Tag: आमदार प्रतिभा धानोरकर

  • अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा थाटात समारोप

    News34 chandrapur

    वरोराः जयहिंद क्रिडा मंडळ, वरोरा द्वारा आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप रविवार दि. 21/01/2024 रोजी कॉटन मार्केट वरोरा येथे पार पडला. या स्पर्धेत पुरुष गटात हरियाणा राज्याचा संघ तर महीला गटात मुंबई येथील संघ अव्वल ठरला.

     

    वरोरा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत देशभरातून अनेक संघातून हजेरी लावली होती. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात साई सोनिपत हरीयाणा या संघाने ठाणे महानगरपालिका, ठाणे या संघावर विजय मिळवला. तर मुर्तीजापूर संघाला पुरुष गटात तृतीय पारितोषिक मिळाले.

     

     

    महिला गटात मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाने एमएच स्पोर्टिंग क्लब, पुणे या संघाचा पराभव करुन अव्वल स्थान प्राप्त केले. तर विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. पुरुष गटात विजेत्या ठरलेल्या साई सोनिपत हरियाणा संघाला एक लाख एक्कावन हजार रुपये रोख व चषक तर उपविजेत्या ठरलेल्या ठाणे महानगरपालिका, ठाणे संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच तृतीय पारितोषिक मिळालेल्या मुर्तीजापूर संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.

     

    तसेच महिला गटात विजेता ठरलेल्या मुंबई महानगरपालिका, मुंबई संघाला एक लाख रुपये रोख व चषक तसेच उपविजेत्या ठरलेल्या एमएच स्पोर्टींग क्लब, पुणे संघाला एक्काहत्तर हजार रुपये रोख व चषक तसेच तृतीय विजेत्या ठरलेल्या विदर्भ क्रिडा मंडळ, मोर्शी या संघाला एक्कावन हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत चेतन साहू हरियाणा याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून बुलेट गाडी देण्यात आली.

     

     

    तर उत्कृष्ट चढाई बिल्ला(मुर्तीजापूर), उत्कृष्ट जंपर म्हणून आवेद पठाण (ठाणे), उत्कृष्ट पकड म्हणून ढोलू (हरियाणा) यांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली. महिला गटात संजना भोई हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून इलेक्ट्रीक स्कुटर देऊन सन्मानीत करण्यात आले. तर पुजा पाटील हिला उत्कृष्ट चढाई, वैष्णवी मेश्राम हिला उत्कृष्ट जंपर तर राखी घानोडे हिला उत्कृष्ट पकड म्हणून सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

     

    यावेळी मंचावर आमदार चषकाच्या आयोजिका आमदार प्रतिभाताई धानोरकर या सोबत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रताताई ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, चित्राताई डांगे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, विलास टिपले, प्रशांत काळे, मिलिंद भोयर, सुरज गावंडे, प्रशांत भारती, शाकीर मलक, रमजान अली, मदिन कुरेशी, राजू चिकटे, प्रमोद मगरे, बसंत सिंह, मनोज चिंचोलकर यासह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष प्रविण काकडे, सचिव कासीफ खान व त्यांच्या चमून अथक परिश्रम घेतले.

  • खेळातून भविष्याचा वेध घ्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    खेळातून भविष्याचा वेध घ्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    वरोरा – कबड्डी खेळ हा मातीतला खेळ असून शारीरिक विकासासोबतच भविष्याचा वेध घेण्याची ताकद या खेळात असून या खेळाकडे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बघितले पाहिजे असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.

     

     

    वरोरा येथे जय हिंद क्रीडा मंडळ द्वारा आयोजित स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिनांक 19 जानेवारी 2024 कॉटन मार्केट ग्राउंड वरोरा येथे पार पडला. या प्रसंगी बोलतांना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी  म्हटले की, प्रो कबड्डी मुळे खेळाडूंना एक नवीन व्यासपीठ मिळाले आहे प्रत्येक खेळातून शारीरिक विकासासोबतच भविष्याचा वेध घेतल्या जाऊ शकते यामुळे भविष्यात व्यसनाच्या आहारी न जाता खेळाकडे वळल्यास आयुष्य सुखकर होऊ शकते.
    स्व.खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सुरू केलेल्या या कबड्डी स्पर्धा कधीही खंड पडू न देता पुढेही कशा सुरू राहील या यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे.
    यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवाजीराव मोघे, प्रमुख अतिथी आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार वामनराव कासावार, उप विभागीय अधिकारी शिवनंदा लांगडापुरे, योगेश कौतकर तहसीलदार वरोरा, अनिकेत सोनावणे तहसीलदार भद्रावती, अमोल काचोरे, पोलिस निरीक्षक वरोरा, विपीन इंगळे पोलिस निरीक्षक भद्रावती,सपकाळ साहेब, गट विकास अधिकारी भद्रावती, मुंडकर साहेब गट विकास अधिकारी वरोरा, विलासभाऊ टिपले, मिलींद भोयार, सूर्यकांत खनके संगीताताई अमृतकर, गोपाल अमृतकर,या सोबत असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी, व प्रेक्षकांची उपस्थिती होती.
  • शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    भद्रावती:- भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात विखुरली असून शासनातर्फे त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.

