चंद्रपूर/ताडोबा ५ डिसेंबर (News३४) : Tadoba rule violation प्रकरणात गोविंदा असोपा नावाच्या तरुणाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमध्ये वाहन थांबवून खाली उतरला. ड्रोन उडवून रील शूट केली. अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर झाल्याची चर्चा सुरु असून अद्यापही वनविभागाने त्या युवकावर कारवाई केली नाही.
कोर झोनमध्ये सर्रास नियमभंग: काय घडले?
ताडोबा कोर झोनमध्ये वाहनातून खाली उतरण्यास सक्त मनाई. असे असताना सुद्धा गोविंदा असोपा याने परवानगी नसताना गाडी थांबवली. फोटो, व्हिडिओ रील शूट + ड्रोन उडवले आणि अपलोडही केले.
अधिकाऱ्याच्या गाडीचा वापर? वरदहस्ताचा संशय
बफर झोनमध्येही उतरण्यास बंदी, कोर झोनमध्ये हा प्रकार. ताडोबा अधिकाऱ्याची गाडी वापरल्याची चर्चा. वन्यजीवप्रेमींकडून चौकशीची मागणी, असोपा याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ तर नाही अशी चर्चा आता बाहेर आली आहे.
अद्याप गोविंदा असोपा यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. Tadoba rule violation मुळे वन्यजीवांना धोका निर्माण झालं आहे. ताडोबा नियम पहा.
वन्यजीव सुरक्षेसाठी कडक चौकशी आवश्यक
गोविंद असोपा यांच्या विरुद्ध वनविभागाला तक्रार देण्यात आली आहे, वन्यजीवांच्या या क्षेत्रात असोपा यांनी नियमांचे भंग करीत वन्यजीवांची सुरक्षा धोक्यात टाकली आहे, उलट तक्रारदाराला असोपा यांनी धमकी सुद्धा दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
Tadoba safari bus service 2025 : चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पापैकी एक असून जगभरातील व देशातील निसर्ग पर्यटक या वनाचा आणि वन्यजीवांचा आनंद उपभोगण्याकरिता या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये येतात. याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्ग पर्यटकांना अल्प दरामध्ये या वनाचा आनंद घेण्याकरिता वर्ष २०२३ मध्ये क्रुझर सेवा सुरु करण्यात आली होती. पर्यटकांचा ओघ बघता मोहर्ली गेट मार्फत ४ व कोलारा गेट मार्फत ३ अशा एकूण ७ क्रुझर मार्फत कोर क्षेत्रात पर्यटन सेवेकरिता उपलब्ध करून देण्यात आले होते. Chandrapur to Moharli bus service
सदर सेवेमार्फत स्थानिक जिल्ह्यातील निसर्ग पर्यटक, सामान्य नागरिक यांना ताडोबा सफारीचा आनंद मनमुराद मिळत आहे. वर्ष २०२३ ते वर्ष २०२५ पर्यत ५८००० निसर्ग पर्यटकांनी या क्रुझरद्वारे ताडोबा सफारीचा अनुभव घेतला आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून वने व वन्यजीवाविषयी जनजागृती सुद्धा सामान्य नागरीकामध्ये होत आहे हे विशेष.
ताडोबा साठी 40 सीटर बस
सदर उपक्रमाची यशस्वीता बघता चंद्रपूर जिल्हातील पर्यटकांना चंद्रपूर ते मोहुर्ली येथे सकाळी व दुपार सफारी जाणे-येणे करण्यासाठी अडचण जात होती. ही बाब लक्ष्यात घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने तसेच मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुझर पर्यटकांकरिता चंद्रपूर ते मोहर्ली ४० सीटर बस उपलब्ध करण्यात आली असून दिनांक १ जून २०२५ ला मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य, चंद्रपूर यांच्या शुभहस्ते बससेवेचे उद्घाटन पार पडले. Tadoba safari from Chandrapur
सदर बसमार्फत सकाळच्या सफारीकरिता ४.३० वाजता व सफारी पूर्ण झाल्यानंतर सकाळी १० वाजता चंद्रपूर परत येणार त्याचप्रमाणे दुपारच्या सफारी करिता २ वाजता तर परत ७.३० वाजता चंद्रपूर ला पर्यटकांन सोडणार आहे. सदर बससेवा उपसंचालक (कोर) कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर येथून प्रस्थान करणार आहे.
