Tag: जिल्हा परिषद शाळा

  • parent teacher meeting in ZP schools । जिल्हा परिषद चंद्रपूरचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    parent teacher meeting in ZP schools

    parent teacher meeting in ZP schools : चंद्रपूर, दि. 12 : आपल्या पाल्याच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा अधिकार प्रत्येक पालकांना आहे. विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यात समन्वय राहण्यासाठी पालकसभा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालक सभा आयोजित करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प सनियंत्रण कक्षाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत जिल्ह्यातील शैक्षणिक सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नूतन सावंत, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, राजेश पाताळे,  जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, अधिव्याख्याता वैशाली येगलोपवार, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गटशिक्षणाधिकारी व सर्व विषय सहायक उपस्थित होते.

    एका आठवड्यात पालकसभा

    पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय रहावा व पालकांना आपल्या पाल्याची प्रगती व अडथळे यांची माहिती व्हावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा झाल्यावर एका आठवड्यात पालकसभांचे आयोजन करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शाळेत घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण पालकसभेत पेपर दाखवून देण्यात येणार आहे. या पालकसभा 31 ऑगस्ट व 31 नोव्हेंबर 2025 तसेच 31 जानेवारी व 31 एप्रिल 2026 ला घेण्यात येणार आहे. parent teacher coordination for student progress

    पालक सभा वर्ग स्तरावर आयोजित करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी आपल्या तालुक्यात होणाऱ्या पालकसभांचे नियोजन करतील. संपूर्ण जिल्ह्यातील पालकसभेत सुसूत्रता राहावी, यासाठी जिल्हा स्तरावर सूचनापत्रक निर्गमित करण्यात येईल. पालक सभेचे आयोजन प्रभावी पद्धतीने होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेच्या भेटीचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

  • first day of school activities । 🥳 शाळेचा पहिला दिवस झाला खास – लेझीम, शिवगर्जना आणि स्वागत समारंभात रंगत!

    first day of school activities

    first day of school activities : चंद्रपूर, दि. 23 : ‘महाराज, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा, विजय असो…विजय असो…विजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, दाताळाच्या सरपंचा सुनिता देशकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, शाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकर, शिक्षिका सुनिता पावडे, वंदना वनकर, अर्चना चिंतावार, शिक्षक राजू लांजेकर, केशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. pm shri schools facilities

    चंद्रपूर पोलीस दलातील बदल्या, महिला पोलीस निरीक्षकांना साईड पोस्टिंग

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. त्याचे महत्व जीवनभर असते. शिक्षणामुळेच स्वत:चा, कुटुंबाचा तसेच सामाजिक, आर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होते. सर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा शासनाचा मानस आहे.

    pm shri schools facilities

    जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, जेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहील. आजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थी घडला तरच देश घडेल. शाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करा, तरच मोठ्या पदावर पोहचाल, असे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. district collector school visit news

    कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्वाची क्षणचित्रे :

    1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके आणि गणवेश वाटप.

    शाळेविषयी माहिती :

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.ओ. मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्ही, विज्ञान प्रयोगशाळा, स्टेम लॅब, गार्डन आदी सोयीसुविधा आहेत.

  • Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    Alcoholic Teacher : ओ गुरुजी तुम्ही दारू पिऊन आले, नो नाय नेव्हर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी नुकतेच मद्यधुंद मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भयानक सवयीबद्दल नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. मुख्याध्यापक श्री मेश्राम आणि सहाय्यक शिक्षक श्री व्यंकटी भदाडे हे वारंवार मद्यधुंद अवस्थेत शाळेत येताना दिसले आहेत, त्यामुळे शाळेतील समाजात खळबळ उडाली आहे. Alcoholic teacher

     

    अतिमद्यप्राशन केल्याने सहाय्यक शिक्षक बेशुद्धावस्थेत कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या वागणुकीचा शाळेच्या शैक्षणिक वातावरणावर होत असलेल्या नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थी आणि पालक अतिशय त्रस्त आहेत. School environment

     

    शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याने, शिक्षकांच्या आचरणावर दारूचा प्रभाव पाहणे निराशाजनक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या, बिडीचे बंडल आणि खर्रा घेऊन साक्ष दिल्याची नोंद केली आहे, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता आणखी वाढली आहे. Education department

     

    परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

    आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. विद्यार्थ्यांचे कल्याण आणि शैक्षणिक प्रगती सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये अल्कोहोलच्या गैरवर्तनाच्या समस्येवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. Asapur zilla parishad highschool

     

    जिवती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प.उच्च प्राथमिक शाळा आसापूर येथील मुख्याध्यापक मंगलदास मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भदाडे यांनी १६ फेब्रुवारी शुक्रवारी शाळेत दारूच्या नशेत बेधुंद होऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार विद्यार्थी व पालकांनी उघडकीस आणत त्यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडे २० फेब्रुवारी ला तक्रार दाखल करून दारूच्या नशेत शाळेत झिंगाट होऊन आलेल्या मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांला निलंबित करण्याची मागणी केली होती. Alcohol abuse

     

