Tag: मानव-वन्यजीव संघर्ष

  • tiger captured in Maharashtra । मरणाची छाया बनलेला वाघ अखेर सापडला: ब्रह्मपुरीचा श्वास आता मोकळा

    tiger captured in Maharashtra

    tiger captured in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला १७ एप्रिल रोजी डार्ट मारीत जेरबंद करण्यात आले. problematic tiger captured

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून आतापर्यंत या संघर्षात १२ नागरिकांचा बळी गेला आहे. उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात T-३ वाघाने ४ नागरिकांवर हल्ला करीत दोघांना ठार तर दोघांना जखमी केले होते. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढू नये यासाठी नरभक्षक वाघाला पकडणे गरजेचे असल्याने वनविभागाने वाघ पकडण्यासाठीची मोहीम राबविली. brahmapuri tiger attack

    चंद्रपुरातील नदीत दडलं रहस्य, नदीतून उलगडलं २५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

    १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यानो डार्ट तयार करून दिला, त्यानंतर शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी T-३ वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध करीत जेरबंद केले.

    सदर मोहीम सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग महेश चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे, विकास ताजने, योगेश लडके, प्रफुल वाटगुरे, गूणनक धोरे, दीपेश टेम्भूर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर व राकेश आहुजा यांच्या उपस्थितीत पार पडली.

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय १३ वर्ष असून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

  • Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

    Dangerous Animal Attack : चंद्रपूर जिल्ह्यात 17 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – मूल तालुक्यातील मारेगाव येथे आशिष राजू दुधकोवार (वय 17) या तरुणावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुलपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर रस्त्यावरील मारेगावजवळील शेतात घडली. Leopard attack

     

    मिळालेल्या माहितीनुसार, आशिष एमआयडीसी परिसरातील पृथ्वी कंपनीजवळील विश्वेश्वर कोंडू पेंदोर यांच्या शेतात शेळ्या चरत होता. दुर्दैवाने तो झुडपात गेला असता, तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला झाल्यावर आशिषने जोरात आरडाओरडा केला मात्र बिबट्याने तरुणाला गंभीर दुखापत करून बिबट्याने घटनास्थळ सोडले. Wildlife conservation

     

    आशिषला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्यासह वनविभाग घटनास्थळी पंचनामा करत आहेत. coexistence between humans and animals

     

    तरूणाच्या कुटुंबाने वन परिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, सावली यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंतीही केली आहे. बिबट्याचे हल्ले दुर्मिळ आहेत परंतु ते अत्यंत धोकादायक असू शकतात, विशेषत: जंगलाच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी. अशा प्रदेशांतील रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ही घटना वन्यजीव संरक्षणाची गरज आणि मानव आणि प्राणी यांच्यातील सहअस्तित्वाच्या महत्त्वाची आठवण करून देणारी आहे.

  • Leopard Capture : चंद्रपुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

    Leopard Capture : चंद्रपुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या एका घटनेत दुर्गापूर, चंद्रपूर येथील शक्तीनगर परिसरात बिबट्या दिसला. मायावी मांजर गेल्या दोन दिवसांपासून फिरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने परिस्थितीला तत्पर प्रतिसाद देत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. 15 फेब्रुवारी रोजी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात त्यांच्या प्रयत्नांना यश आले.  Leopard capture

     

    वनविभागाने वेळीच केलेल्या या कारवाईमुळे रहिवासी आणि बिबट्या दोघांच्याही सुरक्षिततेची खात्री झाली. मानवी वस्तीमध्ये बिबट्याच्या उपस्थितीमुळे दोन्ही पक्षांना धोका निर्माण होऊ शकतो. बिबट्या मायावी म्हणून ओळखले जातात आणि सामान्यत: मानवी संपर्क टाळतात, मानवी वसाहतींच्या जवळ असल्यामुळे संघर्षाचा धोका वाढू शकतो. Wildlife conservation

     

    बिबट्याला पकडल्याने रहिवाशांना होणारी कोणतीही संभाव्य हानी तर टाळलीच शिवाय प्राण्याची सुरक्षितताही सुनिश्चित झाली. वनविभागाने दिलेला तत्पर प्रतिसाद आणि बिबट्याला प्रभावीपणे पकडणे कौतुकास्पद आहे. हे वन्यजीव संरक्षणासाठी त्यांची बांधिलकी आणि मानव आणि प्राणी या दोघांच्या संरक्षणासाठी त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करते. मानव आणि वन्यजीव यांच्यात सुसंवादी सहअस्तित्व राखण्यासाठी असे सक्रिय उपाय महत्त्वपूर्ण आहेत. Human-wildlife conflict

     

    बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने त्याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये यासाठी दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी तात्काळ गर्दीवर नियंत्रण मिळविले.