या महत्वपूर्ण प्रंसगी डॉ. जितेंद्र रामगावकर (भावसे) मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच डॉ. प्रभू नाथ शुक्ल (भावसे) वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. या वेळेस श्री. कुशाग्र पाठक, उपसंचालक बफर, श्री. विवेक नातू, सहायक वनसंरक्षक, कोर, श्री. अरुण गोंड, वनपरीक्षेत्र अधिकारी, मोहर्ली, श्री. संतोष थीपे, वन परिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली बफर, श्रीमती. स्वाती महिसकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर बफर तसेच सर्व वन कमर्चारी तसेच चंद्रपूर शहारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
elephant movement news update : चंद्रपूर – ओडिसा वरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेले हत्ती दीड वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहे. पण आता हे हत्ती ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्क्षेत्रात दाखल झाल्याने वनविभागात चिंतेचं वातावरण पसरले आहे. हे हत्ती वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा या गावातून जंगलाचा मार्गे आले त्यानंतर सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात ऐन्ट्री करीत गुंजेवाही जंगल मार्गे कळमगाव गन्ना , कुकडहेटी गावपरिसरातून शुक्रवार सकाळच्या सुमारास प्रवेश करीत हत्तीने ऐन्ट्री घेतल्याने दहशत निर्माण झाली आहे. कळमगाव गन्ना कुकडहेटी गावातून रानटी हत्तीने अवागमन केल्याने काही काळ कुतूहल वाटले असले तरी हत्तीने नागरिकांचा पाठलाग केल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. wild elephant movement
३० मे रोजी गडचिरोली जिल्ह्यातून दोन हत्ती उमा नदी पार करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कुकडहेटी गावात दाखल झाले. त्यानंतर ते कक्ष क्रमांक ८०८, २७०A आणि २७०B मार्गे जंगलाच्या दिशेने रवाना झाले . त्यानंतर काही वेळ त्यांनी नलेश्वर तलावाजवळ खेळण्याचा आनंद घेतला. ३० तारखेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या पायांचे ठसे कंपार्टमेंट क्रमांक ३१९ मार्गे मुख्य गाभा क्षेत्राच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले.
घराबाहेर झोपू नका
वन विभागाकडून ईडीसी सदस्य व स्थानिक ग्रामस्थांना सतर्कतेबाबत जागरूक केले जात आहे. पीआरटी आणि ईडीसी टीम्स या कामात सहभागी करण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा तसेच जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला जात आहे. जंगलात एकटे फिरणे टाळण्याचे तसेच रात्री घराबाहेर झोपू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे. how to stay safe from wild elephants
संपर्कातील इतर वनपरिक्षेत्रांतील कर्मचारी, बचाव पथक व एसटीपीएफचे कर्मचारी हत्तींच्या हालचालींचा मागोवा घेत आहेत. या टीम्सना रात्री पाहता येणारी उपकरणे (नाईट व्हिजन), IR ड्रोन आणि हत्ती हुसकावण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उंच ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
अफवांपासून दूर रहा
सर्व नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास तात्काळ नजीकच्या वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील मानवी वस्त्यांमध्ये का येतात?
जंगल कमी होत असल्यामुळे, अन्नाचा अभाव आणि नैसर्गिक स्थलांतराच्या प्रवृत्तीमुळे हत्ती मानवी वस्त्यांमध्ये येतात.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोणत्या भागांमध्ये हत्तींची हालचाल आहे?
गेवरा, डोंगरगाव, निफंद्रा, मेहा, कळमगाव गन्ना, कुकडहेटी आणि सिंदेवाही या भागांत हत्तींची उपस्थिती नोंदवली गेली आहे.
