Tag: तिरंगा रॅली

  • 5 km tiranga rally Chandrapur । देशभक्तीची ज्वाला पेटली! चंद्रपूरमध्ये ५ किमी तिरंगा रॅलीला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    5 km tiranga rally Chandrapur

    5 km tiranga rally Chandrapur : चंद्रपूर – ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी “नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक” या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विविध धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकतेचे दर्शन घडले. tiranga rally in Chandrapur 2025

    चंद्रपूरमध्ये पुराचा इशारा, तातडीने नियोजन करा

    संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर सदर रॅली जय घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. या रॅलीत शहरातील विविध भागांतून तरुण,  विद्यार्थी,  महिलावर्ग,  सामाजिक संस्था, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, देशप्रेम आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता. citizens salute to Indian Army

    Powered by myUpchar

    हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश

    या रॅलीत विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र प्रत्यक्ष साकार झाला. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा संदेश दिला. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, भारतीय जवानांच्या बलिदानामुळे आपण शांततेत जगतो. त्यांच्या सन्मानार्थ आपण कृतज्ञतेने झुकतो. ही रॅली केवळ एक कार्यक्रम नसून चंद्रपूर शहराची राष्ट्रभक्तीची आणि एकतेची ताकद जगाला दाखवणारा संदेश आहे.

    citizen salute to indian army

    कार्यक्रमात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारावले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे देशप्रेमाचे संदेश दिले, तर काही ठिकाणी बॅण्ड पथकाच्या गजरात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्गाच्या वतीने पाणी, शीतपेय, फळांचे वाटप करत आपला सहभाग नोंदविला. या रॅलीत जवळपास २०० सामाजिक संघटना आणि पाच हजार देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.

  • Tiranga Rally । ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशप्रेमाचा महासागर — चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन!

    Tiranga Rally

    Tiranga Rally : चंद्रपूर – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर (indian army) भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नॅशनल सेक्युटीसाठी नागरिक या उपक्रमा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संयोजनातून चंद्रपूर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होणार असून, देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले. Indian army bravery celebration rally

    त्या नरभक्षक वाघिणीचा बछडा अखेर जेरबंद

       सदर पत्रकार परिषदेला ओबीसी नेते अशोक जिवतोडे, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी महापौर अंजली घोटेकर, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सुभाष कासनगोट्टूवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती.

    लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सामील व्हा

    पत्रकार परिषदेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला ठोस आणि चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईमध्ये पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, संपूर्ण देशवासीयांच्या मनात गर्व आणि अभिमानाची लहर उसळली आहे. या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि लष्कराच्या शौर्याला मानाचा मुजरा करणाऱ्या तिरंगा रॅलीचे आयोजन चंद्रपूरमध्ये (chandrapur) करण्यात आले आहे.

    ही रॅली केवळ एक मिरवणूक न राहता, ती देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्कराविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे प्रभावी माध्यम ठरणार आहे. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि मनात मातृभूमीबद्दलचा अभिमान असावा, हीच या रॅलीमागची भावना असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

    Powered by myUpchar

    रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होईल. यानंतर ही रॅली गांधी चौक, जटपूरा गेट मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परत येईल आणि तेथे रॅलीचा समारोप करण्यात येईल. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी शहरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. तरुणाईचा, महिला मंडळांचा, विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि चंद्रपूरकर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. या देशभक्तीपूर्ण रॅलीत सहभागी होऊन आपल्या लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.