Tag: चंद्रपूर बातमी

  • Chandrapur Heritage : व्हॅलेंटाईन डे ला चंद्रपुरात सलाम राणी हिराई कार्यक्रम

    Chandrapur Heritage : व्हॅलेंटाईन डे ला चंद्रपुरात सलाम राणी हिराई कार्यक्रम

    News34 chandrapur

    *‘सलाम राणी हिराई’ सारख्या कार्यक्रमातून युवकांनी आदर्श घ्यावा*
    *शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई वास्तुवर पुष्पअर्पण करीत इतिहासाला उजाळा*
    *इको-प्रोसह एफईएस, सरदार पटेल, खत्री व समाजकार्य महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग*

    चंद्रपूरः शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्था, एफईएस गर्ल्स महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय व मामीडवार समाजकार्य महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विदयार्थीनीनी पुष्पअर्पण करून”सलाम राणी हिराई” कार्यक्रमातून अजरामर प्रेमाचे, कर्तृत्वाला उजाळा देत कार्यक्रमातून संदेश देण्यात आला.

    आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विदयाथ्र्याना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या समाधी-वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

    ‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने बांधुन एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत विविध प्राध्यापकांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान डॉ करुणा करकाडे, डॉ रवी वाळके, डॉ माहुरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.

    यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डाॅ. राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा डॉ आनंद वानखेडे यांनी मानले, उपस्थित प्राध्यापक यावेळी एफईएस महाविद्यालयचे प्रा. डॉ.मिनाक्षी जुमले, डॉ मेघमाला मेश्राम, डॉ.राजेश चिमनकर, डॉ.योगेश निमगडे, डॉ अनिल कुभंलकर, प्रा लोकेश दरवे, प्रा.पल्लवी खोके, प्रा स्वाती कनडोतीवार, सरदार पटेल महाविदयालय चे प्रा कुलदीप गौड, खत्री महाविद्यालय चे प्रा संतोष कावरे इको-प्रो चे नितीन रामटेके,  धर्मेंद्र लुनावत, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, भारती शिंदे, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, अब्दुल जावेद यासह अन्य इको-प्रो सदस्य व शेकडो विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

  • चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसेच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच, मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले, पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसऱ्याची रेष पुसणार नाही स्वतःची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे.’कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘१५ नोव्हेंबर १८७५ ला त्यांचा जन्म झाला आणि अवघे २५ वर्षांचे आयुष्य ते जगले. त्यातही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १९४२ ला भारत छोडो आंदोलन झाले, पण खरा एल्गार बिरसा मुंडा यांनी केला. ‘अंग्रेजो अपने देश वापस जाओ… हमारा देश हमारा राज’ अशी गर्जना त्यांनी दिली. भारतीयांच्या मनात त्यांनी हा भाव पोहोचवला,’ असे ते म्हणाले.

     

    समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचे होते. त्यांच्यात शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यावेळी जर्मन मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागला. पण दुर्दैवाने या शाळेने सर्वांत मोठी अट ठेवली ती म्हणजे धर्मांतरण करण्याची. बिरसा मुंडा यांनी काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलेही. पण एक दिवस शाळेतील एका शिक्षिकेने जेव्हा त्यांच्या समाजासाठी अपशब्द वापरले तेव्हा बिरसा मुंडा उठले आणि त्यांनी एल्गार केला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी जबरदस्तीने लागलेला धर्मही सोडला. आज विविध देश भारताच्या प्रगतीकडे वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांच्या संघटना भारतात विषारी विचार पसरवत आहेत. पण बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेत आपण सावध राहिले पाहिजे.’ यावेळी त्यांनी अशोक तुमराम व त्यांच्या संपूर्ण टीमचे पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी अभिनंदन केले.

     

    आदिवासी समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत

    आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. पण २००५ मध्ये आदिवासींच्या आरक्षणावर मी विधीमंडळात चर्चा उपस्थित केली. तेव्हा माझ्याविरोधात मोर्चा निघाला. कारण मी आदिवासी समाजाची बाजू घेतली होती. ज्या समाजाने वनामध्ये, पर्यावरणामध्ये देव बघितला, त्या समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत असताना कोणतीच ताकत माझे काहीच बिघडवू शकत नाही, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

     

    तीच खरी आदरांजली ठरेल

    आदिवासी तरुणांना संधी दिली तर ते कधीही मागे राहणार नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक देणगीचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी समाजातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला केले. ज्यावेळी आपण आदिवासी समाजातील इंकम टॅक्स भरणाऱ्या शंभर तरुणांचा सत्कार याच ठिकाणी करू ती खरी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली असेल आणि तोच खरा लोकार्पण सोहळा असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ‘हजारो मंजिल का सफर हम पुरा कर सकते है… एक कदम आगे चलना होगा…’ या ओळींच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आवाहन केले.

