Tag: प्रदूषण

  • coal pollution in maharashtra । कोळसा वॉशऱ्यांनी शेतीच उध्वस्त केली, वॉशऱ्या बंद करा – आमदार जोरगेवार

    coal pollution in maharashtra

    coal pollution in maharashtra : मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोळसा उत्खननामुळे गंभीर प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या असून, या प्रदूषणाचा परिणाम केवळ हवेत किंवा पाण्यात मर्यादित न राहता शेतजमिनींवर आणि घरांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरी वस्तीमध्ये असलेल्या कोल वॉशऱ्या प्रदूषणाचे मोठे कारण ठरत असून, या कोळसा वॉशऱ्या बंद कराव्यात, अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    सौर ऊर्जा नेट मीटरिंग धोरण अन्यायकारक

    कोल वॉशऱ्यांजवळील शेतजमिनींवर थेट परिणाम होत असून, पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी दूषित होणे असे गंभीर परिणाम स्थानिक शेतकरी आणि नागरिक भोगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. impact of coal mining on agriculture

    पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीमुळे चंद्रपूरात होणाऱ्या प्रदूषणाकडे आणि त्यामुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या विषयावर संबंधित कोळसा उत्पादक जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे.

    शेतीप्रधान भागात मोठया प्रमाणात प्रदूषण

    कोळशाचा सर्वात मोठा ग्राहक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) असल्याने अनेक कोल वॉशऱ्यांची निर्मिती झाली असून त्या शेतीप्रधान भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. विशेष म्हणजे पॉवर प्लांट आणि डब्ल्यूसीएलपेक्षाही वॉशऱ्यांचे प्रदूषण अधिक गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे.

    या वॉशऱ्यांजवळील शेती क्षेत्र, जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता यावर प्रतिकूल परिणाम होत असून, प्रदूषित पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रभावित शेतकऱ्यांना कोणताही लाभ किंवा नुकसानभरपाई दिली जात नाही. आजतागायत अशा भागांसाठी कोणतीही स्पष्ट धोरणात्मक योजना अस्तित्वात नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी अधिवेशनात सांगितले. येथील कापसाचे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले आहेत, मात्र त्याचा अहवाल अजून आलेला नाही, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. वेकोली कडून करण्यात येणाऱ्या स्फोटामुळे अनेक घरांना भेगा जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. impact of coal mining on agriculture

    या पार्श्वभूमीवर विधानसभेत राज्य सरकारचे लक्ष वेधत, डब्ल्यूसीएल, कोल इंडिया या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली.

    चंद्रपूर जिल्ह्यातील २१४  मुली व महिला  बेपत्ता – आमदार जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला  गंभीर मुद्दा

    चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.

    यावेळी मागील अडीच वर्षांची आकडेवारी सभागृहात सादर करताना दररोज सरासरी तीन मुली अथवा महिला बेपत्ता होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काहींचा शोध लागलेला असला तरी एकूण २१४ महिला आणि मुली अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. Chandrapur missing women cases increase

    याप्रसंगी ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा अपरिचित व्यक्तींशी संपर्क येत असून त्याचा गैरवापर केला जात आहे. काही लोक सोशल मीडियावरून महिलांना फसवून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांना चुकीच्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यात पाठवून फसवत आहेत. human trafficking prevention laws need

    मागील अडीच वर्षांच्या काळात २ हजार ७३० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये २ हजार ३०१ महिला आणि ४३९ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील अनेकांचा शोध लागला असला तरी अद्यापही २१४ महिला व मुली बेपत्ता असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले.

    या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा तसेच बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

  • सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा – राजेश बेले

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सनफ्लेग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून, कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मानवी, जलीय, वन्य आणि पाळीव प्राण्यांवर धोका निर्माण झाला आहे.

     

    संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वा. बेले यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

     

    निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे खाणीतील घातक रासायनिक द्रव्य नदी, नाले आणि शेतजमिनीत सोडले जात आहे. यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, या प्रकल्पामुळे होणाऱ्या ब्लास्टींगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.

     

    या खाणीतून निघणारा कोळसा देखील वायु प्रदूषण करत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, हृदयविकार, स्कीन विकार, डोळयांचे आजार, टी.बी., मेंदुचे आजार, नवजात शिशु व गर्भवती महिला यांना प्रदुषणाचा आजार होत आहे.