     

    यासारखी उदाहरणे वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्याची गरज यांची आठवण करून देतात. भविष्यात अशा चकमकींना प्रतिबंध करणारे शाश्वत उपाय शोधण्यासाठी अधिकारी आणि समुदायांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्याने संभाव्य धोका टळला आहे हे जाणून शक्तीनगर परिसरातील रहिवाशांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या योग्य अधिवासात सुरक्षितपणे हलवले जाईल, त्याचे कल्याण सुनिश्चित होईल आणि पुढील संघर्ष टाळता येईल.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल- खरीप हंगाम धान कापणी व चुरणा करण्याची वेळ आली की, नेहमी वाघाच्या घटना घडतच असतात. याच्यावर मात्र शासनाच्या वन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. शेतकरी म्हटला तर त्याच्या जनावरांना चारा लागणारच यासाठी शेतातून गुरांसाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५३३ मध्ये गुरुवारी सकाळी ८.३० वाजता दरम्यान घडली. रात्रो होऊनही शेतातून घरी परत न आल्याने त्याचा इतरत्र शोध घेतला असता शुक्रवार सकाळी ७ वाजता दरम्यान शेतातलगत असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

     

    सुभाष लिंगाजी कडते वय अंदाजे (४२) वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे.नेहमीप्रमाणे घरच्या गुरांना शेतातून चारा आणायला सुभाष शेतात गेला होता.दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने सुभाषवर हल्ला करून जागीच ठार केले.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र सुभाष दिसला नाही.शुक्रवारी सकाळी ७ वाजता शेतातून फरफटत नेल्याचे दिसून आले.त्याच्या ५०० किमी अंतरावर जंगलात सुभाषचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला.घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोरेकर आणि कर्मचारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

     

    शासनाच्या वनविभागाकडून मृतकाच्या नातेवाईकांना तात्काळ ३० हजार रुपयाची मदत वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडून देण्यात आली. याच वन परिक्षेत्रात यापूर्वीही अनेक वाघाने ठार केल्याच्या घटना घडल्या असून अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी वन विभागाला पुन्हा किती घटनेची अपेक्षा आहे असा सूर मात्र जानाळा ग्रामस्थांमध्ये दिसून आला. वाघाच्या सारख्या दहशतीमुळे शेतकरी आपली शेती कसने सोडून देणार असल्याचे बोलून दाखविले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याची शेती करावी व शेतकऱ्याला शेतीचा मोबदला द्यावा. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वणाला तारेचे कुंपण करुन आपल्या वन्य प्राण्यांचे रक्षण स्वतः करावे. अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

  • नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

     

    19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर हल्ला करीत ठार केले.

     

    त्या घटनेनंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम होती, रामाळा-वैरागड या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांचा ती वाघीण पाठलाग करीत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे तो मार्गच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वनविभाग त्या वाघिणीवर लक्ष ठेवून होता.

     

    T13 या वाघिणीमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना सोबत भविष्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढू नये यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानगीने वनविभागाने आरमोरी वनपरिक्षेत्र मुल्लूर चक गावातील झुडपी जंगलात 23 ऑक्टोबर ला डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर, TATR चे शूटर अजय मराठे व RRT सदस्य यांनी वाघिणीला डार्ट करीत बेशुद्ध करून वाघिणीला जेरबंद केले.

     

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यावर तिला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

     

    सदरची यशस्वी कारवाई वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, संदीप भारती, पवनकुमार जोंगा यांच्या उपस्थितीत RRT गडचिरोलीचे दीपक टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाडगुरे, निकेश शेंद्र, मनन शेख यांनी केली.

     

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

    News34 chandrapur

    प्रतिनिधी | गुरू गुरनुले

    मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे.
    यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.

     

    शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या : शेतकऱ्या वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

     

    गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात शेतकऱ्यांचे तुकडे करुन जागीच ठार केले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली.

     

    सदर घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता दरम्यान घडली असून घटनेची माहिती वनविभागाला कळताच घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे, आर. एफ .ओ. राजेश घोरुडे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार व अनेक ग्रामस्थ तसेच क्षेत्र सहाय्यक खणके, मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले, एफ.डी.सी. एम.चे कर्मचारी कूमरे, गवई, कर्मचारी दाखल झाले असुन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडुन मृत्यदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

     

    मृतदेह हाती लागताच उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आले, वनविभागाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 30 हजार रुपयांची मदत केली. परंतु शेतशिवांरातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. यापूर्वी मौजा चीचाळा येथील गुऱ्हे चांरण्यासाठी नेलेल्या दोन इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.