     

    आदिवासींची प्रगती थांबवू शकत नाही

    अशोक तुमराम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दुःखद घटना घडली. त्यांच्या धर्मपत्नी जमुना तुमराम यांचे निधन झाले. अशोक तुमराम यांनी आपले दुःख काही क्षण बाजुला ठेवून समाजासाठी इथे उपस्थित झाले. समाजासाठी झटणारे असे लोक असतील तर आदिवासी समाजाची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    आदिवासी समाजासाठी…

    मी अर्थमंत्री झाल्यानंतर श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाचा निर्णय केला. दुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी गावांना पायाभूत सुविधांसाठी निधीच मिळत नसताना मी अर्थसंकल्पात साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि २ हजार ८९५ आदिवासी गावांना हा निधी थेट पोहोचवला. याचा फायदा तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झाला. तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचे ७२ कोटी रुपये आदिवासींना बोनसच्या रुपात देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, याचा ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

     

    आदिवासी तरुण होणार पायलट

    चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.‘एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास ५० लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे ४८ लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी ५० टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

     

    वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम

    मी मंत्री नसतानाही केंद्राकडे पाठपुरावा करून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढले. आता त्यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम चंद्रपुरात होणार आहे. २५ कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. पण विदर्भातील सर्वांत उत्तम स्टेडियम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. २०३६च्या अॉलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्याचे काम या स्टेडियमच्या माध्यमातून होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    तीनशे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह

    आपण एकाच ठिकाणी नव्हे तर जील्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी वसतिगृहांना मान्यता घेतली. चंद्रपूरचे वसतीगृह बांधून तयार आहे. पोंभूर्णा आणि सावलीलाही आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह होणार आहे. बल्लारपुरजवळील ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहे. आणि याठिकाणी दरवर्षी तिनशे आदिवासी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता ३०० मुलींचे वसतीगृह करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.

    लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्यावर मुल तालुक्यातील समस्त गावे पिंजून काढून राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांनी दिलेला संदेश प्रतेक गावात प्रतेक घरा – घरात चर्चेद्वारे पोहचविण्यात आला.

     

    जनसंवाद यात्रेचा समारोप आकापुर, टेकाडी चीमढा गावातून कांग्रेस नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांचे नेतृत्वात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत भव्य जनसंवाद रॅली काढून ग्रा.पं.सरपंच कालिदास खोब्रागडे यांचे अध्यक्षतेखाली चिमढा गावात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांचे पुतळ्यासमोर करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार,माजी सभापती व संचालक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष संदीप कारंमवार, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नेते दीपक वाढई, सेवादलाचे जेष्ठ नामदेवराव गावतूरे, उपस्थित होते.

     

    समारोपीय कार्यक्रम निमित्त तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी जनसंवाद यात्रेबाबत राहुलजी गांधी यांचा संदेश आपल्या संवादातून सविस्तरपणे समजाऊन सांगितला.तर ओबीसी कांग्रेस सेलचे राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनीही केंद्र व राज्य सरकार जनतेची पिळवणूक कशी करीत आहे.शिक्षण सुद्धा विकत असल्याने तुम्ही आतातरी जागृत होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाचे आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी केले.

     

    यात्रेत व समारोपीय कार्यक्रमाला युवक अध्यक्ष पवन नीलमवार,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,एन. टी.सेल अध्यक्ष गणेश गेडाम, महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार,सचिव शामला बेलसरे,कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार,सदस्य सीमा भसारकर समता बनसोड, विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष अरविंद बोरुले, उपसरपंच साहिल येंनगंटीवार, योगेश लेंनगूरे, साजिद शेख, गंगाधर घुगरे, ईश्वर लोनबले चिमढा ग्रा. पं.सर्व सदस्य, व असंख्य महिला पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.