     

    कोळसा खाणीतुन निघणा-या रासायनिक द्रव्यामुळे संपूर्ण नदी नाले प्रदुषीत झाले आहे. कोळसा खाणीतुन निघणारा रासायनिक द्रव्यामुळे कोळसा खाणीला लागून असलेल्या संपूर्ण शेत जमीन प्रदुषीत झाली आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसामुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसा रेल्वे साईडींगमुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन होणा-या कोळसा वाहतुकीमुळे घातक वायु प्रदुषण व रस्त्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

     

    बेले यांनी या निवेदनात मागणी केली आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच, या प्रकल्पाला तात्काळ बंद करण्यात यावे.

     

    या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घुग्घूस शहर, ता. चंद्रपूर येथील भूमिपुत्र युवा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात संघटनेने घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी, बेरोजगारांच्या विविध मागण्यांबाबत सादर केल्या आहेत.

     

    या मागण्यांमध्ये घुग्घूस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवक व युवतींना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीत सामावून घेणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो, म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कंपन्यांवर कारवाई करणे.

     

    लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घुग्घूस ते पांढरकवडा पांदन रस्ता आणि घुग्घूस ते सेनगाव पांदन रस्तावर केलेला अतिक्रमण हटवणे, लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने शहर व ग्रामीण भागात सन २०१३ पासून ते आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची कार्याची चौकशी करणे, जिल्ह्याधिकारी यांनी सदर लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करणे, विस्तारीकरणात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी कंपनी अधिग्रहित करते त्या जमिनींचा मोबदला हा शेतकऱ्यांना थेट मिळावा, कंपनीचे अधिकारी यांनी विस्तारीकरणाच्या जनसुनानीच्या नोटिफिकेशनमध्ये जाहीरपणे सांगितले की कंपनीच्या परिसरात किमान दोन लाख वृक्षारोपण करण्यात आले असे खोटे व चुकीची माहिती सादर केलेल्या कंपनीवर कडक कारवाई करणे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि त्यांना योग्य पगार किमान ₹२०,००० ते ₹२५,००० रुपये देण्यात यावे, कंपनीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी अनेक लोकवस्तीचे पुनर्वासन करताना सर्वे क्रमांक १६७ आराजी ६३.६७३७ चौ.मी. एकूण ६२ प्लॉट रहिवासा करिता पुरावतीत आहे.

     

    जमिनीचे पट्टे देऊ असे खोटे आश्वासन कंपनी मार्फत देऊन त्या लोकवस्तीना स्थलांतरित करण्यात आले, लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून होत असल्याने दुर्घटनाला आमंत्रण नाकारता येत नाही. म्हणून कंपनीचे जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून बंद करण्यात यावे यांचा समावेश आहे.

     

    या सर्व मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात यावा आणि न्याय द्यावा यासाठी भूमिपुत्रांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. भूमिपुत्रांच्या वरील मागण्यांवर योग्य ती सकारात्मक चर्चा न झाल्यास दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी चेतावणी संघटनेने दिली आहे.

  • 8 दिवसात अवजड वाहतूक बंद करा…अन्यथा युवासेनेचा प्रशासनाला इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ३१ ऑक्टोबर ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप  गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांनी वांढरी गावात होत असलेली अवजड वाहतूक 8 दिवसात बंद करावी अन्यथा युवासेना तर्फे याविरोधात आंदोलन उभारणार याबाबत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     

     वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन कन्स्ट्रक्शन, ग्रेस व इतर कंपनीची अवजड वाहतूक होत असून त्या अवजड वाहतूकीमुळे गावामधे धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्या धुळ आणि ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हा मार्ग गावातील मुख्य मार्ग असल्यामुळे गावातील शाळाकरी विद्यार्थी शेतकरी गावकरी यांचा जाण्या येण्याचा रहदारी चा मार्ग आहे.

     

    जड वाहतुकी साठी दुसरा पर्यायी मार्ग असून सुद्धा कि. मी. अंतर वाचवून डीझेल वाचविण्यासाठी गजानन कन्स्ट्रक्शन,ग्रेस व इतर कंपन्या ही जड वाहतूक शॉर्टकट वांढरी गाव ते वांढरी फाटा ह्या मार्गाने येणे जाणे करत आहे.  भविष्यात या अवजड वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही सर्व बाब लक्षात घेऊन ही अवजड वाहतूक ८ दिवसात बंद करण्यात यावी, अन्यथा युवासेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार यात आणखी काही नुकसान झाल्यास सर्वस्व प्रशासन जिम्मेदार राहणार असा इशारा देण्यात आला.

     

    यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे,केतन शेरकी,तुषार शेडामे,आकाश पावडे,चेतन कामडी, महेश जुनारकर,आयुष गौरकार उपस्थित होते.