Tadoba Wildlife Census on Buddha Pournima : चंद्रपूर – सोमवारी 12 मे ला बुध्द पौर्णिच्या रात्री लखलखत्या चंद्रप्रकाशात ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. बफर मध्ये 81 तर कोअर मध्ये 95 मचाणीवरून 245 पर्यटक, अधिकारी, कर्मचारी घेणार निसर्गानुभव घेत प्राणी गणना करणार आहेत. दोन्ही झोनमध्ये वनविभागाने तयारी पूर्ण केली असून पर्यटक व अधिकारी सज्ज झाले आहेत अशी माहिती ताडोबा प्रशासनाने दिली आहे. night wildlife census in Tadoba
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण चंद्र असतो. लख्ख प्रकाश पडतो. ह्या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्टपणे टिपता येतात. त्यामुळे रात्रीचे निरीक्षण सोपे होते. तसेच, उन्हाळ्याचा काळ असल्याने प्राणी जलस्त्रोता जवळ दिसतात, ज्यामुळे त्यांची गणना सोपी होते. त्यामुळेच परंपरागत काळापासून चालत आलेली वन्यप्राणी गणना बुध्द पौर्णिमेच्या रात्री न चुकता म्हणजे उद्या सोमवारी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प देश विदेशात व्याघ्र दर्शनाकरीता प्रसिध्द स्थळ आहे. wildlife counting in Tadoba forest
सोमवारी (12 मे) ला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ताडोबातील बफर व कोअर झोनमध्ये प्राणी गणना पार पडणार आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राणी गणना हा एक निसर्गानुभवाचा कार्यक्रम आहे. बफर झोनमध्ये वन्यप्राणी गणना हि निसर्ग,पर्यटनप्रेमी किंवा अशासकीय संस्था यांचे माध्यमातून केली जाते. या निसर्गानुभवाकरीता ऑनलाईन प्रवेश देण्यात आले असून बफर झोन मध्ये 162 पर्यटनप्रेमींनी नोंदणी केली आहे. Tadoba wildlife census experience
बफरझोन मध्ये ८१ मचाणी
हे पर्यटक निसर्ग अनुभवातून प्रत्यक्ष प्राणी गणना करणार आहेत. ही प्राणी गणना तयार केलेले पाणवठे किंवा नैसर्गिक पाणवट्याजवळ करण्यात येणार. बफरझोन मध्ये 81 मचानी उभारण्यात आल्या आहेत. एका मचानीवर 2 पर्यटक आणि 1 गाईड राहतील. प्रगणनेकरीता आवश्यक साहित्य वनविभागाचे वतीने पुरविले आहे. ताडोबातील बफर झोनमध्ये मोहूर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव व खडसंगी आदी 6 वनपरिक्षेत्रात 162 पर्यटक प्रगणना करणार आहेत. night wildlife census in Tadoba
कोअर झोन मध्ये ९५ मचाणी
तर ताडोबातील कोअर झोन हा अतीसंवेदनशील भाग आहे. त्यामुळे कोअर झोनमध्ये वन्यप्राण्यांची गणना ही ताडोबातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीच स्वत: करणार आहे. याकरीता कोअर झोन मध्ये 95 मचानी उभारण्यात आल्या बसून 183 अधिकारी कर्मचारी सज्ज झाले आहेत. या ठिकाणी पर्यटकांना संधी देण्यात येत नाही. दोन्ही ठिकाणी उद्या सोमवारी सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 12 तास ही प्रगणना होईल. त्यानंतर निसर्गप्रेमींना त्या ठिकाणावरून परत जावे लागेल. तत्पूर्वी या ठिकाणी 16 प्रवेशद्वारावरून निसर्गानुभवाचा आनंद घेणाऱ्या 162 पर्यटनप्रेमींना वनविभाग उद्या सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गणना होणाऱ्या मचाणीच्या ठिकाणापर्यंत पोहचविणार आहे.
