Tag: नरभक्षक वाघ

  • man eater tiger captured । नागभीड तालुक्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद, २ नागरिकांची केली होती शिकार

    man eater tiger captured

    man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict

    नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर वाघाला २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गंगासागर हेठी बिट, सावर्ला रिट, शासकीय जमीन सर्वे क्र.२ तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्र येथे वनविभागाने डार्ट मारीत जेरबंद केले.

    भाजप आमदाराने पकडली अवैध दारू

    २ नागरिकांचा घेतला होता बळी

    नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात १५ एप्रिल रोजी गंगासागर हेठी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ४५) व १८ मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (वय ६४)या दोघांवर आलेवाही बीट परिसरात हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता  . या घटनेनंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. आज वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले सदर नरभक्षक नर वाघ हा अंदाजे ८ वर्षाचा आहे.

    forest conflict

    सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी या मोहिमेत उपवन संरक्षक राकेश हेपट, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, डॉ, रविकांत खोब्रागडे, पोलीस दलातील शुटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार,अरविंद माने, राजेंद्र भरणे, घनश्याम लोनबले यांनी अथक परिश्रम केले.

  • tiger captured in Maharashtra । मरणाची छाया बनलेला वाघ अखेर सापडला: ब्रह्मपुरीचा श्वास आता मोकळा

    tiger captured in Maharashtra

    tiger captured in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला १७ एप्रिल रोजी डार्ट मारीत जेरबंद करण्यात आले. problematic tiger captured

    चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून आतापर्यंत या संघर्षात १२ नागरिकांचा बळी गेला आहे. उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात T-३ वाघाने ४ नागरिकांवर हल्ला करीत दोघांना ठार तर दोघांना जखमी केले होते. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढू नये यासाठी नरभक्षक वाघाला पकडणे गरजेचे असल्याने वनविभागाने वाघ पकडण्यासाठीची मोहीम राबविली. brahmapuri tiger attack

    चंद्रपुरातील नदीत दडलं रहस्य, नदीतून उलगडलं २५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास

    १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यानो डार्ट तयार करून दिला, त्यानंतर शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी T-३ वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध करीत जेरबंद केले.

    सदर मोहीम सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग महेश चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे, विकास ताजने, योगेश लडके, प्रफुल वाटगुरे, गूणनक धोरे, दीपेश टेम्भूर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर व राकेश आहुजा यांच्या उपस्थितीत पार पडली.

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय १३ वर्ष असून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.

  • Wild Narbhakshak Wagh : त्या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा – संतोष रावत

    Wild Narbhakshak Wagh : त्या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा – संतोष रावत

    narbhakshak wagh नरभक्षक वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट

    Narbhakshak wagh (गुरू गुरनुले) मूल – मुल तालुक्यातील एका हप्त्यात तीन जणांचा बळी घेतलेल्या नरभक्ष वाघामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली असून अशा नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, व गुरे चारण्यासाठी चराई क्षेत्र निर्माण करण्यात यावा, नरभक्षक वाघाच्या (narbhakshak wagh) हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागा अंतर्गत नोकरी देण्यात यावी, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या परिवाराला ७५ लाख व जखमी व्यक्तीला २५ लाख रुपयांची तातडीने मदत देण्यात यावी. आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

    अवश्य वाचा : ओबीसी मधील कुणबी वगळता बाकीनी काय सतरंज्या उचलायच्या काय? भूषण फुसे


    काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात नरभक्षक वाघाच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या तालुक्यातील केळझर, कांतापेठ, चिचाळा, मरेंगाव, जानाळा, सुशी दाबगांव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

    Narbhakshak wagh मागील काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावात नागरिक नरभक्षक वाघाच्या दहशती मध्ये वावरत आहेत. वाघा शिवाय बिबट, रानडुक्कराने शेतीत हैदोस माजवीत शेतीचे नुकसान करीत आहेत. हाती येणारे पीक नष्ट करीत आहेत.यासाठी गावातील शेकडो नागरीकांनी जीवाच्या काळजीपोटी शेती न करण्याच्या निर्णय घेतला असून जंगला लगतच्या अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती आजच्या स्थितीत पडीत आहे. यामुळे शेती पडीत ठेवलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरे चारण्यासाठी चराई क्षेत्र आरक्षित ठेवण्यात न आल्याने गुरे चारायची कोठे ? असाही प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला असून वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी शेतकऱ्यांचे गोधन ही दिवसेंदिवस कमी होत असल्याने देशाच्या कणा असलेला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी अशी विनंती काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांना केली.

    सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांवर चर्चा करताना मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी आठवड्याभरात नरभक्षक वाघाच्या बंदोबस्त करण्यासंबंधी पाऊले उचलले जातील व आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येणारी मदत वाढवून मिळावी याकरिता शासनाकडे निवेदना नुसार प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही देतांना रामगावकर यांनी शेत पिकांची नुकसान करणाऱ्या रानडुकरांना मारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्फतीने विनंती केल्यास २४ तासात परवानगी देण्यात येईल व ही परवानगी वनपरिक्षेत्र अधिकारी देतील असे आश्वासन दिले.

    जंगलात वन्य प्राण्यांना तहाण भागवता यावी म्हणून असलेल्या पाणवठ्यात पुन्हा वाढ करण्यात येईल, वनविभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे तातडीने निर्देश देण्यात येईल, वाघाचा हल्ल्याच्या घटनेचे २४ तासाच्या आत पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करण्यास वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असेही आश्वासन रामगावकर यांनी दिले.

    महाविकास आघाडीची आरक्षण विरोधी भूमिकेचा पर्दाफाश

    यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे शिवाय तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संचालक संदीप कारवार, किशोर घडसे, राजू मारकवार, सरपंच आकापूर भास्कर हजारे, सरपंच चिमढा कालिदास खोब्रागडे, कांतापेठच्या सरपंचा वैशाली निकोडे, मरेगांवच्या सरपंचा जोस्तना पेंदोर, टोलेवाहीचे उपसरपंच विकास येळमे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलावार, प्रशांत उराडे, माजी संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे यांचेसह नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे पत्नी, व नातेवाईक, ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur district : अखेर तो अडकला वनविभागाच्या जाळ्यात

    Chandrapur district : अखेर तो अडकला वनविभागाच्या जाळ्यात


    Chandrapur district तळोधी बा :-ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या नागभीड व तळोधी या दोन्ही वनपरिक्षेत्रातील दोन लोकांना दोन दिवसांत मारणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात तळोदी विभागाला यश आले आहे.

    Chandrapur district नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंदरे या इसमास व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील जनाबाई बागडे या महिलेला ठार मारणाऱ्या वाघाला सापळा रचून पकडण्यात आले.
    यावेळी याकरिता मुख्य वन संरक्षक रामगावकर यांनी परवानगी देत या वाघाला पकडण्याचे आदेश केले होते. त्यानंतर तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाच्या काही अंतरावरच या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात आले.

    अवश्य वाचा : मुसळधार पाऊस आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी


    यावेळी डॉक्टर रमाकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी या वाघाला बेशुद्ध केले. यावेळी तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वनकर्मचारी, चिमूर येथील गस्तीपथक व स्वाब संस्थेचे बचाव पथकाचे यश कायरकर , जिवेश सयाम व इतर संपूर्ण सदस्य उपस्थित होते.
    या वाघाला पकडण्याच्या कारवाईनंतर परिसरातील लोकांनी वनविभागाचे कौतुक करत सुटकेचा निःश्वास सोडला.

    पाऊस सुरू झाल्याने शेतकरी आता पेरण्या करायला शेतात जाऊ लागले, याच दरम्यान वाघाला शिकार करणे सोपे होत व शेता नजीक दबा धरून वाघ शिकारीची वाट बघत असतो, शेत मजूर व शेतकरी अश्या वेळी या घटनेत बळी पडतात, ताडोबा अभयारण्य व बाहेरील भागात वाघांची संख्या जास्त असल्याने एक वाघ जरी वनविभागाच्या जाळ्यात अडकला तर दुसरा वाघ त्या क्षेत्रात येऊ शकतो याकरिता नागरिकांनी खबरदारी बाळगायला हवी.