     

    महाराष्ट्र शासनाच्या निर्देषानुसार विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जानेवारी 2024 रोजी स्वागत सेलिब्रेशन येथे वार्षिक आमसभेचे आयोजन पंचायत समिती भद्रावती यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी तालूक्यातील शासनाच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

     

    शासनातर्फे देण्यात येणारा निधी व त्यातून होणारे विकास कामे वेळेवर झाले पाहिजे यासाठी या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहचतो कि नाही याचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांना वेळेवर मिळाला पाहीजे. तसेच शेवटच्या घटकांना देखील शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याकरीता आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.

     

    यावेळी त्यांनी सन 2021-2022 व 2022-23 या दोन वर्षातील चालू असलेल्या विकास कामांवर देखील चर्चा केली. त्यासोबतच गावातील सरपंच व नागरीकांना येण्याऱ्यां समस्यांचे निराकरण तातडीने करावे असे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

     

    या सभेच्या बैठकीला मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना सांळुके, गट विकास अधिकारी सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी सावसाकडे तसेच भद्रावती तालुका शहर कॉग्रेस चे अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजणे, पंचायत समिती माजी सभापती प्रविण ठेंगणे, सुधीर मुळेवार, पंचायत समिती माजी उपसभावती भोजराज झाडे, सरंपच संघटनेचे अध्यक्ष नयन जांभुळे, राजु डोंगे, महेश मोरे यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, इत्यादी पदाधीकारी व शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

  • मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

    मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करू – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मूल-पोंभुर्णा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांचा निराकरण करण्याचा विश्वास व्यक्त केला.

     

    दि. 12 जानेवारी रोजी, नांदगाव (घोसरी)येथे विनोद अहिरकर यांचा महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “मूल-पोंभुर्णा तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न असतील, ते मी सर्वप्रथम शासनाच्या निदर्शनास आणून देईन. त्यानंतर, त्या प्रश्नांचा निराकरण करण्यासाठी मी माझी सर्वतोपरी मदत करेन. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करत असताना, त्यांना कुठेही गरज लागली, तर त्यांची एक मोठी बहीण म्हणून मी कायम त्यांच्यासोबत आहे.”

     

     

    या सत्कार समारंभाला महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद भाऊ दत्तात्रय, बल्लारपूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा सभापती बाजार समिती पोंभुर्णा रविभाऊ मरपल्लीवर, वैशालीताई पुल्लावार, तसेच मुल व पोंभुर्णा तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

     

     

    यावेळी आमदार धानोरकर यांनी, “राज्यातील सध्याच्या परिस्थितीबद्दलही आपण सर्वांनी चिंता व्यक्त केली पाहिजे. दोन वर्षांच्या कोविड काळात अनेक लोकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. भाजपाची सत्ता आली तेव्हापासून देश मागे जात आहे.”

     

    “संपूर्ण लोकसभा मतदारसंघ हा पोरका झालेला नाही. साहेब जरी गेले असले तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द, त्यांनी बोललेल्या प्रत्येक गोष्टी या सात महिन्याचा कार्यकाळात मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या भागात सुद्धा कामाच्या संदर्भात कुठला विषय असेल तर आपण नक्की माझ्यापर्यंत या. चंद्रपूरला सुद्धा आमचे जनसंपर्क कार्यालय आहे. तिथपर्यंत माझ्या माध्यमातून जेवढ्या कामाचा पाठपुरावा करता येईल, तेवढे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन,” असेही आमदार धानोरकर यांनी आश्वासन दिले.

  • चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कांग्रेस पक्षातर्फे 8 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभा 2019 च्या निवडणुकीत कांग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजय प्राप्त केला होता, मात्र वर्ष 2023 ला खासदार धानोरकर यांच्या निधनाने हा मतदार संघ रिकामा झाला, आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाने चाचपणी सुरू केली आहे.

     

    कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते, कांग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याकडे एकूण 8 अर्ज प्राप्त झाले असून आज सर्व अर्ज नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.

     

    इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, शिवा राव, शंतनू धोटे, दिनेश चोखारे, डॉ.हेमंत खापणे दिलीप माकोडे यांचा समावेश आहे.

     

    सध्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कांग्रेस पक्षाकडून आमदार प्रतिभा धानोरकर हे प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.

  • कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    कांग्रेसने केली लोकसभा समनव्यक पदांची यादी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लोकसभा निवडणूक अवघ्या 2 ते 3 महिन्यात लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

     

    राज्यातील एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अवकाळी निधनाने आता कोण? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले मात्र शेवटच्या क्षणी आमदार प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उभे राहू शकतात.

     

    कांग्रेस महासचिव केसी वेणूगोपाल यांनी राज्यातील लोकसभा समनव्यक यांची नियुक्ती जाहिर केली असून चंद्रपूर लोकसभा समनव्यक पदी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

     

    कांग्रेस पक्षाने अनेक वर्षांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता, मात्र आता कांग्रेस पुन्हा निवडून येणार का? चंद्रपूर जिल्ह्याला पहिली महिला खासदार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर मिळणार काय? हे चित्र लोकसभा निवडणूक नंतर स्पष्ट होणार.

