Tag: कोळसा खाण

  • Tadoba Women Facility Center । ताडोबात महिलांसाठी 6 सुसज्ज सुविधा केंद्रांचा शुभारंभ

    Tadoba Women Facility Center

    Tadoba Women Facility Center : चंद्रपूर : दिनांक १८ जुलै २०२५ रोजी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (TATR) एकूण सहा ठिकाणच्या महिला सुविधा केंद्रांचे उद्घाटन गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते आभासी माध्यमातून संपन्न झाले. हे उद्घाटन मुंबई येथे पार पडलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण फाउंडेशनच्या शासकीय मंडळाच्या बैठकीस संलग्न होते. tadoba tiger reserve women empowerment initiative

    चंद्रपुरातील बोगस पत्रकार

    या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (वन); श्रीमती शोमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (HoFF); श्री एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव); डॉ. प्रभुनाथ शुक्ल, वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, ताडोबा; श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोअर), ताडोबा; आणि श्री सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा यांचा समावेश होता.

    विविध सुविधायुक्त केंद्र

    ही सुविधा केंद्रे ताडोबा (कोअर) विभागीय कार्यालयासह मोहर्ली, कोलारा, कोळसा, ताडोबा आणि कारवा या पाच कोअर विभागातील वन परीक्षेत्रांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायक वातावरण पुरवणाऱ्या या केंद्रांमध्ये कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्तनपानासाठी विशेष जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, विश्रांती क्षेत्र, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यासह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. women facility centers in tiger reserves

    women facility centers in tiger reserves

    हा उपक्रम महिला सशक्तीकरणाकडे आणि सर्व समावेशक व्यवस्थेकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात असून, महिला कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. क्षेत्र संचालक कार्यालयात असेच एक केंद्र यापूर्वीच कार्यरत असून, उर्वरित कार्यालयांमध्येही अशा सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

  • Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

    Landslide : चंद्रपुरात भूस्खलन, कारण काय?

    landslide चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 1 ऑगस्टला खळबळजनक घटना घडली, शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील एका घरात भुस्खलन झालं, घरात 20 ते 25 फुटाचा खड्डा पडला, त्या खड्ड्यात महिला व एक कुत्रा पडल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.

    Landslide रयतवारी कॉलरी परिसरातील आमटे ले आऊट येथे राहणारे शिवणकर कुटुंब बाहेरगावी गेले होते, 2 दिवसांनी म्हणजेच 1 ऑगस्टला ते घरी आले, घराचे दार उघडताच त्या खड्ड्यात महिला कोसळली.

    त्यानंतर सदर बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली तो पर्यंत त्या खड्ड्यात सीडी लावत महिलेला बाहेर काढण्यात आले, पुढील उपचारासाठी महिलेला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

    राजकीय – खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला कांग्रेसने मारले जोडे

    मागील 10 दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी मुळे सदर घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या संपूर्ण घर खाली करण्यात आले असून त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड चे अधिकारी, पोलीस अधिकारी व आमदार त्याठिकाणी दाखल होत नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

    घटनेचे कारण काय?

    चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीने वेढलेला आहे, जिल्ह्यात विविध भागांत कोळसा खाणी आहे, विशेष बाब म्हणजे ज्याठिकाणी ही घटना घडली ती सुद्धा वेकोलीच्या बंद असलेल्या रयतवारी कोळसा खाणी जवळील भागात आहे.

    Wcl द्वारे अंडर ग्राउंड कोळसा खाणीमधून कोळसा बाहेर काढल्यावर त्याठिकाणी माती टाकावी लागते मात्र तसे होत नाही, आवश्यकतेनुसार तशी प्रक्रिया केल्या जात नाही त्यामुळे अशी घटना घडली. विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात वेकोली च्या खाणी बंद अवस्थेत आहे, त्याठिकाणी काहीजण फायदा घेत वेकोलीच्या जागेची विक्री करतात, अवैधरित्या अश्या विक्री होत असल्याने वेकोली मात्र झोपेचं सोंग घेऊन राहते, लालपेठ भागात खाणीचा विस्तार सुरू आहे मात्र अजूनही त्या भागातील नागरिकांना हटविण्यात आले नाही, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुद्धा जैसे थे आहे.

    महत्त्वाचे : पत्रकारांच्या मुलाचा लंडनमध्ये सन्मान

    Landslide चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक शहरात 26 ऑगस्ट 2022 रोजी आमराई वार्डात अशाच प्रकारे एक घर अशाच घटनेत तब्बल 70 फूट खाली खचले होते. कोळसा काढून पोकळ झालेला भूभाग सुयोग्य पद्धतीने पुन्हा रेती भरून बुजविल्या न गेल्याने अशा पद्धतीने भूभागात खड्डे पडण्याचे प्रकार होत असतात. आता वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडचे तज्ञ यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरमालक सुरेश शिवणकर यांनी प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

    आमदार पोहचले घटनास्थळी

    चंद्रपूर रय्यतवारी कॉलरी भागात अचानक भूस्खलन झाल्याने एका कुटुंबावर संकट कोसळले आहे. दोन दिवस बाहेरगावी राहून घरी परतलेल्या शिवणकर कुटुंबाच्या घरात २० फूट खोल खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.
        यावेळी तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, रामनगर ठाणेदार सुनिल गाडे,अजय जैस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रकात बातव आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    योजना : लाडकी बहीण योजनेचा अर्ज असा करा एडिट


       घरातील सुनिता नामक महिला  दरवाजा उघडताच अचानक खड्ड्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ मदत करत शिडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, शिवणकर कुटुंबावर ही घटना अत्यंत भीषण असल्याने त्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली.
      गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे.   घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.
    शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोलि वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने पिडीत कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही सूचना आमदारांनी केली आहे.

