Tag: मिशन ऑलम्पिक

  • benefits of summer sports training camps । ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवण्याचा उपक्रम – आ. सुधीर मुनगंटीवार

    benefits of summer sports training camps

    benefits of summer sports training camps : चंद्रपूर – जिल्ह्यातील युवक-युवतींना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. बल्लारपूर येथे १ मेपासून सुरू झालेल्या उन्हाळी शिबिरात एकूण १५ खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले असून, समाजभान आणि मूल्यसंस्कारांची जोड देणाऱ्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत.हा ‘समर कॅम्प’ तरुणांना सुपरफिट ठेवणारा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शिबिराच्या समारोप समारंभात केले. youth development through sports India

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सायबर घोटाळ्याची होणार चौकशी

    हे शिबिर स्वर्गीय डॉ. सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत आंबेकर अध्यक्ष, सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर, समीर केने, काशी सिंग, मुन्ना ठाकूर, राजू दारी, संदीप पुणे, सुनील यादव, प्रशांत झांबरे, रोहित तुक्कर आदिंची उपस्थिती होती.

    youth development sports

    ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल

    आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथे युवकांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. चंद्रपूरमधील वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट, बल्लारपूरमधील कॉलरी गेट मैदान, वन अकादमी आणि सैनिकी शाळेतील सुविधा हे प्रेरणादायी ठरत आहेत.स्वातंत्र्यसैनिक वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने म्हाडामध्ये उभारले जात असलेले २५ खेळप्रकारांचे अत्याधुनिक स्टेडियम ‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या दिशेने भक्कम पाऊल ठरेल, असा विश्वासही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    sudhir mungantiwar

    विसापूर क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला देशभरातील २८ राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.समर कॅम्पच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आ. मुनगंटीवार यावेळी अभिनंदन केले.

    महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास उपक्रम


    गरजू मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठ व स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमधून अनेक मुलींना स्वबळावर उभं राहण्याची संधी मिळत आहे.विसापूर येथे ‘आर्चरी सेंटर’ सुरू करण्याचे नियोजन असून, युवक-युवतींनी या क्रीडा व प्रशिक्षण सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

  • चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 26 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन, व्यवस्थापन व कामकाज उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. सदर समित्यांना दिलेली जबाबदारी ओळखून कामे पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सदर समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते.

     

    बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ मेहता आदी उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू, संघ व्यवस्थापक, खेळाडूंचे पालक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत.

     

    आयोजन समितीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट होण्याकरीता संपूर्ण नियोजन करावे. खेळाडूंची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन डेक्सची उपलब्धता ठेवावी. स्पर्धेकरीता येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळांची उपलब्धता ठेवावी. मदत कक्षाद्वारे खेळाडूंना सर्व माहिती उपलब्ध होईल याअनुषंगाने माहिती द्यावी तथा कॉलसेंटर उभारावे. स्वच्छता समितीने परिसर स्वच्छता, भोजनाचा परीसर तसेच निवासव्यवस्थेसह, क्रीडांगणाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. याकरीता बल्लारपूर नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.

     

    जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी डॉक्टरांच्या चमूसह ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवाव्यात. भोजन समितीने खेळाडूंच्या तसेच मान्यवरांच्या भोजनासाठी कुपनची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या खेळाडूंकरीता वाहतूक व्यवस्था तसेच वाहनासाठी पार्किंग व्यवस्था ठेवावी. सुरक्षा समितीने सुरक्षा यंत्रणा अद्यावत ठेवाव्या. वनअकादमी, सैनिक शाळा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या निवास व्यवस्थेच्या तसेच क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सुचना दिल्या तसेच प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत, असेही ते म्हणाले.

     

    या आहेत समित्या:

    आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2036 ला भारतात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 ते 31 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वर्ष 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

     

    स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार दरवर्षी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यंदा 14 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा, 17 वर्षाखालील मुले/मुली पटना बिहार व 19 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ला मिळाला आहे.

     

    याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत आयोजनाबाबत माहिती दिली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की ही स्पर्धा देशातील खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयार व्हावे आमचा मानस आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धेबाबत प्रेरणा मिळेल.

     

    4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 26 डिसेंम्बर ला नोंदणी च्या माध्यमातून होणार असून 27 डिसेंम्बर ला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असून उदघाटन कार्यक्रमात देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 3 हजार खेळाडू, 200 तांत्रिक अधिकारी, पंच, 500 स्पोर्टींग स्टाफ, स्वयंसेवक व जवळपास 500 पालकांचा सहभाग असणार आहे.

     

    आयोजित ऐथलीट खेळांमध्ये हॅमर थ्रो, हाय जम्प, लॉंग जम्प, जेव्हलीन थ्रो असे विविध खेळ होणार आहे.

    आयोजित स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील विविध भागात एलईडी टीव्ही द्वारे होणार आहे.

     

    राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करीत रायगड किल्ल्यापासून ते मंत्रालय पर्यंत व दुसऱ्या टप्प्यात गेट वे ऑफ इंडिया पासून ते चंद्रपूर जिल्ह्यात या मशालीचे आगमन होणार आहे, यादरम्यान रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातून मशालीचे आगमन होत असताना भव्य स्वागत व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     

     

    आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत 20 मैदानी बाबीचा समावेश आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून विविध स्कुटर रॅली, टॉर्च रॅली व शोभायात्रा काढत क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा समावेश करून जिल्ह्यात क्रीडा वातावरण तयार करणार आहे.

     

     

    विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षक व बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मोफत ताडोबा जंगल सफारीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

     

    ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या राज्य व देशातील खेळाडूंची मिशन ऑलम्पिक ची तयारी आहे अशी माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना आयोजनाबाबत समस्या उदभवू नये यासाठी नागपूर एअरपोर्ट, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बस स्थानक वरून बसेसची व्यवस्था, डिजिटल बुक, चॅट बॉट व टोल फ्री क्रमांकची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     

    ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी 10 वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

     

    प्रत्येकाची जबाबदारी

    जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एनजीओ, क्रीडा संस्था व विविध खेळांशी संबंधित लोकांच्या टीम निश्चित करून त्यांची यादी तयार करावी. खेळाडूंना क्रीडांगणावर ने-आण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेससोबतच शाळांच्या बसेस राखीव ठेवाव्यात. तसेच ऑनकॉल वाहने उपलब्ध ठेवावीत. स्टेडियमच्या रंगरंगोटीवर लक्ष केंद्रित करावे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धा केवळ क्रीडा विभागाच्या नाही तर आपण सगळे आयोजक आहोत, या भावनेतून प्रत्येक चंद्रपूरकराने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    राष्ट्रीय स्पर्धा दर्जेदारच होतील -क्रीडा मंत्री संजय बनसोडे

    चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मिशन ऑलिम्पिक 2036 ची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातून होईल, असेही ते म्हणाले.

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कारांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना 1 कोटी रुपये, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंना 75 लक्ष रुपये तर कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना 50 लक्ष रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. तसेच पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर संभाजीनगर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रस्तावित आहे. पुणे येथे ऑलिम्पिक भवनाकरीता पहिल्या टप्प्यात 75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

     

    मेजर ध्यानचंद यांच्या नावाने 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने आता 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.