बुध्द पौर्णिमेच्या रात्री होणारी वन्यप्राण्यांच्या गणनेतील माहिती फक्त डाटा सकंलन म्हणून करण्यात येते, त्या माहितीच्या आधारे वन्यप्राण्यांची आकडेवारी घोषीत केली जात नाही. गणना करणाऱ्या निसर्गप्रेमींच्या सुरक्षेकरीता वनाधिकारी उपस्थित राहतील. निसर्गप्रेमींना भोजन व अन्य सुविधा स्वत: करावी लागणार आहे.
निसर्गप्रेमीं बघतील याची डोळा याची देही
कडक उन्हाळ्याचे दिवस आहे. चंद्रपूरचा पारा 42 अंशापार गेला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती पाणी पिण्यासाठी पाणवट्याकडे होणार असून निसर्गप्रेमींना हा अनुभव याची डोळा याची देही पाहता येणार आहे. पाणवट्याशिवाय नैसर्गीक पाण्याच्या स्त्रोतांकडेही वन्यप्राणी भटकंती करणार असल्याने पर्यटनप्रेमींना रात्रभर जागून निसर्गानुभवाचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. या निसर्गानुभवाचा खरा उदेश्य म्हणजे वन्यप्राण्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे, वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करणे हा आहे.
Chandrapur जिल्ह्यातील Moharli range tiger death news पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण इरई धरण परिसरात आढळलेल्या वाघाच्या कुजलेल्या मृतदेहामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. Forest patrol दरम्यान सापडलेला हा मृत वाघ अंदाजे १५-२० दिवसांपूर्वी मृत झाला असावा, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या वर्षात आतापर्यंत Chandrapur district मध्ये 8 tiger deaths नोंदवण्यात आल्या असून, यामुळे Wildlife conservation बाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
DNA test for tiger identification साठी मृत वाघाचे नमुने CCMB Hyderabad येथे पाठवण्यात आले असून, सदर वाघीण T-24 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Forest fire wildlife deaths किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे ही घटना घडली का, याचा तपास सुरु आहे. Tiger poaching investigation India या पार्श्वभूमीवर देखील संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.
Moharli range tiger death news : चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे, वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वनविभागाने मृत वाघाची ओळख पटविण्यासाठी DNA हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. चालू वर्षात आतापर्यंत एकूण ८ वाघांचा मृत्यू झाला आहे.
मोहर्ली वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र सीताराम पेठ अंतर्गत येत असलेल्या भामडेळी गावालगत १४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास इरई धरण परिसरात गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना सदर वाघाचा मृतदेह आढळून आला. Tiger carcass found near Irai Dam
याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यावर वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदर वाघ हा वयस्क असून त्याचा मृत्यू १५ ते २० दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज लगावण्यात आला आहे. ३१ मार्च रोजी परिसरातील शेतकऱ्याने शेतातील पुंजने जाळण्यासाठी लावलेल्या आगीमध्ये गवताळ भाग जळालेला होता या आगीत वाघाचा मृतदेह अर्धवट जळालेला असून वाघाचे नखे, दात व हाडे शाबूत आहे. मृतदेहाचे मास सडलेल्या व अळ्यायुक्त होते, या आगीत मृतदेहाला लागलेल्या अळ्या सुद्धा जळून खाक झाल्या. Tadoba tiger reserve incident
पशु वैद्यकीय अधिकारी यांनी वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून नमुने गोळा केले वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी DNA सॅम्पल घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी CCMB हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी संकेत वाठोरे, वन्यजीव सल्लागार सदस्य धनंजय बापट, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रतिनिधी मुकेश भांदक्कर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ कुंदन पौडचेलवार आदींची उपस्थिती होती.
याच परिसरात १६ मार्चपर्यंत नियमितपणे T-२४ व तिचे बछडे दिसून येत होते, बछडे २ वर्षाचे झाल्याने ते वाघिणीपासून स्वतंत्र झाले होते, वाघीण दिसून न आल्याने तिचा शोध सुरु होता, मृत वाघ हि T-२४ वाघीण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकाराची संतोष थिपे करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ८ वाघांचे मृत्यू – वन्यजीव संरक्षणावर गंभीर प्रश्न!