  • Coal Mine Blasting : चंद्रपुरात नागरिकांच्या घरावर दगडफेक? नागरिक दहशतीत

    Coal Mine Blasting : चंद्रपुरात नागरिकांच्या घरावर दगडफेक? नागरिक दहशतीत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लालपेठ भागातील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहे. 5 फेब्रुवारीला अचानक नागरिकांच्या घरावर दगडफेक होऊ लागली, अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिक घाबरले, वेकोलीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घरावर दगड कोसळू लागले होते. Chandrapur coal mine

     

    लालपेठ क्रमांक 4 मध्ये लालपेठ ओपन कास्ट कोळसा खाणीजवळील वस्तीमध्ये रोज होणाऱ्या ब्लास्टिंग ने नागरिकांच्या घराचे नुकसान होत आहे.

     

     

    5 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास झालेल्या ब्लास्टिंग च्या तीव्रतेने चक्क दगड नागरिकांना लागले, या भागातील नागरिक वेकोलीच्या दहशतीखाली आहे. Black gold city

     

     

    5 फेब्रुवारीला ब्लास्टिंग मुळे नागरिक रस्त्यावर उतरले त्यामुळे या भागात वाहतूक करणारे ट्रक च्या रांगा लागल्या होत्या काही काळ या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु वेकोली तर्फे एकही अधिकारी त्याठिकाणी न आल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप्त व्यक्त केला, भविष्यात पुन्हा अशी घटना झाली तर आंदोलन करू असा इशारा स्थानिकांनी दिला.

     

     

    वेकोली प्रत्येकदा आपली बाजू पुढे ठेवत आम्ही ब्लास्टिंग साठी आधुनिक तंत्र वापरतो असे सांगतो मात्र प्रत्यक्षात स्थिती ही वेगळी आहे.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. याची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला. उर्वरीत मागण्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला.

     

    याप्रसंगी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थांक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक राजेश महाजन, युवा नेते राजू डोंगे, प्रवीण बांदुरकर, अजित फाळके, विजय खंगार, मंगेश मंगाम, शशिकला इंगोले, गीता आडे, ललिता आत्राम, सरिता सुर, कविता सुफी, प्रमोद नगोसे, संदीप कुमरे, महेश मोरे, प्रशांत झाडे, लता इंदुरकर,गोरू थैम, तन्वीर शेख, छोटू धकाते, सचिन पचारे, शिवा कोंबे व परिसरातील ग्रामपंचायत मा.सरपंच, उपसरपंच,सदस्य व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते.

     

    यावेळी कंपनीकडून मिळणारे पुनर्वसन अनुदानात वाढ करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधीत गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) गावातील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऑप्शन फार्म भरतेवेळी घराच्या मिळणाऱ्या मोबदल्याचे विवरण देण्यात यावे व घराचे दर फलक लावण्यात यावे, गावातील पुनर्वसन होणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यासारखी 750 दिवसाची कृषीमजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना नौकरी किंवा नौकरी ऐवजी एकमुस्त 15 लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कंपनी मधील कार्यरत कामगारांना HPC वेतन लागू करण्यात यावे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा, कर्नाटका एम्टा माईन्स ते कोंढा गावालगत असणाऱ्या कोल साईडींगमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे लगतच्या गावांतील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच कोळशाच्या दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीमुळे लगतच्या शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

     

    ज्याप्रमाणे जिएमआर व वर्धा पॉवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांची कृषी विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जी नुकसान भरपाई झाली ती दिली. त्याच धर्तीवर कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दयावी व भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या, या कंपनीने प्रकल्पबाधीत गावांच्या विकासाकरिता आजपावेतो कुठलाही सिएसआर निधी खर्च केला नाही.या सीएसआर निधीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना स्कूल बस देण्यात यावी या मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली.

     

    तसेच पीकनुकसान भरपाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने रोडचे मजबुतीकरण, धुळीवर नियंत्रण, ट्रक वाहतूक ओव्हरलोड न करणे व सुरक्षित करणे, परिसरातील ग्रामपंचायतींना सुमारे १ कोटींचा सामाजिक दायित्व निधी देणे, कोंढा कढोली व चोराळा येथील स्मशानभूमी निर्माण करणे, एम्टा मधील कार्यरत कंपन्यांच्या कामगारांची सविस्तर लिस्ट संपूर्ण माहितीसह देणे, त्यात स्थानिकांना प्राधान्य देणे, सायडिंग जवळच्या १२ व्यक्तींना सेवेत सामावून घेणे, ९ आश्रित विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना रोजगार देणे, शेतकऱ्यांसाठी ओव्हर बर्डन चा वापर करून अप्रोच रोड निर्माण करणे, २००५ ते २०१४ पर्यंत प्रलंबित देयकांसाठी भुगतान करणे, तसेच प्रकल्पबाधित गावांचे सरपंचांसोबत मासिक बैठक घेणे त्यात स्वतः गौरव उपाध्याय किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहतील या सर्व बाबी स्वीकृत केल्यावरच आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.