Tag: मुख्यमंत्री सहायता निधी

  • CM Medical Assistance Fund । 💥 6 महिन्यात 37 रुग्णांचे प्राण वाचले – मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीतून मिळाले लाखो रुपये!

    CM Medical Assistance Fund

    CM Medical Assistance Fund : चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण तसेच उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे मोठा दिलासा मिळत आहे. गत सहा महिन्यात जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून या कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे.

    रानभाजी आता थेट शहरात, रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये 1 मे 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजाराची मदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांचे जीव वाचले आहेत. तसेच कॅन्सर व हृदयशस्त्रक्रिया केलेल्या अनेक रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकले. Chief Minister Medical Assistance Fund help for critical illness

    या आजारांवरील उपचारासाठी मिळते मदत : 

    या निधीतून कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (lung transplant), अस्थीमज्जा प्रत्यारोपण ( Bone marrow Transplant), हाताचे प्रत्यारोपण ( Hand re- construction surgery), खुब्याचे प्रत्यारोपण ( Hip replacement), कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी आणि रेडिओथेरपी, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण (Knee replacement), दुचारीवरील अपघात, लहान बालकाच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस जळीत रुग्ण, विद्युत अपघात/ विद्युत जळीत रुग्ण अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीसुध्दा रुग्णांना देण्यात येते. Maharashtra CM medical aid for low income families

    योजनेसाठी पात्रता  व निकष : 

    अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याची आर्थिक परिस्थिती दुर्बल असावी. ( रुपये 1.60 लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्ण सरकारी/धर्मादाय/मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेत असावा.

    अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

     डॉक्टरांचे आजारावरील प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाज पत्रक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रुग्णाचे आधार कार्ड/ लहान बालकाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार/ आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफ.आय.आर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. अर्जदारांनी ही कागदपत्रे प्रशासकीय इमारत, पहिला माळा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत.  Chief Minister medical fund application procedure

    अर्ज करण्याची प्रक्रिया : 

    संबंधित रुग्णालयातून प्रस्ताव तयार केला जातो. तो वैद्यकीय अधिकारी जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठवला जातो. समिती परीक्षण करून निधी मंजूर करते.

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या या कक्षाचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कुंभलकर यांनी केले आहे.

  • The crime of culpable homicide । तुकूम अपघात – ट्र्क चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – युवतीसेना चंद्रपूर

    The crime of culpable homicide

    मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मृतक व जखमीला आर्थिक मदत द्या – रोहिणी पाटील

    The crime of culpable homicide : चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील तुकूम येथे २ जून रोजी अनियंत्रित हायवा ट्र्क ने वाहनांना धडक देत २ तरुणींना चिरडले यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेनंतर सुद्धा हायवा ट्र्क चालक व मालकावर अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, यावर चंद्रपूर युवतीसेनेने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. ubt yuvatisena

    पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातून सानिका कुमरे व काजल आत्राम या चंद्रपूरमध्ये राहत होत्या, २ जून रोजी अभ्यासिकेतून परत जाताना तुकूम येथे सानिका कुमरे ला हायवा ट्रक ने चिरडले. या अपघातात सानिका जागीच ठार झाली तर काजल गंभीर जखमी झाली होती. पोलीस बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या दोन्ही तरुणींचे स्वप्न धुळीस मिळाले. यावर ठाकरे गट शिवसेना युवासेनेच्या सहसचिव व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील यांनी याबाबत जखमी काजल आत्राम ची भेट घेत तिला धीर दिला. culpable homicide accidental death

    ठोस पुरावे तरीपण कारवाई नाही, आप ने दिला आंदोलनाचा इशारा

    युवतीसेना ने घेतला पुढाकार

    ६ जून रोजी रोहिणी पाटील यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेत या घटनेला जबाबदार ट्रक चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेला जबाबदार ट्र्क चालकावर दारूचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षकांना दिली, जर घटनेच्या वेळी चालकाला फिट आली होती तर अनफिट चालकाला कामावर ठेवणाऱ्या मालकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली. यावर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. news chandrapur

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांची रोहिणी पाटील यांनी भेट घेत मृतक सानिका कुमरे व जखमी काजल आत्राम यांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच जखमी काजल आत्राम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला परंतु तिची चालण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना हॉस्पिटलला जाऊन चौकशी करायला सांगितले. The crime of culpable homicide

    प्रोजेक्ट ऑफिसर विकास नक्षलवार यांनी स्वतः जखमी काजल आत्राम यांची परिस्थिती बघितली व त्यांनी हॉस्पिटल मधे डॉक्टरांशी बोलून परत काही दिवस जोपर्यंत ती ठीक होईल तोपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे सांगितले .दोघांच्या घरची परिस्थिती हि बेताची आहे. त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. गौडा यांनी यावर सकारात्मकता दर्शवित याबाबत लवकर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

    जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळात युवासेना सहसचिव, युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणीताई पाटील, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, युवती जिल्हा चिटणीस रोशनी ध्रुव गोलदार, सौरभ बोढे, सानिका फरकडे, पायल लसंते, शिव राठोड, लोचना वेलके, निधी झाडे, कुणाल मासिरकर, अतुल वांढरे, गौरव आव्हडे, अभिषेक त्रिशूले, निलेश वनकर, वैशू दादांजे, साहिल शेख, संदीप राठोड, आतिष टेकाम, सूरज मोरे, मनीष भोयर, संजना पेंदाम, दिलीप आत्राम, मुकेशकुमार इचारवार, गोविंदा मडावी, प्रीती सलाम व काजल वेलादी उपस्थित होते.

    २ जून रोजी तुकूम भागात झालेल्या या दुर्दैवी अपघातात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला, एक तरुणी जखमी झाली मात्र ट्र्क चालक हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाले. एकही राजकीय पक्ष या घटनेवर स्पष्ट बोलू शकत नाही आहे, कारण राजकीय दबाव, ती गरीबाची लेक होती म्हून तिला न्याय मिळणार नाही का? पोलीस बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आता न्यायासाठी मृत्यूनंतर सुद्धा तिला यातना सहन कराव्या लागत आहे. चंद्रपुरातील वातावरण हे गलिच्छ राजकारणामुळे नासून गेले.’

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. अपघातानंतर श्री. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मिळवून दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यांच्या आत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळू शकली आहे.

     

    अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , कल्पना बगुलकर, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत आदी उपस्थित होते.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मदत जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच धनादेश जारी करण्यात आले आणि सोमवारी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांना हे धनादेश सुपूर्दही करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख विसरणे शक्य नाही, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत श्री. मुनगंटीवार यांनी संकटाच्या काळात दिलासा देण्याचे काम केले आहे, अशी भावना मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

     

    वीस दिवसांच्या आत घोषणा

    श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 20 दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले..

  • बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.

     

    प्रस्ताव पाठविल्यानंतर 20 दिवसांच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, जटपुरा गेट शाखा, चंद्रपूर येथील बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहे.