Tag: संतोष रावत

  • Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, गुरांना चराईसाठी संरक्षण द्या अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिला

    Terror of tigers – (गुरू गुरनुले) आज मरेगांव येथे वाघाच्या हल्यात एक गुराखी आज ठार झाला. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला.

    चिचाळा, ताडाळा, जानाळा, मरेगांव अशा एकापाठोपाठ एक गावात गुराख्यांवर वाघानी हल्ले करून ठार केले. यामुळे या भागातील नागरीकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. लोक जीवाच्या भितीने आपले दैनदिन कामेही करणे बंद केले आहे. शेतकरी शेतात जाण्यांस तर, गुराखी गुरे चारण्यास घेवून जाण्यास घाबरत आहे. यामुळे ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे.

    अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा

    वनविभागाने वाघाचे बंदोबस्त न केल्यांने, अनेक शेतकरी, आपल्या शेतीत पीके न घेता, शेत पडीत ठेवत आहे. यामुळे या शेतकर्यांची मोठी नुकसान होत आहे.

    महावीतरणची अभय योजना

    वनविभागाने या शेतकर्यांना भरपायी द्यावी, गुरांना चराईसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, चारा उपलब्ध करून द्यावा, वाघांचा बंदोबस्त करावा, शासनाने वाघ मारण्यांची तातडीने परवाणगी द्यावी अशी मागणी संतोष रावत यांनी केली आहे.

    वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून ग्रामिणांना दिलासा न दिल्यास कॉंग्रेसच्या वतीने उपनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा श्री. रावत यांनी दिला आहे.

  • बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू उरकुडे यांच्या प्राप्त तक्रारीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत बँकेच्या मेंडकी शाखेची सखोल चौकशी करण्यात आली.

     

    चौकशीत 17 लाख 67 हजार 315 रूपये 65 पैश्याची अपरातफर झाल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने बँकेची विनंती व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक साजन साखरे यांनी मेंडकी शाखेचे लेखा परीक्षण केल्यानंतर निदर्शनास आलेल्या अफरातफरी विषयी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदविली.

     

    प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम 420, 465, 466, 467 468, 471, 409, 34 भादविनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासांती रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे व एस बी शेंडे या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडल्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना अटक केली.

     

    पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अमित राऊत यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी जामीनकरिता न्यायालयाला विनंती केली, परंतु अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी विड्रॉल स्लिप व व्हाँवचर लिस्ट नुसार अमित राऊत यांनी 3 लाख 89 हजार 11 रुपयाची अफरातफर केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कारण नमुद करून अमित राऊत यांची जमानतीची विनंती फेटाळून लावली.

     

    अमित राऊत यांना पोलिसांनी 21 सप्टेंबर 2020 रोजी अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 रोजी ब्रह्मपुरी न्यायालयाने जमानत दिली तोपर्यंत अमित राऊत पोलीस व न्यायालयीन कोठडीत होते. कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी 48 तासाचे वर पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांचेविरूध्द नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आहेत.

     

    अमीत राऊत यांच्या कोठडीतील कार्यकाळ दीड महिन्याच्या वर होत असल्याने बँक प्रशासनाने नियमानुसार त्यांचे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही केली, सेवानिवृत्त सहकार अधिकारी शिरभय्ये यांचे मार्फतीने विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर अमित राऊत दोषी असल्याचा निवाडा दिला. विभागीय चौकशी अंती दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांसंबंधी 30 जून 2021 रोजी पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 21 नुसार दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी असे सर्वानुमाते ठरविण्यात आल्याने बँकेने दोषी कर्माचा-यांविरूध्द बडतर्फीची कारवाई केली.

     

    बडतर्फीच्या कारवाईनंतर अमित राऊत यांनी चंद्रपूर येथील कामगार न्यायालयात धाव घेतली, दरम्यान कामगार न्यायाधीश यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राऊत यांचे विरुद्ध झालेली चौकशी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार झाली असून चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निवाडा कायदेशीर असल्याचा निर्णय 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला. यामध्ये बँक प्रशासनाने कोणतीही गैरकृती केली नसून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध हेतू पुरस्सर कोणातीही कारवाई केली नाही.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी कारवाई केली आहे. असे असताना काही मंडळी अमित राऊत यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात बँकेच्या काही संचालक व अधिकाऱ्यांना गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब अयोग्य व निराधार असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला आहे.

  • आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    News34 chandrapur

    मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.

     

    तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे. असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

     

    मुल- सावली तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली होती. त्यावेळेला महावीकास आघाडीचे शासन असताना कृषी मंत्री श्री. दादा भुसे, आमदार तथा पालक मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रत्यक्ष मुल – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले होते तशीच परिस्थिती यावषी सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत.

     

    दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येतच असतात. यावर्षी सुरवातीलाच धांनाला २८०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. परंतु आता आलेल्या पाण्यामुळे धानाची पोत ओली झाली तर मात्र कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही. कारण तांदूळ लाल होतात. म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेऊन रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे. हीच परिस्थिती कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची आहे.

     

    कापसाचे बोंड वेचण्यााठी आली असताना अचानक आकस्मिक पाऊसाने कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अशा प्रसंगी शासनाने, मा. पालक मंत्र्याने, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व शासनाकडे तसा अहवाल त्वरित सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा खरीप पिकाचे विमा काढला असून शासनानेच विमा कंपनीला तसे आदेश देऊन शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला लावावी आणि शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल – सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

  • त्या कुटुंबांना संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा चिचाला येथील शेतकरी मजूर महिला धान लागवडीच्या शेतात निंदणाचे आठ महिला काम करीत असतांना दिनांक १/१०/२०२३ रोजी दुपारी अचानक आकस्मिक वादळी वारा व पाऊस आल्याने विज अतिशय तीव्र गतीने कडाडली व महिला काम करीत होते त्याच शेतात वीज पडल्याने एक महिला सौ. चंद्रकला संजय वैरागडे वय (४५) ही जागीच गतप्राण झाली. व सौ.आशाताई रवींद्र बुरांडे वय(३५) गंभीर जखमी झाली. ही घटना घडल्याने चींचाला गावात दुःखाचे वातावरण पसरले.

    आर्थिक मदत
    मदतीचा धनादेश देताना

    वैरागडे कुटुंब पोरका झाल्याने गरीब शेतकरी कुटुंबाची फार मोठी हानी झाली. तर बुरांडे कुटुंबावर अचानक संकट आल्याने पत्नीच्या उपचारासाठी पतीला आर्थिक मदतीसाठी धावपळ करण्याची वेळ आल्याने दोन्ही कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याची बातमी कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी चींचाडा येथे मृत्यू पावलेल्या वैरागडे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला व स्वतःहा कडून रोख रुपये १० हजाराची आर्थिक मदत दिली. तसेच जखमी असलेल्या सौ.बुरांडे महिलेच्या घरी जाऊन त्यांचही विचारपुस केली.उपचाराबाबत त्यांना धीर दिला. आणि स्वतःहा कडून ५ हजाराची आर्थिक मदत त्यांना दिली. याप्रसंगी दोन्ही कुटुंब प्रमुख यांच्या हातात मदत दिली.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,माजी सभापती व विद्यमान संचालक तथा माजी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, बाजार समिती माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, ग्राम पंचायत उपसरपंच सूरज चलाख, माजी उपसरपंच यशवंत चलाख, तेजराज ठेमस्कर,जनार्दन आत्राम, सौराज इटकेलवार,सदस्य, दीपक मेश्राम सदस्य,वासुदेव बुरांडे सदस्य,बालाजी निकूरे,सुखदेव वासेकर,संजय टिकले आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

  • त्या कुटुंबाला संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले.

    शेतकरी हा कुटुंबाचा आधार असतो.तोच गेला तर संपूर्ण कुटुंबच निराधार होतो ही दुर्दैवी घटना घडली.त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई टिकले, मुले ईश्वर व रुपेश असा परिवार आहे.

     

    मूल तालुक्यातील यापूर्वीही चिचाळा येथे वाघानेच एका दिवशी दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजीच आहे. शेतकरी सुर्यभान टिकले यांनी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत हे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन स्वतःहा कडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, तेजराज ठेमस्कर, बालाजी निकूरे, चालदेव मांदाडे, बबलू गांडलेवार, मुन्ना मडावी, सूरज इतकेलवार, ग्रा. प सदश जनार्दन आत्राम, कृष्णाजी टिकले, सुभाष मंकीवार, अनुप लेंनगूरे, श्रीनिवास टिकले, उपसरपंच सूरज चलाख, पोलिस पाटील दुर्गे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, पवन बलगेलवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम. ५२२ कक्षात त्याच्याच शेतात त्याचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

     

    याबाबत संतोष सिंह रावत यांनी कुटुंबियांसमोर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे यांना मोबाईल वर बोलून वनविभागाकडून तात्काळ पूर्ण आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. तसेच वन्य प्राणी वाघ,रानटी डुकरे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करीत असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा.व वणाला तारेचे कुंपण करावे अशी मागणी देखील याप्रसंगी केली.