Tag: मासेमारी

  • Ek Khidki Yojana । विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ राबवा, संजय गांधी योजनेचा सर्वे तात्काळ पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार

    Ek Khidki Yojana

    Ek Khidki Yojana : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, पर्यटन, सामाजिक कल्याण, तसेच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली.

    बाबुपेठ मधील ऑटो चालकांकडून लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त

    या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नकवा, संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सीमा गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, तांगडे, पगारे, निर्माण वर्धा रेल्वेचे कार्यकारी अभियंता वर्मा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतडे, तुषार सोम, रवींद्र गुरुनुरे, रशिद हेसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, कार्तिक बोरेवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    एक खिडकी योजना राबवा

    नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली ‘एक खिडकी योजना’ तात्काळ सुरू करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिले. student document verification at tehsil office

    संजय गांधी निराधार योजना, सर्व्हेक्षण पूर्ण करा

    तसेच, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला. सदर योजनेत २७०० अर्ज प्राप्त झाले असून, यातील १२०० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण पुढील १५ दिवसांत पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. Sanjay Gandhi Niradhar Yojana application

    सप्टेंबर महिन्यात नव्या इमारतीमध्ये मेडिकल कॉलेज सुरु होणार

    या बैठकीत चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मां सा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. येत्या सप्टेंबर महिन्यात नव्या इमारतीतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचनाही आमदार जोरगेवार यांनी दिल्या.

    रामाळा तलावात मत्स्योत्पादन व मासेमारीसाठी ‘वाल्मिकी मछुआ सहकारी संस्था मर्या., चंद्रपूर’ यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय करार देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. यामुळे स्थानिक मच्छीमार समाजाला स्थिर रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. fisheries cooperative society contract process

    तसेच, मध्य रेल्वेच्या तिसऱ्या लाईन प्रकल्पामुळे नझूल जमिनीवरील जे नागरिक विस्थापित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि म्हाडाच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

    दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, रस्ते पाण्याने डुबू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिले. या बैठकीस वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

  • मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    मासेमारी करणे बाप-लेकाच्या जीवावर बेतले

    News34 chandrapur

    वरोरा – वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे.
    खड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यां मध्ये वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

     

    असाच प्रकार नंदोरी येथील पंकज जैन खदानीच्या परिसरात घडला असुन नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखे चे ढिगारे खचून पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

     

    यामध्ये मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जन स्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय 60, व मुलगा योगेश जंगेल वय 27 यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृतक बाहेरील राज्यातील असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना झाली असल्याचे समजते.

  • नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा
    तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

     

    लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.

  • मासे पकडण्याच्या नादात युवकाने गमावला जीव

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे.

    मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो वस्तीमधील मित्रांसोबत सोबत कच्चेपार गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावात मासे पकडण्यास गेला होता. मासे पकडण्याकरिता मृतक प्रफुल मेश्राम व त्याचे सोबती तलावात मच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले.

     

    प्रफुल मेश्राम हा मासे पकडण्याकरिता तलावाच्या खोल पाण्यात गेला परंतु तो डाव्या हाताने व डाव्या पायाने अपंग असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला.

    मृतकाच्या भावाने तोंडी रिपोर्ट वरुन सिंदेवाही पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे, मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले आहे पुढील तपास सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.