Tag: मुसळधार पाऊस

  • heavy rainfall chandrapur । मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते बंद, शाळांवर संकट

    heavy rainfall chandrapur

    heavy rainfall chandrapur : चंद्रपूर – आठवडाभरानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार १३ ऑगस्ट रोजी जोरदार कमबॅक केले, रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अनेक मार्ग बंद झाले तर कोरपना तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरले तर शाळेवर झाड कोसळल्याने विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

    शाळेवर कोसळले झाड

    भद्रावती आयुध निर्मणी वसाहतीमध्ये शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारती मध्ये असलेल्या वृक्ष कोसळला त्याची एक फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 13 ला शहरातील आयुध निर्माण चांदा वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. Chandrapur heavy rain August

    जुना वाद खेळ खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या

    केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग वसाहतीतील टाईप थ्री सेक्टर फोर या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे. सदर शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड आहे. आज सकाळपासून पाऊस येत असल्याने हे जीर्ण झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे खाली पडल्याने चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. मात्र सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.

    वरोरा व परिसरात दडी मारलेल्या पावसाने आपली जोरदार हजेरी लावत जवळपास १२ ऑगस्ट चे रात्रौ आणि १३ ऑगस्ट ला दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले.शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ह्या पॅक केल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.त्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळित झाले. heavy rainfall chandrapur


    शहरातील शुभम मंगल कार्यालय व कर्मवीर शाळा या मध्यंतरी रस्त्यांवर , कॉलरी वॉर्ड,तसेच अलीशान मंगल कार्यालय ते आझाद वॉर्ड कडे जाणारा मार्ग हे तिन्ही मार्गावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली . कॉलरी वॉर्ड मध्ये वरोरा साजा च्या तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
    आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती आहे.

    राजुरा शहरालगतचा बामणवाडा परिसर अक्षरशः पाण्याखाली! कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने स्नेहदीप नगर, स्टेला मॅरीस स्कूल आणि बामणवाडातील आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, रस्ते चिखलमय झाले, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना , नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.


    यामागे फक्त पाऊसच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाचा निष्काळजी व नियोजनशून्य कारभार हेही तितकेच जबाबदार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९३०(ड) च्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी नैसर्गिक प्रवाहाऐवजी थेट वस्त्यांकडे वळते. चुकीचे ड्रेनेज, बंद नाले आणि बामणवाडा तलावाचे अयोग्य खोलीकरण यांनी परिस्थितीचे रूपांतर आपत्तीमध्ये केले आहे.

    राजुरा तालुका बंद असलेली मार्ग

    टेम्बुरवाही ते विरूर स्टे. रस्ता अतिवृष्टी व सततच्या पाण्यामुळे बंद, मानोली बूज या गावात जाणारा रस्ता बंद, सुमठाना या गावात जाणारा रस्ता बंद व निर्ली ते धाडशी जाणारा रस्ता बंद. rain impact road closures

    कोरपना तालुक्यातील स्थिती

    शिवनारंडा ते कढोली, कढोली ते आवारपूर, नारंडा ते लोणी रस्ते बंद.

    इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

    जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणाचे क्रमांक १ व ७ हे दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन. Erai dam gate opening Chandrapur

  • chandrapur orange alert heavy rain warning । चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान शक्यता! प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना!

    chandrapur orange alert heavy rain warning

    chandrapur orange alert heavy rain warning : चंद्रपूर – नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

    • संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या.
    • मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहा.
    • रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा .
    • खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा.
    • पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.
    • फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारोपासून दुर रहा. heavy rain alert chandrapur

    ७ ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १० वे राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात


    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये
    • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.
    • जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
    • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
    • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. what to do during lightning and thunderstorms


    • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.
    • शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.
    • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.


    • उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
    • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.
    • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

    जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क आणि सुरक्षित राहण्याचे व मुसळधार पावसामुळे नदी नाले किंवा पुलावरून पाणी ओसंडून वाहत असेल तर ते ओलांडू नये उचित काळजी घ्‍यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत करण्‍यात आलेला आहे.

  • tree fall accident during storm । “थोडा वेळ थांबलो असतो तर…” चंद्रपुरात धावत्या दुचाकीवर कोसळले झाड

    tree fall accident during storm

    tree fall accident during storm : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र वादळी वारा व पावसाने थैमान घातले आहे, ९ जून रोजी चंद्रपुरात आलेल्या वादळी पावसात धावत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

    ५२ वर्षीय एकनाथ अनिल कुमरे राहणार नवीन सिनाळा असे मृतकाचे नाव आहे, सायंकाळच्या सुमारास अचानक चंद्रपूरच्या वातावरणात बदल झाला, काही क्षणात वादळी वारा व पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची पळापळ सुरु झाली.

    चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, मायलेकींचा रस्ते अपघातात मृत्यू

    धावत्या दुचाकीवर कोसळले झाड

    सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस आला, त्यानंतर विजेच्या कडकडाटाने चंद्रपूर हादरले, ऊर्जानगर-दुर्गापूर मार्गावर एकनाथ कुमरे हे आपल्या दुचाकी वाहनाने पावसात ओलेचिंब होत जात होते, पाऊस सुरु असल्याने दुचाकींचा वेग कमी होता मात्र त्याक्षणी एक भलं मोठं झाड कुमरे यांच्या धावत्या दुचाकीवर कोसळले.

