Tag: दुर्दैवी घटना

  • student dies in river while swimming । 🛑 “१५ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमढा नदीत बुडून मृत्यू – पावसाळ्यातील आनंद ठरला जीवघेणा!”

    student dies in river while swimming

    student dies in river while swimming : सावली – २८ जुलै २०२५]: सावली तालुक्यातील चिमढा नदीत बुडून सोहम प्रमोद मोहूर्ले (वय १५) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेलेल्या सोहमचा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना सावलीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये घडली असून, सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    राजुरा शहरात पुन्हा तलवार जप्त, दोन दिवसात दोन कारवाई

    मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोहूर्ले, जो इयत्ता दहावीत शिकत होता, रविवारी कुटुंबीय घरी नसताना आपल्या मित्रांसोगट फिरायला गेला होता. फिरत असताना वाटेत चिमढा नदीवरील बंधारा पाहण्याची त्याला इच्छा झाली. बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असताना सोहमला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सोबत असलेले मित्र लहान असल्याने त्याला रोखू शकले नाहीत. पोहण्याच्या इच्छेने त्याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो प्रवाहात वाहून गेला.

    ही घटना सोहमच्या मित्रांच्या डोळ्यासमोरच घडली, परंतु भीतीपोटी त्यांनी तातडीने घरच्यांना किंवा पोलिसांना माहिती दिली नाही. रात्री उशीरपर्यंत सोहम घरी परत न आल्याने घरच्या मंडळींची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली असता, मित्रांकडून सत्य परिस्थिती समोर आली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

    माहिती मिळताच पोलीस विभाग आणि आपत्कालीन मदत विभागाने तातडीने शोधमोहीम राबवली. अखेर, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, घटनास्थळापासून काही अंतरावर सोहमचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    Somayya institute of technology

    पोलिसांचे आवाहन

    सावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर सावली पोलिसांनी नागरिकांना वाहत्या पाण्यापासून सावध राहण्याचे आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये न उतरण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. police advisory for monsoon water safety

  • mother and daughter killed in road accident । आई, आपण पोहचू ना?” – पण त्या दोघींचा प्रवास वाटेतच संपला

    mother and daughter killed in road accident

    mother and daughter killed in road accident : बल्लारपूर – राजूराहून चंद्रपूरकडे दुचाकीने जात असताना ट्रक खाली येऊन आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा नदीच्या राजुरा पुलाजवळ बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बामणी गावाच्या हद्दीतील जलाराम मंदिराच्या समोर सोमवारचे दुपारी दीड वाजताचे दरम्यान घडला आहे.

    चंद्रपुरात जड वाहनांना नो एंट्री?

    मृतकाचे नाव ज्योती बंडू रागीट (३८ वर्षे) आणि त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट (८ वर्षे) राहणार पेठ वार्ड राजुरा, असे आहे . ज्योती या स्कुटी क्रमांक एम एच ३४ बी एस५५३८ ने चंद्रपूरला आपल्याकडे आईकडे जात होत्या. धडक दिलेल्या ट्रकचा क्रमांक एम एच ३४बीझेड ७६९९ असा आहे.सेजल ही सहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.


    बामणी – राजुरा ते आदिलाबाद या राष्ट्रिय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सूरू आहे. रस्त्याची उंची वाढविण्याकरीता मातीचे ढिगारे टाकण्यात आले. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्याने या धिगाऱ्यावरील माती रस्त्यावर येत आहे. पावसात घसरून तर पाऊस नसताना प्रचंड धुळीचे साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत आहे. national highway construction accident

    जीव मुठीत घेऊन प्रवास

    नुकत्याच झालेल्या पावसात तर भर रस्त्यात चिखल होऊन अनेकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागला. या मार्गावरून नेहमीच प्रवश्याना तारेवरची कसरत करावी लागत असुन वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा अनेकांना प्राणाला मुकावे लागणार असल्याची भिती प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

    पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोअं. नरेंद्र वाकडे करीत आहे

  • चंद्रपुर जिल्ह्यात दुर्दैवी घटना

    News34 chandrapur

    बल्लारपूर (रमेश निषाद)

    बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी चॉकलेट घेण्यासाठी दुचाकी मोपेडवरून घरातून निघाली होती.

     

    बामणीहून राजुरा येथे जात असताना , दुचाकीचा तोल गेल्याने वाहन वर्धा नदीच्या पुलावरून खाली पडले. या घटनेत गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या मुुुलाचा जीव वाचला.. निरागस बाळ रात्रभर आईच्या मृतदेहा शेजारी रडत राहिले.

    आज पहाटे पाच वाजता पुला खालून मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबीयांना ऐकू आल्याने त्यांनी खाली जाऊन पाहिले असता सुषमाचा मृतदेह शेजारी लहान बाळ रडत असताना आढळले. त्या चार वर्षाच्या मुलालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

     

    बालकावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी सुषमा काकडे यांना मृत घोषित केले.

    महिलेने आत्महत्या केली की काही घात झाला याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत. महिलेचा पती हा कर्मचारी पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत आहे.