Jatayu Conservation Project चंद्रपूर – 21 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथील बोटेझरी जंगलात राज्यातील जटायु संवर्धनाचा महत्वाचा प्रकल्प साकारण्यात आला होता.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पांढरी पाठ असणारे 10 जटायु पक्षी हरियाणा राज्यातील पिंजोर जिल्ह्यातून आले मात्र नोव्हेंबर महिन्यात 3 जटायू चा मृत्यू झाल्याने वनविभागात चांगलीच तारांबळ उडाली आहे. Jatayu Conservation Project
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरयाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे 10 गिधाड पक्षी रीतसर शासनाची परवानगी घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरीलीज अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते. साधारणत: 3 महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करणार होते मात्र तसे काही झाले नाही. Jatayu Conservation Project
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात सोडलेल्या 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात हरियाणा राज्यातील पिंजोर येथून आणण्यात आलेल्या धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरट्यावर असलेल्ल्या 10 गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडण्यात आली होती. Jatayu Conservation Project
वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे. या गिधाडांची संख्या कमी झाल्याने निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी या अद्यावत तंत्रज्ञानाने अभ्यासातून गिधाडांचे संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार आहेत. Jatayu Conservation Project
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील २१ जानेवारी २०२४ ला जटायु संवर्धन केद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रामध्ये बिएनएसएस (BNHS) या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केद्रातील धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या १० पाढऱ्या पुठ्यांचे गिधाडे (White-rumped vulture) आणण्यात आले होते. त्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री-रिलीज एवेयरीमध्ये (Pre-realise Aviary) तज्ञांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते.
या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतून प्री-रिलीज एवेयरीमध्ये ठेवण्यात आले. या गिधाडांचा मागील ६ महिन्याचा दैनदिन व शुक्ष्म अभ्यास बिएनएसएस (BNHS) संस्थेच्या वैज्ञानिकांनी केला. या सर्व गिधाडांना निसर्ग मुक्त करणे आवश्यक होते.
त्यामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानीकांनी सर्व १० गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस (GSM Transmission Tracking Device) लावले. सदर डिव्हाईस युरोपमधून आयात करण्यात आली होती. Jatayu Conservation Project
सदर जिपीएस लावल्यानंतर काही दिवसांच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करून या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांचे रोजचा दैनदिन हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच या अभ्यासातून गिधाड संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार असल्याने 21 जानेवारी 2024 ला ताडोबातील बोटेझरी जंगलात 10 गिधांडाना सोडण्यात आले. त्यैकी 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरूवारी उजेडात आली आहे.
वनविभागाने मृत गिधाडांचे शव एकत्रित करून शवविच्छेदनासाठी नागपुरात प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ही सर्व गिधाडे पांढ-या पाठीच्या प्रजातीची होती. निसर्गातील स्वछतादूत गिधाडांची संख्या कमी झाली होती. निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.
उद्देश काय होता?
जटायु (गिधाड) हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणा-या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असे. भारतात जटायुच्या 9 प्रजाती आढळतात. सन 1990 मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती पण, आता ती संख्या कमी होऊन केवळ 50 हजारांवर आली आहे. जटायु प्रजाती नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायुंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायु मरण पावतात. जटायुची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्रालाघातक आहे.
Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे.
Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
Tadoba resorts याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व पिडीत अन्यायग्रस्त फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर, रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी भरत नानाजी धोटे, रा. तुकुम, चंद्रपूर यांनी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या मार्फतीने मौजा पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला. ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे फिरण्यास येणाऱ्या लोकांना रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाणे देऊन येणारे प्रतिमहिना मासिक उत्पन्न 7083 रुपये देण्याचे प्रलोभन देऊन प्रत्येक गुंतवणुकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांची एकुण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.