    झाड कोसळल्याने कुमरे हे मार्गावर कोसळले, त्यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने कुमरे जागीच गतप्राण झाले, पाऊस व विजेचा कडकडाट असल्याने त्यावेळी मार्गावर वाहनांची वर्दळ कमी होते, काही वेळ कुमरे हे मार्गावर तसेच पडून राहिले, याबाबत दुर्गापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कुमरे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

    orange alert chandrapur : मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हाधिकारी गौडा यांचा आदेश धडकला

    Orange alert chandrapur गत आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने शनिवार दि. 27 जुलै रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस 27 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

    अवश्य वाचा : महिला प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य

    Orange alert chandrapur  जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : मूल शहरात भव्य रोजगार मेळावा

    या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

  • Flood Situation : चंद्र”पूर’ अनेक गावांचा संपर्क तुटला

    Flood Situation : चंद्र”पूर’ अनेक गावांचा संपर्क तुटला

    Flood situation गुरू गुरनुले मुल – गेल्या तींन दिवसापासून दिवस रात्री सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, मुल साभोवतालची मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीला पूर आला आहे. मागील २४ तासांत मूल तालुक्यात सर्वाधिक मुल परिसरात मागील एक दिवसात 247 mm पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल मूल तालुक्यात मुल परिसरात मागील एक दिवसात 247 mm पाऊस झालेला आहे, मिलिमीटर पाऊस पडला. उमा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने तेथे बॅरिकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीच्या पुरामुळे मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे मुलच्या भोवतालची सर्व मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा मूल तालुका. प्रशासनाने, पोलिस प्रशासनाने दिला आहे.

    मामा तलाव फुटला, चीचपल्ली गावात हाहाकार


    Flood situation सर्व जनतेला सूचना आहे की मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गाडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद झालेला आहे तरी सदर मार्गावरील प्रवास करणारे नागरिकांनी प्रवास करू नये.


    सतत सुरू असलेल्या पावसामुळे पोलीस स्टेशन मुल हद्दीतील
    1) मूल ते चंद्रपूर जाणारे मार्गावरील आगळी जवळील तलाव भरल्याने रोडवर पाणी आल्यामुळे मार्ग बंद आहे, त्यानंतर अंधारी नदी वरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद आहे.
    2) जाणाळा ते सुशी जाणारा मार्गा वरील चीरोली जवळील अंधारे नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे.
    3) मरोडा ते भादुर्णा ला जाणारे रोडवरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे
    4) मुल ते करवण काटवण जाणारे रोडवरील रेल्वे बोगदया मध्ये पाणी भरल्याने मार्ग बंद आहे
    5) मूल ते सावली जाणारे रोडवरील आक्कापर गावाजवळी ल नाल्यावर उमा नदीचे पुरा मुळे तीन ते चार फूट पाणी वाढल्यामुळे मार्ग बंद आहे.
    6) मौजा मूल येथील रामपूर वार्डात घरात पुराचे पाणी घुसले आहेत.
    7) रजोली ते पेडगाव जाणारे रोड वरील गावाजवळ नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे पेटगाव जाणारा मार्ग बंद झाले आहे.
    8) मुल ते राजोली ब्रह्मपुरी जाणारे रोडवरील उमा नदीचे समोरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झालं आहे.
    तरी पूर परिस्थिती वर लक्ष ठेवले असून योग्य बंदोबस्त लावण्यात आले आहेत. मुल शहरात सर्वत्र पाणीच पाणी झोपडपट्टीत घरात घुसले पाणी संपूर्ण नगर जलमय झाला आहे.

  • Irai Dam water level : इरई धरणाचे सातही दरवाजे 1 मीटरने उघडले

    Irai Dam water level : इरई धरणाचे सातही दरवाजे 1 मीटरने उघडले

    Irai dam water level नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिनांक 19 व 20 रोजी मिळालेल्या रेड अलर्ट नंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यांच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. दिनांक 19 व 20 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 500 ते 600 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील मुख्य मार्ग नागभीड – नागपूर हायवे पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर मार्ग जे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडले होते, ते पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मार्ग मोकळे झाले आहेत. घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान यांना मदत कार्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

    मुसळधार पावसाने 18 घरांची पडझड

    प्रशासनाने आज दुपारी 1 वाजता इरई धरणाचे 3 दरवाजे उघडले होते, मात्र पावसाने पुन्हा मुसंडी मारल्याने धरणाने धोक्याची पातळी गाठली, त्यामुळे प्रशासनाने सायंकाळी धरणाचे सर्व सात दरवाजे 1 मीटरने उघडले. त्यामुळे नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    Irai dam water level 19 व 20 रोजी झालेल्या पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील एका घराची भिंत पडल्यामुळे पाच लोक जखमी झाले, यांच्यावर  ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहे. नागभीड तालुक्यातील विलंब या गावचा रहिवासी असलेला 8 ते 10 वर्षाचा रोनाल्ड पावणे हा मुलगा विलंब रोडवरील नाल्यावरून वाहून गेला आहे. त्याच्या शोध मोहिमेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे. तसेच नागभीड तालुक्यातील मौजे बोथली येथील नाल्यात 30 वर्षाचा इसम स्वप्निल दोनोडे हा बुडून मृत पावला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने मिळाला असून पुढील कार्यवाहीकरीता नागभीड पोलीस विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

