Tag: चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

  • Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller : चंद्रपुरात चिल्लर भाजीपाला विक्रीचा वाद शिगेला

    Vegetable seller चंद्रपूर – चंद्रपुरात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ठोक भाजीपाला विक्रेता व्यापाऱ्यांनी मनमर्जी वागत भाजीपाल्याची चिल्लर विक्री सुरू केली आहे, ते पूर्णतः नियमबाह्य आहे, त्या चिल्लर विक्रीमुळे गंजवार्ड येथील भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

    त्या दलालांविरोधात अनुसूचित जनजाती आयोगाला तक्रार

    Vegetable seller ठोक व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद न केल्यास गंजवार्ड येथील भाजी विक्रेता संघटना 12 फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन करणार असा इशारा 9 फेब्रुवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
    विशेष म्हणजे सदर चिल्लर विक्री ही ठोक व्यापारी व बाजार समिती संचालकांनी सुरू केली आहे.

    चंद्रपुरात आता ठोक व चिल्लर भाजी विक्रेत्यांचा वाद येणाऱ्या काळात वाढणार असल्याची चिन्हे आहे.

    चंद्रपूर शहरात दररोज पहाटे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मध्ये शेतकरी भाजीपाला घेऊन दाखल होतात, सदर भाजीपाल्याची बोली लागल्यावर लहान व्यापारी ते खरेदी करतात, आणि बाजारात विक्रीसाठी आणतात मात्र सध्या मोठे व्यापारी चिल्लर विक्री करीत असल्याने लहान व्यापाऱ्यांचा माल कुणी खरेदी करीत नाही, त्यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी चिल्लर विक्री बंद अशी मागणी लहान व्यापाऱ्यांनी केली आहे.

    छोटे व्यापारी म्हणतात की आम्ही चिल्लर विक्री करीत आपल्या परिवाराचे पोषण करतो मात्र मोठे व्यापारी आमच्या पोटावर लाथ मारू बघत आहे, हे अत्यन्त चुकीचे आहे त्यांनी आता चिल्लर विक्री थांबवायला हवी. अन्यथा आम्हाला मोठ्या व्यापारी विरोधात आंदोलन करावे लागेल.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून पोडे कुटुंबियांचे सांत्वन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चैतन्य व भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांचा दुर्दैवी व अकाली मृत्यू झाला. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या नांदगाव येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

     

    यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, चंद्रपूर तालुका काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल,अनिता बोबडे यांची उपस्थिती होती.

     

    मोठ्या वडिलांचे अंतिम विधीनंतरचे कार्य पार पडण्यासाठी अख्खे कुटुंब व नातेवाईक वर्धा – इरई नदीच्या संगमावर गेले. तेथे मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम घेतला. अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावाजवळ वर्धा – इरई नदीच्या संगमावर रविवारी घडली. हि घटना दुर्दैवी असून यातून पोडे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.