सदर गुन्हयातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता तसेच नमुद आरोपी का कोणास आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172- 273258, 07172-264702 या क्रमांकावर तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. नं. 9359258365) या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
चंद्रपूर – वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या वतीने १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम व कुमार विश्वास यांचे कवी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी सांगितले. Tadoba andhari tiger project
रामगावकर पुढे म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. Sustainable tourism
हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. Wildlife conservation
पर्यटनाला चालना देणे, औद्योगिक विकासाला चालना देणे या सर्व बाबी वन्यजीवांच्या अधिवासांचे संरक्षण सुनिश्चित करते, असे ते म्हणाले. Tadoba tiger
या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
निसर्ग प्रश्नमंजुषा. पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे.
कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ. रामगावकर यांनी दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर – राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे ओळख आहे, वर्ष 2023 मध्ये ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ठाकूर बंधूनी ऑनलाइन तिकीट विक्री च्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती, मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारी च्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. Tadoba tiger project
छत्रपती संभाजी नगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावसकर यांनी जून 2023 ला बावसकर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयुज कडुकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च महिन्यात केयुज कडुकर यांच्या फोन पे वर बावसकर यांनी तब्बल 25 हजार 500 रुपये, 27 मार्च 3 हजार रुपये व 14 एप्रिलला 10 हजार 400 रुपये असे एकूण 38 हजार 900 रुपये पाठविले होते. Jungle safari
काही अपरिहार्य कारणामुळे बावसकर हे ताडोबा सफारी साठी येऊ शकले नाही, बावसकर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडुकर यांच्यासोबत सम्पर्क साधला आधीचे पैसे कडुकर यांचेकडे जमा होते, त्यांनतर बावसकर यांनी नोव्हेंबर 2023 ला 5 हजार फोन पे द्वारे कडुकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024 ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. Online booking
27 जानेवारीला बावसकर कुटुंब हे सफारी साठी ताडोबा येथील मोहरली गेटजवळ आले असता त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याला बुकिंग चे तिकीट दाखविले असता कर्मचाऱ्यांनी ते बोगस असल्याचे सांगितले, आपली फसवणूक झाली असे बावसकर यांच्या लक्षात आले, त्यांनी तात्काळ याबाबत दुर्गापूर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता काही तासात आरोपी केयुज कडुकर ला अटक करण्यात आली.
पोलीस तपासात कडुकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांचीसुद्धा अश्याच प्रकारे फसवणूक केली होती, फिर्यादी बावसकर व वाजपेयी यांची कडुकर यांनी बुकिंग च्या नावाखाली तब्बल 66 हजार 400 रुपयांनी फसवणूक केली, पोलिसांनी आरोपी कडुकर यांच्यावर कलम 420, 66(ड) व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अनव्ये गुन्हा दाखल केला.
याबाबत वनविभाग सध्या काही बोलायला तयार नाही, मात्र आरोपी केयुज कडुकर यांचे 5 वर्षांपूर्वी ताडोबा येथे होम स्टे होते, मात्र त्यांच्या बोगस कामामुळे वनविभागाने कडुकर यांचे होम स्टे बंद केले होते, त्यांनतर सुद्धा सफारीसाठी आलेल्या पर्यटकांशी ओळखी करीत पुन्हा ताडोबा मध्ये यायचं असेल तर मला सम्पर्क करा मी सफारी बुकिंग करतो असे दर्शवायचा.
सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसरपे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.
चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.
ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई केली, त्यांनतर ते गेट जवळील कवठाच्या झाडाजवळ गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पर्यटकांसमोर फरफटत नेत हनवते यांच्यावर हल्ला करीत ठार केले.
5 ते 6 महिन्यांपूर्वी हनवते हे कंत्राटी कर्मचारी म्हणून निमढेला गेटवर रुजू झाले होते, हनवते यांचा मुलगा रणजित हनवते ताडोबा अभयारण्यात गाईड चे काम करतो.
सकाळच्या सुमारास जंगल सफारीची सुरुवात असताना पर्यटकांसमोर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.