    जिल्हा प्रशासनाचे आवाहन : गत 24 तासापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन – तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 07172-250077 आणि 07172-272480 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच  पूर परिस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

    गत 24 तासात जिल्ह्यात झालेला पाऊस : गत 24 तासात चंद्रपूर तालुक्यात 32.7 मिमी. पाऊस, मूल 64.7 मिमी., गोंडपिपरी 23.5 मिमी., वरोरा 47.4 मिमी., भद्रावती 28.6 मिमी., चिमूर 107.1 मिमी., ब्रम्हपूरी 190.1 मिमी., नागभीड 120 मिमी., सिंदेवाही 102.4 मिमी., राजुरा 27.6 मिमी., कोरपना 18.4 मिमी., सावली 68.6 मिमी., बल्लारपूर 30.5 मिमी., पोंभुर्णा 20.3 मिमी., आणि जिवती तालुक्यात 19.4 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

  • पोळ्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नांदा फाटा/ नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावे यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षापासून येथील शेतकरी बांधव व प्रतिष्ठित नागरिक शासन दरबारी पायऱ्या झिजवीत आहे.

     

    अनेक राजकीय नेते आमदार खासदार पदाधिकारी अनेकांनी या मागणीला घेऊन केवळ निवडणुकीपुरते मता पुरते राजकारण करत पुलाच्या बांधकामाच्या श्री गणेशाचा नारळ फोडून केला तत्कालीन आमदार वामनराव चटप यांनी सदरील पूल मंजूर सुद्धा करून आणले मात्र त्यानंतर सत्ता बदल झाला व पुलाची मागणी हवेत विरली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक आमदार खासदार आले अनेकांनी नारळ फोडले मात्र पूल काही झाले नाही.

     

    पुलाकरिता तांत्रिक निधी अंदाजपत्रकानुसार मंजूर झाल्याचेही अनेकांनी सांगितले मात्र पुलाअभावी मागील पंधरा दिवसापासून नाल्याच्या पलीकडील परिसरात शेती असलेला शेतकरी आपल्या शेतात सुद्धा जाऊ शकत नाही आहे पोळ्याचा दिवस असल्यामुळे नांदा येथील शेतकरी किसान चौधरी हे आपल्या शेतातील बैलबंडी आणण्याकरिता पलीकडे गेले त्यावेळी परत नाला ओलांडत असताना त्यांची बैलबंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली शेतकरी कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून बाहेर पडला मात्र बैलबंडी वाचवू शकला नाही.

    मागील वर्षीच्या पावसाळ्यात सुद्धा अशा असंख्य घटना या नाल्याच्या पाण्यात घडल्या मात्र वारंवार निवेदना तक्रारी देऊन सुद्धा कसल्याही प्रकारचा न्याय येथील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे की शेवटी प्रशासन हे मोठ्या जीवितहानीची वाट बघत आहे असाच प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असून पुलाची मागणी ही कधी पूर्णत्वास जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा सण असतो ज्या दिवशी वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैलांना सकाळपासून विविध शृंगार करून सजविले जाते मात्र नांदा येथील नाल्याच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना आपली जनावर नाल्याला पूर आल्यामुळे घरी आणता सुद्धा आली नाही.

     

    याशिवाय या जनावरांचे दुसरे दुर्दैव काय असू शकते अनेक शेतकरी पाणी कमी होईल या आशेने नाल्याच्या पलीकडच्या तीरावर पाण्याच्या उतरण्याची वाट बघत उभे आहे असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले कदाचित या नाल्यावर पूल बांधला गेला असता तर या जनावरांना आणि शेतकऱ्यांना पोळा या सणाला मुकावे लागले नसते.

     

    गावातील सुशिक्षित शेतकरी बांधवांनी आता कंबर कसायला सुरुवात केली आहे एवढेच नव्हे तर पोळा भरणाऱ्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी नाल्यावरील पुलाची आवश्यकता दर्शवणारे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले त्यामुळे आता राजकारणी व शासन याकडे कोणत्या दृष्टीने बघते हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार दिनांक 15 ते 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्याता वर्तवली आहे.

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

    ◆ संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या. ◆ मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहा. ◆ रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातून जाणे टाळा. ◆ खराब दृश्यपमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवणे टाळा. ◆ पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबुत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्या  तारा असू शकतात. ◆ पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा. ◆ फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.

     

    वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये

    ◆ विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. ◆ जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. ◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. ◆ आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. ◆ तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. ◆ शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. ◆ विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. ◆ उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. ◆ धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. ◆ जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
    जिल्ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.