Tag: पीक विमा

  • pmfby notification for Chandrapur district । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी, विमा भरून मिळवा 60,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण

    pmfby notification for Chandrapur district

    pmfby notification for Chandrapur district : चंद्रपूर, दि. 0८ जुलै : खरीप हंगाम 2025 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. सदर योजना शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, कीड प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे नुकसान इत्यादींपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते.

    चंद्रपुरात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र

    या योजनेत भात, कापूस, सोयाबीन, तुर, ज्वारी इ. पिकांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे. भात (तांदुळ) करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 61,000 रुपये असून शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता प्रती हेक्टर 1220 रुपये आहे. तसेच खरीप ज्वारी करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 33,000 रुपये असून विमा हप्ता 82 रुपये 50 पैसे व सोयाबीन करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 58,000 रुपये व विमा हप्ता 580 रुपये. तुर करीता 47,000 रुपये विमा हप्ता  117 रुपये 50 पैसे तसेच कापूस करीता विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर 60,000 रुपये व शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता 1200 रुपये प्रती हेक्टर.

    योजनेत सहभागी होण्यासाठी महत्वाचे निकष व अटी:

    योजना अंतरभूत (Notified) पिके आणि क्षेत्रांवरच लागू असेल, कृषीदार व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी दोघेही पात्र, मात्र भाडेपट्टीचे नोंदणीकृत करार अपलोड करणे बंधनकारक, ई-पीक पाहणी प्रणालीवर पिकांची नोंदणी करणे आवश्यक, शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक (भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई) (ईमेल: pikvima@aicofindia.com). how to apply for pmfby scheme online 2025

    योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा किंवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ मार्फत आवश्यक कागदपत्रांसह हप्ता भरावा. सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी किमान 7 दिवस आधी नकारपत्र संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. pmfby registration last date 2025

    शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पीक संरक्षणासाठी आर्थिक सुरक्षेची हमी घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी / मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी / उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

  • pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    pik vima : पीक विम्याबाबत महत्वाची बैठक

    Pik vima शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, सदर रक्कम तात्काळ मिळावी यासाठी पुढचे पाऊल काय असणार आहे, याबाबत डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती.

    pik vima वीरई ग्राम पंचायत येथे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे तातडीने एक बैठक बोलावली. त्या बैठकीत डॉ अभिलाषा गावतुरे या उपस्थित होत्या. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा झाली नाही हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. त्यांचा अन्याय दुर करण्यासाठी व इतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी व तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवीत गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम मिळावी यासाठी यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली.

    धक्कादायक बातमी : तुझ्या अब्रूचे धिंडवडे उडवीत तुला ठार करणार, अवैध दारू विक्रेत्यांची महिलेला धमकी

    डॉ गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. या सभेत शेतकरी बांधव न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई,काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रमजी मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर, सुखदेवजी वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जेलभरो आंदोलन