Tag: मराठी बातम्या

  • बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू उरकुडे यांच्या प्राप्त तक्रारीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत बँकेच्या मेंडकी शाखेची सखोल चौकशी करण्यात आली.

     

    चौकशीत 17 लाख 67 हजार 315 रूपये 65 पैश्याची अपरातफर झाल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने बँकेची विनंती व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक साजन साखरे यांनी मेंडकी शाखेचे लेखा परीक्षण केल्यानंतर निदर्शनास आलेल्या अफरातफरी विषयी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदविली.

     

    प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम 420, 465, 466, 467 468, 471, 409, 34 भादविनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासांती रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे व एस बी शेंडे या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडल्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना अटक केली.

     

    पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अमित राऊत यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी जामीनकरिता न्यायालयाला विनंती केली, परंतु अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी विड्रॉल स्लिप व व्हाँवचर लिस्ट नुसार अमित राऊत यांनी 3 लाख 89 हजार 11 रुपयाची अफरातफर केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कारण नमुद करून अमित राऊत यांची जमानतीची विनंती फेटाळून लावली.

     

    अमित राऊत यांना पोलिसांनी 21 सप्टेंबर 2020 रोजी अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 रोजी ब्रह्मपुरी न्यायालयाने जमानत दिली तोपर्यंत अमित राऊत पोलीस व न्यायालयीन कोठडीत होते. कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी 48 तासाचे वर पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांचेविरूध्द नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आहेत.

     

    अमीत राऊत यांच्या कोठडीतील कार्यकाळ दीड महिन्याच्या वर होत असल्याने बँक प्रशासनाने नियमानुसार त्यांचे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही केली, सेवानिवृत्त सहकार अधिकारी शिरभय्ये यांचे मार्फतीने विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर अमित राऊत दोषी असल्याचा निवाडा दिला. विभागीय चौकशी अंती दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांसंबंधी 30 जून 2021 रोजी पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 21 नुसार दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी असे सर्वानुमाते ठरविण्यात आल्याने बँकेने दोषी कर्माचा-यांविरूध्द बडतर्फीची कारवाई केली.

     

    बडतर्फीच्या कारवाईनंतर अमित राऊत यांनी चंद्रपूर येथील कामगार न्यायालयात धाव घेतली, दरम्यान कामगार न्यायाधीश यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राऊत यांचे विरुद्ध झालेली चौकशी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार झाली असून चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निवाडा कायदेशीर असल्याचा निर्णय 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला. यामध्ये बँक प्रशासनाने कोणतीही गैरकृती केली नसून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध हेतू पुरस्सर कोणातीही कारवाई केली नाही.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी कारवाई केली आहे. असे असताना काही मंडळी अमित राऊत यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात बँकेच्या काही संचालक व अधिकाऱ्यांना गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब अयोग्य व निराधार असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला आहे.

  • नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा
    तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

     

    लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.

  • चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात ( दि. 9 डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच  सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव, गिरीश भालचंद्र, पांडुरंग भोसले, भगवान फड, प्रशांत काळे आदी उपस्थित होते.

     

    लोक न्यायालयासाठी चंद्रपूर मुख्यालयात 7 तसेच तालुका न्यायालयात 21 असे एकूण 28 पॅनल तयार करण्यात आले होते. या लोक न्यायालयामध्ये 10 हजार 55 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 17 हजार 680 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 27 हजार 735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 342 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तर 1 हजार 337 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 2 हजार 679 प्रकरणी निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईत 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 70 लक्ष 80 हजार वसूल करण्यात आले. भूसंपादनाची एकूण 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याबाबत 71 लक्ष 65 हजार 857 रुपये नुकसान भरपाई संबंधित पक्षकारास अदा करण्यात आली. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 5 प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीअंती एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला.

    धनादेश अनादरीत प्रकरणांपैकी 61 प्रकरणे ज्याची रक्कम रुपये 53 लाख 58 हजार 819 निकाली काढण्यात आली. लवाद वसुलीची 27 प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्याची रक्कम रुपये 1 कोटी 38 लक्ष 79 हजार 192 वसूल करण्यात आली. औद्योगिक न्यायालयातील पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

  • ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात करण्यात येणार आहे.
    सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत.
    स्पर्धेचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूर चे आमदार अभिजीतजी वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबाले , शहरातून निघणाऱ्या प्रमुख रॅलीचे आकर्षण सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराजजी राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोकजी रामटेके, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. देवेशजी कांबळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशजी फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
    @कार्यक्रमावली
    10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होईल.
    11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पासून कुस्तीला सुरुवात
    12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.

     

  • थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

     

    7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, पप्पू शेख, अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

     

    यावेळी यामिनी कामडी, दुर्गा निवटे, विजया तरारे, सुनीता सहारे, कपिला चावरे, सुनीता मुरकुठे, रेखा चाचारकर, मंदा रंधये, पुज्या नन्नावरे व शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

     

    शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

     

    संताजी भवन व पुढील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ची पोलिसांनी तपासणी करीत दुचाकी व अल्पवयीन मुलांची ओळख पटताच त्यांना ताब्यात घेण्यात आले, या घटनेत तिघांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांनी सांगितले की हा आमचा पहिलाच गुन्हा आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34CC1447 व हिसकावून नेलेला मोबाईल असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, इम्रान खान, भावना रामटेके, सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, रुपेश रणदिवे यांनी केली.

  • गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ज्या जन्मदात्यांनी कठीण परिश्रम घेऊन मुलांना वाढवले. त्यांना काय हवं, काय नको याचे लाड पुरवले. त्यांना योग्य शिक्षण दिले आणि त्याच शिक्षणाच्या भरवशावर दोन्ही मुले शासकीय सेवेत लागली. मात्र जेव्हा वयोवृद्ध पालकांचा सांभाळ करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या निष्ठुर मुलांनी पाठ फिरवली. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या पर्यंत पोचले आणि त्यांनी या मुलांना दणका दिला. या दोन्ही मुलांना आपल्या आईवडीलांचा निर्वाह खर्च उचलण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

    मेघराज माधव पिंपळशेंडे (७१) आणि त्यांच्या पत्नी हे पोंभुर्णा येथे राहतात. त्यांची दोन मुले आहेत. सत्यपाल पिंपळशेंडे आणि सचिन पिंपळशेंडे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही शासकीय सेवेत रुजू आहेत. या वयात या वयोवृद्ध दाम्पत्याची विसावा घेण्याची नातवंडांसोबत मज्जा करण्याची वेळ. मात्र, यांपैकी दोन्ही मुलांनी त्यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. उलट त्यांना पालकच नको आहेत. त्यांनी आपल्या पालकांचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार दिला.

     

    पिंपळ शेंडे या वयोवृद्ध दांपत्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. यापूर्वीची जी संपत्ती त्यांच्याकडे होती त्यांची वाटणी देखील त्यांनी मुलांमध्ये केली. त्याच्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर हतबल झालेल्या दांपत्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागितली. त्यांनी आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता मिळण्याबाबत गोंडपिपरी- पोंभुर्णाचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांच्याकडे मुलगा सत्यपाल पिंपळशेंडे, सचिन पिंपळशेंडे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला. त्यांची ही दोन्ही मुले शासकीय नोकरीवर असून, सांभाळ करत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मेघराज यांनी धाव घेतली.

     

    उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी याची गंभीर दखल घेतली. तक्रारीवरून त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीअंती उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दोन्ही मुलांना ज्येष्ठ आई- वडिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रतिमाह निर्वाह भत्ता देण्याचा आदेश पारित केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, नोकरदार मुलांनाही चांगलीच चपराक बसली आहे.

     

    पीडित पालकांना पूढे येण्याचे आवाहन

    उपविभागीय अधिकारी या पदाची सूत्रे हातीच घेताच बालाजी शेवाळे यांनी अनेक उपक्रम राबवले. आपल्या परिसरात चाललेल्या वाळूच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी देखील त्यांनी आदेश काढला होता. अशा पद्धतीची वाळूची तस्करी होत असल्यास केवळ दंडच नव्हे तर फौजदारी कारवाई करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले होते. त्यामुळे या परिसरातील वाळू तस्करी चाप बसला. हे प्रकरण आले असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत योग्य निर्णय दिला आणि पीडित पालकांना न्याय मिळवून दिला. सोबतच त्यांनी आवाहन देखील केले आहे अशा पालकांचा सांभाळ करण्यास मुलं नकार देत असल्यास त्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागण्याचे आवाहन देखील शेवाळे यांनी केले आहे

     

    नियम काय सांगतो

    आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर मूळ नकार देत असतील तर
    निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम ५ पोट कलम (१) नुसार निर्वाह भत्ता मिळण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात दाद मागता येते. यात तथ्य आढळल्यास अर्जदाराला प्रतिमाह भत्ता देण्याचा आदेश दिला जातो. तसेच आदेशाचे पालन न केल्यास एक महिन्याच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी BRS पक्षाचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात 12 डिसेंबर ला जिवती ते विधानभवन नागपूर ला बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे, याबाबत 8 डिसेंम्बर ला आयोजित पत्रकार परिषदेत फुसे यांनी सविस्तर माहिती दिली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीत आला आहे, आज असंख्य समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे, मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी शासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी भूषण फुसे BRS पक्षाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत आहे.

     

    शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज तात्काळ घोषित करून देण्यात यावे, कर्ज माफ करीत सातबारा कोरा करावा, शेतीच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रान डुक्करांची नसबंदी करण्यात यावी, धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांना उद्योगधंद्यात रोजगार देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुरू असलेले जुगाराचा अड्डे बंद करावे अश्या विविध मागण्यांसाठी बैलबंडी मोर्चा जिवती तालुक्यातून थेट विधानभवनावर 16 डिसेंम्बरला धडकणार आहे.

     

    मोर्च्यांचे नियोजन काय?

     

    12 डिसेंम्बरला सकाळी 9 वाजता शेतकरी आपल्या बैलबंडी सह जिवती येथून प्रारंभ करतील त्यानंतर गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, खांबाडा, जाम, बुट्टीबोरी नंतर 16 डिसेंबर ला मोर्चा विधानभवनावर धडकणार.

     

    वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – भूषण फुसे

     

    माननीय नागपूर उच्च न्यायालयाने रानटी डुक्कर मारण्याच्या जीआर विरुद्ध निकाल दिला. या निकाला विरुद्ध वनमंत्री साहेब सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले.

    रान डुकरांमुळे उभ्या शेतीचे नुकसान होत आहे, याबद्दल वनमंत्री काही ठोस भूमिका का घेत नाही? जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढत आहे त्याला नियंत्रण करण्यात व वन प्राण्यांचे नियोजन करण्यात वनमंत्री अपयशी ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान जर आफ्रिकेतून चिता आणू शकतात तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण व पुनर्वसन का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील निर्दोष, निष्पा शेतकऱ्यांचा, गुराख्यांचा व नागरिकांचा जीव जातोय याबद्दल काहीच वाटत नाही का? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्व प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.

  • हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी #हिवाळीअधिवेशन2023 #एकदिवसएकआंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.

     

    या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, आज सकाळी 7:30 ते 10:00 दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करीत किल्ला संवर्धन विषयक मागण्याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठा सत्याग्रह केला. यावेळी इको-प्रो तर्फे सुरू असलेले किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक मार्गातील अडथळे दूर करीत पर्यटकांना सुरक्षित जाता यावे म्हणून परकोट भिंतीची दोन ठिकाणी दुरुस्ती त्वरित करावी, किल्ला भिंत व पुरातत्व विभागाने नव्याने बांधलेली संरक्षण भिंतिचे बांधकाम पूर्ण करण्यास त्या दरम्यानचे अतिक्रमण मुक्त करण्यास पंतप्रधान/मुख्यमंत्री आवास योजनेत घरे देण्यात यावे, किल्ला परकोट पासून शंभर मीटर पर्यंत बांधकामाची अट असली तरी बांधकाम होत असून यावर कुठलेही नियंत्रण नाही, नाहक नागरिकांना बांधकाम करताना त्रास होत आहे, यामुळे ऐतिहासिक स्मारक विषयी नकारात्मक भावना निर्माण होत असते, त्यावर उपाय म्हणून ही किल्ला परकोट भिंतीपासून बांधकाम ची 100 मीटर अट रद्द करून 3 ते 5 मीटर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

     

    हिवाळी अधिवेशन दरम्यान इको-प्रो कडून करण्यात येत असलेली आंदोलन/सत्याग्रह पुढील काळात व्यापक व तीव्र असे आंदोलन करण्याचे नियोजीत आहे. आणि महत्वाचे म्हणजे संस्थेचे “आपला वारसा आपणच जपुया” या मुख्य उद्देशपुर्ती करिता असून आपला नैसर्गिक वारसा (जल, जंगल, जमीन, नदी, तलाव, वन्यजीव) व ऐतिहासिक वारसा (गड, किल्ले, मंदिरे, स्मारक व समाध्या) यासोबत शेतकरी, गावकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे हिताचे प्रश्न करिता इको-प्रो चा लढा सुरू असून प्रत्येकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी म्हणून सातत्यपूर्ण संयमाने लढे सुरू ठेवले पाहिजे म्हणून इको-प्रो चा लोकजागृतीकरिता लोकलढा सुरू आहे.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला चांदागड किल्ला-परकोट जे इको-प्रो ने सतत 1020 दिवस स्वच्छता करीत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करीत स्थानिक पर्यटनाला एक दिशा दिली आहे. मात्र पुरातत्व विभाग व राज्य शासन कडून तसेच जिल्हा प्रशासन कडून स्थानिक पर्यटन विकास करिता अद्याप हवे तसे लक्ष दिले गेलेले नाही. एखादी संस्था जेव्हा निस्वार्थ भावनेतून व लोकसहभागातून काही करीत असेल तर त्यास आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. या सात वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यात सतत पाठपुरावा करीत असलेल्या मागण्या संदर्भात आज किल्ला भिंतीवर बसून ‘बैठा सत्याग्रह’ तर श्रमदान करीत स्वच्छता सत्याग्रह करण्यात आले.

     

    या आंदोलनावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात अब्दुल जावेद, अभय अमृतकर, ओमजी वर्मा, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, कुणाल देवगिरकर, विजयहेडाऊ, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण, चंदू आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील Preventive Cardiologist तज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोगावर आयुर्वेद उपचार पद्धती सक्षम असल्याचा संशोधनपर अहवाल यांनी सादर केला असून, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाची दखल घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

     

    ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे जागतिक हृदय परिषद पार पडली. या परिषदेत डॉ. सरबेरे यांनी सादर केेलेला आयुर्वेदाने हृदयरोग बरा होऊ शकतो आणि विनाशस्त्रक्रिया उच्च गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो, या आशयाचा अहवाल आपण सादर केला होता, असे डॉ. सरबेरे यांनी सांगितले.

     

    हा अहवाल संपूर्ण जगातील हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखविणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतात हृदयरोगाचे वाढते प्रमाण आणि हृदयरोगामुळे होणारे मृत्यू दर रोखण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती अत्यंत उपयोगी सिद्ध होत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला माधवबागच्या संचालिका  डॉ. प्रीती सरबेरे यांच्यासह माधवबागचे सामाजिक आरोग्य अधिकारी संजय ठेकाळे उपस्थित होते.