्यासाठी सर्व सुविधायुक्त प्रतिक्षा कक्ष, नातेवाईकांसाठी स्वतंत्र शौचालय, आंघोळीकरीता बाथरुम, रुग्णांचे नातेवाईक तसेच रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचा-यांसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था राहणार आहे.

  • Chandrapur News सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Chandrapur News सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. minister sudhir mungantiwar

     

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वसुले, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.

     

    देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहिदांनी प्राणाची आहुती दिली, असे सांगून ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाला संविधान अर्पण होऊन 74 वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली. Mul nagar Parishad

     

     

    सर्वप्रथम जेव्हा स्व.दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल,असा विश्वास ना .श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

     

    महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले. प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी, यासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती. सदर प्रवेशद्वारासाठी 50 लक्ष रुपये मंजूर केले. मात्र, जागेअभावी 25 लक्ष रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिल्लक 25 लक्ष रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

     

     

    22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. मंदिर ट्रस्टचे सचिव श्री.चंपतराय यांनी संकलित केलेल्या पवित्र वस्तूबाबत माहिती देतांना चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या लाकडाचा उल्लेख केला. ‘सियावर रामचंद्र की जय’ या अकरा अक्षरी मंत्राचा देशात पहिला विश्वविक्रम झाला. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली. प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावात चंद्र आहे, त्या चंद्रपूर जिल्ह्यानेच हा विश्वविक्रम केला. रामायणात रावणाने सीतामातेचे हरण केले तेव्हा एक जटायु होता. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने ताडोबात 10 जटायू सोडण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे संवर्धन व त्यांच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असेही ते म्हणाले.

     

     

    पुढे बोलतांना श्री. मुनगंटीवार म्हणाले, दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शहीद स्मारकाची (म्युरल) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी “मेरा रंग दे बसंती चोला” म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहे, हा भाव निर्माण होईल.

     

     

    मूल येथे मुख्य रस्ता, कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह, तहसील कार्यालय, पंचायत समितीची इमारत, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, इको पार्क, स्विमिंग टॅंक, आठवडी बाजार असे विविध विकासकामे तालुक्यात झाली. 100 खाटांच्या मुल उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळाली. सोमनाथ येथे भव्य कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. तसेच मुलींसाठी शुरवी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या 5 वर्षात जिल्ह्यातील महिलांच्या पंखांना बळ देणारे शुरवी महाविद्यालय सर्वोत्कृष्ट होईल. जगातल्या उत्तम विद्यापीठाशी हे महाविद्यालय जोडण्यात येईल. या माध्यमातून मुलची विद्यार्थिनी प्रशासकीय अधिकारी होऊन मुलचा गौरव वाढवेल.

     

     

    चंद्रपुरातील मोरवा येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यात येत असून एअरपोर्ट विकसित करण्यात येत आहे. गरीब कुटुंबातील मुलगीही वैमानिक व्हावी आणि ती चंद्रपूर जिल्ह्यातील असावी, असा निश्चय केला आहे.चंद्रपूर विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुढे आहे. मात्र, मागील दोन वर्षात जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला. त्यामुळे जे मागे राहिले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. मुल येथे 28 तलाठी कार्यालय होत आहे. 600 कोटी रुपयांच्या एस.एन.डी.टी विद्यापीठाला मान्यता आणली व 62 कौशल्याधारीत प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर केला आहे. मुल पोलीस स्टेशनचे डिझाईन तयार करण्यात येत असून पोलिसांचे निवासस्थान देखील उत्तम करण्यात येईल. तसेच मुल तालुक्यातील नागरिकांचे पट्टे व घरकुलांचा प्रश्न देखील निकाली काढण्यात येईल. मुल तालुका महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट असला पाहिजे, हा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

     

    मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण

    9 कोटी रुपये निधीतून 61 गाळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल उभारण्यात आले. यामध्ये तळ मजल्यावार 23 गाळे, पहिला व दुसरा मजला प्रत्येकी 19 गाळे, तसेच प्रसाधनगृह, जिना, लिफ्ट, स्ट्रक्चरल ग्लेझींग, अतंर्गत व बाह्य विद्युतीकरण व सोलर सिस्टीम आदी सुविधा करण्यात आल्या आहे.नगर परिषद मुल येथे वैशिष्ट्यपुर्ण निधीतून 25 लक्ष रु. खर्ची करुन मुख्य रस्त्यावरील वाल्मिकी नगरातील स्वागत गेटचे बाधंकाम करण्यात आले. तसेच नगर परिषदांना वैशिष्ट्यपुर्ण कामासाठी विशेष अनुदानातुन आठवडी बाजार व मटन मार्केटचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये भाजी बाजारासाठी 45 आच्छादीत ओटे, मटन मार्केटसाठी 8, चिकनसाठी  14 गाळे, फिश मार्केट स्लॉटरच्या इमारतीचे बांधकाम, पेव्हींग  ब्लॉक, पाईप नाली, सुरक्षाभिंतीचे बांधकाम करण्यात आले.आदींचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

    गिरीजाबाई मेश्राम, रामाजी मेश्राम, काशिनाथ बावनकर, महादेव कर्नेवार, अंबादास अमदूर्तीवार नागरिकांचा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव तर आभार सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री. साखरे यांनी मानले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

    News34 chandrapur

    मूल (गुरू गुरनुले): गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

    मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे आज 20 ऑक्टोबर ला गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले.

     

    यावेळी बडु विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.

     

    आज 1 ऑक्टोम्बरला सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा कडकडाट होत होता. विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात असल्याने चिचाळा येथील महिला चीचाला शेतशिवारात आपल्या शेतात काम करीत होती, त्याचवेळी चंद्रकला वर वीज कोसळली, त्यामध्ये ती जागीच ठार झाली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. झालेल्या घटनेत दोन महिला जखमी झाले.

     

    या घटनेची माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला देण्यात आली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास प्रशासन करीत आहे.