    त्यामुळे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांना विदाऊट पे करुन कारणे दाखवा नोटिस बजावत या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात दोन शिक्षकांना डेप्यूटेशवर देण्यात आले आहेत.आसापूर येथील पालकांनी दिलेल्या
    तक्रारीवरून २२ फेब्रुवारी गुरूवारी शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानराज आवारी,व विस्तार अधिकारी रामा पवार यांनी येथील मदतनीस व पालकांचे एकत्रित बयाण नोंदविले आहे.या संदर्भातील चौकशीचा अहवाल दोन दिवसांत वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • Teacher Recruitment : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वपूर्ण मागणीला मिळाले यश

    Teacher Recruitment : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वपूर्ण मागणीला मिळाले यश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त पदांवर शिक्षक भरती करीता 21678 पद भरतीची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. Teacher recruitment

     

    राज्यातील अनेक शाळांत इंग्रजी, गणित, विज्ञान यासह अनेक विषयाचे पदे रिक्त होती. यामुळे विज्ञार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. शिक्षक भरती तात्काळ व्हावी म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठविला. त्यासोबतच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. षिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेऊन शिक्षक भरती तात्काळ घेण्याची मागणी केली होती.

     

    त्यांच्या मागणी ला यश प्राप्त झाले असून राज्यातील 34 जिल्हा परिषद शाळेत 12522, 18 मनपातील शाळेत 2951, 80 नगर परिषद/नगर पालिकेतील शाळेत 477 तसेच राज्यातील 1123 खासगी अनुदानीत शैक्षणिक संस्थांमधील शाळेत 5728 रिक्त पदांची जाहीरात पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध झाली असून शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मधील उर्तीण उमेदवारांना प्राधान्य क्रम दाखल करण्यासाठी संदेश प्राप्त झाले आहे. Mla pratibha dhanorkar

     

    या प्राधान्य क्रमाच्या आधारे लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया पुर्ण होणार आहे. सदर भरती प्रक्रियेत सध्या 70 टक्के रिक्त जागांवर भरती होणार असून उर्वरीत 30 टक्के रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात याकरीता पाठ पुरावा करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे. सदर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने अनेक शिक्षक पात्रता परिक्षा उमेदवारांनी आमदार प्रतिभाताई यांचे आभार आहे.

  • विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    विद्यार्थीच देशाचा खरा कणा: अफसान सय्यद

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आज देशाला गरज आहे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांची, जो आपल्या नावासह देशाचे नाव उज्ज्वल करेल. विद्यार्थीच हा देशाचा कणा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या बल्लारपूर महिला तालुका अध्यक्ष अफसान सय्यद यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. मा.श्रीमंती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तसेच चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

     

    बल्लारपूर येथील पळसगाव, कोर्टीमक्ता, कवडजई, किन्ही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये नोटबुक वाटप करण्यात आले.

     

    पुढे बोलताना ते म्हणाले आज आपल्याला सामाजिक कार्यासह सर्व क्षेत्रात प्रगती करावीच लागेल. त्याशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थी वर्गाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांचे पालन करून समोर गेले पाहिजे. शिका, संघटित रहा, वेळ पडल्यास संघर्ष करावे लागल्यास करा. जोपर्यंत आपण ध्येय ठेऊन काम करत नाही, तोपर्यंत आपण काय करतो याला महत्त्व नाही. म्हणून समाजात वावरताना कोणता तरी उद्देश समोर ठेऊनच ध्येय प्राप्त करावे लागेलच. विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात भेदभाव न करता प्रगती केली पाहिजे.

     

    यावेळी बल्लारपूर काँग्रेसचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गोविंदा पाटील उपरे, बल्लारपूर काँग्रेस महिला विभागाच्या तालुका अध्यक्ष अफसान सय्यद, कोर्टीमक्ताचे सदस्य मनोज सोयाम, सामाजिक कार्यकर्ते महेश थेरे, वर्षा भोयर, मंदा मडावी, मुख्याध्यापक शंकर यादव, मानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक दहेलकर, शिक्षिका पुष्पा आडे, रत्नमाला मोकासी, शालिनी गावंडे, आलम सर, वनिता आलाम, विलास गवारे, सय्यद, अर्चना धनराज डोंगे, विनोद गवारे, सुनील कोरे, अजय धोतरे, कवळजई जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नासिर खान, अरविंद सुरजगडे, सिद्धार्थ उंमरे, रविशंकर कोडाम, दिनेश केशकर, ऋषी आलम, पुणे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शुभांगी गाजरलावर, किन्हीचे माजी सरपंच वासुदेव येरगुडे, शिक्षक भोजराज चंदेलवार, तसेच शिक्षक, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

     

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

     

    सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

     

    याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

     

    अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

     

    सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

     

    चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

  • दारूच्या नशेत झिंगाट असलेले शिक्षक जेव्हा शाळेत येतात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा जूनासुरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असणारा शिक्षक जी एन. कुळमेथे हा शिक्षक चक्क दारू ढोसून कर्तव्यावर आला असल्याचे प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नव्हते. असे भेट देनाऱ्यानी सांगितले.

     

    याबाबतची माहिती मुल पंच्यायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मोबाईल वर देण्यात आली असून दारूच्या नशेत असणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून ज्ञान दानाचे कार्य करणारा शिक्षक लहान विद्यार्थ्यांना काय घडवणार आणि विद्यार्थी सुद्धा अशा शिक्षकाकडून कोणत्या ज्ञानाची अपेक्षा करणार अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये केली जात असून पोलिस व प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

     

    याबाबत गट विकास अधिकारी यांनी केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना चौकशी करीता पाठविले असून चौकशी अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सांगितले.