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षात गटबाजीचा सूर आहे, त्या विविध सुराला सतीश चतुर्वेदी कसे जुळवून घेतात याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

  • महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला साद देत अनेक महिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार प्रतिभाताई धानोरकर तसेच महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
    याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संदीप कुमार जी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, शहर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा तालुका अध्यक्ष रवी मरपल्लीवार, जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्ष वैशाली पुल्लावार, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष हेमंत आरेकर, युवा नेते आशिष अहिरकर, अंशुल मोरे यांची उपस्थिती होती.
    यावेळी  शोभा नंदू कुमरे, वैशाली पुल्लावार यांची जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष  पदावर तर छबूताई वामन पावडे, वंदना शत्रुघ्न उईके, किशोरी विकास मशाखेत्री, सुशिला प्रभाकर कुळमेथे, मंगलाताई दादाजी आत्राम, शोभा प्रकाश महाजनवार, प्रेमिला गोविंदा रोहणकर, रिना रंजीत मारबोनवार यांची जिल्हा महिला काँग्रेस महासचिव म्हणून तर संगीता विनायक बुरांडे, रोशना लोंढे, शिल्पा विनोद ठाकरे, प्रिती नरेश भांडेकर, कविता किशोर नंदीग्रामवार, विनता नितेश रायपुरे, नलिनी थेरकर यांची जिल्हा महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
  • घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    घोडाझरी तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

    News34 chandrapur

    चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते मृतकाच्या कुटुंबियांना धनादेश दिले.

     

    वरोरा तालुक्यातील शेगाव येथील जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष , मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष, चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष, संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला असे मृत युवकांची नावे आहेत.

     

    वरोरा तालुक्यातील शेगांव येथील 04 युवकांचा ब्रम्हपुरी तालुक्यातील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात आर्थिक मदत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी वरोरा कृ ऊ बा माजी सभापती राजेंद्र चिकटे, वरोरा पं स. माजी उपसभापती विजय आत्राम, नायब तहसीलदार काळे, मंडळ अधिकारी अजय निखाडे, महादेव कोटकर, चंदूभाऊ जयस्वाल, संजय कोटकर, गोलू वाढई, ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम, प्रभाकर घोडमारे व शेगांव ग्रामस्त उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः एक महिन्याच्या आत मध्ये येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

     

    नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार प्रतिभाताई धानोकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज देणारी आणि शेतकऱ्यांना अडी अडचणीच्या काळात सांभाळून घेणारी बँक आहे. मात्र, याला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अपवाद आहे. सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे .आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत होत्या. परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना, देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या सहा वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरवव्यवहाराचा कळस गाठला आहे. 2023 ला झालेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. बँकेच्या सहा संचालकावर आणि पाच कर्मचाऱ्यावर गुन्हे देखील दाखल केलेले आहे, आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली.

     

    2020 मध्ये देखील बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आरोग्याचे कारण दाखवून पाल्यांना अनुकंपतत्वावर नोकरी दिली. तसेच खरेदी घोळ झाल्याने दोन संचालकांना म्हणजे एकूण सात संचालकावर गुन्हे दाखल झाले. या बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे. 3.97 कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यांनुसर नोटीस देखील बजावल्या गेल्या. बँकेतील सीईओ कल्याणकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेचा पदभार त्यांच्याकडे आहे. रिझर्व बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही. परंतु रिझर्व बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये सीओवर असणाऱ्या दोन गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळांनी लपवली आणि रिझर्व बँक व नाबार्डची यांनी देखील फसवणूक केली. या संदर्भात देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. परंतु त्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या लक्षवेधी नोटमध्ये या बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख केला आहे. त्यात नोकर भरतीचा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, सीईओवर गुन्हे दाखल असतानाही त्यांची नेमणूक, बँकेचा एनपीए वाढणे, बँकेच्या किरायाच्या जागेवर शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे खर्च करणे, संगणक खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करणे, शेतकरी भवनसाठी जास्त वेळ घेणे, शेतकऱ्यांच्या सहकार संस्थांना मतदानाचा अधिकार नाकारणे, शेतकरी कल्याण निधीचा वापर सर्रास करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.

     

    सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या बँकेच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला स्टे उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ नेमले जाईल. त्यावेळी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई केली जाईल.”असे मंत्री म्हणाले.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वळसे पाटील यांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

  • धक्कादायक – चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता

    धक्कादायक – चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता

    news34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये महिलांची काढलेली विवस्त्र धिंड शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी आहे. मात्र, अनेक दिवसाचा कालावधी लोटून अजूनही त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही.”

     

    चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्यात 3500 अधिक 16 ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का?” असा सवाल करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “फेसबुक व्हाट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशा प्रकरणातून महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

     

    “अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा सरस्वती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो त्यामुळे खरच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का असा प्रश्न त्यांनी केला.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लवकरच शक्ति कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.”

    चंद्रपूर येथील कोळसा उद्योगातून एका निष्पाप महिलेची हत्या राजुरा येथे घडली. देखील अशी प्रकरणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.